(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुनर्नवा

    पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.

    ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
    आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
    पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
    तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.

    पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.

    २)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.

    ३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.

    ४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.

    ५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 22, 2017


  • चला जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामींबद्दल….

    मित्रांनो, आपण मनाचे श्लोक, दासबोध किंवा त्यांचे इतर काव्य रचना जेंव्हा वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला असे वाटत असते की जणू प्रत्यक्ष समर्थच आपल्याला ते सांगत आहेत. संतांच्या वाणीचा हा प्रभाव असतो कारण ते त्यांच्या स्वानुभवाचे बोल असतात.

      September 19, 2017


  • जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार

    २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरणारे झाले आहे ( ठरलंय ) . दैनंदिन जीवनव्यापारही करणे अतिशय कठीण झाले होते ; असा मागील काही महिन्यांचा काळ आपण सर्वांनी पाहिला , अनुभवला . अजूनही थोड्या फार प्रमाणात त्याची झळ आहेच

      October 18, 2022


  • तेरवी गोडजेवण बंद करा

    काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.

    पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
    जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.

    आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.

    मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.

    असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.

    -- प्रकाश पोहरे

      July 8, 2007


  • सागराविषयीचे माहितीपट, चित्रपट

    पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत.

      May 18, 2025


  • राज कपूर – निळ्या डोळ्यांचा जादूगार !

    त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.

      November 27, 2022


  • घरातच फुलवा बाग

    घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

      January 11, 2011


  • असुरक्षित जीवन

      May 5, 2013


  • मराठी आडनाव – बोंबला

    भुसावळजवळील, वरणगाव येथे माझी आत्या राहते. त्या कुटुंबाला, अहिल्याबाआी होळकरांच्या काळापासून अेका मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

      April 21, 2016


  • रेल्वेचा गार्ड

    रेल्वेव्यवस्थापनात 'स्टेशनमास्तर' हे पद जसं महत्त्वाचं असतं, तसंच तांत्रिकदृष्ट्या 'गार्ड' हा संपूर्ण गाडीचा प्रमुख असतो. स्टेशनमास्तर गार्डला गाडी स्टेशनवरून सोडण्याची विनंती करतो, गार्ड-इंजिन ड्रायव्हरला आज्ञा देतो आणि मगच गाडी स्टेशनाबाहेर पडते.

    गार्डला गरज वाटल्यास, काही अपरिहार्य कारणासाठी तो इंजिनड्रायव्हरला गाडी थांबविण्यास भाग पडू शकतो. तत्काळ ब्रेक लावण्याचा अधिकार गार्डकडे.

    दिलेला आहे, म्हणूनच तत्काळ ब्रेकव्हॅनचा डबा हा गाडीच्या शेवटी गार्डच्या जवळ तैनात केला जातो. अणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास गार्ड मार्गावरती छोटा स्फोट घडवून उजेडाची सोयही करून देऊ शकतो. सिग्नल्समध्ये बिघाड असेल किंवा गाडीच्या मशिनचा एखादा भाग काम करीत नसेल, तुटला असेल, तर अशा वेळी इंजिनड्रायव्हर गार्डला विचारल्याशिवाय गाडी पुढे नेऊ शकत नाही. एखाद्या संकटकाळी गाडी पुढे न्यावयाचीच असेल, तर गार्ड तशा लेखी सूचना ड्रायव्हरला द्याव्या लागतात, मगच तो गाडी पुढे नेऊ शकतो. प्रत्येक स्टेशनातून गाडी जात असताना गार्ड स्टेशनमास्तरला दिवा वा झेंडा दाखवतो आणि मगच गाडी पुढे जाते. क्वचितप्रसंगी अगदी छोट्या स्टेशनवर तिकीट देण्याची सोय नसेल, तर गार्ड प्रवाशांना तिकीट देऊ शकतो.

    गजमुखी गार्ड: भारतीय रेल्वेच्या १५० वर्षांपूर्तीनिमित्त प्रसिद्ध केलेलं व्यंगचित्र

    मालगाडीलाही गार्ड असतो. अगदी क्वचित, कधीतरी छोट्या प्रवासात गाडी गार्डशिवाय जाते.

    डिसेंबर २०१३ मध्ये बांद्रे-डेहराहून एक्सप्रेसच्या तीन डब्यांना भीषण आग लागली. त्या स्थितीत गाडी लवकरात लवकर थांबविण्यात यश आलं. गाडीचे गार्ड श्री. पतंगे धावत धावत दोन रेल्वे कामगारांबरोबर जळत्या डब्यांत शिरले. जिवावर उदार होऊन त्यांनी आठ ते दहा प्रवाशांना जळणाऱ्या व कोंडलेल्या धुराच्या डब्यांतून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. ही घटना गार्डचे कौतुक करण्यासारखी होती, आणि गाडीच्या 'तांत्रिकदृष्ट्या प्रमुख पदाची जबाबदारी दाखवणारीही होती.

    भारतीय रेल्वेची १५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एक व्यंगचित्र खास प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात 'गार्ड' हा चालत्या गाडीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हे सूचित करण्यासाठी हत्तीच्या तोंडासारख्या ‘भोलूला' गार्डचं प्रतीक बनविण्यात आलं होतं. ह्या गजमुखी गार्डच्या हातात एक हिरवा दिवा दिलेला होता. तो गाडीसाठी पुढील रस्ता मोकळा आहे हे दर्शवीत होता. गार्ड हा गाडीच्या प्रवासात खास भूमिका बजावतो हे प्रतिबिंबित केलेलं व्यंगचित्र रेल्वेमधलं गार्डचं महत्त्व बोलकेपणानं सांगणारं होतं.

    -डॉ. अविनाश वैद्य

      July 14, 2022