वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात.
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का.. ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल.
आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते.
नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास त्याचे रुपांतर ‘ताडी’ म्हणजेच सौम्य प्रकारच्या दारूमध्ये होते. ताडी चवीला आंबट आणि उग्र चवीची असते.
नीरा पिण्याचे फायदे
ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक नीराचा आस्वाद घेतात.
सकाळ सकाळ काढलेल्या पाण्याचे म्हणजेच निराचे सेवन केल्याने रिफ्रेशिंग वाटते. निरादेखील आरोग्यदायी आहे. एका दिवसात १-२ ग्लास निरा पिणे फायदेसहीर ठरते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पण तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर नियमित नीरा पिणे अडथळा ठरू शकतो. निरामध्ये साखर आणि कॅलरीज अधिक असतात. निराऐवजी साखर,मीठ घातलेले लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते
पण हल्ली आरोग्य व उत्साहवर्धक नीरा या पेयाकडे लोकांचा कल कमी होताना दिसतो आहे.
कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही नीरा हे पेय लोकप्रिय झाले आहे. नागरिक उन्हाळ्यात पहाटे नीराचा हमखास आस्वाद घेत असतात.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती.
दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.
त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झोपेची सायकल म्हणजे?
झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
फ़ेब्रुवारी, मार्च महिना हा भारताच्या लूक ईस्ट आणि लूक वेस्ट या दोन्ही धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये ११ मार्चला तब्बल १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
प्रसार भारतीच्या अखत्यारीत असलेल्या या स्टेशनचा पोहोच चांगला असल्याने ते चांगलेच लोकप्रिय बनले.
विजयच्या आत्महत्येची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. एका उमद्या व्यक्तिमत्त्वाने अचानक सर्वांचा निरोप घ्यावा याला काय म्हणावं? स्वत:चं आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याइतकं असं कोणतं कारण असावं याबद्दल मला जिज्ञासा वाटू लागली. विजयच्या मृत्यूचं दु:ख काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आत्महत्येशी संबंधित माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला.
विजयचे वडील एक मोठे सरकारी अधिकारी. मोठ्या पदामुळे त्यांच्याभोवती सतत खुशमस्क-यांचा गराडा पडलेला असे व आपल्या बॉसचा अहंकार सतत कुरवाळण्याचं काम हे खुशमस्करे मोठ्या इमाने-इतबारे पार पाडायचे. अधिकारीपदाच्या खुर्चीमुळे साहेबांना कोणाकडूनही नकार ऐकण्याची सवयच राहिली नव्हती. घरातसुद्धा प्रत्येकाने आपल्याला सलाम करावा व आपलेच म्हणणे ऐकावे असे त्यांना वाटू लागले. विजयची आई महिला मंडळं, क्लब्ज व पार्ट्यांच्या विश्वात रमणारी स्त्री होती. तिला स्वत:च्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता व सभोवतालच्या सर्वांनी आपलं केवळ कौतुकच करावं अशी तिची अपेक्षा होती. कोणीही तिच्या मनाविरुद्ध वागलं तर तिच्या जिवाचा अत्यंत संताप होत असे. दोघेही जन्मदाते अहंकाराला कुरवाळण्यात इतके व्यग्र होते की विजयच्या आयुष्याकडे व समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना अजिबात फुरसत नव्हती. आपल्या भावना, विचार, समस्या समजावून घेणा-या व्यक्तीच्या शोधात निघालेला विजय अखेर एका मुलीच्या प्रेमात पडला. पण तिची मानवनिर्मित जात वेगळी होती. स्वत:च्या मुलाच्या भवितव्याचा विचार करण्यास कधीही फुरसत न मिळालेले त्याचे पालक त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्रचंड बिथरले. आपल्या मुलाशी थेट चर्चा न करता इतरांच्या मदतीने त्यांनी प्रेमी युगुलावर लग्न न करण्यासाठी प्रचंड दबाव आणला व त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अखेर अति अहंकाराने आंधळ्या झालेल्या पालकांच्या भावनाशून्य वागण्याची परिणती झाली विजयच्या अत्यंत दुर्दैवी आत्महत्येत !
असे आम्ही कसे? प्रत्येक घरातली मुलं त्यांच्या वयोमानानुसार वागत असतात. त्यांचं विश्व वेगळं, त्यांची स्वप्नं वेगळी, आकांक्षा वेगळ्या, धडपड वेगळी, आदर्श वेगळे. त्यांना अवघं जग जिंकायची इच्छा असते. पण त्याच वेळेस लहान वयातील अपरिपक्वतेमुळे व बरेचदा अति उत्साहामुळे अनेक चुका त्यांच्या हातून घडतात.पूर्ण विचार न करता उतावळेपणाने चुकीचे निर्णय घेणे, एकतर्फी प्रेम तसेच शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजण्याची घोडचूक ही सगळी सळसळत्या तारुण्याची लक्षणे आहेत. आपल्या मुलांशी सुसंवाद साधून, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन तारुण्यातील धोकादायक वळणांची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांच्या परिपक्वतेचे व त्यांना आपल्या अपत्यांप्रति असलेल्या जबाबदारीचे लक्षण आहे. आई-वडील जर चोवीस तास आपल्याच तो-यात वावरत असतील तर मुलांनी त्यांच्या भावना, व्यथा कोणाजवळ व्यक्त कराव्या? अशा वेळी होणा-या प्रचंड कोंडमा-याचा जर आत्महत्येसारखा दु:खद शेवट झाला तर त्याला जबाबदार कोण?
घराघरातील पालकांनी स्वत:चा अहंकार काबूत ठेवून व मुलांच्या अहंकाराला न डिवचता त्यांना योग्य वेळी सावध करणे हे कौशल्याचे काम आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी ते कौशल्य हस्तगत करणे ही काळाची गरज आहे !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं?
Copyright © 2025 | Marathisrushti