वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुढीपाडवा व नूतन वर्षाभिनंदन !
मराठीसृष्टीसाठी जीवापाड मेहनत घेणारी टीम व त्यांचे आमच्यावरी प्रेम आणि आमचे त्यांच्या वरील प्रेमासाठी कविता. ज्यांनी मराठीपण जपले, मराठीसाठी काम केले.
तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे.
तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते.
विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे.
पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात.
स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग, आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
१९६२-६३ मध्ये टेड डेक्स्टर इंग्लंडचे कप्तान म्हणून इंग्लंडचा संघ घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये गेले तेव्हा त्यांनी ४८.१० च्या सरासरीने त्या सिरीजमध्ये ४८१ धावा केल्या. तो त्यावेळी रेकॉर्ड होता.
निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे.
संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.
भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं :
केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा - भाग तीन
पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही.
हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा आणखी एक गुण म्हणजे सखल जागी हे पाणी खेचले जाते.
समजा आपल्या घराच्या सभोवती पाणीच पाणी साठलेले असेल, तर त्याचा परिणाम म्हणून घरामधे ओल येते, जी आपल्याला त्रास देते. ही ओल नको असेल तर काय करावे लागेल ?
घराबाहेर जमलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करणे. यासाठी जिथे खोलगट भाग आहे तिथून या पाण्याला मार्ग तयार करून द्यावा. पाणी शांतपणे तिथून निघून जाईल. जिथे उंचवटा येईल, तिथे पुनः ते अडकून अवरोध निर्माण करेल. तिथे पुनः मार्ग मोकळा करून द्यावा. असं करत करत रस्त्यावरील मुख्य गटारापर्यंत हे पाणी ढकलावे लागेल. एकदा का हे पाणी मुख्य गटारात गेले की आपले काम संपले.
तस्संच शरीरात होतं. आपण हे ओळखून त्या अतिरिक्त पाण्याला मुख्य स्रोतसात आणण्यासाठी मदत करायची की झाले.
मुख्य स्रोतस म्हणजे मुखापासून गुदापर्यंत ! ही एकच पोकळी आहे. आकाश महाभूत. यामधे नैसर्गिकरीत्या काही जलमहाभूत पाझरत असते. साहाजिकच त्याची गती अधोगती असते. वरून खाली असा हा प्रवाह असतो. या आकाश महाभूतात्मक आतड्यांमधे आपण खाल्लेल्या पृथ्वी महाभूतात्मक अन्नातील चिकटून राहीलेला काही भाग तिथे असलेल्या अतिरिक्त जलमहाभूतामुळे अवरोध निर्माण करतो. तिथेच चिकटलेल्या मळाला मागाहून येणारे चांगले अन्न पाणी चिकटत जाते.
वायु महाभूतामुळे आतड्यांची योग्य हालचाल जर होत असेल तर यातील जल महाभूत अडचणीतून, अडथळ्यातून वाट काढत पुढे पुढे जात रहाते.
पाण्याचा निचरा वृक्कावाटे केला जातो, तर घन भाग मलावाटे शरीराबाहेर टाकला जातो. या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवावे. उगाचच जास्ती पाणी पिऊन ते काही मलावाटे जात नाही. ते किडनीतूनच बाहेर काढले जाईल.
शरीराची गरज नसताना अधिक पाणी घेतले तर आतमधे नुसता चिखल होईल. आणि या रबडा झालेल्या चिखलातून पुनः पाणी वेगळे करून ते मूत्रावाटे बाहेर काढणे, हे आणखी कठीण काम होऊन बसते.
यासाठी हेच लक्षात ठेवावे, पाण्याला शरीराबाहेर पडून जाण्यासाठी जे नैसर्गिक उतार किंवा सखल भाग हवा, तो करून द्यावा. कपालभाती, नौली, नमनमुद्रा, मंडुकासन, शशांकासन, सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, बटरफ्लाय, यासारख्या आसनांनी, यौगिक क्रियांनी आतड्यातील आमाचे अडथळे दूर होत जातात, खड्डे पडत जातात, अतिरिक्त पाण्याला पुढे जायला योग्य रस्ता करून दिला जातो.
आमरूपी चिखलातून पाणी वेगळे करीत गेलो, की पचन सुधारतेच ! पचन म्हणजेच अग्नि.
शुद्ध तेजमहाभूत !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.05.2017

बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते.
Copyright © 2025 | Marathisrushti