वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल.
February 24, 2019
स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.
October 18, 2018
इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते.
September 23, 2023
भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा आग्रह धरण्यात आला. हा कायदा अस्तित्वात येताच विविध प्रकारे मिळवलेल्या माहितीद्वारे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. असे असताना माहिती मिळवणार्यांवर दबाव आणण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, याला जनताच प्रखर विरोध करेल आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची नवी पहाट पहायला मिळेल असे वाटते.
January 10, 2011
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.
जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.
पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ....ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.
दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.
अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.
सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.
ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.
या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.
त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक "अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?" आणि दुसरा "अीश्वराची संकल्पना".
ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.
चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने...विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. "आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत" आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
तेथेच रुजलं.
या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व ... जेनेटिक मटेरिअल.
हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.
गजानन वामनाचार्य, मुंबअी.
शनिवारचा सत्संग - 1
शनिवार 26 नोव्हेंबर 2016
पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी -
27 फेब्रुवारी 2012
November 26, 2016
भारतात आर्थिक नियोजनाद्वारे विकास करताना सरकारची भूमिका आवश्यक ठरली. सरकारच्या आर्थिक विकासातील भूमिकेत आजवर भरपूर बदल घडून आज जरी आपण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेकडे आलो असलो तरी देखील शिक्षण, आरोग्य, शेती, कर रचना इ. विषयात सरकारची भूमिका अत्यंत सजग असणे अपेक्षित आहे. आर्थिक समरसता साधण्यासाठी आजवर आपल्या सरकारांनी केलेल्या उपाय योजना आपण थोडक्यात पाहू.
April 25, 2019
२१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो.
December 22, 2021
भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.
July 23, 2006
एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती.
एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली.
ती मुंगी तिच्या कामामध्ये 'फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड' होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याउला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते.
पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याफच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती.
सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्या च्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले.
पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते.
माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात?
याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुणात नेता आले नाही.
आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का?
तुम्हाला काय वाटते?
August 7, 2016
हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात.
January 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti