वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा गुलकंद वर्षभर टिकतो व वापरता येतो.
मी ह्या फुलाचा उपयोग करून बरेच जणांचे मायग्ेनचे त्रास कमी केले आहेत. ज्यांचेकडे हे फुल येते त्यानी जरूर गुलकंद करून ठेवावा.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे.
गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान पेटले होते. इंटरनेट हे माध्यम सगळ्यांसाठी समान असावं आणि त्यात भेदभाव असून नये हा नेट न्युट्रॅलिटीच्या समर्थकांचा मुद्दा होता. फ्री बेसिक्सची सेवा देणार्या कंपन्या त्यांना हवी असलेली माहिती ग्राहकाच्या गळ्यात मारू शकतील अशी शंका उपस्थित होत होती.
ट्रायने (दूरसंचार नियामक मंडळाने) हा मुद्दा मान्य करत नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे ट्रायच्या आदेशानुसार सगळ्या ग्राहकांना त्यांना हवी ती माहिती मिळवण्याचा व त्यासाठी समान पैसे मोजण्याचा निर्णय अमलात आला.
‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिल्यानंतर दोनच दिवसात फेसबुकने भारतातून फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला आहे. रिलायन्सने आता फेसबुकचा फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्म पेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर भारत फ्री-बेसिक्समुक्त झाला आहे.
हा रिलायन्स आणि फेसबुकचा मोठा पराभव समजायचा का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
-- निनाद प्रधान
महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे.
मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे
अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा ।
आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।।
अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।।
तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।।
स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण त्रिशुळ हाती । हाती बोधाची तलवार ।।
हिडता नगरी माजी । देखीयला चमत्कार । षड रिपू दैत्य थोर । तये ग्रासिले जेजूर ।।
मर्दिले राक्षसाशी । हेची किर्ती केली थोर ।।1।। अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।
घेतली दिक्षा तुझी । जीव दशा वाघ्या थोर । ँ़ कार येळ कोट । वारं वार उच्चारी ।।
मागे मी सदा वारी । लक्ष चौऱ्यांशी घरी । एकविस सहस्त्र । शते सहा उच्चार करी ।।
श्रमलो तेणे फार । हिडता दारो दारी । कौटमा औट हात । गळे तो नव द्वारी ।।
वैराग्य झोळी गळा । सदा रिकामी सारी। फोडीतो दीर्घ टाहो ।
घाली निज कृपा वारी ।।2।। अनाद्यंत खंडेराया ।।
विकार वासनादी । विचारे फोडीयले । अनुभव गाळणीने । महाकष्टे गाळीयले ।।
भंडार शुद्ध तोची । देहा भूषण शोभले । फोडूनी द्वैत भावा । ते खोबरे उधळीयले ।।
होताची ऐक्य ऐसे । आत्मराज प्रगटले । कैचा देव कैचा भत्त* । देही देहिच देखीले ।।
आनंदा पूर आला । मौन वाचेसी झाले । राधा गोविद सुताचे । पूढे बोलणे खुंटले ।।3।।
अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।
गायक - श्री.सुधीर गोरे.
गायीका - सौ. हेमा.
आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.
मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.
१) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.
२) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.
३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.
४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.
५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.
मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात.
हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत.
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय.
सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti