(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एक्याऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 38

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग बारा

    अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।।

    अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा.

    अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः।
    प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।।
    अमृतोपस्तरणमसी...पाश्य मौनी ।
    .....जलंस्पृष्ट्वा यथेष्टं भोजनंकुर्यात् ।।

    एकदा जेवायला सुरवात केली की जेवण संपेपर्यंत मौन पाळावे. यथेष्ट (यथेच्छ नव्हे ! यथा इष्ट, म्हणजे जे आपल्या प्रकृतीला योग्य असेल ते! आणि यथेच्छ म्हणजे मला जे खावेसे वाटते ते. किती फरक आहे ना ! शेवटी आरोग्य महत्त्वाचे!

    जेवण पूर्ण झाले की, जी आपोषणी घ्यायची असते, त्या पळीभर पाण्यामधील अर्धे पाणी अंगठ्यावरून पितरांसाठी जमिनीवर सोडायचे असते.

    किती सूक्ष्म विचार केला आहे पहा, हात आणि तोंड धुवायला अंगणामधे जावे. (ताटामधेच किंवा बाऊलमधेच पुचुक पुचुक करू नये.) येताना पायावर बाहेरील जमिनीवरचे जे जीवजंतु अंगावर येऊ नये म्हणून परत येताना सुद्धा हातपाय धुवूनच घरात यावे. (अंगणादौ पाणिमुखेसंशोधयेत् । हस्तौ पादौ प्रक्षाल्याचम्य शतपदनिगत्वा।)

    हातपाय धुवून येताना पोटावर हात फिरवत यावे आणि अग्निदेवतेला सांगावे, "मी जे अन्न खाल्लेलं आहे ते, काहीही शेष न राहाता जिरून जावे. या देहाला सुख प्राप्त व्हावे, या अन्नामुळे माझे सर्व शरीर रोगरहित व्हावे."
    हे म्हणत म्हणत, असा भाव मनात ठेवत, पोटावरून उलटसुलट हात फिरवावा, म्हणजे जेवताना अन्नपाण्याबरोबर गिळली गेलेली हवा किंवा पचनामधून तयार झालेला वात बाहेर येतो. (ज्याला आपण ढेकर म्हणतो.) आणि पचन सुधारते.
    (....इत्युदरंपरिमृज्य.....)

    (ही सर्व संस्कृत अवतरणे ऋग्वेदीय ब्रह्मकर्म या पोथीतून घेतली आहेत.)

    जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवणे ही किती छोटी गोष्ट आहे, ( असे रोज दोन्ही वेळा करावे, म्हणजे आपले पोट किती वाढत आहे याकडे आपले लक्ष वेधले जाते हा दूरदृष्टीचा अॅगल ) पण तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे असत नाही. पोट पुढे यायला लागले की मग मात्र पोट पुढे आलेल्याच डाॅक्टरांच्या दवाखान्यात किती वेळ जातो, याचे मोजमापच नाही. ????

    भोजनापूर्वी कुत्रा, मांजर, पोपट आदि पाळीव प्राणी यांना जेवू घालावे. घरासमोर आलेल्या अतिथीला अन्नदान करावे. घरामागे बांधलेल्या गाईवासरांसाठी गोग्रास काढावा. जेवायला सुरवात करताना भूतबली काढावा, कावळ्याला घास ठेवावा. आणि जेवणानंतर पितरांसाठी अन्नपाणी द्यावे.
    असा समष्टी विचार भारत सोडून अन्य कोणत्याही देशात केला जातो का ? केला जात असेल का ?
    नक्कीच नाही.
    म्हणून तर संपूर्ण जगामध्ये फक्त आपल्या प्रिय भारत देशाला "माता" असे संबोधले जाते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    01.07.2017

  • भज गोविन्दम् – भाग २ – चतुर्दशमंजरिका – चर्पटपंजरिका – मराठी अर्थासह

    भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. ‘चर्पट’ चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे.  

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ३

    आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.

  • ये कहाँ आ गए हम !

    सक्काळी दार उघडलं आणि अतिथी गृहाच्या दारातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! “

  • निसर्ग

    सध्या निसर्गाशी नाते तुटताना दिसते. आपण निसर्गाशी कसेही वागतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगतो. हे आपल्याला हृतू बदलात दिसून येत कधी पाऊस जास्त पडतो, कधी उन्हाळा जास्त होतो तर कधी कडाक्याची थंडी पडते. हे टाळण्यासाठी त्याच्याशी सख्य करा, त्याला जगवा आणि स्वत:ही जगाला शिका.

  • अमृततुल्य मैत्री

    प्रज्ञा रावकर 
    (मुंबई) यांच्या लेखावरुन

    पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. सुरुवातीला ते त्याला ‘बंगालीबाबू? म्हणायचे. हा बंगालीबाबू लवकरच मराठी शिकला आणि इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाला. गणपती, होळी साजरी करू लागला.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४

    शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः |
    अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं
    परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖

    भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी.
    येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी तत्त्वाचे, तत्पुरुष हे अग्नी तत्वाचे, अघोर हे आकाश तत्वाचे तर वामदेव हे वायू तत्वाचे प्रतिक आहे. त्या पंचमहाभूतांच्या रूपात भगवान प्रगट होत असल्याने यांना मुख म्हटले आहे.
    षड्भिरंगैः - सहा अंगांनी.
    वेदांची सहा अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, ज्योतिष आणि छंद.
    या सहा अंगांनी अध्ययन केल्यावर वेदांचा अर्थ कळतो. भगवान या सगळ्यांच्या पार आहे.
    अनौपम्य- अनुपमेय. ज्यांना कशाचीच उपमा देता येत नाही असे.
    षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं- छत्तीस तत्व विद्यांच्या पार असणारे.
    शैव सिद्धांतामध्ये असणाऱ्या तंत्रांतर पटल या आगम ग्रंथात, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय, यासह मन, बुद्धी ,अहंकार, शिव,शक्ती, सदाशिव, ईश्वर, विद्या, माया, अविद्या, कला, राग, काल, नियती,जीव आणि प्रकृती अशा छत्तीस तत्वविद्यांचे वर्णन आहे.
    परं - या सगळ्यांच्या पार असणाऱ्या,
    त्वां कथं वेत्ति को वा - आपणास कसे आणि कोण जाणू शकेल?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • माध्यमांची भाषा

    कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात.

  • क्षमतांची संहिता

    मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे.

  • सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

    फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! गुरुवार शुक्रवारपर्यंत चेहरा स्वच्छ होऊन जाई. नंतर पुन्हा शनिवारी चेहरा भरून जाई.

    पिंटो अगदी वैतागून गेल्या होत्या. त्यांनी दोन वर्षात अनेक उपचार करून पाह्यले. तपासण्या, क्रीम, घरगुती औषधे सगळं झालं पण शनिवार-रविवार पुटकुळ्या चेहऱ्यावर आपल्या हजर ! त्यांना तपासले खरं, पण मलाही काय करावं प्रथम समजेच ना ! त्यांनी ठरवून टाकलं होतं, आता हा शेवटचाच उपाय. यापुढे उपचार बंद. त्यांचा निर्णय कळल्यामुळं माझीही जबाबदारि वाढली होती. मी पहिल्या प्रथम माझा सुरुवातीचा उपचार केला आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाबद्दल विचारलं.

    त्यांचे पती मुंबईला एका बड्या आंतराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह होते. ते पुण्याला शनिवार-रविवारी यायचे. दोन दिवस कुटुंबात राहून सोमवारी परत मुंबईला जायचे.मिस्टर पिंटो पुण्याला आले की त्यांना भेटायला घेऊन येण्याबद्दल मी मिसेस पिंटोना सांगितलं. नंतरच्या शनिवारी पतिपत्नी दोघं कन्सल्टिंरुममध्ये आले. ते आत येताच इंपोर्टेड सेंटचा मंद सुवास रुममध्ये पसरला. ती दोघं बसली. पिटोंच्या अंगावरचा वास मला अस्वस्थ करू लागला. वास आवडला नाही म्हणून नाही; तर हा सेंटच मिसेस पिंटोच्या पुटकुळ्यांना कारणीभूत असेल काय असा विचार मनात आला म्हणून !
    मिस्टर पिंटोंना या आफ्टर शेव्हलोशनची खूप आवड. ते शानिवार-रविवार पुण्याला आले की साहजिकच ते इथंही दाढी केल्यावर हे लोशन वापरीत असणार !

    दोन दिवस पत्नीच्या सहवासात काढून ते सोमवारी जात. म्हणजे त्यानंतर शनिवारपर्यंत मिसेस पिंटो एकट्याच.मिस्टर पिंटोंना मी सांगितलं की तुम्ही पुण्याला पुन्हा आलात की दोन दिवस हे आफ्टर शेव्ह लोशन वापरू नका.त्यांनी तसं केलं. दोनच दिवसांनी मिसेस पिंटो आनंदी चेहेऱ्यानं आल्या आणि सांगू लागल्या, ‘ हा शनिवार-रविवार पुटकुळ्या आल्या नाहीत !

    अशा तऱ्हेच्या कितीतरी केसेस सांगता येतील. लोशन, क्रीम यासारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कितीतरी स्त्रीपुरुषांना त्रास भोगावा लागत असतो. पण ते जागरूक राहत नाहीत.सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधं आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकानं विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्पपरिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.

    नेहमी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधनं खाली उल्लेख केलेली प्रसाधनं नेहमी वापरलं जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.

    (१) हेअर डाईज :
    आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारी कितीतरी माणसं असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत ते सैतानी उपद्र्व देणारं असते ! असे कलप वापरल्यानं चेहेरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होताट. दीर्घ काळापर्यंत हे कलप वापरल्यामुळ या व्याधी व्यक्तीला कायमच्या चिकटतात.
    कलप वापरल्यानं त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत. मेंदी हा नैसर्गिक कलप असून अत्यंत कमी धोकादायक आहे.

    (२) शांपू :
    अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसंच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होत जाते. आणि केस गळायला लागतात.

    (३) साबण :
    बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेले असते. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.

    (४) केसांचे सुगंधी तेल :
    जर कुणाला सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असेल, तर त्यांनी सुगंधी तेल न वापरणंच इष्ट असतं. कित्येकांना अशी तेलं वापरल्यानं डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेलं विशेषतः खोबरेल तेल वापरणं हितकारक असतं.

    (५) कुंकू :
    ज्या रंगाची साडी त्याच रंगाची कुंकवाची टिकली कपाळावर हवीच, अशी हल्लीची फॅशन आहे. निरनिरळ्या रंगाची कुमकुम हल्ली बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.

    (६) मस्कारा व आय शॅडोज :
    या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळं त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.

    (७) लिपस्टिक :
    लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ अत्यंत आकर्षक आणि आव्हानात्मक दिसतात. हे खरं असलं तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.

    (८) फेस पावडार क्रीम :
    विविध प्रकारच्या फेस पावडरींमध्ये क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.

    (९) जीवनसत्त्वांचा वापर :
    आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.

    (१०) ब्लिचिंग एजंटस :
    आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. पण या खाळ्या सावळ्या रंगातही सौंदर्य असतं, तेज असतं याची कल्पना स्त्रियांना नसते. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.

    (११) नेल पॉलिश :
    सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये ‘ फॉर्मलडिहाईड लिकर ” या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं ‘ पैरानोसिया ’ म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो. आणि काहीजणींना तर नखापासून दूर असलेल्या ठिकाणी म्हणजे पापण्याजवळ इसब वगैरेसारखे विकार होऊ शकतात.
    हे सर्व वाचल्यावर कुणी घाबरून गेल्यास नवल नाही. पण या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येकीला प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाची ऍलर्जी असलेच असं नाही. प्रत्येकीच्या त्वचेची संवेदनक्षमता वेगवेगळी असते. सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वीच नीट दक्षता घेतली गेली तर त्याचा त्रास होण्याचा संभव कमी होतो.

    नेहमी वापरात असलेले ब्रँड एकदम बदलून दुसरे सुरू करू नयेत. जर नवीन प्रकार वापरायला सुरुवात केल्यावर त्वचेवर काही अनपेक्षित चमत्कारिक बदल दिसले तर लगेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि तो प्रकार वापरणं बंद करावं.किंमत जास्त असलेलं अगदी परदेशी प्रसाधनही एखादीला छळू शकतं. तेव्हा आणि अपाय यांचा काहीही संबंध नाही. कधी कधी अगदी साधं मलमसुद्धा त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा निसर्ग आणि नैसर्गिक उपचार हेच खरं. पाण्यानं स्वच्छ धुतलेला चेहरा नेहमीच टवटवीत दिसत नाही का ? तेव्हा आपल्याचं सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रसाधनांचा उपयोग न केलेलाच बरा.

    आरोग्यम् धनसंपदा