(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

    आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे.

  • एक काल्पनीक पत्र

    दिल्लीमध्ये नुकतेच झालेले तीन भूकबळी. त्याबद्दलची अस्वस्थता मांडण्याचा केलेला प्रयत्न

  • सुधीर फडके – ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे

    शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव.

  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १

    भगवान श्रीवैकुंठनाथांच्या आळवणी साठी आचार्य श्री निर्माण केलेल्या विविध स्तोत्रां पैकी हे अत्यंत रमणीय स्तोत्र. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. भगवंताच्या चरण कमला पासून केशसंभारा पर्यंत प्रत्येक गोष्टीचे यात वर्णन केले आहे.

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग एक

    आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

    केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.

    म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
    भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !

    थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.

    हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.

    त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.

    आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.

    तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
    त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
    यालाच म्हणतात,
    चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
    भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
    माझे काही चुकलंय का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.02.2017

  • अर्थहीन निवडणुका !

    निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही. 

  • औषधाचे सेवन करताना घ्यावयाची काळजी

    औषधाचे गुणधर्म जपून ती टिकावू व्हावीत, त्यांचा शरीरात योग्य ठिकाणी परिणाम व्हावा व ती सुलभतेने घेताही यावीत यासाठी औषधे वेगवेगळ्या रुपात बनविली जातात. व (पातळ) औषधे, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, त्वचेवर लावायची औषधे, हुंगायची औषधे, अशी बहुरुपी औषधे आज आपण वापरतो. यातील बहुतांशी औषधे ही शरीरांतर्गत जाऊन रक्तात शोषली जातात व ईप्सित स्थळी (टारगेट ऑर्गन) जाऊन परिणाम करतात.

  • अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात.

    पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते.

    आजचे संशोधन असे सांगते, शरीरातील झिंक कमी होते, म्हणून मधुमेह, ह्रदयविकार होतात.

    काय जमाना आलाय, जी भांडी औषधी गुणांनी युक्त होती, ती मोडीत देऊन टाकली आणि बीकोझिंकच्या गोळ्या खात बसलो. याला म्हणायचा विकास.

    अॅल्युमिनियम, हिंडालीयम हे धातु शरीराला हानीकर आहेत, हे अर्वाच्च विज्ञान सांगते आहे, तरीदेखील शाळेतील पोषण आहार किंवा मंगल कार्यालयातील आहार याच भांड्यात केला जातोय. (सोयीस्कर दुर्लक्ष)

    पूर्वी तुरूंगातील कैद्यांना ( ते लवकर आजारी पडावेत, म्हणून ) हिंडालीयमच्या ताटात जेवण वाढायचे.

    आम्ही आमच्या घरालाच आता तुरुंग बनवलाय. तवा, चहाची किटली, दुधाची पातेली, कढई, अंडी उकडण्याचे पातेली हमखास अॅल्युमिनियम किंवा हिंडालीयमची असतात !

    सर्वात चांगले भांडे मातीचे ! आपले शरीर ज्या अठरा मुलद्रव्यांनी बनले आहे, तीच अठरा मुलद्रव्ये मातीत आहेत. मातीच्या भांड्यात आपण फोडणीपण देऊ शकतो, दूध तापवू शकतो, दही लावू शकतो, पेजसुद्धा शिजवू शकतो. गॅसवरपण ठेवू शकतो.

    मातीची भांडी वापरण्याचा आणखीही एक फायदा म्हणजे घरातला राग भांड्यावर काढला जावू शकत नाही.

    वेळ आली आहे,
    बदल करण्याची...
    वेळ आली आहे,
    बदल स्विकारण्याची...
    वेळ आली आहे,
    जुनं ते सोनं म्हणण्याची....

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ

  • दारूहरिद्रा / दारूहळद

    ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.

    दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते.ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.

    चला आता आपण दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)दारूहळद दीपन,यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.

    २)कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.

    ३)त्वचारोग,खाज,स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.

    ४)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar