वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत.
देशाची अंतर्गत सुरक्षा खर्च गृहमंत्रालयाच्या बजेट मधून केला जातो. बाह्य सुरक्षेचा खर्च डिफेन्स मिनिस्ट्रीच्या बजेट मधून केला जातो. म्हणुन या वर्षी जरी संरक्षण मंत्रालयाचे बजेट फ़ारसे वाढले नसले तरी गृह मंत्रालयाचे बजेट हे पुष्कळ वाढले आहे.याचाच अर्थ अंतर्गत सुरक्षेचे धोके आणि आतल्या शत्रुंचा हिंसाचार वाढत असल्यामुळे सरकारने अंतर्गत सुरक्षावर लक्ष केंद्रित केले आहे.
आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
।। गजदन्ताय नम: अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
ह्याचा २०-२५ मीटर उंच वृक्ष असतो.काण्ड सरळ वाढते व त्याची त्वचा पांढरी,गुळगुळीत व आतून नाजूक,मोठी व तांबूस रंगाची असते.पाने ५-९ सेंमी लांब व आयताकार असतात.फुले पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची मंजीरी स्वरूपात असतात.फळ २.५-३ सेंमी व्यासाचे पक्ष युक्त असते.
ह्याची त्वचा उपयुक्त असते.आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात ह्याची चव तुरट असून थंड गुणाचा असतो.तसेच हा हल्का व रूक्ष असतो.हा हृदयाला हितकर असतो.हा कफ पित्तनाशक वातकर अाहे.
चला आता अर्जुनाचे उपयोग पाहूयात:
१)जखमेमधून रक्तस्राव हो असल्यास व जखम भरून येण्यास ह्याचा रस किंवा चुर्ण जखमेवर लावतात.
२)अर्जुनामुळे हृदयाचे पोषण सुधारते,हृदयाच्या पेशींना बळ मिळते व त्यामुळे वाढलेले ठोके कमी होण्यास मदत होते.
३)फ्रॅक्चर झाला असता इतर उपचारांसह अर्जुन चुर्ण दुधासह दिले असता फायदा होतो.
४)बायकांच्या अंगावर पांढरे जात असल्यास अर्जुनाचे चुर्ण द्यावे.
५)विविध त्वचारोगांमध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
।। कपिलाय नम: अर्कपत्रं समर्पयामि ।।
मारूतीला प्रिय असणारी व वाहीली जाणारी रूईची पाने हि गजानन प्रिय देखील आहेत.तसेच ह्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असल्याने ह्याचा पत्रीमध्ये समावेश केला आहे.
ह्याचे १-२ मीटर गुल्म क्षुप असते.ह्याचे काण्ड कठीण असून वरची त्वचा हि धुरकट,रेषायुक्त असून पाने १०-१५ सेंमी लांब व २.५-७ सेंमी रूंद आयताकार असतात.पानांचा वरचा भाग गुळगुळीत असून मागील भागावर पांढरी लव असते.ह्याची फुले पांढरी व वरच्या अर्ध्या भागात तांबूस वांगी रंगाची असतात.फळे लांब व आतल्या बाजूस वळलेली असतात.वाळल्यावर फुटून त्यातून मऊ कापूस बाहेर येतो व त्याला बि चिकटलेली असते.हाच तो कापूस ज्याला आपण लहानपणी म्हातारीचे केस म्हणायचो व तो उंच उंच उडवायचो आठवले ना!
ह्याचे उपयुक्तांग आहे मुलत्वचा,चीक ,फुले,पाने.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव कडू,तिखट असून उष्ण गुणाची असते.तसेच हल्की,रूक्ष व तीक्ष्ण असते.रूई कफ व वातनाशक असून पित्तकर आहे.
चला तर मग आता आपण ह्याचे उपयोग पाहू:
१)सूज व वेदना असणाऱ्या भागावर रूईची पाने गरम करून बांधली जातात.
२)पानांचा काढा जखम धुण्याकरीता उपयोगी आहे.
३)कोडावर रूईचा चिक लावतात.
४)दम्यामध्ये रूईच्या फुलाची व मिरीची राख उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने - कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर आणि प्रसिद्ध व्यक्तींचे सहज दर्शन होत असे. ७ / ८ मराठी दुकानांनंतर १ /२ अन्य भाषिकांची दुकाने असत.
पण भारताच्या राज्यघटनेने कुणालाही कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले असल्याने आणि ते फक्त मराठी मुलुखाला लागू होत असल्याने, संपूर्ण देशातून मुंबईत सुनामीसारखी माणसे येऊन कोसळायला लागली. इथली स्थानिक भाषा, पेहेराव, संस्कृती, खाद्यपदार्थ, दुकाने, आस्थापने,नोकऱ्या, सणवार, पद्धती, सिनेमा, नाटके, प्रकाशने, राहत्या इमारती, वृत्तपत्रे, इतिहास आणि त्यातील आमचे आदर्श, इत्यादी शेकडो गोष्टी टिपून टिपून मारल्या गेल्या आणि आम्ही मराठी मंडळींनी अगदी एकजूट करून त्या त्यांना मारू दिल्या.
आज आम्ही हिंदीतच बोलतो. मराठी बोलतांना १० शब्दांमध्ये ४/५ शब्द हिंदी आणि इंग्रजी वापरतो. उडुपी, पंजाबी, चायनीज , थाय, कॉन्टिनेन्टल " फूड" ( "जेवण"म्हणू नये --त्यामुळे त्याची ग्रेसच जाते) खातो. मिसळ पाव, वडापाव, झुणका भाकर इत्यादी गोष्टी या " गावठी" ठरल्या आहेत. ! मिसळ हा अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे हे जागतिक पातळीवरही मान्य झालंय तरीही तो कॉन्टिनेन्टल होत नाही. एखादा मराठी माणूस भेटला तरी आम्ही बरेचसे हिंदीतच बोलतो आणि काही कारणाने आमचे भांडण सुरू झालेच आणि ते मात्र अर्वाच्च मराठी भाषेत चालते.
मुंबईतून पुण्यात शिरलो की बराच फरक जाणवतो. पुण्यात आलो की मी कुणाशीही चक्क मराठीत बोलू शकतो. उठसूट मला "excuse me " ने सुरुवात करावी लागत नाही. रसवंती गृह, क्षुधाशांती गृह, खाऊवाले, पोटपूजा, मंगल कार्यालय, वस्त्रालय, गंडेरी, मऊ भात, मेतकूट भात, मंडई, बोळ ,केशकर्तनालय .... अहो, हे पुण्यात सहज वापरले जाणारे मराठी शब्दही मला आता भरजरी वाटतात. हे शब्द आजही लोकं वापरतात आणि ते सर्वांना कळतातही ! ब्राह्मणी गोड चविष्ट पदार्थांपासून ते झणझणीत कोल्हापुरी पदार्थांपर्यंत, मराठी अन्नपूर्णेचे समग्र दर्शन ठायीठायी होते. तुळशीबागेत गुडदाणीवाला पाहून तर मी जुन्या मराठी वाङ्मयातील मजकुरात थेट पोचलो. गोल निळ्या पाट्या, तेथे पूर्वी कोणती थोर व्यक्ती राहत होती ते सांगतात. ठिकठिकाणी दिसणाऱ्या अशा पाट्या पुण्याचे सांस्कृतिक संचितच दर्शवितात. मराठीला वैभवसंपन्न करणारे किती तरी प्रकांड पंडित लेखक, कवी, नाटककार, तसेच संशोधक,अभ्यासक,वैज्ञानिक, अभिनेते, चित्रकार, मूर्तिकार .... पुण्यात पूर्वी तर होतेच आणि आजही आहेत.
व्यासंग जपण्याच्या वृत्तीमुळे पुण्यात २५ हून अधिक विविध संग्रहालये आणि व्यक्तिगत पातळीवर विविध गोष्टींचा संग्रह करणारे शेकडो संग्राहक आहेत. सामाजिक चळवळी ,लढे,,राजकीय पक्ष, धार्मिक आणि वैचारिक पंथांच्या नेत्यांची नुसती नावे लिहायलासुद्धा २ /३ पाने कमीच पडतील. भारतातल्या सगळ्या भागात अत्यंत चमत्कारिक आणि विचित्र वागणारे भरपूर लोक आहेत. पण पुण्यातल्या पाट्या आणि "विनोदी किस्से" यांच्या आम्हीच करीत असलेल्या कुचेष्टेसारखी कुचेष्टा मात्र कुठेही होत नाही.
पण... पण गेली २ / ३ वर्षे माझ्या प्रत्येक पुणे भेटीत कुठेतरी फार मोठा फरक वेगाने दिसायला लागलाय. दाही दिशांनी पुण्याला हजारो इमारतींचा वेढा पडलाय. हजारो मराठी शेतकरी त्यांच्या जमिनींसह नाहीसे झाले. पुण्याशी कसलेही देणेघेणे नसलेले लाखो लोक येथे येउन वसले आहेत. अन्य राज्यांतून हजारो मंडळी रोजगारासाठी पुण्यात घुसली आहेत.पुण्याच्या कित्येक रस्त्यांवरील, फेऱ्या मारून फुटकळ वस्तू विकणारे विक्रेते हे परप्रांतीय आहेत. मराठी माणसांच्या काही त्रुटींचा पुरेपूर फायदा उठवत ही मंडळी पडेल ते काम करून येथे रुजतायत. असे नोकर कमी पगारात दिवसभर राबतात. रात्री दुकानाबाहेरच झोपतात. रात्रभर दुकानाचे रक्षण करणारे आणि सकाळी तात्काळ हजर होणारे असे हे नोकर, वेगाने आपल्या मराठी मंडळींच्या नोकऱ्या काढून घेतायत. उडुप्यांची हॉटेले वेगाने वाढतायत. त्यामुळे आता मराठी पदार्थांची रेलचेल असलेल्या खाणावळी, क्षुधाशांती गृहे, भोजनालये बंद पडू लागतील. रग्गड भाडे देणारे अन्य प्रांतीय आणि विदेशी भाडेकरू पुण्याच्या आतपर्यंत शिरलेत. प्रचंड देणग्या मिळतात म्हणून अशा मंडळींना आमची थोर विद्यापीठे लाल गालिचे अंथरतायत.
यापुढे पुण्याची अत्यंत वेगळी ओळख जपणारे सगळे मारुती, गणपती, देविदेवता, हौद, चौक हे वाहतूक कोंडी करतात म्हणून हटविले जातील. त्यामुळे आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध होईल. मोठमोठया व्यक्तींची स्मारके, विकासाच्या आड येतात म्हणून हलविली ( पाडली ) जातील. आता विविध पेठांच्या जागी, जुन्या संस्कृतीला कायमचे आडवे करणारे छान छान टॉवर्स उभे राहतील. अशा टॉवर्सची नावेही सफायर, ब्ल्यू माऊंट, ला मॉन्द, ऑलीम्पिया अशी असतील. त्यामुळे आपले गावठीपण आपोआप नाहीसे होईल.नाहीतरी पुण्यात झालेल्या " स्मार्ट (पुणे) सिटी" कार्यक्रमातून मराठी पूर्णपणे हाकललेले होतेच . बाहेरून आलेल्यांची गैरसोय होवू नये, त्यांना नीट कळावे म्हणून आपल्या मराठी मंडळींनी आता हिंदीतून आणि इंग्रजीतून बोलायला सुरुवातही केली आहे. पण वाहतूक सिग्नल तोडला म्हणून मराठी पोलिसांनी पकडले की दंड होवू नये म्हणून एरवी मराठी येत नसल्याचा आव आणणारी ही बाहेरून आलेली मंडळी,त्याच्याजवळ मात्र अगदी शुद्ध मराठीतून घडाघडा बोलतात. दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन लाखो वारकरी पुण्यनगरीला पावन करीत असतात. आता या पालख्यांमुळे
वाहतुकीची प्रचंड कोंडी होते म्हणून या पालख्या, पुण्याच्या बाहेरून नेण्याची यापुढे हळूहळू मागणी होईल आणि ती मान्यही होईल. रस्ते अडविणाऱ्या गणपती उत्सवांवर सतावणूक करणारी बंधने येतील. आज पुण्यातील बहुतेक फेरीवाले मराठी आहेत. पण त्यांच्या जागी आता, रस्त्यांवर रात्री प्रचंड खरकटे फेकणारे,चोरून वीज-- पाणी घेणारे, किळसवाणी घाण करणारे,वाहतुकीला बेगुमानपणे अडथळा करणारे,सर्व प्रकारचे रोग आणि प्रदूषण फैलावणारे... अशा फेरीवाल्यांचे जथ्थे येऊन बसतील. असा चमत्कार पाह्यला मिळेल की आपले लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी बाहेरच्या फेरीवाल्यांच्याच मागे खंबीरपणे उभे राहतील.एकही रिक्षावाला मराठी असणार नाही. मुंबईत मी हेच पाहत राहिलो .आज मला येथे मराठीत कुणाशीच बोलता येत नाही.
मोरारजींचा महाराष्ट्राला मुंबई मिळू न देण्याचा चंग मी पहिला होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर त्या रात्री शिवाजीपार्कवरचा जल्लोष मी पहिला आहे. आणि मराठी मुंबई अशा तऱ्हेने वेगाने बुडते आहे आणि तेही मी पाहतो आहे .
मराठी भाऊ भाऊ एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांना संपविण्यासाठी निकराने लढतायत. मराठी राज्याचे तुकडे पडण्यासाठी निष्णात मराठी मंडळीच वकिली करतायत. महापालिकेने, सरकारने अधिकृतपणे रस्त्यांना, चौकांना , वास्तुंना, गावांना पिढ्यांपिढ्यापासून दिलेली नावे बिनदिक्कत आणि तीही बेकायदेशीरपणे बदलली जातायत. आजूबाजूच्या परिसरात कुणाला माहितीही नाही अशा अगम्य "महान" व्यक्तींची नावे रस्त्यारस्त्यावर उगवली आहेत. विलेपार्ल्यासारख्या पु. लं. देशपांडे यांच्या घरात, त्यांचे नाव एका बागेला देण्याच्या तीव्र विरोधाला वर्षभर निकराने तोंड द्यावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव काय असणार ? आमची दहीहंडी, गणपती उत्सव,आमच्या सभा, सण यांच्यावर अमराठी मंडळी लक्ष ठेऊन आहेत.यंत्रे घेऊन आमचा आवाज मोजत फिरतात या मंडळींनी जर हरकत घेतली नाही तर आम्हाला हे सण साजरे करता येतात. मांसाहार करतो असे कारण दाखवून गडगंज टॉवर्समध्ये मराठी माणसाला जागाच दिली जात नाही.
आता भीती वाटते ती पुण्याची !! कारण पुण्यात ही सर्व पूर्व-लक्षणे आता वेगाने दिसतायत. पण असे काही घडू लागले असले तरी ते नाकारले जाईल अशीही शक्यता आहे. मला असे वाटते की आपण बराच काळ काहींशा गुंगीत राहतो. असे काही घडत असेल यावर आपला आधी विश्वासच बसत नाही. आपली मराठी मंडळीच " असे पुण्यात घडणे कदापीही शक्य नाही " असे सांगणारे लेख, परिसंवाद, चर्चा करतील ....आणि पुणे बुडणे सुरूच राहील.कारण मुंबईतही हेच घडले होते.
पानिपत आणि पानशेत ही दोन प्रलयंकारी संकटे पुण्यावर कोसळली. पण पुणे कात टाकून पुन्हा उभे राहिले. मराठी पुणे, सांस्कृतिक पुणे, विद्वानांचे पुणे, ऐतिहासिक पुणे, सामाजिक चळवळींचे पुणे ...काही उणे नसणारे पुणे ! ... पुन्हा उभे राहिले. पण आताचे हे संकट मात्र ही सर्व गुणवैशिष्ठ्ये पार धुवून काढील. त्यानंतरचे पुणे मात्र आपले नसेल.
अशीच धुतली जातांना मी मुंबई पाहिली, ठाणे पाहिले, डोंबिवली पाहिली ! मी पुणेकर नसलो तरी मला पुण्याबद्दल खूप आपुलकी आहे. पण दुर्दैवाने मला पुणेदेखिल असेच पाहत राहावे लागेल. मी कुणाला विचारणार --" कुठे नेऊन ठेवणार आहात पुणे ?"
-- मकरंद करंदीकर.
अंधेरी-पूर्व, मुंबई.
अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात.
चीज आणि केक स्वतंत्रपणे जगभरात प्रसिद्ध आहेत , पण एकत्रितरित्याही ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ह्या चीजकेकचे जगभरात खूप चाहते आहेत.
अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे.
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात अंतरिक्षाला रणभूमी बनविता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. परंतु आता अंतरिक्षातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी आपापल्या देशांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिक्षाचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti