वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्यासाठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे
भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.
'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता.
१६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो.
समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते.
ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला.
यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.

जगीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारी मना तूंचि शोधूनि पाहे |
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले | तयासारिखे भोगणे प्राफ्त झाले ||11||
मना मानसी दुःख आणू नको रे | मना सर्वथा शोक च़िंता नको रे |
विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||12||
मना सांग पां रावणा काय झाले | आकस्मात ते राज्य सर्वै बुडाले |
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं | बळे लागला काळ हा पाठलागी ||13||
जिवा कर्मयोगें जनी जन्म झाला | परी शेवटीं काळमूखी निमाला |
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले | कितीएक ते जन्मले आणि मेले ||14||
मना पाहता सत्य हे मृत्यभूमी | जितां बोलती सर्वही जीव मी मी |
चिरंजीव हे सर्वही मानिताती | आकस्मात सांडूनिया सर्व जाती ||15||
मरे ऐक त्याचा दुजा शोक वाहे | आकस्मात तोही पुढे जात आहे |
पुरेना जनी लोभ रे क्षोभ होतो | म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतो ||16||
मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते | आकस्मात होणार होऊन जाते |
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे | मतीमंद ते खेद मानी वियोगे ||17||
मना राघवेवीण आशा नको रे | मना मानवाची नको कीर्ति तू रे |
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ||18||
मना सर्वथा सत्य सोडू नको रे | मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
मना सत्य ते स्ा़त्य वाचे वदावे | मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ||19||
बहू हिंपुटी होज्ञख्154लृजे मायपोटी | नको रे मना यातना तेचि मोठी |
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी | अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ||20||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
मना वासना चूकवी येरझारा | मना कामना सांडि रे दव्यदारा |
मना यातना थोर हे गर्भवासीं | मना सज्जना भेटवी राघवासी ||21||
मना सज्जना हीत माझे करावे | रघूनायका दृढ चित्ती धरावे |
महाराज तो स्वामि वायूसुताचा | जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22||
न बोले मना राघवेंवीण कांही | जनी वाउगे बोलता सूख नाही |
घडीने घडी काळ आयुष्य नेतो | देहांती तुला कोण सोडू पाहतो ||23||
रघूनायकावीण वाया शिणावे | जनासारिखे व्यर्थ का वोसणावे |
सदासर्वदा नाम वाचे वसो दे | अहंता मनीं पापिणी ते नसो दे ||24||
मना वीट मानू नको बोलण्याचा | पुढे मागुता राम जोडेल कैंचा |
सुखाची घडी लोटता सुख आहे | पुढे सर्व जाईल कांही न राहे ||25||
देहेरक्षणाकारणे यत्न केला | परी शेवटी काळ घेवोनि गेला |
करी रे मना भक्ती या राघवाची | फ्ेाढे अंतरी सोडि चिंता भवाची ||26||
भवाच्या भये काय भीतोस लंडी | धरी रे मना धीर धाकासि सांडी |
रघूनायकासारिखा स्वामि शीरी | नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||
दिनानाथ हा राम कोदंडधारी | पुढे देखता काळ पोटी थरारी |
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||28||
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे | बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणे विमानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||29||
समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||30||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl
(ऋग्वेद१/१६४/४६)
[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणीगॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].
आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात,त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही.
आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.
ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती.
हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पनापुढे आणली.
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥
(ईशान उपनिषद /६)
जो सर्व प्राणीमात्रां मध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पनात्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.
भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.
काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली,नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा,विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एक सुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषीमुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.
पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे'.
महासंकटी सोडिले देव जेणे | प्रतापे बळे आगळा सर्व गूणे |
जयांते स्मरे शैलजा शूलपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||31||
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली | पदी लागता दिव्य होऊनि गेली |
जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||32||
वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा | शशी सूर्य तारांगणे मेघमाळा |
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||33||
उपेक्षा कदा रामरूपी असेना | जिवा मानवा निश्चयो तो वसेना |
शिरी भार वाहेन बोले पुराणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||34||
असे हो जया अंतरी भाव जैसा | वसे हो तया अंतरी देव तैसा |
अनन्यासि रक्षीतसे चापपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||35||
सदा सर्वदा देव सन्नीध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे |
सुखानंद आनंद कैवल्यदानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||36||
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||37||
मना प्रार्थना तूजला एक आहे | रघूराजअंकीत होऊनि राहे |
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||38||
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | जयाचेनि योगे समाधान बाणे |
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||39||
मना पाविजे सर्वही सूख जेथे | अती आदरे ठेविजे लक्ष तेथे |
विवेके कुडी कल्पना पालटीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||40||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही |
विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41||
बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे |
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42||
मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे |
रघूनायकावीण बोलो नको हो | सदा मानसी तो निजध्यास राहो ||43||
मना रे जनी मौनमुदा धरावी | कथा आदरे राघवाची करावी |
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे | सुखालागि आरण्य सेवीत जावे ||44||
जयाचेनि संगे समाधान भंगे | अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी | जिये संगतीने मती राम सोडी ||45||
मना जे घडी राघवेंवीण गेली | जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघूनायकावीण तो शीण आहे | जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ||46||
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे | जनी जाणता भक्त होऊनि राहे |
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||47||
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा |
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा | जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||48||
सदा बोलण्यासारिखें चालताहे | अनेकीं सदा एक देवासि पाहे |
सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||49||
नसे अंतरी काम नाना विकारी | उदासीन जो तापसी ब्रह्मचारी |
निवाला मनी लेश नाही तमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||50||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुध्दी | प्रपंचीक नाही जयाते उपाधी |
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||51||
क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे | न लिंपे कदा दंभवादे विवादे |
करी सूखसंवाद जो ddऊगमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||52||
सदा आर्जवी प्रीय जो सर्वलोकी | सदासर्वदा सत्यवादी विवेकी |
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||53||
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी | मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |
चळेना मनी निश्र्चयो दृढ ज्याचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||54||
नसे मानसी नष्ट आशा दुराशा | वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा |
ऋणी देव हा भक्तीभावें जयाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||55||
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू | स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू |
तया अंतरी क्रोध संताप कैंचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||56||
जगी होइजे धन्य या रामनामे | क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे |
उदासीनता तत्वता सार आहे | सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ||57||
नको वासना वीषयी वृत्तिरूपे | पदार्थी जडे कामना पूर्वपापे |
सदा राम निष्काम चिंतीत जावा | मना कल्पनालेश तोही नसावा ||58||
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी | नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |
मनी कामना राम नाही जयाला | अती आदरे प्रीति नाही जयाला ||59||
मना राम कल्पतरू कामधेनू | निधी सार चिंतामणी काय वानू |
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता | तया साम्यता कायसी कोण आता ||60||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा तेचि आहे |
जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा ||61||
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला | बळे अंतरी शोक संताप ठेला |
सुखानंद आनंद भेदे बुडाला | मनी निश्र्चयो सर्व खेदे उडाला ||62||
घरी कामधेनू पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनि वेवाद लागे |
करी सार चिंतामणी कांचखडे | तया मागता देत आहे उदंडे ||63||
अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना | अती काम त्या राम चित्ती वसेना |
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा | अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ||64||
नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे | अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे |
धरी रे मना आदरे प्रीति रामी | नको वासना हेमधामी विरामी ||65||
नव्हे सार संसार हा घोर आहे | मना सज्जना सत्य शोधूनि पाहे |
जनी वीष खाता पुढे सूख कैंचे | करी रे मना ध्यान या राघवाचे ||66||
घनश्याम हा राम लावण्यरुपी | महाधीर गंभीर पूर्णप्रतापी |
करी संकटी सेवकाचा कुढावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||67||
बळे आगळा राम कोदंडधारी | महा काळ विक्राळ तोही थरारी |
पुढे मानवा किंकरा कोण केवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||68||
सुखानंदकारी निवारी भयाते | जनी भक्तीभावे भजावे तयाते |
विवेके त्यजावा अनाचार हेवा | फ्ा्रभाते मनी राम ंिचंतीत जावा ||69||
सदा रामनामे वदा पूर्णकामे | कदा बाधिजेना पदा नित्यनेमे |
मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||70||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71||
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही |
महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72||
देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||73||
बहूतांपरी संकटे साधनांची | व्रते दान उद्यापने ती धनाची |
दिनाचा दयाळू मनी आठवावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||74||
समस्तामध्ये सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधूनि पाहे |
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||75||
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही | नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही |
म्हणे दास विश्वास नामीं धरावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||76||
करी काम निष्काम या राघवाचे | करी रुप स्वरुप सर्वा जिवाचे |
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता | हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||77||
अहो ज्या नरा रामविश्वास नाही | ताया पामरा बाधिजे सर्व कांही |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता | वृथा वाहणे देहसंसारचिंता ||78||
मना पावना भावना राघवाची | धरी अंतरी सोडि चिंता भवाची |
भवाची जिवा मानवा भूलि ठेली | नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||79||
धरा श्रीवरा त्या हरा अम्तराते | तरा दुस्तरा त्या परा सागराते |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते | करा नीकरा त्या खरा मत्सराते ||80||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
Copyright © 2025 | Marathisrushti