वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात
प्रेमभक्तीचा प्रचंड महापूर शेगांव रस्त्यावर धो-धो वाहत होता. समुद्राला जणू भरती आली आणि लाटावर लाटा किनाऱ्यावर येऊन धज्ञकत होत्य, त्या लाटातील अमृतमयी सिंचनाने सारे भक्तगण न्हावून निघाले होते. टाळमृदंगाच्या गजरातील तो अनुपम सोहळा भावभरल्या अश्रुपूर्ण नंत्रांनी बघताना क्षण्काल काळाचे भान हरपले. कितीतरी वेळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंच डिव्हायडरवर निश्चल शरीराने भावपूर्ण अंत:करणाने सारे प्राण डोळ्यात साठवून घेताना मनात आल खरच देव अशा साध्या भाळ्या भाविकांच्या हृदयातच निश्चितपणे नांदतो.
अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हातून, डोक्यावर खांदयावर स्वतःचा बोजा सावरीत दिंडीत सामील झालेले वारकरी आपल देहभान विसरून टाळ मृदंगाच्या लयदार गजरात नाचतांना पाहून मन तृप्त झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्यक्ष प्रेमभक्ती काय असते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रामनवमीला शेगावी होणारा दिंडी सोहळा याची देही याची डोळा अवश्य बघावा. तो बघायला मिळणे अनुभवणे खरोखरीच महद्भाग्याचं लक्षण आहे. ते महद्भाग्य सर्व भक्तगणांना आज शेगांवी निश्चितच मिळाले.
आज हजारो दिंड्या शेगांव रस्त्यावरून टाळमृदंगाच्या लयीत भजने म्हणत एकाच ओढीने चालत होत्या. लोहचुंबकाच्या कक्षेत येणाऱ्या लोखंडाला लोहचुंबक जसा आपल्याकडे ओढून घेतो तसे सर्व वारकरी श्री महाराजांच्या कक्षेत येताच ओढल्याप्रमाणे जावू लागले.
श्री महाराजांच्या पादकांच्या परिस स्पर्शाने आपल्या जिवाचं सोन करण्यासाठी लागलेली ओढ मनाला लागलेला ध्यास सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे जाणवत होता. हे सर्व दृश्य पाहून सांग पुलकीत होत होतं. दिंडीत घुसून मनसोक्त नाचावसं वाटत होत, परंतु श्री महाराजांनी दिंडीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवल्याने, वाहवून जाण योग्य नव्हतं, आणि शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध नियोजनाचा माझ्या भावनिक उर्मीने अजाणतेपणाने का होईना अपमान झाला असता. संस्थानचा आदर्श नजरेसमोर ठेवून वागणारा मी, मला असं करून कस चालेल? स्वतःच्या मनाला समजावीत जडअंतकरणाने सर्व विहंगम दृष्ये डोळ्यात साठवून मुक्कामाचा रस्ता धरला.
आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरीच सुवर्णदिन म्हणावा लागेल. श्री गजानन महाराज संस्थानकडून प्रसादरूपाने टाळ-मृदुंग मिळावेत ही बरीच वर्षे अतृप्त राहिलेली इच्छा श्री महाराजांनी आज पूर्ण केली. जणुकाही आमच्या सेवेला, भक्तीला पुर्णरूप प्रदान केलं. आता आणखी काही मिळवायची इच्छा राहिली नाही. मनात आलेल्या सर्व गोष्टींची महाराज लीलया पुर्तता करतात हे पदोपदी अनुभवतांना जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री महाराजांची सेवा ह्या पामराकडून घडो ती त्यांनी करवून घेण व श्रीचरणाजवळ स्थान मिळो एवढीच इच्छा ! साधे आचरण, निर्मळ अंतःकरण आणि निष्ठायुक्त भक्ती भगवंताला प्रिय असते असे सर्व संताच्या शिकवणीचे सार आहे. दांभिकता आणि कर्मठपणाबरोबरच भोंदुगिरी वर संतांना चौफेर हल्ले केले. जगद्गुरु तुकारामांच्या अभंगगाथेत, संत एकनाथांच्या भारुडात, असे कितीतरी दाखले मिळतात ज्यात बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती यावर कडाडून हल्ला केलेला दिसून येतो.
आजही धर्माच्या नावाखाली भोळ्याभाबड्या भाविकांना लुटण्याचे काम स्वतःला मठाधिपती, महाराज, संत म्हणवणारे लोक करीत आहेत. भोळ्या भाविकांनी अशा दांभिक गुरुंपासून सावध राहिले पाहिजे. श्री गजानन महाराजांकडे अनन्य भावानं शरण गेल्यास निश्चितच आजही ते योग्य मार्ग दाखवतात. भक्त पुंडलीकाला जसे सावध केले तसे आपणालाही करतील यात शंका नाही. त्या साठी आपली भक्ती पुंडलिकाप्रमाणे खरी व दृढ असणे गरजेचे आहे. वारी पुर्ण होऊ दे मग खुशाल ज्वर येऊ दे! नाहीतर मरण ते मी आनंदाने स्विकारीन असे म्हणणाऱ्या पुंडलिकाची पायदळ वारीवर किती प्रेम, किती निष्ठा होती. हे समजण्याकिरता पायदळ वारीच केली पाहिजे त्यात काय सुख असते हे आम्ही सलग दहा पदयात्रेत अनुभवलं आहे.
शेगावं संस्थानच्या श्रीरामनवमी उत्सवाला शेंगावी जाण्याचा योग मात्र अनेक वर्षांनी आज आला. उत्सवातील आनंद सोहळा बघून मन तृप्त झाले. रीरामनवमीला दुथडी भरून वाणाऱ्या नदीसारखा वारकऱ्यांचा दिंडीसमूह दरवर्षी श्री गजाननाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात लाखोच्या संखेनी शेगांवी येतो हे केवळ ऐकून माहित होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र आज होत होता.
प्रत्येक वारीत सहभागी असलेल्या दिंडीत २ ते ३ महिला डोक्यावर तुळस पाण्याची कळशी घेवून चालत असतात. आपले वय विसरून तुळाशीवृंदावन सावरत त्या आपल्या लाडक्या "गजानन बाबाला" भेटायला अधीर होऊन पळत असतात.
चालण्यचा थकवा असला तरी वरकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्ततेचा आनंद दिसतो. कडक उन्हा तडाखा सोसत दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगी असलेल्या सहनशीलतेचे आणि निरामय भक्तीचे आपणाला दर्शन घडते.
अतिशय शिस्तबद्धरितीने हजारो दिंड्या आपल्या वारकऱ्यांना घेऊन नगरप्रदक्षिणा करत असतात. ते सार दृश्ये इतकं लोभसवाणं असतं, इतकं मनोहारी असतं की त्यावरून जराही नजर ठळू नये.
संध्याकाळच्या श्री महाराजांच्या पालखी सोहळ्याच वर्णन करण हे लेखनीचं काम नव्हे. तो सोहळा प्रत्यक्ष बघणे भाग्यात आले तर त्यासारखा अत्यूच्च आनंदाचा क्षण नाही. प्रत्येक भक्ताने हा अनुभव घ्यावाच. साखर गोड असते हे सत्य असलं तरी त्याची गोडी ती खाल्याशिवाय कळत नाही.
हजारो दिड्यांचं शिस्तबद्ध नियोजन करताना कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अस्वच्छता नाही. भव्य अशा अनेक शामीयान्यात हजारो दिंड्यांची राहण्याची, जेवणाची चोख व्यवस्था संस्थानाचे सेवेकरी अतिशय श्रद्धेने, काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून सांभाळत असतात. महाराजांच्य सेवेबरोबरच त्यांच्य भक्तांची सेवा करण्यात संस्थानच्या सेवेकऱ्यांना धन्यता वाटते. एवढ्या प्रचंड गर्दीचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध रितीने करणारे व ते सांभाळणारे सेवक खरोखरच धन्य होत. दिंडीच्या मार्गावर शुभ्र वेषातील सेवेकरी हजारोंच्या संखेने संस्थानला नियमित सेवा देतात.
श्रीमहाराजांनी समाधिमूर्वी दिलेल्या वचनावर दृढ श्रद्धा ठेवून संस्थेचे कार्य अन्याहतपणे चालू असून ह्या सर्व सेवाकार्याच श्रेय श्री महाराजांना अर्पण करणारे, संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे श्री महाराजांच्या चरणी वहिलेला समर्पित जीव. श्री महाराज प्रत्यक्ष भक्तांच्या हृदयात कसा नांदतो याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे प. पू. शिवशंकर भाऊ पाटील होय.
प्रचंड अशा कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आणि क्षमता त्यांना श्रीमहाराजांकडून भरभरून मिळाली याचं कारण त्यांची श्री महाराजांवर असलेली दृढ श्रद्धा होय. काटेकोरपणे नियमांच पालन, स्वच्छता व सुव्यवस्था असणारी भरतातील एकमेव संस्था म्हणजे श्रीगजानन महाराज संस्थान शेगांव होय.
सायंकाळच्या नेत्रदिपक पालखीचा सहभाग असलेल्या दिंड्यांच्या पुढे गावातील सर्व बॅण्डपथके आपल्या सर्व ऐश्वर्यासह दिंडीत सामील होतात. त्या मागोमाग मानाच्या दिंड्या, मधोमध श्री महाराजांचे तीन सजवलेले अश्व लयबद्ध पावले टाकीत चालतात. त्यांना सोबत असते डौलदार भारदस्त चालीच्या दोन हत्तींची. श्री महाराजांची वैभवशाली पालखी संस्थानच्या शिस्तबद्ध वारकऱ्या सोबत निघत असते. एका लयीत चालणारे ध्वजधारी उंच असे ध्धराज सरळ रेषेत उंच धरुन चालत असतात. परिटघडीच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखातील संस्थानचे वारकरी एका लयीत भजने म्हणत चालताना त्यांच्या कडक शिस्तीतून व्यवस्थानातील उत्तुंगता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
“श्री गजानन महाराज संस्थानचे वेवेकरी" हा खरोखरीच प्रबंधाचा विषय ठरू शकेल इतकी त्यांची सेवा नियमांचे काटेकोर बंधन पाळून अविरतपणे चालू आहे कारण “मी गेलो सेसे मानू नका । भक्तीत अंतर करू नका । कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच।।” या श्रीमहाराजांच्या वचनावर त्यांची दृढ श्रद्धा आहे. आपली प्रत्येक गोष्ट श्री महाराज बघतात हा उच्चतम भाव सर्व सेवेकऱ्यांच्या हृदयात नांदताना आपणाला पदोपदी दिसून येतो. हा उच्चतम कोटीचा भाव आपल्या कुशल व कल्पक नियोनाद्वारे शेगाव संस्थान आज वर्षानुवर्षे जोपासत आहे आणि भविष्यातही जोपासत राहील यात शंका नाही.
“सर्वे भवन्तु सुखिन:” हे संस्थानचे घोषवाक्य असून या घोषवाक्याबरोबरच "शिवभावे जिवसेवा' आणि “सेवा हीच साधना" या व्रताचा अंगीकार करता अनेक सेवाकार्ये अविरतपणे चालू आहेत. रंजल्या गांजलेल्यंना जीवनावश्यक वस्तू आणि मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात पुरवण्याचे कार्य खरोखरीच वाखणण्यासारखे आहे. संस्थानचे कार्य अनेकांनी आदर्श घ्यावा असेच आहे. भुलोकीचे नंदनवन शोभावे असा “आनंदसागर" प्रकल्प साडेतीनशे एकर जमिनीत अतिशय कल्पकतेने साकारला आहे.
हे सारं घडत ते कृपासागर असलेल्या श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि पेरणेने यावर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त प. पू. श्री शिवशंकर भाऊ पाटील यांची नितांत श्रद्धा आहे. श्रीमहाराजांच्या चरणी संपुर्णतः शरणागत असलेले, संपुर्णपणे श्रीमहाराजांचे कृपापात्र असलेले भाऊ पाटील ज्यांच्या अंगी नम्रता, लिनता, कर्तव्यतत्परता यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो संपूर्ण महाराजमय झालेले प. पू. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे कार्तव्याचा, निष्ठेचा, प्रेमभक्तीचा महामेरू होय. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या विषयी लिहिण्यास लेखणी थीटी पडावी असे त्यांचे कर्तृत्व महानच नव्हे तर गगनाला गवसणी घालणारे आहे. सेवा, भक्ती, समर्पण आणि त्याग ह्य उच्च जीवन मुल्यांना १९६९ पासून आजतागायत अखंडपणे व्यवस्थापक ह्या पदावर कार्य करीत असताना जोपासले आहेत. अशा थोर विभूतीच्या केवळ दर्शनानेसुद्धा साधकाच्या हृदयात खऱ्या भक्ती प्रेमाचा उदय झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे. “शिवशंकर भाऊ पाटील । कारभार करी अंगे सकल । अतिप्रसन्न त्यासी भक्तवत्सल श्री गजानन महाराज ।।"
ज्या ज्या वेळी पालखी किंवा दिंडीचा विषय चर्चिला जातो त्या त्या वेळेस पाटील घराण्यातील एका तेजस्वी व्रतस्थ वारकऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ते व्रतस्थ वारकरी म्हणजे पुरूषोत्तम भाऊ पाटील होय.
श्री गोमाजी महाराज यांनी कुकाजी पाटलांना स्वप्न दृष्टांत देऊन मृत्यूपत्र करण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी सर्व संपत्तीची योग्य सोय लावावी व त्या बरोबरच "पंढरीच्या वारीचे व्रत वंश परंपरागत अखंड चालवावे" असाही संकेत दिला गेला. तो ही मृत्युपत्रात नमूद केला गेला. आजतागायत ते व्रत पाटील मंडळी जोपासत आहेत.
एक व्रतस्थ वारकरी म्हणून १९६८ ते १९८० एक तप सलगपणे श्री महाराजांच्या पालीखीसोबत श्री पुरूषोत्तम भाऊ पाटलांनी पायी वारी केली. यात कधीही खंड पडला नाही. प्रत्यक्ष द्वितीय चिरंजीव पांडूरंग पाटील यांच्या लग्न सोहळ्यास ते हजर राहू शकले नाहीत. कारण त्या वेळेस श्री गजानन महाराजांच्या पालखी सोबत ते पायी वारीत होते. आध्यात्मिक कार्यास, प्रापंचिक कर्मा ऐवजी प्रथम प्राधान्य द्यावं हा आदर्शच वरील प्रसंगातून दिसून येतो.
श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या पायदळ वारीत संस्थानच्या नियमांचे काटेकोर आणि शिस्तबद्ध पालन करीत तब्बल १२ वर्षे श्री पुरूषोत्तम भाऊ पाटील यांनी श्रींची सेवा केली, श्री महाराजंच्या लीला महात्म्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार वारीच्या माध्यमातून केला. अनेक वारकऱ्यांना संस्थानशी कायमचे जोडले, त्यांच्यात डोळस भक्तीची ज्योत जागवली.
तीच धुरा आज समर्थपणे श्री गजानन महाराज संस्थान अतिशय सुत्रबद्ध नियोजनाद्वारे अविरतपणे सांभाळत आहे. आजमितीला शेगांव संस्थानरच्या प्रमुख उत्सवात लाखो दिंड्या येताना आपणास दिसतात त्याचे बीज खऱ्या अर्थाने पाटील वंशानेच "गुरुआज्ञा प्रमाण मानून पेरले. " नियम, शिस्त स्वच्छता आणि कारभारातील पारदर्शकता यांचे काटेकोर पालन श्री कृपेने, श्री शिवशंकर भाऊ पाटील १९६९ पासून आजतागायत.
सर्वेसर्वा असूनही निष्ठावानसेवक रूपाने कार्य करीत आहेत. कुठलाही डामडैल न बाळगता तब्बल ४२ वर्षे श्रीमहाराजांची सेवा निष्ठेने अविरतपणे करीत आहेत. त्यांचे पुत्र श्री निळकंठदादा पाटील यांनीही आपले जीवन श्री चरणी वाहीले आहे.
श्री हरी पाटील ते श्री निळकंठ पाटील या प्रवासातील सर्व पाटील मंडळींनी शेगावमध्ये भक्तीप्रेमाचा सात्वीक मळा फुलवला, तो सदा टवटवीत राहील याची खबरदारी घेतली, त्याला शिस्त व नियमांचे कुंपण घातले. श्रीमहाराजांच्या सेवेबरोबरच श्रींच्या भक्तांची सेवा व्हावी हा परमोच्च विचार श्रीगजानन महाराज संस्थान करीत आहे. संस्थनच्या अनेक सेवा प्रकल्पातून आपणास ते दृश्य स्वरूपातून पहावयास मिळत आहे.
कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील म्हणजे सात्वीकता, नम्रता आणि त्यागाचं मुर्तिमंत प्रतिक म्हणून श्री महाराजांच दर्शन घेतल्यानंतर ओढ लागते श्री शिवशंकरभाऊंच्या भेटीची. प्रत्येक वारीस त्यांची भेट घेणं शक्य नसलं तरी त्यांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळतात. निष्ठा आणि कर्माचा सागर असलेल्या भाऊंना माझा कोटी-कोटी प्रणाम !
--श्री बाळकृष्ण कुलसंगे
संस्थापक: श्री गजानन महाराज मंदिर
उल्हासनगर - ३ जि. ठाणे
मो. ९४२२६७०४४८
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ३ रा (अंक २७)
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.
मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.
माझ्या शुक्राणूत होतं
माझ्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यातून संक्रमित
झालेलं आनुवंशिक तत्व,
माझ्या बायकोच्या
पक्व बीजांडात होतं
तिच्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.
आमच्या अपत्याचा जन्म
हा आमचा निर्णय होता
या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता
माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
आमच्या अपत्याचा जन्म ….
आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
पुनर्जन्म.
सजीवांच्या ….
जनक-जननींच्या
अनेक पूर्वपिढ्यातून
संक्रमित झालेलं
आनुवंशिक तत्वंच
अपत्यरुपानं अनेक
पुनर्जन्म घेत असतं
आनुवंशिक तत्व हाच
सजीवांचा आत्मा आहे.
तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
जन्म घेत असतो
आनुवंशिक तत्व
दोन जिवंत शरीरातून
तिसर्या जिवंत शरीरात
प्रवेश करतं ….
अेका मेलेल्या शरीरातून
दुसर्या जिवंत शरीरात नाही.
वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
हा श्लोक
आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
मान्य नाही
सजीव मेला की संपला
त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
पहिलाच आणि शेवटचाच असतो.
प्रेताची प्रत्येक पेशी
सडते विघटन पावते आणि
अणूरेणूंच्या स्वरूपात
पर्यावरणात विलीन होते.
जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
हे ध्यानी घे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - ३
शनिवार १० डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे-----शिवथर घळ --कुम्भे शिवथर --ढालकाठी--कांगोरी किल्ला--महादेवाचा मुरा--नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ--महाबळेश्वर मठ--तापोळा --बामणोली--शेंबडी वाघाली--नवरणवारीची खिंड --जुमडी--जळकेवाडी--वाघापूर सड्याचा उत्तर भाग --मोरवाडी --मोर घळ परसावडे --पांगरी --परळी --सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.
मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.
शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.
शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी "गुरु गादी" म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.
सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी 'दत्तात्रय स्वामी ' या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .
--चिंतामणी कारखानीस
ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।।
महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।।
ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।।
कोटीसुरजपकाश ऐसी छब तेरी ।।
गंडस्थल-मदमस्तक झुले शशिबिहारी ।।2।।
ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।
भावभगतसे कोई शरणागत आवे ।।
संतती संपती सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।3।।
ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।
गायक - श्री.सुधीर गोरे.
गायीका - सौ. वृक्षाली घाणेकर
या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता.
कर्करोगाच्या संभाव्य कारणांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि कर्करोगाच्या प्राथमिक स्तरावर ओळखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हे याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली.
पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरू करण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला एक महिना उजळणीसाठी देऊन त्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. पुन:परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा. मात्र पुन:परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्याच इयत्तेत ठेवण्यात यावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे . या बाबतीत शिक्षण मंत्री विनोद तावडे योग्य दिशेनी जात आहेत . गुणवत्तेला पर्याय असूच शकत नाही हे लक्षात आले हे बरेच झाले. अगदी लहान पणा पासून मुलांना तसेच शिक्षकांना आणि पालकांना परीक्षे बाबत बेदरकार बनवणा-या या धोरणाला तातडीने बदलले पाहिजे अशी मागणी अनेक शिक्षक करत होते .
तावडे योग्य दिशेनी जात आहेत. अभिनंदन !!!!!!
-- चिंतामणी कारखानीस
झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी..हे गाणं म्हणजे रेल्वे नामक एका भव्य युगाशी आपली बालपणीच झालेली ओळख. आमच्या पिढीने तर जन्मापासूनच या झुकझुक गाडीचा प्रवासमय आस्वाद घेतला. परंतू, हजारो प्रवाशांना एकत्र घेऊन जाणारी ही रेलगाडी भारतात पहिल्यांदा कधी धावली आणि या रेल्वे नामक एका ‘चाक्या म्हसोबा’ चा चमत्कार बघून लोकांनी तिचं स्वागत कसं केलं हे ऐकून आजच्या आणि येणार्या अनेक पिढ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
Copyright © 2025 | Marathisrushti