(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रात्री उशीरा जेवण

    वजन वाढू नये, यासाठी अनेक पदार्थ जेवणात टाळले जातात. पण याशिवाय जेवणाची वेळही आपलं वजन वाढवू शकते, असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. रात्री उशिरा जेवल्यास वजन वाढू शकतं, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील ‘सॉल्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज’ यांच्या नुसार रात्री जेवताना एकीकडे इंटरनेटवर काम करत असाल किंवा टीव्ही बघत असाल, तर तुमचं वजन वाढू शकतं. “दिवसातील काही काळ आपले आतडे, मांस पेशी आपल्या कामाची परीसीमा गाठत असतात. इतर वेळी त्या सुषुप्तावस्थेत असतात. या प्रत्येक अंगाची एक वेळ ठरलेली असते. ही वेळ चयापचय चक्र ठरवत असते. जेव्हा इंदिर किंवा माणूस रात्री अपरात्री आहार घेतात, तेव्हा त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो.” यामुळेच अवेळी आहार घेतल्यास वजन वाढतं आणि शरीर बेढब होत जातं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 2, 2017


  • भाषा…. मातृभाषा

    जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…

      June 23, 2011


  • देर आए, दुरूस्त आए

    बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता.

      July 9, 2024


  • वाहातं राहा..-

    आपली हिन्दू संस्कृती सिंधू नदीच्या काठी रुजली, फुलली, बहरली..! सिंधू आजही वाहती आहे आणि हिन्दू संस्कृती आजही नांदती आहे..सिंधूचं वाहणं आपल्या रक्तात एवढं भिनलंय की आपण आयुष्याच्या वाहण्याला ‘जीवन प्रवाह’ असं नांवच देऊन टाकलंय. पण एकेकाळी मोकळी, वाहती असलेली आपली संस्कृती आता हळुहळू बंदीस्त होऊ लागलीय.

      March 27, 2017


  • प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

    शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते.

      August 14, 2019


  • लाय डिटेक्टर

    या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते.

      October 15, 2022


  • जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

    महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

    ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
    मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
    याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

    त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'

    “ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

    "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
    वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,

    "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
    संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

    " महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
    वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
    "महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
    "नक्कीच, ऐक तर,"
    वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

    "पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

    संजयाने मानेने नकार दर्शवला.
    "कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"

    संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
    "तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"

    वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
    "भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."

    संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"

    वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
    " याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
    तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
    मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."

    संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

    "वा!"
    वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"

    "कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'

    संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

    पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!

      August 6, 2017


  • निवृत्ती नंतरच्या व्यथा !

    सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्‍या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !

      June 10, 2011


  • किचन क्लिनीक – दही

    दही हा पदार्थ जरी दुधापासूनच बनत असला तरी दुध व दह्याच्या गुणधर्मात बराच फरक आहे.दुधासारखे जर आपण दह्याचे नियमीत सेवन केले तर ते रोगांना आयतेच निमंत्रण दिल्या सारखे होईल.

    दही हा पदार्थ थंड असून तो शरीरात थंडावा निर्माण करतो हा जो समज आपल्या समाजात रूढ झाला आहे तो पुर्णत: चुकीचा आहे.वास्तविक दही हे उष्ण गुणाचे असते.

    आता दह्याचे सामान्य गुणधर्म पाहूया:

    दही हे शरीरात स्निग्धपणा निर्माण करते,पचायला जड असते,तोंडास रूची आणते,शरीरात शुक्रधातू व चरबी वाढविते,वात दोष कमी करून पित्त व कफ दोष वाढविते.

    साधारण पणे दही हे ७ प्रकारचे असते व प्रत्येकाचे गुण वेगळे असतात चला आता ते आपण थोडक्यात पाहू:

    १)ताजे दही:
    रुचिकर,गोड,शरीरात विविध स्त्रावांची उत्पत्ती करणारे व चरबी व कफ वाढविणारे असते.

    २)आंबट दही:
    कफपित्तकर,अंगावर सूज उत्पन्न करणारे व शरीरात स्त्राव उत्पन्न करणारे असते.

    ३)शिळे आंबट दही:
    रक्तधातू विकृत करते,पित्त वाढविते व त्यामुळे रक्ताचे व पित्ताचे अनेक विकार जसे त्वचारोग,डोळे लाल होणे,घशाशी आंबटकडू येणे,झोपेचा अतिरेक असे त्रास होतात.

    ४)अदमुरे दही:
    ह्याचे वारंवार सेवन केल्याने छातीत जळजळ,सर्दी,खोकला,पोट फुगणे,अशा तक्रारी होतात.

    ५)तापविलेल्या दुधाचे दही:
    वातनाशक,तोंडास रूचि आणते,शरीर पुष्ट करते,बलदायक आहे.

    ६)साय काढलेल्या दुधाचे दही:
    तुरट,पचायला साईच्या दह्या पेक्षा हल्के,भुक वाढविणारे,मळ घट्ट बांधुन बाहेर काढणारे,आतड्यांची गती कमी करणारे,ह्याच्या नियमीत सेवनाने पोट फुगते.

    ७)साईचे दही:
    पचायला जड,वातनाशक,कफकर,शुक्रधातू वाढविणारे आहे.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 10, 2017


  • पेट्रोलियम: खनिज तेले

    हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते.

      March 5, 2023