(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ५

    “जवा आगळं काशी” अर्थात काशी पेक्षा देखील एक जव भर अधिक महत्त्व असलेले स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्थित ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान परळी वैजनाथ.

      September 8, 2020


  • शेतकरी राजा

    असा उद्योगधंदा जगाच्या पाठीवर शोधुन तरी सापडेल का ?

    ९५२ किलो म्हणजे जवळपास टनभर कांद्याची विक्री. कांद्याला दर मिळाला प्रतिकिलो १ रुपया ६० पैशे.

    ९५२ किलोचे झाले १५२३ रुपये २० पैशे.

    त्या १५२३ रुपये २० पैशातुन आडत ९१ रुपये ३५ पैशे,

    हमाली ५९ रुपये,

    भराई १८ रुपये ५५ पैशे,

    तोलाई ३३ रुपये ३० पैशे आणि

    मोटार भाडे १३३० रुपये

    असे एकुण १५२२ रुपये २० पैशे वजा करुन

    हातात मिळाला 1 रुपया.

    हमाल, काट्यावाला, आडतदार, वाहतुकदार यांना रोजगार तर ग्राहकांना माफक दरात शेतीमाल उपलब्ध करुन हातात मिळालेली दमडी घेऊन तो विनातक्रार चालता झाला. एवढी दानत एखाद्या कर्तव्यदक्ष राजाकडेच असु शकते.

    म्हणुनच त्याच्यासाठी शेतकरी राजा हे विशेषण वापरले जात असावे.

      June 1, 2016


  • तारफुल

    तारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे.

      October 14, 2019


  • आई’चा संप..

    आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही.

      June 3, 2017


  • नैराश्यावर बोलू काही

    आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!!

      October 16, 2017


  • एलसीडी टीव्ही

    एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात.

      September 25, 2023


  • शरीरात पाण्याच्या कमतरतेने उद्भवणाऱ्या समस्या

    आपल्या शरीरासाठी पाणी म्हणजे जीवन असून आपल्या पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी श्वासाइतकीच पाण्याची देखील अत्यंत आवश्यकता असते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते तसेच त्याबरोबर आपल्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील पाण्याची खूपच मदत होते.

      April 15, 2019


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १०

    भगवान शिवशंकर तथा देवी पार्वतीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

      September 28, 2020


  • कत्तल गोवंशाचीच नव्हे समृध्दी आणि मूल्यांचीहा!

    प्रकाशन दिनांक :- 20/03/2005

    बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.

      March 20, 2005


  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ४

    कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थितां,
    षडंबरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् |
    विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं ,
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥४||

    महाविद्या श्री त्रिपुरसुंदरीचे अतुलनीय वैभव सांगतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनमध्यगां- कदंब वृक्षाच्या अर्थात कल्पवृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कनकमंडलोपस्थितां- कनक अर्थात सोन्यापासून मंडल म्हणजे वर्तुळाकार आसनावर विराजमान असणारी. मंडल हे पूर्णत्वाचे, अखंडत्वाचे प्रतीक आहे. वर्तुळ ज्या बिंदूपासून आरंभ होते त्याच बिंदूवर समाप्त होते. स्वतःतच परिपूर्ण असणे हे वर्तुळाचे लक्षण. आई त्या पूर्णतेवर आरूढ आहे.
    षडंबरुहवासिनीं- सहा कमळावर आरुढ असणारी. योगशास्त्रामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांचे वर्णन असते. तेथे विविध संख्यांच्या कमळांचे वर्णन केलेले असते. या सहा चक्रांवर निवास अर्थात विश्राम करीत कुंडलिनी स्वरुपा आदिशक्ती प्रवास करते. त्यामुळे तिला सहा कमळांवर निवास करणारी असे म्हटले आहे. सततसिद्धसौदामिनीम् - भक्तगणांना त्यांची इच्छित वरदाने पुरवण्यासाठी सौदामिनी अर्थात विजेप्रमाणे अत्यंत चपलगतीने त्यांच्यापर्यंत जाण्यास सदैव सिद्ध असणारी.
    विडम्बितजपारुचिं- आपल्या तेजाने जपा पुष्प म्हणजे जास्वंदीच्या फुलाच्या लाल रंगाला विडम्बित अर्थात चेष्टेने पराजित करणारी. विकचचंद्रचूडामणिं - कच म्हणजे केस. विकच म्हणजे व्यवस्थित रचना केलेले केस, अर्थात वेणी. त्यावर चूडामणि म्हणून जिने चंद्र धारण केला आहे अशी.
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये- भगवान शंकरांच्या सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 5, 2020