(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिप्टोग्राफी

    दांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही.

  • गोवा मुक्तीदिनाची सुरुवात

    १९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता.

  • अखंड भारत दिवस

    अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो.

    प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता.

    इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले.

    भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला. १९४७ साली झालेली भारत व पाकिस्ताननची फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या‍ राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यां नी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याीचा उल्लेयख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यालमुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टीा मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्योतिष विषयक

    ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय

  • पर्यटन विचार

    मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य असल्यामुळे घटक निसर्गातील विविधता त्याच्या मनाला फार पूर्वीपासून म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आकर्षित करीत असावी. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मानवाला शिकारीच्या शोधात दूरवर जावे लागत असे. एका ठिकाणी मिळणारी शिकार कमी झाली की त्याला ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जावे लागे.

  • किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

    १)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे,
    ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे.

    २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा.

    ३)अंगावर सुज येण्याची सवय असल्यास बिनसाईचे दही घुसळून लोणी काढावे व त्या ताकामध्ये मिरी,सुंठ,हिंग,लसूण असे पदार्थ घालून ते ताक जर सुजेवर दाबल्याने खड्डा पडत असेल तर त्या व्यक्तिला द्यावे.

    ४)तोंडला रूची नसल्यास जेवताना मध्ये मध्ये फोडणी दिलेली ताकाची कढि प्यावी.

    ताक प्यायचा अतिरेक केल्यास कफ व पित्ताचे आजार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर

    सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत ,परंतु १९९० पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी लढण्यासाठी 44 हवाई दलाच्या स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे. भारतीय हवाई दल जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०२५ पर्यंतच पुर्ण होइल. 

  • फ्रेश वॉटर

    दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला.

  • ट्रॅक्टर

    आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे आणि ते योग्यही आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरट, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रक्टर हे वरदान आहे. हे कृषीयंत्र बैलजोडी सांभाळण्यापेक्षा शेती व्यवसायात सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे.

    अर्थात, ट्रक्टर विकत घेताना निरनिराळ्या कंपन्यांच्या जाहिरातीला बळी न पडता अभ्यासांती अनुभव जमेला धरावा आणि गुणवत्ता, दर्जेदारपणा आदी आवश्यक असणाऱ्या ट्रक्टरची निवड करावी. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, पडताळणी करून तो विकत घ्यावा. कारण तो घेण्यासाठी फार मोठे भांडवल गुंतवावे लागते.

    विशेषतः आवश्यक असतील तेवढी सुरुवातीला ट्रक्टरचालीत औजारे घ्यावीत म्हणजे अडचणी येत नाहीत. नंतर मात्र सवडीने जशी जमतील तशी इतर औजारे घ्यावीत. ट्रक्टर औजारासाहित स्वयंपूर्ण असणे कधीही चांगले. घेतलेला (खूप भांडवल घालून) ट्रक्टर सुलभतेने चालवा. त्याची कार्यक्षमता कमीत कमी १०-१५ वर्षे टिकून राहायला हवी. आपण ट्रक्टरची योग्य प्रकारे काळजी घ्यावी.

    ट्रक्टर काम झाल्यानंतर उन – पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवाऱ्याला ठेवावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल अगर काडीकचरा काढून स्वच्छ करावा. ट्रक्टर नेहमी एकहाती असावा. ड्रायव्हर सारखे बदलू नयेत आणि ट्रक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात.अगदी पहिली गोष्ट म्हणजे इंजिनटाकीतले तेल पुरेसे आहे कि नाही ते पाहावे. पाम्पामधले वंगण / तेल डीप स्टीकच्या सहाय्याने तपासावे. रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे. एअर क्लीनर स्वच्छ करावा. ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या सहाय्याने तपासावे. टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी. (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी. असावा.) फॅनबेल्ट तपासावा. ज्या ठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत. महत्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत. बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे कि नाही ते तपासावे. इ. गोष्टी पाहून खात्री करून मगच किल्ली फिरवून ट्रक्टर चालू करावा.

    ट्रक्टर चालू करताना पहिल्यांदा इंधनकॉक चालू करावा. गिअर शिफ्ट लिव्हर आणि पिटीओ लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. थ्रोटल लिव्हर तीनचतुर्थांश जागेवर ठेवावी. क्लच दाबून ट्रक्टरची चावी ऑनच्या बाजूने फिरवावी. अशा पद्धतीने ट्रक्टर चालू करावा. ट्रक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी. क्लच पेडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे. गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत.

    ट्रक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला कि ट्रक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे. जर इंजनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भर कमी करावा. ट्रक्टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये. ट्रक्टरमागे घेताना औजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी. ड्राबर पट्टी अगर औजारांवर उभे राहू नये. नेहेमी क्लच हळुवार सोडवा. रोडवर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहेमी ट्रक्टर गिअरमध्ये असावा. वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये.

    मॅन्युअलप्रमाणे ट्रक्टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात. काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून ट्रक्टरची देखभाल करून घ्यावी. म्हणजे पुढे भविष्यात एखादा मेजर घोटाळा होत नाही. ट्रक्टर यंत्राची आपण जशीन काळजी घेऊ तसा तो आपल्याला साथ देईल. अलीकडे ट्रक्टरनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुधारणा केल्यात. सुविधा निर्माण केल्यात. त्यामुळे ट्रक्टरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळेच देखभालीकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडते. मॅन्युअलचा अभ्यास करून या महागड्या पण उपयुक्त यंत्राची देखभाल सतत ठेवावी.

    Vasant Charmal
    Krushi - Sheti
    Schedule - 26 oct 16 - 17:00
    Search for a photo of tractor and use it

  • जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन

    हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.