वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां
नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् ।
सत्यज्ञानानन्दमयीं तां तनुरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ २॥
आई गौरीचे हे स्वरूपच सर्व साधकांचे साध्य आहे, उपास्य आहे,हे स्पष्ट करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां- प्रत्याहार, ध्यान, समाधी इत्यादी योगशास्त्रातील स्थितींना जे भाज अर्थात पात्र आहेत अशा साधकांच्या,
नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् - चित्तामध्ये नित्य निवृत्ती रूपाने क्रीडा करणाऱ्या, काष्ठा अर्थात रुद्र भामिनी.
योगशास्त्र मध्ये अष्टांगयोगात प्रत्याहार, ध्यान, धारणा ,समाधी अशी उत्तरोत्तर श्रेष्ठ अंगे वर्णिली आहेत. आपापल्या योग्यतेनुसार त्या त्या अंगावर स्थिर असणाऱ्या साधकांचा चित्तात आई जगदंबा गौरी आनंदरूप क्रीडा करते.
सत्यज्ञानानन्दमयीं - वेदांता मध्ये परब्रह्माचे चे स्वरूपलक्षण म्हणून वर्णिलेल्या सत्, चित्, आनंद मयी. अर्थात परब्रह्मस्वरूपिणी.
सत् शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. चित् शब्दाचा अर्थ आहे चैतन्य,ज्ञान. तर आनंद म्हणजे आनंदच. ही तीन वेगवेगळे नसून सच्चित् असणारा आनंद, अशा स्वरूपात तिन्हींचे एकत्रीकरण. परब्रह्म असे आहे. ते स्वरूप लक्षण आई जगदंबे ला वापरतांना आचार्य सुस्पष्ट करीत आहेत की ती परब्रह्म परमात्मस्वरूप आहे.
तां तनुरूपां- ती स्वरूपलक्षणे जणू काही तनू म्हणजे शरीर धारण केली आहेत अशी. अर्थात सत्- चित्- आनंद ही अमूर्त लक्षणे जर देहधारी म्हणजे सगुण-साकार झाली तर ती कशी दिसतील? याचे जणू काही सादरीकरण आई जगदंबेचे स्वरूप आहे. ती जणू काही ज्ञानाचे, आनंदाचे मूर्तिमंत रूप आहे.
ज्ञानाचा आनंदाचा रंग आहे गोरा. तेच तिचे स्वरूप म्हणून ती गौरी. गौरवर्णीय असणाऱ्या भगवान शंकरांची सहधर्मचारिणी. त्यांच्या समान वर्णाची ती गौरी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
या जगामध्ये अनेक universes आहेत. Multi Universe संबंधित Dr Stuart Clark यांनी ‘Unknown Universe’ या पुस्तका मध्ये संगीतलेले आहे. वेगवेगळ्या Universe मध्ये वेगवेगळे जीवन असू शकते अथवा सारखेच जीवन सुधा म्हणजेच समांतर ब्रम्हांड असू शकते.
दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते.
२५ फेब्रुवारी २००१ रोजी सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन झाले. त्याआधी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचा सार्वकालिक सर्वोत्तम संघ निवडला होता.
इथेही त्यांचे टाइमिंग जबरदस्त होते. ‘मुलाखती आणि प्रश्न किंवा स्पष्टीकरणांसाठी कुणी आपल्याकडे येऊ नये’ म्हणून आपल्या आयुष्याचा (हा) डाव संपल्यावरच हा संघ जाहीर करावा अशी त्यांची सूचना होती!
आताच्या पिढीतील खेळाडूंपैकी केवळ सचिन तेंडुलकरचा समावेश त्यांनी निवडलेल्या १२ खेळाडूंमध्ये होता. हा संघ असा होता – अर्थातच त्यात ब्रॅडमन होतेच.
दक्षिण आफ्रिकेचे बॅरी रिचर्ड्स आणि ऑसी आर्थर मॉरिस सलामीला, क्रमांक तीन खुद्द डॉन, क्रमांक चार सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स पाचव्या स्थानावर (ब्रॅडमनच्या मते सोबर्स हा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे), मग कांगारू यष्टीरक्षक डॉन टॅलन. वेगवान गोलंदाजांमध्ये ऑसी रे लिंड्वॉल, डेनिस लिली आणि इंग्लंडचा अलेक बेडसर. फिरकीपटूंमध्ये बिल ओ’रेली आणि क्लॅरी ग्रिमेट (या दोघांसोबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंची संख्या सात) आणि बारावा खेळाडू इंग्लंडचे वॉली हॅमंड (कव्हरड्राईव मारावा तर हॅमंडनेच अशी त्याची ख्याती होती!) कर्णधाराची निवड त्यांनी केलेली नाही पण एकेका सत्रासाठी सोबर्स आणि ब्रॅडमन यांनी कप्तानी सांभाळली असती तर शोभून दिसले असते!
वॉली हॅमंड, क्लॅरी ग्रिमेट, बिल ओ’रेली आणि रे लिंड्वॉल हे चौघे ब्रॅडमन यांनी संघ निवडण्यापूर्वीच कालवश झाले होते. एप्रिल २०१०मध्ये बेडसर गेले...‘टेस्ट प्रिमिअर लीग’ भरविणारी कुणी पॅकरसदृश असामी अजून भूतलावर जन्मली असल्याचे ऐकिवात नाही. कसोटी क्रिकेट हे खरे तर क्रिकेटच्या झटपट प्रकारांचे जन्मदाते आहे. कसोटी क्रिकेटच न टिकणे म्हणजे उंच वाढलेल्या झाडाला मुळापासूनच छेद देणे होईल- भाषेतील उद्गारचिन्हांसारखे !
डॉ. आनंद बोबडे लिखित `जागत्या स्वप्नाचा प्रवास' या पुस्तकातील एक उतारा.
हे पुस्तक मराठीसृष्टीवर उपलब्ध आहे... छापील आणि इ-बुक स्वरुपात
हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा
लांब पल्ल्याच्या प्रवासीगाड्यांचं नियोजन
मेल, एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अशा बारा तासांपासून अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी तासांचा प्रवास करणाऱ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. या गाड्यांना लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणतात. त्यांचं नियोजन विविध विभागांमार्फत होत असतं.
इंजिनड्रायव्हर्स, गार्ड, हेल्पर, तिकीट तपासनीस, या सर्वांच्या एकत्रित काम करणाऱ्या गटाला 'क्रू' म्हणतात. या सर्वांची ड्यूटी साधारणतः आठ ते दहा तासांनंतर समाप्त होते. यासाठी रेल्वेमार्गावरील ज्या स्टेशनवर 'क्रू' बदलला जातो ते स्टेशन सर्व सोयींनी परिपूर्ण असावं लागतं. त्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीच्या जागा ठीकठाक असाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे इंजिनाची तत्परतेनं करावी लागणारी तपासणी, प्रत्येक डब्याची तांत्रिक तपासणी, डब्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता, खानपानाची सोय, ह्या सर्व गोष्टी दहा मिनिटांत पूर्ण कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी अशा जंक्शनस्टेशनवर गाडी अर्धा तास थांबत असे, परंतु आजकाल गाडी लवकरात लवकर स्टेशनातून बाहेर काढावी लागते. या गाड्यांचे इंजिनड्रायव्हर्सही सहा ते आठ तासांनंतर बदलले जातात.
प्रत्येक इंजिनमध्ये एक जड लाईन बॉक्स ठेवलेली असते, ज्यामध्ये संपूर्ण मार्गाचं तपशीलवार टाईम टेबल, ट्रॅकची सखोल माहिती, आवाज करू शकणारे व उजेड पाडणारे छोटे बॉम्बस्, सुटे दिवे व इतर छोटी-मोठी आयुधं असतात. ही पेटी जड असून, रेल्वेपोर्टर एका इंजिनामधून दुसऱ्या इंजिनात तिची ने-आण करतात.
इंजिनड्रायव्हरना गाडी सुटण्याच्या वेळेआधी तासभर यार्डात जाऊन इंजिनाची तपासणी करून ते प्लॅटफॉर्ममधील उभ्या असलेल्या गाडीला लावावं लागतं. राजधानी एक्सप्रेससारख्या अति-महत्त्वाच्या गाडीचे ड्रायव्हर त्यांच्यावरील जोखमीचे काम करताना पूर्ण दक्षता घेतात. इंजिनड्रायव्हरजवळील वर्किंग टाईम टेबल हे सर्वांर्थानं परिपूर्ण असतं. त्यामध्ये सर्व लेव्हल क्रॉसिंग्ज, छोटी गेट्स, वळणं, पूल, नद्या, मार्गाची चढण, उतार, संपूर्ण मार्गावरील सिग्नल्सच्या जागा, तत्काळ वैद्यकीय केंद्रं, या सर्वांची पूर्ण माहिती दिलेली असते. काही ठिकाणी तांत्रिक थांबे असतात, जे प्रवासी टाईम टेबलमध्ये नसतात.
प्रत्येक गाडीला Booked Maximum Speed, Commereial Speed आणि Maximum Permitted Speed यांचं कोष्टक आखून दिलेलं असतं. काही कारणाने गाडी उशिरा धावत असेल, तर अशा वेळी गाडी वरील कोष्टकाप्रमाणे वेगाने जाऊन वेळ भरून काढते. डबे ओढण्याची प्रत्येक इंजिनाची किती क्षमता आहे हे निश्चित केलेलं असतं. त्यानुसार अगदी जरूर पडल्यास पुढील बाजूस दोन इंजिनं जोडली जातात. २५०० कि.मी. प्रवास झाल्यानंतर प्रत्येक इंजिनाची कसून तपासणी होते. ३० ते ३५ दिवसांनी आयए, आयबी, आयसी अशा श्रेणीत तपासणी होत असते. प्रत्येक इंजिन कोणत्या शेडमध्ये तपासणीसाठी पाठवायचं हे ठरलेलं असतं. त्याप्रमाणेच ते गाडीला लावण्याचा क्रम आखला जातो.
'ट्रेन सुपरिटेंडन्ट' हा एक महत्त्वाचा अधिकारी राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, अशा काही खास गाड्यांसाठी नेमलेला असतो. गाडीतील संपूर्ण अंतर्गत व्यवस्थाप्रमुख म्हणून त्याचा हुद्दा असतो. सर्व प्रवाशांची झोपण्याची, जेवणाखाण्याची व्यवस्था, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तत्परतेनं त्यांना मदत करणं ही या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. या विशेष गाड्या रेल्वेमंत्र्यांच्या आधिपत्याखाली असतात. अनेक परदेशी प्रवासी अशा गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गाडीतील व्यवस्थापनाचा दर्जा उत्तमच राहील याकडे अधिकाऱ्यांचा नेहमीच कटाक्ष असतो. गाडी संपूर्ण प्रवास बरोबर वेळेवर करत आहे किंवा नाही हे पाहण्याकरता मार्गावर १५० ते २०० कि.मी. अंतराचे 'कंट्रोल सेक्शन' असतात. ते सर्व एकमेकांशी टेलिफोननं जोडलेले असतात. या सर्व विभागांवर एक मुख्य नियंता असतो. गाडीच्या वेळापत्रकावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. समजा, अपघात झाला, तर तत्काळ आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग करण्याची जबाबदारी मुख्य नियंत्यावर असते.
मुख्य व अतिमहत्त्वाच्या स्टेशनवरील कंट्रोल रूममध्ये भव्य कंट्रोल पॅनेल असतं, ज्यावर धावणारी प्रत्येक गाडी टिंबांच्या स्वरूपात दाखविली जाते. तांबडा ठिपका म्हणजे मेल व एक्सप्रेस गाड्या, निळा रंग पॅसेंजर गाडीचा, तर काळा रंग मालगाडी दर्शवितो. काही कारणाने गाडी मध्येच थांबून राहिली असेल तर ती ठळक जाड रेषेत दाखविली जाते.
'केबिन कंट्रोल क्रू' हे सर्व रेल्वेमार्गावरील सांधे, सिग्नल व त्यांची इंटर-लॉकिंग अरेंजमेंट या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देतात, ज्यामुळे गाडी सुरक्षितपणे स्टेशनात शिरते व बाहेर पडते. गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची हे मुख्य स्टेशनमास्तर ठरवितो. महत्त्वाच्या गाड्यांचे, जेथून गाडी सुरू होते व ज्या ठिकाणी शेवटचा थांबा असतो तेथील, प्लॅटफॉर्मस ठरलेले असतात. छोट्या स्टेशनात स्टेशनमास्तरना ही जबाबदारी एकट्याने सांभाळावी लागते.
मालगाड्या एकदा मुख्य यार्डातून निघाल्या, की त्यांना मधल्या स्टेशनचे थांबे नसतात. त्यामुळे अशा पट्ट्यात त्या वेगाने जातात. जलद मालगाडी-सेवा (मुंबई ते दिल्ली) घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, परंतु इतर मालगाड्यांना मात्र पक्कं वेळापत्रक नसतं.
एखाद्या वेळी तांत्रिक कारणामुळे डबे जोडण्यास विलंब होतो व त्यावेळी गाडी सुटण्यासच उशीर होतो. हे सर्व सांभाळणं म्हणजे एक कसरतच असते.
-– डॉ. अविनाश वैद्य
देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,
देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी...
देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..
पूजेचे साहित्य —
अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)
वापरती भांडी –
तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.
पूजेचे साहित्य कसे असावे ?
सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.
गंध –
चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .
अक्षता -
धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .
हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.
फुले –
ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.
विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.
गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.
पाने –
विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.
धूप –
देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .
दिप –
निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..
नैवैद्य –
रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.
फळे -
देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.
तांबूल –
म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .
नमस्कार –
दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.
आरती –
देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .
प्रदक्षिणा –
देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..
प्रार्थना –
देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.
देवपूजेचे महत्त्व —
प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.
यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.
देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.
देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.
आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …
अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.
अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.
देवपुजा करण्याचे प्रकार —
१ मानसपूजा
२ मुर्तीपूजा
मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.
ही पूजा करताना दोन प्रकारे करतात
१ पंचोपचार पूजा
व
२ षोडशोपचार पूजा
१ पंचोपचारी पूजा Panchopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य
२ षोडशोपचार पूजा ShodShopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
(६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
(१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
(१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .
देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .
अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .
उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..
आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..
वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .
मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..
@ संकलित माहिती....
१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत.
अमर्यादमेवाहमाबालवृद्धं
हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः |
मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖
महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही.
श्री धर्मराजांचे उत्तर अत्यंत यथार्थ आहे. पण हा झाला अविवेकी माणसाचा विषय.
याउलट विवेकशील व्यक्ती नेमक्या याच गोष्टीने व्यथित होतो.
त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
अमर्यादम् - कोणत्याच प्रकारची मर्यादा अर्थात बंधन नसलेले,
एवाहम् - अशा त्या यमराजांना मी
आबालवृद्धं- बालकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना
हरंतं कृतांतं - धरून नेणाऱ्या यमराजांना, समीक्ष्यास्मि भीतः - पाहून मी घाबरून जातो.
मृतौ - या मृत्यूच्या विषयात, तावकांघ्र्यब्ज- आपल्या चरणकमलांच्या,
दिव्यप्रसादाद्- दिव्य प्रसादामुळे
भवानीपते - ही भवानी पती भगवान शंकरा !
निर्भयोऽहं भवानि - मी निर्भय होवो.
भगवान यमराज खऱ्या अर्थाने समदर्शी आहेत. बालकापासून वृद्धापर्यंत, गरीबा पासून श्रीमंता पर्यंत, मूर्खा पासून पंडिता पर्यंत, कुरुपा पासून विश्वसुंदरी पर्यंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांना नेतात. हे पाहिल्यावर ते मला तरी कसे सोडतील? हा विचार माझ्या मनात येऊन मी त्रस्त होतो.
अशावेळी आपली चरणकमले हेच माझ्या दुःख निवृत्तीचे एकमेव स्थान आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांच्या आदेशानुसार श्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी इंद्रवज्रा व उपेन्द्रवज्रा वृत्तात रचलेले हे स्तोत्र अशा इतर स्तोत्रांपेक्षा थोडे वेगळे आहे. कामाक्षी देवीला निद्रितावस्था त्यागण्याची विनंती करतानाच ते जगन्मातेला शुभ प्रभात चिंतण्याऐवजी, `आम्हा भक्तांची सकाळ शुभप्रद कर’ अशी विनंती करते. “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २
प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी ।
राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर ।
खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।।
अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
दुसरे ठाणक हे । पालीत । पहा मनुजा ख्यालीत ।
पालीत पाहुनीया । देवराव । श्री मार्तंड भैरव ।।
घालीत नगाऱ्या । वर घाव । विघ्ना सुटला धाव ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
तिसरे ठाणक हे । बाळ्यांत । सदरच्या किल्ल्यात ।
मुल देव बसले । खुशभत्त* । गड जेजुरीला जात ।।
माथा वन्दीले । चरण । भवजलधी तारण ।।3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
चौथे ठाणक हे सातारा । शेगुडी देव पाहता ।
आनन्दले चित्ता । अवचिता । हरली माझी चिता ।।
प्रभु म्या देखियला । अवधारा । हरपले असे धारा ।।4।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पाचवे ठाणक हे । जेजुरी । नवखण्ड मेदिनी ।
परतुन आणीली । धनंगिरी । बाणु उजव्याकरी ।।
राणी म्हाळसे । हे माते । पसन्न हो भत्त*ाते ।।5।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायक - श्री. नितिन श्री.
Copyright © 2025 | Marathisrushti