वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पालकहो...
मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा..
आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय... सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की...
मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात... गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही... म्हणजे पहा ना... प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय... नौकरी... शाळा... टुशन... अस काही...
पण यातील काही ठिकाणे वगळता... यातील शाळा व टुशन यांच्या वेळा बहुदा सर्वंच ठिकाणी एकसारख्याच असतात...
पण मंडळींनौ..., या दरम्यान शाळेतील वा टुशनमधील विद्यार्थी खरच नेमक्या ठिकाणी असतात का हो....?
कदाचित् .... या बद्दल अनेकजण वा नेहमीप्रमाणे (आंधळेप्रेम) आमचा आमच्या मुलामुलीवर भरपुर वा अतोनात विश्वास आहे... अस मनातल्या मनात म्हणाले सुध्दा असतील... छान..हरकत नाही...
पण मी अशा वेळेतही काही शाळेय मुलामुलींना अशा काही ठिकाणी पाहत असतो की... जेथे सामान्य पणे येणाऱ्या वा जाणाऱ्या जनतेची... लोकांची... नजरच जाऊ शकत नाही... कारण आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये अशीच भिती या मुलामुलींच्या चेहऱ्यावर असतेच...
मग ही शाळेच्या पोशाखात, शाळेच्या वेळामध्ये... शाळेत शिकायच सोडुन बाहेर नेमकी का...? कशासाठी...? कोणासोबत...? कशाला...? बाहेर फिरत असतात हेच नेमक कळत नाही... कदाचित् लहान व अपरिपक्व वयामध्ये यांना बहुदा मजा वाटत असेलही... अशावेळी ह्यांची पालकांना व शिक्षकांना वेळप्रसंगी ठामपणे खोट बोलण्याची हिम्मतच वाढत असते.. पण या खोटेपणाचा दुरगामी परिणाम यांना माहीतच नसतो...
अशावेळी मोठमोठ्या कॉफी शॉप्स... महागड्या हॉटेलमध्ये.... साध्या टॉकीझ मध्ये... मोठ्या मॉल मध्ये... गजबजलेल्या रस्त्याच्या पासुन निर्जन ठिकाणी... मंदिराच्या कोपऱ्यात.... बागेत एकदच गर्दीपासुन लांब... बसस्टॉपवर.... अशा अनेक ठिकठिकाणी ही शाळेय मुलमुली शाळेय गणवेशात वेगळ्याच विश्वात हरवलेली असतात....
मंडळींनौ .... मी अस म्हणत नाही...की तुमचेच पाल्य असेल...? पण फक्त कळकळीची नम्र विनंती की... तुम्हीपण जागृत रहा.... कारण या लहान कोवळ्या वयामध्ये यांना आयुष्याची फारसी जाणीव नसते हो... याच वयामध्ये थोडीफार एक्साईटमेंट करायला जातात... व काही समाजकंटक अशावेळी नेमका याच अजाणतेचा जाणीवपुर्वक गैरफायदा घेतातच... मग काही विद्यार्थ्यां वाममार्गाला लागताल. (तबांकु... मावा... सिगारेट... नशा...) अशापैकी काहीही... हिरोप्रमाणे वागण हेच यांना माहीती असत... व मुली ..कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतय.. महागड्या हॉटेलमध्ये जेवण वा स्नँक्स खाऊ घालतायत... आलिशान गाड्यातुन सफर करवतात... आपल्या सौंदर्यांयाची मनभरुन तारीफ करातायत... बारिक.. सारिक.... गोष्टींच .. हसण्याच... बोलण्याच... चालण्याच... लाजण्याच... बेधडक स्वभावाच.... आवाजाच... कौतुक करत असत म्हणुनही ह्या कोवळ्या वयात मुली साहजिकच हरळुनच जातात... मग नेमका हाच गैरफायदा समाजकंटकही घेतात...
पण आपला पाल्य शाळेतच गेलाय... या गोडगैरसमजुतीत असतात.. पण ही टेक्नोसेव्ही पिढी कदाचित् जरा लवकरच पुढे जायच्या घाईत आहेत... या नादात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हायरस घुसु नये... याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायलाच हवीच तेही ॲन्टीव्हायरस होऊन... हीच विनंती....
आपला हितचिंतक
--विवेक जोशी
१८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.
सामना १९७५ सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू
निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
दिग्दर्शक :जब्बार पटेल
कथा :विजय तेंडुलकर
पटकथा :विजय तेंडुलकर
संवाद :विजय तेंडुलकर
संगीत :भास्कर चंदावरकर
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :शा. वैद्य
गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :निवृत्त दळवी
वेषभूषा :पांडुरंग खटावकर
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू
गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM
“रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय.
परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे.

एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक झाल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी मुंबईत येण्यासाठी घरून पळ काढला.बरकत राय,कृष्णराव जावकर,व जनार्दन जावकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले.अली अकबर खान सारख्या मातब्बराकडे शागीर्दकी केली.म्हणजे किती शास्त्रीय संगीताचे ज्ञान त्यांच्याकडे होते. नवकेतनच्या “TAXI DRIVER“ पासून एस डी बर्मन यांच्या कडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. कालापानी मधील “हम बेखुदिमे तुमको पुकारे” गाण्याची कम्पोजीशन जयदेव यांची होती.पण स्वाभाविकपणे संगीतकार म्हणून नाव लागले सचिनदाचे.
सुजाताचे संगीत दिले जात होते.”जलते है जिसके लिये” ची चाल तयार झाली. सचिनदानी सांगितले उद्या रफीला रिहर्सलसाठी बोलवा. जयदेवनी हळूच दादांना बाजूला घेतले व म्हणाले “ “दादा,ट्यून जरा ध्यान से सुनो, ये ट्यून रफिसाब कि नही, ये SOFT ट्यून तलत कि है “ दादानाही ते पटले. देव आनंदने निर्णय केला कि एक चित्रपट जयदेवना देऊ या. म्हणून “ हम दोनो “ चित्रपट जयदेवना दिला. त्यावेळी लतादीदी सचिनदाकडे गात नसत. जयदेव सचिनदाचे सहायक होते त्यामुळे लतादीदी आपल्याकडे गातील याची त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी दीदींना विनंती केली “ कृपया माझ्या कडे गा नाहीतर हा चित्रपट माझ्या हातून जाईल” लतादीदी तयार झाल्या.” झायलोफोन वर वाजवलेली लायटरची ट्यून, चित्रपटाची सिग्नेचर ट्यून झाली.पण नंतर कधीही देव आनंदने जयदेवना स्वतंत्र चित्रपट दिला नाही. याच चित्रपटातील “कभी खुद्पे,कभी हालातपे रोना आया, बात निकली तो हार एक बात पे रोना आया “गाण्यासारखे जयदेव जगले. ऋषिकेश मुखर्जींचा “आलाप” व अमोल पालेकर यांचा “अनकही” हे चित्रपट तर पूर्णपणे रागदारीवर आधारित होते. गमन चित्रपटात त्यांनी गायक हरिहरन यांना ब्रेक दिला.
आयुष्यभर ते अविवाहित राहिले आणि चर्चगेट येथील रिट्झ हॉटेलसमोरच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यात एका खोलीत राहिले. कधी कधी ते दरवाज्याला कुलूप न घालताच बाहेर जात. तेव्हा त्यांना विचारले जाई कि “तुम्ही कुलूप न घालताच बाहेर कसे जाता तेव्हा ते म्हणत “माझ्या कडे चोरून नेण्यासारखे आहेच काय? एक माझं संगीत जे माझ्या हृदयात आहे आणि दुसरे माझं दुर्दैव जे माझं कधीही साथ सोडत नाही.” त्यांना मध्य प्रदेशचे एक लाख रुपयाचे लता मंगेशकर पारितोषिक मिळाले ते घेतल्यावर त्यांना विचारले “ तुम्हाला पारितोषिक मिळाल्यावर कसे वाटते?” ते म्हणाले “आयुष्यात मी कधी एकत्र एक लाख रुपये पाहिले नाहीत “ चेक घेऊन ते कामासाठी दिल्लीला गेले.मुंबईला आल्यावर त्यांनी तो चेक बँकेत भरला.तो क्लीअर होण्या आधीच ६ जानेवारी १९८७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी संगीत दिलेल्या ४२ चित्रपटापैकी कितीतरी चित्रपटाची गाणी गाजली होती.त्यांची गैरचित्रपट गाणी गाजली होती.हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालामधील कवीताना चाली देऊन मन्नाडे कडून गाऊन घेतली होती त्यांना तीन वेळा उत्कृष्ठ संगीतकार रेश्मा और शेरा,गमन,अनकही चित्रपटांना मिळाले.आणि सूर सिंगार ४ चित्रपटाना मिळाले. त्यांची गाणी गाजलेले चित्रपट.
१) जोरूका भाई २) हम दोनो ३) किनारे किनारे ४) मुझे जिने दो ५) रेश्मा और शेरा ६) प्रेम पर्बत ७) परिणय ८) आलाप ९) तुम्हारे लिये १०) घरौंदा ११) गमन १२) अनकही
-- रवींद्र शरद वाळिंबे.
श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.
बचत मग ती कोणत्याही स्वरूपात करता येईल. अगदी स्वयंपाक घरापासून ते इंधन, पाणी, वीज, खरेदी, वाहन, भटकंती आदी विविध प्रकारांतून आपण बचत करू शकतो. अशी बचतीची वृत्ती ही आपल्याला पर्यायाने देशाला विकासाकडे नेत असते.
पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.
पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते.
१९६२-६३ मध्ये टेड डेक्स्टर इंग्लंडचे कप्तान म्हणून इंग्लंडचा संघ घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये गेले तेव्हा त्यांनी ४८.१० च्या सरासरीने त्या सिरीजमध्ये ४८१ धावा केल्या. तो त्यावेळी रेकॉर्ड होता.
Copyright © 2025 | Marathisrushti