(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विकासनीतीचा महाविजय !

    राजकारण विकासाच्या मुद्दयांवर चालतं कि भावनिकतेवर? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलं तर शंभर पैकी किमान ऐंशी लोक जात, धर्म, तथाकथित राष्ट्रवाद आदी भाविनक मुद्यांचेच उत्तर देतील ! कारण, सध्याच्या राजकारणाची अवस्थाच तशी झाली आहे..

  • डेंगू आणि इतर ताप

    मित्रांनो सध्या तापाची साथ जोरात सुरु आहे.
    लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत सर्व जण तापाने आजारी आहेत व दवाखान्याच्या खेपा घालत आहेत.
    दोन तीन दिवस औषध,injection, saline लावून देखील ताप कमी जास्त होत राहतो.मग तुमचा डॉक्टर रक्त तपासायला सांगतो,ज्यात प्लेटलेट कमी झाल्याचे समजते किंवा डेंगू ची टेस्ट positive येते.
    ह्यावर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला मिळतो.

    घाबरलेला पेशन्ट आणि धास्तावलेले कुटुंबीय त्याला ऍडमिट करतात. ट्रीटमेंट सुरु होते,सलाईन चा ,injections चा मारा सुरु होतो,रोज रोज रक्त तपासणी केली जाते .
    पण दुर्दैवाने काहींच्या प्लेटलेट्स वाढण्याच्या ऐवजी उलट कमीच होताना दिसतात.

    अश्या वेळी कोणीतरी सांगितलेले किंवा वाचलेले उपचार म्हणजे पपईच्या पानांचा रस,ड्रॅगन फ्रुट,किवी इत्यादी पेशन्टला देण्यात येतात मात्र विशेष फायदा होताना दिसत नाही.

    सुदैवाने अश्या डेंगू तापासाठी किंवा कोणत्याही viral तापासाठी (म्हणजे चिकूनगुण्या,फ्लू इत्यादी) अगदी रामबाण औषध आहे

    Eupatorium 200 (यूपाटोरीयम 200)

    पेशन्टला डेंगू झाला असेल, ताप उतरत नसेल,प्लेटलेट खूप कमी झाले असतील,अंगदुखी फार असेल,डोके खूप दुखत असेल
    तर अधिक वेळ न दवडता वरील औषध liquid मध्ये मागवा.
    अर्धा लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे मग थंड झाल्यावर एका प्लास्टिक च्या बाटलीत भरून घ्यावे
    ह्या बाटलीत वरील औषधाचे फक्त 3 थेंब टाकावे आणि बाटली झाकण लावून जोरजोरात हलवावी आणि
    2 - 2 झाकण औषध दिवसातून दर 3- 3 तासाने देत रहावे.

    पेशन्टला 24 तासात फरक जाणवेल,आराम होईल आणि 48 तासात तो जवळजवळ बराच होईल.

    तर तुमचा कोणी नातेवाईक आजारी असेल तर Eupatorium 200 हे औषध होमिओपथी च्या दुकानातून लगेच मागवा आणि सांगितल्याप्रमाणे सुरु करा.

    डॉ प्रसाद हजारे,भिवंडी ठाणे
    व्हाट्स अप 9881374994

  • झापडं !

    माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे.

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ८

    पुरम्दरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां ,
    पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम्‌ |
    मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं,
    भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥८॥

    पृथ्वीवर जेव्हा एखादी स्त्री सम्राज्ञी पदावर आरूढ होते त्यावेळी इतर मांडलिक राजांच्या राण्या तिची दासी स्वरूपात सेवा करतात.
    आई जगदंबा त्रिपुरसुंदरी या अनंतकोटी ब्रह्मांडांची सम्राज्ञी असल्याने तिच्या सेवेला उपस्थित असणाऱ्या अलौकिक दैवी शक्तींचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां - पुरंदर अर्थात देवराज इंद्र. भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसात चवदा इंद्र होतात असे वर्णन आहे. सध्या असणाऱ्या इंद्राचे नाव पुरंदर आहे. त्यांची पुरंध्रिका म्हणजे स्त्री. ती देवी शची, आई जगदंबेची, चिकुरबंधसैरंध्रिका म्हणजे वेणी घालणारी दासी असते.
    पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम्‌ - पितामह अर्थात भगवान ब्रह्मदेव. त्यांची पतीव्रता म्हणजे देवी सावित्री, सरस्वती. आई जगदंबेचा सोबत चर्चा करून अर्थात तिला गोष्टी सांगून तिचे मनोरंजन करते.
    मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं- मुकुंद अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची रमणी म्हणजे देवी लक्ष्मी. ती आई त्रिपुरसुंदरी ला विविध अलंकारांनी नटवत असते.
    भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् - सुर वधू अर्थात देवतांच्या स्त्रिया.टिका शब्दाचा एक अर्थ आहे श्रेष्ठ. त्या श्रेष्ठ देवस्त्रिया आई जगदंबेच्या चेटी म्हणजे दासी असतात.
    अशा अद्वितीय भुवन अंबिकेची मी आराधना करतो.
    जय श्रीत्रिपुरसुंदरी.!
    जय जगदंब !!

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन!

    लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स.

    १. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.

    २. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही.

    ३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.)

    ४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा.

    ५. नियमितपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही.

    दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • सावरकरांना मिळालेला वैचारिक वारसा

    केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते.

  • घालीन लोटांगण

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

    घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?

    या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.

    रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

    -- रवी उवाच

    विकास,

    'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

    (१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

    (२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.

    (३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

    (४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

    (५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

    तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

    -- रवी अभ्यंकर

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

  • हृदयस्पर्शी आसावरी

    रागदारी संगीतातील काही खास मजेच्या बाबी म्हणजे, जर रागांचे स्वरलेखन तपासले तर, एका रागातील काही स्वर दुसऱ्या रागात तंतोतंतपणे सापडतात पण तरीही, प्रत्येक राग वेगळा असतो. त्यानुसार त्यातील भावना, स्वरांची बढत, ताना, हरकती इत्यादी अलंकार, त्याची आभूषणे आणि तेजाळ लखलखणे वेगळे असते.

  • साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का?

    आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.

    ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.

    imageह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.

    ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

    ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.

    साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.

    ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.

  • प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

    घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे