वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.
सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.
सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषात्त* आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो ‘इडियट बॉक्स’ अर्थात छोटा पडदा!
आपली व्होटबॅंक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी आणी तृणमूल काँग्रेसने मागच्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होऊ दिली. बंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून गेल्या ४८ वर्षांपासून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत.
हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.
हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.
आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:
१)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.
२)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.
३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.
४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.
५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.
अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मराठी जनमाणसात मराठीचा जास्तीत जास्त वापर संगणकावर व्हावा या हेतूने वरील लेखाचे प्रयोजन केलेले आहे. त्यात इंस्क्रिप्ट कळफलक रचना व युनिकोड अक्षरवळणांचा वापर ही दोन तत्वे वापरण्याचा आग्रह केलेला आहे.
हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.
अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.
२)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.
४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला हा लेख
तत्कालीन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय डॉ. टी. के टोपे यांच्या शिफारसीमुळं मी वसईत प्राचार्य म्हणून रुजू झालो. त्याकाळी वसईगाव ही ग्रामपंचायत होती. त्यामुळं प्राध्यापकांना नियमाप्रमाणं घरभाडे, अन्य भत्ते मिळत नव्हते. बाहेरील प्राध्यापक इथं आर्थिक अडचण सोसून येण्यास तयार नव्हते. आर्थिक पात्रता असलेले विद्यार्थी मुंबईतील
महाविद्यालयात प्रवेश घेत. मुंबईच्या नामवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मोठ्या मनानं सहाय्य केले. आपले उत्तम प्राध्यापक दिले. हळूहळू परिस्थिती बदलली. पण प्रारंभी काही वर्षे अडचणींना तोंड देऊन मी महाविद्यालयाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले. मी साहित्याचा विद्यार्थी. इंग्रजीचा प्राध्यापक.त्यामुळं मराठी बरोबरच इंग्रजी साहित्याचं मी वेळ काढून वाचन करीत असे. विनोदी वाङ्मय हे इंग्लंडचं खास वैशिष्ट्य! चॉसर पासून ते शेक्सपियर पर्यंत, डिकन्स पासून ते प्रिस्टले, वुडहाऊसपर्यंत या सर्व प्रतिभासंपन्न लेखकांनी विनोदी नाटकं, कादंबऱ्या लिहिल्या. उत्तम, दर्जेदार विनोद निर्मिती एकूण समाजाच्या अभिजात संस्कृतीची साक्ष देते!
मी संभाषणातून अधूनमधून विनोदी बोलतो. त्याचप्रमाणं आपण विनोदी लेखन करावं असं मला राहून राहून वाटतं.
मी कोकण साहित्यपरिषदेच्या कार्यात सहभागी असताना सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. राजा राजवाडे यांच्याशी माझा परिचय झाला. ते खूप विनोदी लेखन करीत. एकदा रत्नागिरी ते मुंबई कारनं प्रवास करताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुर्दैवानं त्या अपघातात ते गेले ! प्रत्येक वर्षी ते दिवाळी अंक काढत असत.त्यांच्या अपघाती मृत्युमुळं त्यांच्या पत्नी, त्यांचे सुपुत्र प्राचार्य माधव यांना धक्का बसला. पण त्यांनी आपल्या पित्याच्या दुर्दैवी देहावसानानंतर दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. श्री. राजवाडे यांनी एक विनोदी कादंबरी लिहावयास घेतली होती. पण ती अर्ध्यावरच राहिली. प्रा. माधव राजवाडे यांनी ही अडचण श्री. माधव गडकरी, प्रा. वि.शं. चौघुले याच्यापुढं मांडली. मी समोरच होतो. त्यांना मी ती कादंबरी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. विनोदी लेखन करण्याची संधी सहजच चालून आली होती मी ती कादंबरी पूर्ण केली. सर्वांनीच माझ्या या प्रयत्नाचं कौतुक केलं.
त्यानंतरही मी अधूनमधून विनोदी लेखन करण्याचा प्रयत्न केला. 'मी मुख्यमंत्री झालो तर' या विषयावर विद्यार्थ्यांना लेख लिहायला सांगितले जाते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या लेखात आपल्या अधिकाराचा (गैर) वापर करुन आपण संपत्ती कशी कमावणार, आपल्या नातेवाईकांचं कसं भलं करणार याचं वर्णन करतात. 'मन की बात' द्वारे पंतप्रधान जनतेशी संवाद साधतात. एक सामान्य पोलीस 'मन की बात' द्वारे आपल्याला होणाऱ्या त्रासाचं आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाचं वर्णन करतो. बडे अधिकारी मंत्री सर्वकाही करतात. पण गरीब बिचारा पोलीस मात्र अडकतो. पैशाअभावी तो कोर्टकचेऱ्या, बडे वकील यावर पैसे खर्च करु शकत नाही. ही त्याची 'मन की बात' मी विनोदी पद्धतीनं कथन केली. एक महाविद्यालय. तेथे एक विद्वान उत्तम विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्राचार्यासह अनेक प्राध्यापकांना त्याची विद्यार्थी, पालकप्रिय प्रतिष्ठा अस्वस्थ करते. त्यांच्यावर एक प्राध्यापिका अतिप्रसंग केल्याचा आरोप करते. प्रत्यक्ष न्यायालयात कॅमेऱ्यामधील चौकशीत ती प्राध्यापिका रडते आणि सर्वांनी माझ्यावर ‘अतिप्रसंग केल्याचा बहाणा करते.' असा दबाव आणला म्हणून मी खोटे आरोप केले असे न्यायाधीशांना सांगते. मी अशा कथा लिहिल्या. त्या मासिकात प्रसिद्धही झाल्या. विनोदी लेखन करण्याची माझी अजूनही तीव्र इच्छा आहे. माझे लेखन विनोदी आहे की हे विनोदी लेखन म्हणजे एक 'विनोदच' आहे असेही म्हणतील पण विनोदी लेखक म्हणून लिहिण्याची इच्छा मात्र माझ्या मनात शत्रूंवर हल्ला करण्यासाठी लपून बसलेल्या सैनिकांप्रमाणं आजही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ही इच्छा दबा धरुन बसलेली आहे. बऱ्याच वेळा शत्रू आसपास आल्याची खबर मिळते. झाडाझुडपात लपून बसलेल्या शत्रूंच्या हालचालीची खबर मिळते. सैनिक गोळीबार करतात. शत्रू सावध होतो. माझ्या विनोदी लेखनाच्या या गंभीर प्रक्रियेत असेही काही घडत राहते. त्यामुळं विनोदी लेखक म्हणून सातत्यानं लेखन करण्याचे मनोरथ आकाशात दाटलेले मेघ सोसाट वाऱ्यानं विखुरले जावे त्याप्रमाणे माझे मनोरथ एक प्रचंड भिंत कोसळावी त्याप्रमाणं अलगद कोसळतात. हे असं का होतं हे माझ्या मनाला समजत नाही. पण त्याची खंत मात्र माझ्या मनाला अस्वस्थ करते. यासाठी मी एखाद्या नामवंत मनोवैज्ञानिकांना माझे मन उघडे करुन माझी ही खंत, मनातील सल स्पष्ट करुन त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्याचा गंभीरपणे विचार करत आहे!
सध्या समाजात उघडपणे दिसणारी विसंगती मला विनोद लेखन करण्यास अधूनमधून अस्वस्थ करते. राजकीय क्षेत्रात नेते एकमेकांविरुद्ध 'तुम्ही चोर' असे प्रच्छन्नपणे आरोप करण्यात जितके पारंगत आहेत. तितकेच त्यांना वंदनीय असणाऱ्या थोरपुरुषांच्या पुतळ्यांची उंची वाढवण्यात मग्न आहेत! ही विसंगती माझी झोप उडवते.'पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपले स्थान समाजात अत्यंत गौण आहे' असा नारा नारी मंडळी छेडतात पण त्याच नारी – महिला विवाहानंतर पुरुषांवर वर्चस्व गाजवतात. त्यामुळं आता स्त्रीमुक्ती ऐवजी पुरुषमुक्ती असा नारा देण्यात येईल असे मला वाटतं! सध्या फॅशन्सचे युग आहे. अनेक आकर्षक जाहिराती, चित्रपट, मालिकेमधील अभिनेत्रींच्या केशभूषा, वस्त्रे यांचे (अंध) अनुकरण तरुणी करतात, मग साहजिकच तरुणांची मने विचलीत होतात. पण आता त्यांच्या पोटात 'मीटू' मुळे भीतीचा गोळा उठला आहे! सर्व क्षेत्रांत विसंगतीचे थैमान आहे. विनोदी लेखनासाठी हे विषय मला सतत खुणावतात. पण 'संध्याछाया भिवविती हृदया!' ही माझी आजची शारीरिक आणि मानसिक अवस्था! त्यामुळं विनोदी लेखक होण्याचं काय म्हणतात ते स्वप्न की काय ते अधुरेच राहणार हे नक्की. हीच एक खंत माझ्या मनाला सतत डॉक्टरांच्या इंजेक्शनच्या टोचणीप्रमाणे टोचत राहणार. त्यामुळं काही मिनिटं गुंगी येणार! पण त्याला आता माझा म्हणाल तर ईश्वराचाही इलाज नाही!
-- प्रा. पु. द. कोडोलीकर
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोजवर ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या समोरच्या उंचं इमारतीत ‘रेमंड्स’चं मोठं शोरुम आहे. ही इमारत म्हणजे रेमंड्सच्या सिंघानीयांचं नवं घर. या इमारतीच्या दर्शनी भागावरच हे मखर आणि त्यात एक पुतळा बसवलेला पाहायला मिळेल.अगदी हमरस्त्यावर आणि सहज दिसेल अशा ठिकाणी हे मखर आहे. इच्छुकांनी जाऊन जरूर बघून यावं.
Copyright © 2025 | Marathisrushti