(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभ्यासक्रमातील प्राधान्यक्रम..

    अभ्यासक्रमातील प्राधान्यक्रम..

    जीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली.

  • सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन कमी करायला मदत करते

    आपल्या आरोग्यावर आपण रोजच्यारोज घेत असलेल्या आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत अनेक सल्ले आपल्याला मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते आणि ह्यावरूनच तुमचे आरोग्य कसे असेल ते ठरते.

  • जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या प्रकारचा दहशतवाद

    1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते.

  • छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

    छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.

    छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.

    सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.

    माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.

    शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...

    -- श्री. राहुल अविनाश कळंके
    वैजापूर, जि. संभाजीनगर

  • अष्टभुजा नारायणी

    अष्टभुजा नारायणी' या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल!धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल.अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो.साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे नियोजन अश्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपण लढत असतो.हात, पाय,मेंदू, तोंड आणि हो आपलं मनसुद्धा या वेळी प्रचंड व्यस्त असतं.पहाटे पाच वाजेच्या आसपास सुरु झालेलं हे शरीराचं यंत्र रात्री बारा वाजेपर्यंत आई,बायको,सून,मुलगी,बहीण, भावजय याच जोडीला जवाबदार कर्मचारी अश्या आखलेल्या परिघात वेगवेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याचा पिंगा घालत नाचत असतं.

    ...........आणि अचानक महिला दिन किंवा women's day येतो आणि सगळ्यांना या गोष्टीचा साक्षात्कार होतो.या दिवसापुरते स्त्रीच्या समर्पणाचे, त्यागाचे गोडवे गायले जातात.स्त्रीच्या कष्टांची,तिच्या परिश्रमाची,तिच्या संघर्षाची,तिच्या जिद्दीची जाणीव सगळ्यांना होते.

    पण वर्षानुवर्षे या चक्रातून जाणाऱ्या तिच्या शरीराला मात्र ही जाणीव हळूहळू रोज व्हायला लागलेली असते.वाढत जाणारे वजन,दुखणारे गुडघे,पित्ताचा त्रास,कंबरदुखी,पाळीचा त्रास,कमी हिमोग्लोबिन,दम लागणे,टाचा प्रचंड दुखणे,रात्री झोप न येणे,अनामिक दडपण जाणवणे,केस गळणे,भेगा पडणे,त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अश्या असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.
    या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरचं यासाठी वेळ कुठून आणायचा हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

    या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

    Energy boosting:

    पाव किलो खारीक पावडर,पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.
    दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

    बस्स पांच मिनीटवाला नाश्ता with देशी अंदाज:

    नाश्ता compulsary प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात,तुपसाखर पोळी,लोणीसाखर पोळी,राजगिरा लाही व दुध,लाह्यांचे पीठ व ताक,नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी,पुलाव,थालीपीठ,उपमा,शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.
    ओट्स, कॉर्नफ्लेक्स,packed juices, बेकरी पदार्थ,शिळे पदार्थ,मॅगी यांना ठामपणे NO म्हणायचे.

    किचन क्लिनिक:

    फोडणी करतांना हिंग,मेथी दाणे,हळद,कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.
    एक वेळेच्या जेवणात वरण,भात, तूप,लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
    ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.
    कणकेत चिमूटभर चुना add करून,कडीपत्ता चटणी,जवस चटणी,तीळ चटणी,शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

    Fitness मन्त्र:

    सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठीदेऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल
    सकाळी उठल्यानन्तर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास
    दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊयात

    सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी शोधून खूप हसूयात

    आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना,मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूयात,स्वतःची ओळख घडवून आणत,महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर निरामयतेच्या वाटेने जाता जाता फिरुनी नवे जन्मेन मी हे promise स्वतःशीच करूयात.

    वैद्य सौ दिप्ती धर्माधिकारी
    ९३७०७२०५०२
    diptisdharmadhikari@yahoo.com


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

  • जानेवारी १६ : सीमारेषा बनली पोलिसरेषा – बॉडीलाईनचा कहर

    क्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्‍यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.

  • सुप्त मनाची अफाट शक्ति

    सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.

    हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का?

    तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.
    लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे.

    सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.
    दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.

    जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते.
    सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
    काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.

    त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात. याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.

    म्हणूनच मी सुखी आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत. जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे, असेच विचार मनात सतत असू द्या. हाच समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • ताण-तणावांचे विषाणू

    ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.

  • श्रीनृसिंहसरस्वती महाराज, कारंजे

    श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात.

  • सरकारी गुन्हेगार

    भारतीय दंड संहितेनुसार गुन्हेगाराच्या व्याख्या निश्चित असल्यातरी या व्याख्यांच्या बाहेर असलेले अनेक गुन्हेगार आहेत. कायद्याच्या भाषेत ते गुन्हेगार नसले तरी सरकारच्यादृष्टीने ते गुन्हेगार ठरत असल्याने सरकार आपल्यापरीने त्यांना द्यायची ती शिक्षा देतच असते. शिक्षेचे स्वरूपही रूढ शिक्षेपेक्षा फार वेगळे असते.