(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिर्फ खिलौना छीना हैं

    १८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर - बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी " लाजते , पुढे सरते , फिरते " अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा - बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ - उताराचे आहे हो !

    हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि " ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि " तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर - बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० - २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .

    पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .

    एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि " सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं "

    असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर - बाजार आणि " ऐ दिल हैं मुश्किल " या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव " अली " . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !

    तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .

    त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .

    गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .

    पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) " रोने और हँसने के बीचवाला रास्ता " असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर - बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात " . . . . दिल नही टूटा हैं " असं असतेच .

    " असन्गाशी संग , प्राणांशी गाठ " अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर - बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही " पाकिस्तान " असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच " ऐ दिल हैं मुश्किल " अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .

    याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर " अमीर - रईस " , " इजाजत - जसबात " , " मोहोब्बत - आदत " यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं " .

    अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! " फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं " ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .

    हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक - आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर " वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता " हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . " या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )

    नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि " कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते " . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर " रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना " तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " ?

    तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण " एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं " . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचा चक्रव्यूह .

    या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण " मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे " हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .

    पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे " तुझे नसणे मला अजमावत राहते " अशी अनुभूती देणारी .

    कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?

    नसणे की नडण हे तर नाहीच नाही .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की " मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . "

    आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग " ऐ दिल हैं मुश्किल " चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे " अधूरे इश्क का जिक्र " , " प्यार मे जुनून ( वेडेपणा ) " , " दोस्ती मे सुकून ( दिलासा ) " असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . " गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं " हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , " जख्मों के कर्ज अदा नही होते " हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . " तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! " . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !

    तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की " आज जाने की जिद ना करो " . कारण

    " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल - ९८२०२९२३७६
    Email - tilakc@nsdl.co.in

  • काम’ म्हणजे नेमकं काय?

    भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय.

  • ॲमेझोना, ख्राईस्ट दे रेडिमेर, रिओ दे जनीरो, ब्राझील

    ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली.

  • वायुपुत्र मारूती

    मारुती हा ‘मरुत’ म्हणजे साक्षात ‘वायु”चा पुत्र मानला गेला आहे. इथं वारा म्हणजे आपण अनुभवतो ती झुळूक किंवा एखाद्या पठारावर येणारा फणाणता वारा नव्हे, तर साक्षात झंझावात, वादळवारा..! या वाऱ्याची ताकद काय हे बघण्यासाठी अधनं-मधनं ‘डिस्कन्हरी’ किंवा ‘नॅशनल जिआॅग्राफीक’ चॅनल पाहत जावं..

  • श्री भ्रमरांबाष्टकम् – ९

    गायत्रीं गरुडध्वजां गगनगां गान्धर्वगानप्रियांगम्भीरां गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालंकृताम् ।
    गङ्गागौतमगर्गसंनुतपदां गां गौतमीं गोमतीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ९॥

    एकच अक्षर किंवा शब्द वारंवार वापरण्याला साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात. मागील श्लोकात आचार्यश्रींनी क चा उपयोग करून तर या श्लोकात ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे.

    गायत्रीं - ज्याचे गायन केल्याने साधक तरुन जातो, त्या मंत्राला गायत्री म्हणतात. सर्वच मंत्रांचे गायन अर्थात आनंद पूर्ण उच्चारण करावे.

    गरुडध्वजा- गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांची सहधर्मचारिणी.

    गगनगा- गगन म्हणजे आकाश. त्यातून ग म्हणजे गमन करणारा अर्थात भगवान सूर्य. तशी तेजस्वी. त्याच्या प्रकाशाच्या मागे असणारी चैतन्यशक्ती. ज्ञानशक्ती.

    गान्धर्वगानप्रिया- देवतांचे जे विविध प्रकार आहेत, त्यापैकी गायन प्रवीण असणाऱ्या देवतांना गंधर्व असे म्हणतात. हाहा, हूहू, तुंबरू अशा अनेक गंधर्वांचे वर्णन शास्त्रात आहे. त्या गंधर्वांच्या द्वारे केल्या जाणारे गायन अत्यंत प्रिय असणारी.

    गम्भीरा- अत्यंत गहन. सहजा सहजी पार न लागणारी. अपार. अथांग. अनाकलनीय.

    गजगामिनी- हत्तीप्रमाणे शांत, गंभीर तथा आकर्षक गतीने चालत जाणारी.

    गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. त्यांचा राजा तो हिमालय. त्याची कन्या. पार्वती. गन्धाक्षतालंकृताम् - मस्तकावर गंध आणि त्यावर अक्षता धारण केलेली.

    गङ्गा- गंगा म्हणजेच गमनशीला . गमन अर्थात गती हा चैतन्याचा विषय. त्यामुळे गंगा म्हणजे चैतन्यमयी.

    गौतमगर्गसंनुतपदां - गौतम, गर्ग इ. ऋषिमुनींनी चरण वंदना केलेली.

    गां- गोमाता स्वरूप असलेली.

    गौतमीं - महर्षी गौतमांवर आलेले गोहत्येचे बालंट दूर करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे प्रगटलेली गोदावरी स्वरूप असलेली.

    गोमतीं- दक्षिण भारतात गोमती नदी स्वरूप असलेली.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमराम्बेचे मी भजन करतो.

    जय भ्रमराम्बा !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा - भाग तीन

    पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही.

    हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा आणखी एक गुण म्हणजे सखल जागी हे पाणी खेचले जाते.

    समजा आपल्या घराच्या सभोवती पाणीच पाणी साठलेले असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरामधे ओल येते, जी आपल्याला त्रास देते. ही ओल नको असेल तर काय करावे लागेल ?

    घराबाहेर जमलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करणे. यासाठी जिथे खोलगट भाग आहे तिथून या पाण्याला मार्ग तयार करून द्यावा. पाणी शांतपणे तिथून निघून जाईल. जिथे उंचवटा येईल, तिथे पुनः ते अडकून अवरोध निर्माण करेल. तिथे पुनः मार्ग मोकळा करून द्यावा. असं करत करत रस्त्यावरील मुख्य गटारापर्यंत हे पाणी ढकलावे लागेल. एकदा का हे पाणी मुख्य गटारात गेले की आपले काम संपले.

    तस्संच शरीरात होतं. आपण हे ओळखून त्या अतिरिक्त पाण्याला मुख्य स्रोतसात आणण्यासाठी मदत करायची की झाले.

    मुख्य स्रोतस म्हणजे मुखापासून गुदापर्यंत ! ही एकच पोकळी आहे. आकाश महाभूत. यामधे नैसर्गिकरीत्या काही जलमहाभूत पाझरत असते. साहाजिकच त्याची गती अधोगती असते. वरून खाली असा हा प्रवाह असतो. या आकाश महाभूतात्मक आतड्यांमधे आपण खाल्लेल्या पृथ्वी महाभूतात्मक अन्नातील चिकटून राहीलेला काही भाग तिथे असलेल्या अतिरिक्त जलमहाभूतामुळे अवरोध निर्माण करतो. तिथेच चिकटलेल्या मळाला मागाहून येणारे चांगले अन्न पाणी चिकटत जाते.

    वायु महाभूतामुळे आतड्यांची योग्य हालचाल जर होत असेल तर यातील जल महाभूत अडचणीतून, अडथळ्यातून वाट काढत पुढे पुढे जात रहाते.

    पाण्याचा निचरा वृक्कावाटे केला जातो, तर घन भाग मलावाटे शरीराबाहेर टाकला जातो. या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. उगाचच जास्ती पाणी पिऊन ते काही मलावाटे जात नाही. ते किडनीतूनच बाहेर काढले जाईल.

    शरीराची गरज नसताना अधिक पाणी घेतले तर आतमधे नुसता चिखल होईल. आणि या रबडा झालेल्या चिखलातून पुनः पाणी वेगळे करून ते मूत्रावाटे बाहेर काढणे, हे आणखी कठीण काम होऊन बसते.

    यासाठी हेच लक्षात ठेवावे, पाण्याला शरीराबाहेर पडून जाण्यासाठी जे नैसर्गिक उतार किंवा सखल भाग हवा, तो करून द्यावा. कपालभाती, नौली, नमनमुद्रा, मंडुकासन, शशांकासन, सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, बटरफ्लाय, यासारख्या आसनांनी, यौगिक क्रियांनी आतड्यातील आमाचे अडथळे दूर होत जातात, खड्डे पडत जातात, अतिरिक्त पाण्याला पुढे जायला योग्य रस्ता करून दिला जातो.

    आमरूपी चिखलातून पाणी वेगळे करीत गेलो, की पचन सुधारतेच ! पचन म्हणजेच अग्नि.
    शुद्ध तेजमहाभूत !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.05.2017

  • अंगणी गुलमोहर फुलला

    शीतल गारवा, तृप्तता देणारा, आयुष्याला उभारी देणारा ‘वसंतराजा गुलमोहर’. कधी कधी निसर्गात घडणा-या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत सहजपणे टाकतात.

  • आजचा आरोग्य विचार – भाग चौदा

    प्रत्येक कृतीमधे आपण भारतीयत्वापासून कसे लांब जातोय, आणि भारतीयत्वापासून लांब जाणे म्हणजे आरोग्यापासून लांब जाणे, कारण भारतीयत्व म्हणजे संपूर्ण आरोग्य हे लक्षात आणून देणारी ही लेखमाला आहे, याची एकदा आठवण करून देतो. आपण भारतीय असल्याचा आनंद नक्कीच व्हायला हवा. गेले ते दिन गेले, असे म्हणून सोडून देऊन कसे चालेल ? त्यातील जे चांगले असेल ते स्विकारण्याची तयारी हवीच.

  • कापसापासून सुतापर्यंत

    अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

  • सिक्कीम–दार्जिलिंग : हिमालयाच्या कुशीतली मोहक अशी अनुभवयात्रा!

    सिक्कीम–दार्जिलिंग : हिमालयाच्या कुशीतली मोहक अशी अनुभवयात्रा!

    ढगांनी वेढलेल्या हिरव्या टेकड्यांवर सूर्याची पहिली किरणं स्पर्शून जातात आणि मनात एक अनामिक शांतता संचारते. काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात; ती अनुभवण्यासाठी, आतून जाणण्यासाठी असतात. भारताच्या ईशान्य हिमालयात वसलेले, सिक्किम ही अशीच जादुई भूमी. निसर्ग, अध्यात्म, साहस, शांतता आणि सौंदर्य या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.