वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
आज दिनांक १ सप्टेंबर. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा आठवडा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहाची सुरुवात फूड अँड न्यूट्रीशन बोर्डाने केली. सध्याच्या काळाची पाऊलं ओळखत आपणही संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. ह्याने झाला तर फायदाच होईल तोटा होणार नाही.


‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल.
काल गडकरीला हे नाटक पाहिलं अाणि खूप दिवसांनी काहितरी विचार मनात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडलो !
या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :
१) कुठल्याहि परिस्थितीत नथुरामची प्रामाणिक देशभक्ती अाणि गांधीवधामागची भूमिका नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावी , गांधीवधामागे स्वातंत्र्यवीर सावरकर या तेजस्वी देशभक्ताचा काहिहि संबंध नव्हता हे अधोरेखित करत गांधिजींना त्यांच्या देशभक्तीचं वाजवी श्रेय देत त्यांच्या अवाजवी बनवलेल्या देशापेक्षाहि मोठ्या प्रतिमेचं चोख मूल्यमापन करत झोपी गेलेल्यांना जागं करणं , जागं असलेल्यांना मरगळ झटकत हलवणं या हेतूनं प्रेरित होऊन मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातूनंहि राहून गेलेली काहि सत्यं नीडरपणे मांडणार्या जिगरबाज शरद पोंक्षे अाणि प्रमोद धुरत या जोडीचं तोंडभरून कौतुक करणं ! अाणि
२) हे नाटक कुणी कुणी पहायलांच हवं हा { न मागता दिलेला अागाऊपणाचा } सल्लेवजा प्रस्ताव मांडणं.....
नाटक बघताना एक जाणवलं ते म्हणजे निव्वळ लेखक , दिग्दर्शक व अभिनेत्याच्या पलिकडे जाऊन केलेलं नाटकाचं संकलन..... तुमच्यापैकी ज्यांनी ह्रषिकेश मुखर्जींचा अानंद पाहिला असेल त्यांना अाठवतत्रअसेल की अमिताभच्या अावाजातलं निवेदन .... जिन दिनों मैं अादसे मिला.... ते अानंद मरतें नहिं पतचं संकलन ज्या हळुवार पण प्रभावी पद्धतीने केलं गेलंय तितक्याच ताकदीने ते शरदजींनी नथुराम गोडसेंच्या जीवनपटाविषयी { किंबहुना मृत्यूपावेतो } मांडलंय..... ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ या ६५५ दिवसातली नथुरामच्या मनाची अवस्था अाणि ३० जानेवारी १९४८ या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत त्याचा झालेला गांधीवधाचा दृढनिश्चय हे दोनहि कंगोरे अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे येरागबाळ्याचं काम नव्हे महाराजा ! बरं हे करत असताना दिलेल्या कोपरखळ्या , पाकिस्तानातील अणि स्वतंत्र भारतातील पण मुसलमान लोकांकडून झालेले हिंदूंवरचे अनन्वित अत्याचार , सरकारचं { अजूनहि चालूच असलेलं मुसलमानांचं } लांगूलचालन ते अगदि पार बॅरिस्टर देवीदास मोहनदास गांधींचं नथुरामचं वकीलपत्र घेण्यामागचं दांभिकपण { हसत खेळंत दाखवलं असलं तरी त्यामागचं अत्यंत किळसवाणं अाणि स्वार्थी धोरण } अाणि सरतेशेवटि अखंड भारत अमर रहे या घोषवाक्यासह वेदीवर लटकलेले नथुराम ..... संवेदमशील माणसाच्या डोळ्यांना धारा अाणि अावंढे येईपर्यंतचे नाटकातील कैक प्रसंग ...... हे सगळं अनुभवण्यासारखं अाहे , नाटक अवश्य पहा अाणि सहकुटुंब सहपरिवार पहा ! , १५ नोव्हेंबर १९४९ ते अाज ३ मार्च २०१७ पर्यंत , म्हणजेच ६७ वर्षे ३ महिने १८ दिवस पर्यंत तळतळणार्या नथुरामच्या अात्म्याची ह्रद्य हकिकत जाणून घेण्यासाठी तरी पहा.....
हे नाटक कुणी पहावं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव सांगून ६६० कोटि रुपये खर्च { दाखवायचा हां , करायचा नव्हे ! } करत समुद्रात महाराजांचा पुतळा बसवणार्या तमाम राजकारण्यांना मतं अाणि पाठिंबा देणार्यांनी पहावं , सावरकरांसारख्या तेजपुरुषाला पण तसबीरीचाहि मान मिळू नये म्हणून अाटोकाट प्रयत्न करणार्या शिरो मणींनी पहावं , Semi Automatic Pistol ने २ फुटांवरुन ३ गोळ्या लागल्यावरहि पोलादी पुरुषाप्रमाणे कणखरपणे शेवटच्या क्षणीहि हे राम शब्द सत्य—अहिंसेचा पाठपुरावा करणार्या गांधीजींसारख्या नेत्याच्या तोंडी देणार्या दांभिक लोकांनी अाणि हाच इतिहास म्हणून तमाम भारतियांच्या गळी उतरवणार्या पाठ्यपुस्तक महामंडळ व शैक्षणिक संस्थांच्या महानुभावांनी पहावं अाणि गेला बाजार ऊठसूट संघाविरुद्धंच छापणार्या तमाम वृत्तपत्रांच्या संपादकांनी पण बघावं .....
धगधगता ज्वलंत विषय न डगमगता न थकता निडरपणे समाजासमोर अाणण्याचं धारिष्ट्य दाखवणार्या शरद पोंक्षे या लेखक—दिग्दर्शक—अभिनेता—निर्मात्या चौफेर जिगरबाज माणसाचं अाणि प्रमोद धुरत या जिगरबाज निर्मात्याचं करावं तेवढं कौतुक कमीच अाहे !
जाता जाता एक विनंती मात्र शरदजी व प्रमोदजींना : तिकिटविक्री अाजपासून सुरु असं वृत्तपत्रांत अाल्या दिवसापासूनंच संपूर्ण थिएटर House Full घोषित करणार्या Ticketees.com व फोनबुकिंगचा नंबर न उचलणारे असे दोन्हि - Booking वाले कृपया बदला , फार मनस्ताप होतो !
कळावे ,
अापला विनम्र ,
उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
०३ मार्च २०१७
नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली.
बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे गर्दी पण जमली व कोणीतरी या अपघाताची खबर पोलीसांना दिली. दरम्यान दुसरा मुलगा धावत आला व पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करू लागला. पण भोक लहान असल्यामूळे हे त्याला जमेना. त्याला जवळच एक मोठे झाड दिसले. त्याने पळत जाऊन त्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली व त्या फांदिच्या सहाय्याने भोकाचा आकार मोठा करून पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. तेवढ्यात पोलीस व पॅरॅमेडिकलचे लोक तेथे पोचले. त्यांनी पाण्यात पडलेल्या मुलाला योग्य ती वैद्यकीय मदत दिली व त्या मुलाचे प्राण वाचवले. पण तेथे आलेल्या पोलीसांना व पॅरामेडिकलच्या लोकांना एका गोष्टीचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते की एका छोट्या मुलाने झाडाची भली मोठी फांदी तोडून आणलीच कशी. त्यांची याच विषयावर चर्चा चालू होती तेव्हा एक वृद्ध म्हातारबुवा तेथे आले वम्हाणाले, ‘मला महीत आहे की या मुलाने ही झाडाची फांदी कशी तोडली ते.’
‘अस मग सांगा या मुलाने ही फांदी कशी तोडली? त्याला हे कसे जमले?’ पोलीसांनी उत्सुकतेने विचारले.
‘कारण ‘तु हे करू शकत नाहीस किंवा तुला हे जमणार नाही!’ असे सांगणारा कोणी माणूस नव्हता म्हणून!’ म्हातारबुवांनी मिस्कीलपणे उत्तर दिले.
आपल्यामधे काहीतरी आगळेवेगळे, अतर्क्य किंवा अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची एक प्रकारची प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. संकटकाळात ही उर्जा बाहेर यावी व त्यामुळे माणसाने संकटावर मात करावी अशी देवाने योजना केलेली असते. प्रत्येकाकडेच ही उर्जा असते व अनेक वेळा याचा वापर करून काहीतरी आगळेवेगळे करून दाखवावे अशी इर्शा प्रत्येकाच्याच मनातकेव्हा ना केव्हातरी निर्माण होत असते. पण ‘तुला हे जमणार नाही. तुला हे शक्य होणार नाही. तुझ्यात तेवढी ताकद नाही. तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्याला करू द्यायचे नाही असा यांचा खाक्या असतो. मला तर लहानपणापासून अशी माणसे सतत भेटत आली आहेत. यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने मराठी समाजात अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत असे मला आढळून आले आहे.
समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे, ‘तरी मी त्याला सांगत होतो की नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरवात आपल्या कुटुंबापासूनच होते.
ज्या समाजात अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसे जास्त प्रमाणात असतील तो समाज जास्त विकास करू शकत नाही. आज जरी मराठी समाजाने प्रगतीच्या कितीही डिंग्या मारल्या तरी अनेक बाबतीत मराठी समाज हा अजुनही‘अत्यंत मागासलेला’च आहे व तो पुढारण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. म्हणुनच गेल्या 400 वर्षांत शिवाजीमहाराजांच्या तोडीचा एकही माणूस या महाराष्ट्रात पैदा होऊ शकला नाही.
अर्थातच आपण ‘सकारात्मक’ रहायचे का‘नकारात्मक’ रहायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतःच ठरवायचे नाही का?
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
July 26, 2015
पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही.
कोणताही प्रसंग असो तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही…
भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले.
यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
या लक्षणांकडे बघा
* त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
* यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
* सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
* पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
* सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे.
* दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते.
* मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.
जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
* मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
* स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
* अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
* ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
* हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
निरोगी यकृतासाठी योग्य आहार
यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
* शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
* ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
* सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
* कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
* भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
* यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
* मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
* दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
* हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
* काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. रामदास जाधव
Copyright © 2025 | Marathisrushti