(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • वाल्मिकी रामायण – रामसेतुचे पूर्ण सत्य

    रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

    आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार्‍या १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भौगोलिक संरचना आहे. यासंरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठलाही पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे सनातनी लोक म्हणतात, हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

    दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.

    आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.

    आपल्या देशात आजही दुर्गम भागातले लोक पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीही जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.

    p-20193-Ram-Setu-2वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. किनार्‍यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

    वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.


    टीप:
    वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

    ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
    बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

    ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
    कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

    बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
    चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

    हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
    पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥

    संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

    समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
    सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

    दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
    वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

    मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
    पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

    संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥

    -- विवेक पटाईत
  • ॐ जय जय जी गणराज


    ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
    धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।

    शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।।
    दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
    हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।।
    महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।।

    ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।

    अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।।
    विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।।
    कोटीसुरजपकाश ऐसी छब तेरी ।।
    गंडस्थल-मदमस्तक झुले शशिबिहारी ।।2।।

    ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।

    भावभगतसे कोई शरणागत आवे ।।
    संतती संपती सबही भरपूर पावे ।।
    ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।।
    गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।3।।
    ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
    धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. वृक्षाली घाणेकर

  • जय देवी जय देवी विंझाई माते


    जय देवी जय देवी विझाई माते।
    आरती गातो मी तुझी गुण किर्ते।
    जय देवी जय देवी ।।धृ।।

    वेहेर गांवी एकविरा तुं।
    भवानी म्हणसी तुळजापूरी तुं।
    विध्याचली तु विध्यवासिनी।
    प्रधानांची तु कुलस्वामिनी ।।1।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    शुंभ नि शुंभादि राक्षस वधिले।
    महिषादि असुर त्वांची वधिले ।।
    निर्भय त्वांची भत्त*ासी केले ।
    कायस्थासी तुं अजी रक्षिले ।।2।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    प्रसन्न होता वरदान देशी ।
    सर्व गुणे तु संपन्न करशी ।।
    गणेश सुत विनवी तुजशी ।
    विनम्र सदा तव चरणाशी ।।3।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    गायक - श्री.गजानन प्रधान.

  • जय जय अंबे

    जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे
    महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।।

    रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*।
    ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।।
    घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला ।
    करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    रूद्र रूप ते प्रचंड भासे कंठी शीरांचे हार ।
    लवलव लवलव जिभही करीते कटी बांधिले करहार ।।
    भु भु:त्कारे कंपे धरणी कंप सुटे गगनावर ।
    वर्ण निळा हा काळा भासे नेत्री विलसे भास्कर ।।2।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    उग्र रूप रूद्र स्वरूप त्वरीतही तारी भत्त*ांते ।
    असंख्य रूपे धारण केली तारण करण्या भत्त*ांते ।।
    कोधी येता काली म्हणसी शांत स्वरूपी विझाई ।
    भत्त*ा दासा गणेश सुता मुत्त* करी त्वरीत ही आई ।।3।।
    जय जय अंबे ।।धृ।।

    गायक - श्री.गजानन प्रधान.

  • उदो बोला उदो

    उदो बोला उदो अंबा विझामाऊलीचा हो । उदो बोला उदो ।।
    उदोकार गर्जती सकल प्रधान मंडळी हो । उदो बोला उदो ।।धृ।।

    सह्याद्री पर्वती नगरी ताम्हीणीते मधी हो ।
    देवी विझाई वसली प्रधान कुल रक्षिणी हो ।।
    मूळ रूप जगन् माता अंबा विध्याद्री पर्वती हो।
    ताम्हीणीते आली भत्त*ा प्रसन्न होऊनी हो ।।1।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    सप्तशति जप होम हवने सद्भत्त*ी करूनी हो।
    श्रेष्ठ गंगा सुते विध्य पर्वती आकान्त मांडीला हो ।।
    तनु त्यागुनि विलिन झाला जगदंब स्वरूपी हो ।
    जगतामध्ये कीर्ती केली कायस्थाचे कुळी हो ।।2।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    प्रसन्न झाली अम्बा कनिष्टा कारणी हो ।
    रक्षीन तुझे कुला सूर्य चंद्र हो परी हो ।
    मागणे मागतो विध्यवासीनी चरणी हो ।
    दासा गणेश सुता ठाव द्यावा तो चरणी हो।।3।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    गायक- श्री.गजानन प्रधान.

  • ओवाळू ओवाळू आरती


    ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा।
    मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।

    अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।
    अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।।
    ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।

    भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ।
    सारासार निवडू जाता न दिसे थारा ।।2।।
    ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
    मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।

    काळातील कळानिधी पर्वती ठाण । अंबे पर्वती ठाण ।
    भत्त* शिवाजीसी दिधले पूर्ण वरदान ।।3।।
    ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
    मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।

    चिच्छत्ते*, चिन्मात्रे, चित्त, चैतन्य बाळे । अंबे चैतन्य बाळे ।
    विठ्ठल सुतात्माजी दावी पुर्ण सोहाळे ।। 4 ।।

    ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
    मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।

    गायक - श्री.मनोहर पवार

  • प्रचंड चंडाबाई

    प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो ।
    ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
    कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो।
    गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो ।
    भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो ।
    खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।।
    प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
    अष्टदश भुजदंड माथा बरग्या पिगट जटा हो।
    रत्त*ांबर परिधान शोभे कासोटा तटतटीत हो।
    चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा हो।
    तकाकी शोणित राहे तेज फाकितसे अंबरी हो ।।धृ।।
    प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
    सिहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो ।
    पसरूनी वितंड दाढा वदनी केले अग्नीकुंड हो।
    घोर गर्जना केली कंपित झाले हे ब्रम्हांड हो ।
    थरथर कापती असुरे पळती अपूरे हे ब्रम्हांड हो ।।धृ।।
    प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
    भृकूटी व्यंकट केल्या नेत्री अग्नीचे स्फूलींग हो।
    थयथय टाकीसी ज्वाला करिसी असूराचा मुळभंग हो ।
    खणखण वाजती खडगे, सणसण सोडिसी कैसे शर हो ।
    घणघण घंटा नादे दूमदूले अवती अंग हो ।।धृ।।
    प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
    ऐसी ही अदिशत्त*ी हिचा न कळे कोणा पार हो
    स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकी जयजयकार हो ।
    विनवी गिरजा नंदन अंबे चरणी नमस्कार हो
    ऐसी ही जगदंबा भत्त*ा नेईल अक्षय पार हो ।।धृ।।
    प्रचंड चंडाबाई ।।धृ।।

    गायक - श्री.विनोद पंदीरकर.

  • जगत श्रेष्ठ अवतार

    जगत श्रेष्ठ अवतार अंबा विझा देवीचा । अंबा विझा देवीचा ।
    ताम्हीणीते वास, ताम्हीणीते वास देवी विध्यवासिनीचा
    हो देवी विध्यवासिनीचा ।।धृ0।।
    उपासक शत्त*ी प्रभु चांद्रसेनिय । कायस्थाते रक्षी दुर्गा विध्य पर्वतीय ।।1।।
    महिषादी असुर अंबे त्वांची वधिले । अनंत नांवे रूपे दुर्गे भत्त* तारीले ।।2।।
    गंगा सुते अतुल भत्त*ी अंबेची केली । विध्यवासिनी देवी नच प्रसन्न झाली ।।3।।
    बंधू द्वया दिधला अंबे तुच दृष्टांत । श्रेष्टाने करावा मम चरणी देहान्त ।।4।।
    पाहिलेस सत्व अंबे प्रधान रामाचे । अर्पण केले शीर, तुते हस्ते स्वतचे ।।5।।
    शीर कमळ अर्पण करीता तव चरणी । भत्त* कौतुका लागी प्रगटे विझाई देवी ।।6।।
    माग माग पसन्न तुजला म्हणे महादेवा । विळेकरांच्या मूळ पुरूषा प्रभू महादेवा ।।7।।
    पहाताच जगत् अंबा प्रत्यक्ष आता । ब्रह्यानंदी लागे द्वितीय गंगा सूता ।।8।।
    मागणे ते एकची आहे आई जगदंबे । तव चरणासी विलीन करावे माते जगदंबे ।।9।।
    संतती संपत्ती कुलवृध्दी सर्व गुणे । आर्शिवाद माझा कूला काय उणे ।।10।।
    निरंतर ध्यान माझे तुम्ही करावे । संकट येता काही तुम्ही मजला स्मरावे ।।11।।
    पती बंधनी जाता अंबे स्मरले तुजला । माहेराचे देवी दे चुडेदान मजला ।।12।।
    त्याच करीता वास तुझा वैद्य देव्हारी । भाकेला गेली अंबा वैद्या घरी ।।13।।
    तव गुण वर्णितां सर्व देवही शिणले। विध्यवासिनी देवी तुझे तुच वर्णिले ।।14।।
    गणेश सुत दास तुझा प्रार्थी भगवते । संधी द्यावी पुन्हा प्राण अर्पण्याते ।।15।।

    गायक - श्री.गजानन प्रधान.
    गायीका - सौ. हेमा.

  • आरती विंझाईला

    आरती विंझाईला । ताह्मिणीचे आईला।
    सप्रम आनंदाने । पंचारती ओवाळीन ।।धृ।।
    आरती विंझाईला ।

    तुंची एक परब्रह्य । निर्गुण तुचि साचार ।
    उत्पती स्थिती नाश । सर्व तुझाच भास ।।1।।
    आरती विंझाईला ।।धृ।।

    घेतली अनंत रूपे । भत्त* तारावयासी ।
    मारिले राक्षसाशी । खेळ आम्हा दाविशी ।।2।।
    आरती विंझाईला ।।धृ।।

    ऱ्हमलज्जा बिजरूपे । श्री ऱ्हंकार स्वरूपे ।
    अक्राळ विक्राळ सुक्ष्मे । सर्व स्थित्यंत रक्षे ।। 3।।
    आरती विंझाईला ।।धृ।।

    ताह्मिणीचे तापिणीला । श्री विझाई देवीला ।
    गणेश सुत प्रिय भत्त* । चरणी तिचे आसत्त* ।।4।।
    आरती विंझाईला ।।धृ।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.

  • अनाद्यंत खंडेराया

    अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा ।
    आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।।

    अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।।
    तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।।
    स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण त्रिशुळ हाती । हाती बोधाची तलवार ।।
    हिडता नगरी माजी । देखीयला चमत्कार । षड रिपू दैत्य थोर । तये ग्रासिले जेजूर ।।
    मर्दिले राक्षसाशी । हेची किर्ती केली थोर ।।1।। अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    घेतली दिक्षा तुझी । जीव दशा वाघ्या थोर । ँ़ कार येळ कोट । वारं वार उच्चारी ।।
    मागे मी सदा वारी । लक्ष चौऱ्यांशी घरी । एकविस सहस्त्र । शते सहा उच्चार करी ।।
    श्रमलो तेणे फार । हिडता दारो दारी । कौटमा औट हात । गळे तो नव द्वारी ।।
    वैराग्य झोळी गळा । सदा रिकामी सारी। फोडीतो दीर्घ टाहो ।
    घाली निज कृपा वारी ।।2।। अनाद्यंत खंडेराया ।।

    विकार वासनादी । विचारे फोडीयले । अनुभव गाळणीने । महाकष्टे गाळीयले ।।
    भंडार शुद्ध तोची । देहा भूषण शोभले । फोडूनी द्वैत भावा । ते खोबरे उधळीयले ।।
    होताची ऐक्य ऐसे । आत्मराज प्रगटले । कैचा देव कैचा भत्त* । देही देहिच देखीले ।।
    आनंदा पूर आला । मौन वाचेसी झाले । राधा गोविद सुताचे । पूढे बोलणे खुंटले ।।3।।
    अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. हेमा.