वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जम्मू –काश्मीर, पंजाब आदी सीमावर्ती राज्यांत घुसखोरांबरोबरच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करून तेथे अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळीही पाकिस्तान खेळत आहे. हा गंभीर धोका ओळखून त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
आपल्या घरातील, नात्यातील किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यातील वयस्करांकडून एक तक्रार नेहमी ऐकू येते- गुडघेदुखीची! ज्येष्ठांच्या या समान तक्रारीला कारणीभूत असतो झिजेचा संधिवात.
* सुट्ट्यांची चंगळ * कंकणाकृती सूर्यग्रहण * सुपर मून दर्शन * ब्ल्यू मून योग * आश्विन अधिकमास
* चार गुरुपुष्ययोग * भरपूर विवाहमुहूर्त * लीप वर्ष असल्याने कामाला एक दिवस जास्त मिळणार !
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.
मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.
माझ्या शुक्राणूत होतं
माझ्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यातून संक्रमित
झालेलं आनुवंशिक तत्व,
माझ्या बायकोच्या
पक्व बीजांडात होतं
तिच्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.
आमच्या अपत्याचा जन्म
हा आमचा निर्णय होता
या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता
माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
आमच्या अपत्याचा जन्म ….
आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
पुनर्जन्म.
सजीवांच्या ….
जनक-जननींच्या
अनेक पूर्वपिढ्यातून
संक्रमित झालेलं
आनुवंशिक तत्वंच
अपत्यरुपानं अनेक
पुनर्जन्म घेत असतं
आनुवंशिक तत्व हाच
सजीवांचा आत्मा आहे.
तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
जन्म घेत असतो
आनुवंशिक तत्व
दोन जिवंत शरीरातून
तिसर्या जिवंत शरीरात
प्रवेश करतं ….
अेका मेलेल्या शरीरातून
दुसर्या जिवंत शरीरात नाही.
वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
हा श्लोक
आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
मान्य नाही
सजीव मेला की संपला
त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
पहिलाच आणि शेवटचाच असतो.
प्रेताची प्रत्येक पेशी
सडते विघटन पावते आणि
अणूरेणूंच्या स्वरूपात
पर्यावरणात विलीन होते.
जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
हे ध्यानी घे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - ३
शनिवार १० डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
रत्नागिरी केळशी गावात हे स्थान असून, हे ठिकाण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे; मंदिर अगदी लहान असलं तरीपण ते अनेक शतकांपूर्वीचं आहे;
लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते?
हेररगिरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावविशेषच वेगळे असावे लागतात. मूळ पिंडच सर्वसामान्य माणसांपेक्षा दुर्मीळ स्वरूपाचा असावा लागतो. पोलादी रक्तवाहिन्या, धाडसी वृत्ती, मृत्यूविषयी बेपर्वा वृत्ती आणि वेगळे काही करून दाखविण्याची तीव्र ओढ, हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीत असावी लागते. त्याखेरीज इतर अनेक स्वभाववैशिष्ट्यांचीही अपेक्षा असते.
के. ऐन . सिग असे एकटे होते की त्या चित्रपटातील सर्व संवाद रशियन भाषेत त्यांनी स्वतःच्या आवाजात ‘ डब ‘ केले होते बाकी सर्वाना दुसऱ्यांचा आवाज दिलेला होता. के. ऐन . सिंग यांचे भेदक डोळे , त्यांची संवादफेक , खलनायकी ढंग इतका प्रसिद्ध झाला की ते कधी कुणाच्या घरी गेले तर त्याच्यासाठी पटकन दरवाजा उघडला जात नसे , कुणाकडे समारंभास गेले की त्याच्याशी आलेल्या स्त्रिया त्यांना बघून घाबरत.
15 वर्षापर्यंत चीनने कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला मदत केली तेव्हा तिथल्या राजाची सत्ता जाऊन तिथे कम्युनिस्ट सत्ता प्रस्थापित झाली आहे. ही सत्ता पूर्णपणे चीनच्या बाजुने आहे. म्हणून पाकिस्तान आयएसआयच्या नेपाळमधून सुरु असलेल्या कारवायांवर लक्ष ठेवून त्यावर मात कऱणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti