वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात.
गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर,
लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस प्यायला दिला जातो.
जसे हे स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.गाजराचे रोप हे हातभर उंचीचे होते व गाजर हे जमीनी खाली वाढणारे कंद आहे.
गाजर हे चवीला गोड कडवट असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते पण पित्त मात्र वाढविते.
चला आता गाजराचे उपयोग पाहूयात:
१)इसब,गळवे,फोड ह्यात गाजर थोडे मीठ घालून पाणी न घालता वाफवून घ्यावा व त्याचा पोटीस बांधावा.
२)गाजराचे बी हे मासिक पाळी येण्या करिता ५ दिवस पाण्यात वाटून घ्यावे.
३)वारंवार भरपूर गढूळ लघ्वी होत असल्यास १ कप गाजराचा रस +१/२ चमचा जीरे +१चमचा धणे हे मिश्रण सकाळ संध्याकाळी उपाशी पोटी घ्यावे.
४)मधुमेहामुळे झालेली जखम नसेल व ती चिघळली असेल तर गाजराच्या रसाच्या घड्या
दिवसातून ४ वेळा जखमेवर ठेवाव्या.
५)कच्चे गाजर चावून खाल्ल्यास तोंडास रूची येते,जीभ साफ होते व हिरड्या देखील मजबूत होतात.
गाजर खायचा अतिरेक केल्यास पित्त वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 22, 2016
हळूहळू स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्या् अत्याचाराच्या घटना कानावर येऊ लागल्या. ४९८ या कायद्याचा स्त्रिया ढाल म्हणून नव्हे तर तलवार म्हणून उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा हा कायदा असल्याने या कायद्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ लागला.
November 19, 2021
माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते
January 31, 2012
म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे |
गुरूअंजनेवीण ते आकळेना | जुने ठेवणे मीपणे ते कळेना ||141||
कळेना कळेना कळेना ढल्íना | ढळे नाढळे संशयोही ढल्íना |
गळेना गळेना अहंता गळेना | बळे आकळेना मिळेना मिळेना ||142||
अविद्यागुणे मानवा ddऊमजेना | भ्रमे चूकले हीत ते आकळेना |
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे | परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ||143||
जगीं पाहता साच ते काय आहे | अती आदरे सत्य शोधूनि पाहे |
पुढे पाहतां पाहतां देव जोडे | भ्रम भ्रांतिं अज्ञान हे सर्व मोडे ||144||
सदा विषयो चिंतिता जीव जाला | अहंभाव अज्ञान जन्मासी आला |
विवेके सदा सस्वरूपी भरावे | जिवा उगमी जन्म नाही स्वभावे ||145||
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी | अकस्मात आकारले काळ मोडी |
पुढे सर्व जाईल कांही न राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||146||
फुटेना तुटेना चळेना ढळेना | सदा संचले मीपणे ते कळेना |
तया एकरूपासि दूजे न साहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||147||
निराकार आधार ब्रधदिकांचा | जया सांगता सीणली वेदवाचा |
विवेके तदाकार ह्ऊोनि राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||148||
जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे | जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे |
जगी पाहता पाहणे जात आहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||149||
नसे पीत ना श्र्वेत ना शाम कांही | नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही |
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||150||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 18, 2016
वरवर पाहता मिग विमानांचे अपघात जास्त वाटले तरी दर दहा हजार तासांच्या उड्डाणांच्या हिशेबात जगातील अनेक प्रगत वायुदलातील अपघातांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. म्हणजे भारतातील व्यावसायिक वैमानिकच काय पण शिकाऊ वैमानिकही इतर देशांच्या तुलनेत अधिक कसबी आहेत. पण तरीही अपघात हा अपघातच आणि तो वाईटच. म्हणून तो पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून काही शिकायला हवे.
July 23, 2023
मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत.
August 10, 2022
प्रकाशन दिनांक :- 16/01/2005
पश्चिम महाराष्ट्राने विकास साधला म्हणण्यापेक्षा या भागाने विकासाची गंगा खेचून नेली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगिरथ प्रयत्नात त्या भागातील सामान्य शेतकरी तर सामील झालाच होता, सोबतच तिकडच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आपल्या मतदारांचे हित जोपासणे सर्वोतोपरी मानले.
विदर्भाचा अनुशेष,विदर्भ-मराठवाड्याचे मागासलेपण याबद्दल नेहमीच ओरड होत असते.
January 16, 2005
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ ।
सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य
त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥
अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात,
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात,
त्वद्वन्दनॆषु - तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनी माझे नेत्र स्थगित होतील, अर्थात यामुळे मला दिसणे बंद होईल.
ज्यावेळी असा साधक आईची चरण वंदना करण्यासाठी वाकेल त्यावेळी डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंनी त्याला ती चरणकमले देखील दिसणार नाहीत. त्यावेळी त्याची प्रार्थना आहे की,
उद्यत् - उगवणाऱ्या
अरुण- सूर्य सारथी, प्रभातीचा लालिमा.
अयुत- कोट्यावधी
सॊदरस्य- समान.
अर्थात प्रभाती पसरलेल्या अरुणोदय कालीन लालिम्याच्या कोट्यावधी पट अधिक तेजस्वी असलेल्या,
परया सुधयाप्लुतस्य- परम म्हणजे श्रेष्ठ सुधा म्हणजे अमृताने अर्थात आनंदाने प्लुत म्हणजे परिपूर्ण भरलेल्या.
त्वद्विग्रहस्य सान्निध्यम् - तुझ्या विग्रह म्हणजे स्वरूपाचे, सान्निध्य म्हणजे जवळीक, मला प्राप्त होवो.
अर्थात ज्या वेळी मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझी चरणकमले मला दिसणार नाही, त्यावेळी हे आई जगदंबे ! मला दिसत नसले तरी, तुझ्या शिवाय मला कोणीही नाही हे, तुला दिसत असल्याने तू दूर जाऊ नकोस.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 13, 2020
कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी विशिष्ट थीम जाहीर केली जाते.
March 4, 2025
स्त्रीला ‘भिक्षा’ म्हणून किंवा ‘चढावा’ म्हणून ‘डावा’वर लावायची आपली परंपरा पांडवांइतकी जुनी आहे आणि पुढेही चालूच राहाणार आहे. राम रहीम पहिला नाही आणि शेवटचा तर नाहीच नाही. आणखी काही बाबा, बापू, माॅं हे स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून हे सारे खेळ या क्षणालाही करत असावेत असं म्हटलं तर खोटं ठरू नये. जोपर्यंत बाबांना राजाश्रय आहे आणि लोक देवापेक्षा उपायांच्या शोधात आहेत, तो पर्यंत आपल्या समाजात असंच चालू राहाणार.
September 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti