(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मनाचे श्लोक – २१ ते ३०

    मना वासना चूकवी येरझारा | मना कामना सांडि रे दव्यदारा |
    मना यातना थोर हे गर्भवासीं | मना सज्जना भेटवी राघवासी ||21||

    मना सज्जना हीत माझे करावे | रघूनायका दृढ चित्ती धरावे |
    महाराज तो स्वामि वायूसुताचा | जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22||

    न बोले मना राघवेंवीण कांही | जनी वाउगे बोलता सूख नाही |
    घडीने घडी काळ आयुष्य नेतो | देहांती तुला कोण सोडू पाहतो ||23||

    रघूनायकावीण वाया शिणावे | जनासारिखे व्यर्थ का वोसणावे |
    सदासर्वदा नाम वाचे वसो दे | अहंता मनीं पापिणी ते नसो दे ||24||

    मना वीट मानू नको बोलण्याचा | पुढे मागुता राम जोडेल कैंचा |
    सुखाची घडी लोटता सुख आहे | पुढे सर्व जाईल कांही न राहे ||25||

    देहेरक्षणाकारणे यत्न केला | परी शेवटी काळ घेवोनि गेला |
    करी रे मना भक्ती या राघवाची | फ्ेाढे अंतरी सोडि चिंता भवाची ||26||

    भवाच्या भये काय भीतोस लंडी | धरी रे मना धीर धाकासि सांडी |
    रघूनायकासारिखा स्वामि शीरी | नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||

    दिनानाथ हा राम कोदंडधारी | पुढे देखता काळ पोटी थरारी |
    मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||28||

    पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे | बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
    पुरी वाहिली सर्व जेणे विमानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||29||

    समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |
    जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||30||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • योगासक्त जीवन व्हावे!

    संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस भारतातही साजरा केला जाणार आहे. यामुळे येथे काही उलटसुलट चर्चा रंगायला लागल्या आहेत. याचा येथे विचार करण्यापेक्षा राजयोगाबाबत सांगताना स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते की, “राजयोगाच्या साऱ्या शिकवणुकीचा उद्देश आहे

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ

    विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.

    औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.

    औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
    औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
    ...... श्रद्धय हरिकिर्तनम।

    मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.

    अकाल मृत्यु हरणम्
    सर्व व्याधी विनाशनम्,
    विष्णुपादोदकं तीर्थे
    जठरे धारयाम्यहम् ।

    असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.

    हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)

    आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.

    "मेरे लिए दुवा करो,"
    "प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.

    केवळ औषध काम करत नाही.
    हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
    यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    27.04.2017

  • अध्यात्मरामायण, की रामायणातील अध्यात्म!

    आपण रामायणातले काही प्रसंग पाहिले तर लक्षात येईल यात कसे अध्यात्म आहे ते ! फक्त काही नावे व प्रसंग पाहू, विस्तार मर्यादेमुळे अधिक सूक्ष्मपणे विचार करणे अशक्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

  • एका बोटांचे कौशल्य

    एका बोटांचे कौशल्य

    आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन‌ अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.

  • सतत बदला, नाही तर नष्ट व्हा !

    आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचा आयटी, बीटी आणि एनटी या विषयावरील हा लेख शेअर करत आहे…

  • श्री गणेश अवतारलीला ३ – श्री गजानन अवतार

    चार हात, लाल रंग, सोंडे सह असलेला अवतार हे या द्वापार युगातील आपल्या सगळ्यात जवळच्या अवताराचे वैशिष्ट्य असल्याने सामान्यतः गणेशमूर्ती याच स्वरूपात केल्या जातात. या अवताराचा प्रगटोत्सव देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच आहे.

  • आता लढा सुरू झालाय!

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निकराच्या लढ्यात प्रकाश पोहरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यामुळे दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘प्रहार’ या स्तंभासाठी ते यावेळी वेळ देऊ शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी दि.

  • दिवाळी आणि फटाके….!

    भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही.

  • नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

    अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

    “ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

    वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥