(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

    प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
    राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.

  • आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी

    Deshonnati-18-Dec-2014-596x480

    जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.

    अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!

    सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.

    Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440

  • मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

    २६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.

  • क्रिकेटपटू अल्फ व्हॅलेन्टाईन

    अल्फ व्हेलेंटाईन याने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या त्यामधील ५ विकेट्स त्याने लंचच्या पूर्वी घेतल्या त्या पहिल्याच दिवशी .

  • प्रेम आणि भोळेपणा – भाबडेपणा

    कर्तृत्वानेच मिळव यश.. विश्वासान जीवनात कर यशाला वश

  • ज्येष्ठ हो तुमच्यासाठी

    विज्ञानाची प्रगती, वैद्यकीय उपचार, लोकात आरोग्याविषयी निर्माण झालेली सजकता यामुळे आयुर्मान वाढले आहे. तथापि, वृद्धापकाळात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व समस्यांना तोंड देण्याची अनेकांच्या मनाची तयारी झालेली नसते. त्यांचे एक कारण म्हणजे मागच्या पिढीतील त्यांचे आईवडील एवढे जगलेले नसतात. दुसरे आपली मुले चांगली आहेत आणि ती वृद्धापकाळात आपली व्यवस्थित काळजी घेतील. या भाबड्या समजुतीत अनेक असतात.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – 31

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ५

    कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां ,
    कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् |
    मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं ,
    मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५||

    पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे?
    कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी जिने वीणेचा दांडा धरलेला आहे अशी. अर्थात पूर्ण हृदयापासून आणि भक्तांच्या हृदयाला पूर्ण आकर्षित करणारे संगीत ज्यातून निर्माण होत आहे अशी. कुटिलकुंतलालंकृतां - कुटिल म्हणजे कुरळे किंवा गोल गोल गुंडाळलेले आपले केस जिने अत्यंत सुंदर रीतीने अलंकृत केली आहेत अशी.
    कुशेशयनिवासिनीं- कुशेशय म्हणजे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. कुटिलचित्तविद्वेषिणीम् - ज्यांचे चित्त कुटील असते अशा दुष्टांचा द्वेष अर्थात राग करणारी. त्या धर्मभ्रष्टांचा विनाश करणारी.
    मदारुणविलोचनां- मधु प्राशनाने नेत्र लाल झालेली. मनसिजारिसंमोहिनीं - मनसिज अर्थात मनातून जन्माला येणारा म्हणजे कामदेव मदन. त्याचे अरी म्हणजे शत्रू ते भगवान शंकर. त्यांना संमोहित करणारी.
    देवी पार्वती स्वरूपात तपस्यारत असणाऱ्या भगवान शंकरांच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर जागृत करणारी.
    मतंगमुनिकन्यकां- मतंग ऋषींच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली. मधुरभाषिणीमाश्रये- मधूर भाषण असणाऱ्या श्री त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • विडा घ्या हो नारायणा – भाग १०

    धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.

  • श्री गजानन महाराज, शेगांव

    गजानन तो संत महात्मा ह्या भूतली आला असे
    मानव म्हणूनी जन्म घेतला सर्वासाठीं ईश्वर भासे ।।१।।

    आला होता गरिबांसाठीं कैवारी बनूनी त्यांचा
    आजही त्याचे स्मरण होतां नाश होई दुःखाचा ।।२।।

    कोठूनी आला, कसा आला कळले नाहीं कुणां
    जात पात धर्म बंधने त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा ।।३।।

    तो तर आला सर्वासाठीं मानवातील देव बनुन
    धन्य केले कित्येकांना संकटे दूर करुन ।।४।।

    संदेश घेवूनी आला होता प्रभूचा पृथ्वीवरी
    धर्म रक्षण्या सांगुन गेला महान कार्य तो करी ।।५।।

    नास्तिकतेची चढली होती धूळ विचारावरती
    झटकून देतां तिजला नविन ज्योत पेटविती ।।६।।

    जागृत केला भाव प्रभूचा प्रत्येक व्यक्तीचे मनीं
    आस्तित्व ईश्वर शक्तीचे दाखविले गजाननांनी ।।७।।

    कलियुगीचा असे हा काळ धर्म चालला विसरुन
    गजाननाच्या रुपामध्यें दिसले सर्वा देवपण ।।८।।

    प्रफुल्लित करिंता ज्ञानानी फुंकार मारुनी राखेवर
    भक्तीभावानें पुजितां तुम्हीं पावन होतो ईश्वर ।।९।।

    लेखक नव्हता, कवि नव्हता शिकविले नाहीं ज्ञान
    सामान्य अशा घटनानीं दाखवूनी दिले प्रभूपण ।।१०।।

    लोकांस वाटले चमत्कार गजाननाच्या जीवनाचे
    हे तर सहजची घडले आस्तित्व होते त्यांत प्रभूचे ।।११।।

    आजही त्याच्या नावामध्यें आहे शक्ति प्रभूची
    संसारातील दुःखे हरपती कृपा होतां गजाननाची ।।१२।।

    मानव म्हणून होता साधा उघडून देई मंदीरद्वार
    देई घालवूनी दुःखें सारी हलका केला पाप भार ।।१३।।

    बऱ्याच घडल्या घटना दिसले ज्यामध्ये चमत्कार
    प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी केली ईशवृत्ती साकार ।।१४।।

    प्रभूसी पावन करण्या पाहिजे महान तपशक्ति
    कित्येक जन्माची त्याला लागत असते भक्ति ।।१५।।

    कठीण असते सारे पावन करण्या प्रभूला
    मोठ मोठ्या विभूती हार जाती त्याला ।।१६।।

    तुरळक कांही व्यक्ति प्रभूमय जे झाले
    शेगांवचे गजानन त्यांतलेच एक ठरले ।।१७।।

    त्यांच्याकडे असते दिव्य शक्तीचे बळ
    सहजतेनें ते जे करिती चमत्कार समजे सकळ ।।१८।।

    गण गण गणांत बोते मुखी घेत होते सतत
    तन्मय होऊन शब्दामध्यें ध्यान मग्न ते होऊन जात ।।१९।।

    आंता कांही प्रसंग सांगतो चमत्कार भासला त्यामध्यें
    ईश्वर चैतन्याची झलक दिसून आली आनंदे ।।२०।।

    प्रथम येतां शेगांवी कपडे नव्हते अंगावरी
    वेडा पिसा वाटूनी समजले त्यास भिकारी ।।२१।।

    एका घरा पुढतीं पडल्या उष्ट्या पत्रावळी
    गजानन बसून तेथें जमवी शिते सगळी ।।२२।।

    तुच्छ लेखले सर्वानीं प्रथम बघतां त्याला
    अन्नातील ब्रह्म जाणतां पाणी आले नयनाला ।।२३।।

    वृत्ती असते लोकांची बघण्या बाह्याकडे
    अंतरीच्या दिव्यत्वाची उमज त्यांना न पडे ।।२४।।

    नाल्यामधले थोडे पाणी मलीनतेने साचलेले
    हात लागतां गजाननाचा निर्मळ बनूनी वाहूं लागले ।।२५।।

    कित्येक रोगी त्रासून गेले दुर्धर अशा व्याधींनी
    आशिर्वाद मिळतां गजाननाचा सुद्दढ झाले शरिरांनी ।।२६।।

    शुष्क झालेल्या विहीरींमध्यें उचंबळूनी आले पाणी
    आनंदी झाले गांवकरी तहानलेल्यांची तहान भागूनी ।।२७।।

    अहंकारानी पेटलेले आले होते गोसाविजन
    अग्नीज्वालांत बघूनी त्यांना नतमस्तक झाले सारेजण ।।२८।।

    वांझोट्या एका गाईने उच्छाद फार मांडला
    क्षीर देण्यास लावूनी शांत केले तिजला ।।२९।।

    अंतःकरण जाणून भक्ताचे देई त्यांना तसेच दर्शन
    आनंदी केले कांहीना विठोबाच्या रुपांत येवून ।।३०।।

    नावेमध्यें जात असतां गजाननाच्या सहवासे
    संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा धावूनी आली असे ।।३१।।

    टिळकासम थोरांना आशिर्वाद मिळती गजाननाचे
    गीतारहस्य लिहूनी ज्यानी पांग फेडले भूमातेचे ।।३२।।

    येथे नव्हता जादूटोणा नव्हते कांहीं गंडे दोरे
    विश्वास ज्याचा प्रभूवर त्यांनाच मिळते सारे ।।३३।।

    जीवनाचे असून चक्र त्यांच्या असतात मर्यादा
    दिव्य शक्तीनें ओलांडतां चमत्कार भासतो सदा ।।३४।।

    असेंच बघूनी चमत्कार विश्वास ठेवतो प्रभूवरी
    श्रद्धा होण्या निर्माण चमत्कारच काम करी ।।३५।।

    एकदा बसतां श्रद्धा प्रभूस समर्पण होई
    प्रभूस पावन करितां चमत्कार विसरुनी जाई ।।३६।।

    गजाननाच्या जीवनांतील बघू नका चमत्कार
    श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी पावन करा ईश्वर ।।३७।।

    आजही येता भक्तमंडळी दूर दूर गांवाहूनी
    समाधान पावती सारे दर्शन त्यांचे घेवूनी ।।३८।।

    पावन होई नवसाला हीच त्याची महती
    आदर ठेवूनी भक्तजन प्रेमभावना अर्पण करती ।।३९।।

    गुरु त्यांना समजोनी पूजा करा त्यांची
    पारायण करा सतत गजाननाच्या पोथीची ।।४०।।

    सतत करितां पारायण गजाननमय तुम्ही व्हाल
    लय लागूनी ईश्वराची उद्धरुन तुम्ही जाल ।।४१।।

    अवतार कार्य करुनी देहयात्रा संपविली
    ईश्वर श्रद्धा मिळवून धार्मिक चेतना पेटविली ।।४२।।

    संवाद करुनी विठ्ठलाशी समाधीची घेतली अनुमती
    शेगांवी मुक्कामीं येवून सर्वासमोर समाधिस्त होती ।।४३।।

    अठराशे बत्तिस शके भाद्रपद शुद्ध पंचमीला
    समाधी घेऊनी गजाननांनी जीवन यात्रेस निरोप दिला ।।४४।।

    भव्य असे मंदीर उभारले गेले शेगांवी
    लाखो भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेई ।।४५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १८- २२०१८४