(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माणसाचे जमिनीवर असणे

    जीवनात चढ -उतार येतच असतात , सुखातल्या जीवाला संकटाची झळ बसते , तर दुखाने होरपळून गेलेल्याला सुखाची सुखद शीतल सावली मिळून जाते. अशा नित्य बदलत्या प्रसंगात माणसाची एक प्रकारे परीक्षाच होत असते.

    भल्या भल्या माणसांना अशा वेळी स्वतःला नियंत्रित ठेवणे जमू शकत नाही, म्हणूनच आपल्या सभोवतालची असलेली मित्र मंडळी अपेक्षा करीत असतात की- अशा बिकट प्रसंगी आपले जमिनीवर असणे खूप महत्वाचे असते.

    लहान असो व मोठा , गरीब असो वा श्रीमंत .प्रत्येकाला जीवनात नेहमीच यश आणि अपयश या दोन गोष्टींशी सामना करावा लागतो . अशा प्रसंगांना सामोरे जातांना ,एखाद्या संकटाशी सामना करतांना यश किंवा अपयश पदरात पडते मग यशाने दिलेली हुलकावणी आणि अपयश स्वीकारणे कठीण जात असते कारण अपयश " ही भावना कुणाच्याही मनास वेदना देणारी असते. यात भर म्हणजे "आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचे खापर "नेहमी इतरांच्या माथी फोडणे " ,अपयशाचे दुखः उगाळीत बसणे" ,हा कित्येकांचा आवडता उद्योग असतो ."गम्मत म्हणजे ,अशी माणसे आपल्या सहवासात असतात , काहीच प्रयत्न न करता खूप काही मिळावे .! अशी इच्छा असणार्याला यश कसे मिळेल ? असे तुम्ही म्हणाल , पण अशा व्यक्तीला याचा सोयीस्करपणे विसर पडत असतो .अपयशाचे धनी होणे कुणालाच आवडत नसते

    यशाची धुंदी आणि विजयाची नशा माणसाला हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" ,याचा अर्थ आजकालच्या मिळणार्या प्रसिद्धीच्या झोताने कळून येतो आहे . लोकांच्या नजरेत भरण्यासाठी " टीव्ही आणि त्यावरील शो" अगदी सोपे आणि सहजसाध्य माध्यम झालेले आहे. प्रसिद्धीच्या झोतात येणे ", ग्लैमरच्या दुनियेत वावरण्यास मिळणे , चाहते मिळणे ,त्यांचे प्रेम मिळणे "

    स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी अचानक वाट्यास येतात आणि "पतंग आकाशात उंच उंच भिरभीरु लागतो ", माणसाचे पाय जमिनीवर नसतात " याचे उदाहरण पहावयास मिळते .नेमक्या अश्या वेळी "जो भानावर राहून जमिनीवर राहू शकतो " त्याला या "वैभवाचा मोह" दूर दूर सारणे जमून जाते , या उलट अनेकांचे होते .यशाची धुंदी ,यशाचे वारे अंगात भिनले की .आपल्या माणसापासून दूर दूर जात आहोत "याचे भान रहात नाही ,आणि हे जग तर उगवत्या सूर्यास नमस्कार करणारे आहे" , मावळतीचे दिवस कठोर जाणीव देतात आणि आकाशात विहरणारा -एक दिवस पुन्हा त्याच जमिनीवर येऊन आदळतो .फार कठीण असते हे सारे .जो तरला -तो यातून सहीसलामत सुटला "असे म्हणूया .

    श्रीमंती आणि गरिबी या दोन अवस्था दुरावा निर्माण करणाऱ्या आहेत .जो श्रीमंत असतो..त्याला आपल्या वैभवाचा आणि श्रीमंत असण्याचा गर्व ,वृथाअभिमान असेल तर काय उपयोग त्याच्या श्रीमंतीचा ? कारण आपल्या भोवती अशी खूप श्रीमंत माणसे असतात की जी कधीच -गरीब-श्रीमंत असा भेद न करता सगळ्यांशी मिळूनमिसळून वागतात ,त्यांच्या माणुसकीच्या व्यवहारात "पैशांची भाषा "कधी बोलली जात नाही ,अशा माणसांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात "असे लोक म्हणतात .हा त्या श्रीमंत व्यक्तीचा गौरवच असतो.

    काही व्यक्ती अशाही असतात की ज्यांच्यासाठी त्यांचे सर्वस्व फक्त पैसा "असतो, जगातील सगळ्या गोष्टी पैश्याने विकत घेता येतात "अस त्यांचा पक्का विस्वास असतो .याच गुर्मीत ते जगत असतात ,पण दुर्दैवाने यांचे दिवस बदलून गेले की मग मात्र "जमिनीवर पाय असते तर ? याची जाणीव होऊ लागते ,पण आता खूप उशीर झालेला असतो.

    सारासार बुद्धीची देणगी मिळालेली असतांना "विचारशक्ती गमावून बसणार्यांना समजावून सांगणारे भेटले पाहिजे. आणि अशा अनुभवी माणसांनी सांगितले पाहिजे की "

    बाबा रे ,जमिनीवर रहात जा " यातच तुझे भले आहे.

    -- अरुण वि.देशपांडे -पुणे.
    मो- ९८५०१७७३४२ .
    ई-साप्ताहिक - जनमंगल.
    दि.१२-७-२०२० अंकात पूर्वप्रकाशित लेख
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १

    गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं
    चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् |
    कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं
    शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖

    भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत.
    कसे आहेत हे भगवान गणेश?
    गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत आहे. कोणतीही गोष्ट तेव्हाच ओसंडून वाहते, ज्यावेळी ती आत परिपूर्ण भरलेली असते.
    मिलद्भृंगषंडं- अशा या मदमत्त गंडस्थळावर मुनी मानसरूपी भुंग्यांचा समुदाय सतत एकत्रित येऊन गुंजारव करीत असतो.
    चलच्चारुशुंडं- भगवान गणेशांचा सगळ्यात आगळावेगळा अवयव म्हणजे ज्यांची सोंड. तिची हालचाल चारू म्हणजे अत्यंत आकर्षक आहे. जगत्त्राणशौंडम् - असे हे भगवान गणेश संपूर्ण विश्वाचे संरक्षण करण्याच्या सामर्थ्याने युक्त स्वरूपात, शौंड आपल्याच आनंदात डुलत आहेत.
    कनद्दंतकांडं- भगवान गणेशांच्या दातांवर जी आभूषणे लावली आहेत त्यांना छोटी छोटी घुंगुरे लावली असल्याने त्याचा आकर्षक किण् किण् आवाज होत आहे.
    विपद्भंगचंडं- ही भगवान गणेश सर्व विपत्तींचा विनाश करण्याच्या बाबतीत चंड अर्थात प्रचंड सामर्थ्य संपन्न आहेत.
    शिवप्रेमपिंडं - ते भगवान शंकरांच्या प्रेमाचा जळून एकत्रित आविष्कार आहेत. जसे एखाद्या पिंडात म्हणजे गोळ्यात तो एकच पदार्थ ठासून भरलेला असतो तसे भगवान शंकरांचे सर्व प्रेम श्री गणेश यांच्या ठिकाणी परिपूर्णरीत्या एकवटले आहे.
    भजे वक्रतुंडम् - अशा भगवान वक्रतुंडांचे मी भजन करतो.
    वक्र असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे अक्षरश: फुंकरीने उडवून लावतात त्यांना श्री वक्रतुंड असे म्हणतात.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • जागतिक संगीत दिन

    जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती.

  • भारत उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व सज्जता !

    शेतकर्‍यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.

  • आईस्क्रिम

    उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही.

    आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला खोकला, घश्याला त्रास, जुलाब होतात. आपण थंडीत आईस्क्रीम खाल्ले तर त्रास होत नाही असा माझा ३० वर्षाचा अनुभव आहे. आम्ही थंडी मध्ये भरपूर आईस्क्रीम खातो. थंडीत दुकानात आईस्क्रीम पटकन मिळत नाही म्हणून मी बासुंदी फ्रिजर मध्ये ठेऊन कुल्फी करून खातो.

    ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊच नका असे नाही पण एक पथ्य पाळा. जेवण झाले की लगेच (एक तासाचे आत) खा. म्हणजे त्याची उष्णता अन्न पचायला उपयोगी पडते व बाधत नाही.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

  • हेल्मेट (लघुकथा)

    सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती.

  • तुम्हाला काय आहे… मुलगा? की रेसचा घोडा

    आपण मुलांना खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक क्लासेस लावतो. ज्यामुळे मुले रेसमध्ये ढकलली जातात आणि रेसचा घोडा बनतात.
    कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
    एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
    Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?”

  • हवाई दलाची युद्ध सज्जता – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना

    एका बाजूला भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना आपली युद्धसज्जता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. अशा स्थितीतून देश जात करताना भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघातामुळं या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेचषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणाऱ्या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहीजे.

  • प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

    मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.

  • निरंजन – भाग – २९ – स्कंदमाता

    स्कंदमाता म्हणजे साक्षात ममत्वाचे आराध्यदैवत… स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे. बाळ कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता…