वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पण “दस्तक” मधील लता -सुरीली ! आपल्या आवडत्या मदन भैय्या च्या ओंजळीत ती सगळा गोडवा ओतायची, आणि ही गोड तक्रार खय्याम पासून सर्वांची ! लताच्या सर्वाधिक आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात मदनमोहनची जास्त आहेत. पारितोषिकांनी या चित्रपटाची झोळी भरली. यथावकाश या चित्रपटातील सर्व मंडळी कर्तृत्वाच्या उंचीवर पोहोचली – अपवाद रेहानाचा ! तिची दस्तक कानांवर जास्त काळ रेंगाळली नाही.
April 24, 2021
दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना!
February 6, 2022
हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे.
February 6, 2022


भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
July 3, 2025
प्रकाशन दिनांक :- 01/02/2004
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे संतवचन निश्चितच प्रेरणादायी आहे. फक्त बदलत्या काळानुरूप या वचनात किंचित बदल सुचवावासा वाटतो. केवळ केल्याने काही होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही.
February 1, 2004
आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग पक्कं पाहिजे” तिने अनुभवाचे बोल ऐकवले.
आम्ही सगळेजण fliers बघण्यात गर्क झालो होतो. मोठमोठया स्टोअर्सचे तर सात आठ पानी fliers होते. त्यात चपलांपासून लॅपटॉप पर्यंत आणि बार्बी डॉल पासून बेडरूम मधल्या फर्निचर पर्यंत, सार्या गोष्टींच्या रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती होत्या. काय बघू आणि काय नको ते समजेनासं झालं होतं. शेवटी मी चक्क एका कागदावर वेगवेगळ्या स्टोअर्सची यादी केली, त्यांच्यापुढे ते ऑफर करत असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या DVD – VCR players ची मॉडेल्स, त्यांच्या किंमती, त्या प्रत्येकाचा rebate, rebate वजा करता येणारी रक्कम असं एक मोठं कोष्टक तयार केलं. एक दीड तासाची मेहनत झाली पण निदान काय घ्यायचं आहे, हे तरी नक्की झालं.
गुर्जरांच्या दिवाणखान्याला एखाद्या युद्धकालीन नियंत्रण कक्षाचे (war office) स्वरूप आले होते. वर्तमानपत्रांचा आणि fliers चा पसारा, त्यात आपल्याला हवे असलेले नेमके पान शोधण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड, आरडा ओरडा, कॅलक्युलेटरवर किंमती व rebates चे कॅलक्युलेशन, असा सगळा गोंधळ चालला होता. “अगं बाई, तू कॅलक्युलेशन करू नकोस. चुकीचं कॅलक्युलेशन करशील आणि आपण भलतंच मॉडेल घेऊन येऊ”. “एवढं काही येता जाता माझं मॅथेमॅटिक्स काढायला नकोय” असे खटकेबाज प्रेमळ संवाद सुरू होते.
तासा दीडतासाच्या धुमश्चक्री नंतर, आमचे DVD – VCR player चे मॉडेल ठरले. कोणत्या स्टोअर मधून, कोणते मॉडेल, किती किंमतीला, वगैरे तपशील पक्के झाले. एवढयात अनुपमाने गुगली टाकला, “तुम्ही DVD –VCR player चे एकत्रित मॉडेल बघताय मग दोघांची वेगवेगळी मॉडेल्स का बघत नाही? ” झालं! परत मारामारी सुरू ! मग मी DVD players ची मॉडेल्स आणि मृणालने VCR players ची मॉडेल्स बघायला सुरुवात केली. पण शेवटी हा खटाटोप कामी आला. कारण DVD players आणि VCR players वेगवेगळे घेतले तर त्यांची किंमत DVD-VCR players च्या मॉडेल्स पेक्षा कमी होती. प्रत्यक्ष युद्धावर जाण्यापूर्वीच आपली व्यूह रचना यशस्वी होतेय हे बघून आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
देशमुख कुटुंब मात्र अजूनही भांबावलेलंच होतं. नक्की काय घ्यावं याचा त्यांचा विचार काही पक्का होत नव्हता, आणि आता तर एवढया जाहिराती आणि fliers पाहून ते आणखीनच चक्रावून गेले होते. “बघा बघा जरा त्यांच्याकडे, शिका काही तरी व्यवस्थितपणा ” नलिनीबाई माधवरावांना बोलल्या. “अगं त्यांचं काय, ते ठरवूनच आले होते DVD-VCR player घ्यायचं म्हणून, इथे येऊन त्यांना फक्त मॉडेल निवडायचं होतं. तुझं कुठे काय घ्यायचंय ते ठरतंय काय? पन्नास गोष्टीत जीव अडकलेला तुझा ”. शेवटी बर्याच हाणामारीनंतर देशमुख कुटुंबाची देखील यादी तयार झाली.
रात्री जेवणं झाल्यावर पुढच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा कोण कोण जाणार हे ठरवायला हवं होतं. श्रीयुत गुर्जरांना एवढया पहाटे थंडीत कुडकुडत खरेदीला जाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून आणि आमचा मुलगा सिद्धार्थ लहान म्हणून, त्या दोघांनी घरीच झोपून रहायचं असं ठरवलं. मग किती गाडया न्यायच्या आणि कोण कोणाबरोबर कोणाच्या गाडीतून कुठे जाणार याचं प्लॅनिंग सुरू झालं. नशीबाने दुकानं एकमेकांपासून फार लांब लांब नव्हती. परंतु विकत घ्यायच्या वस्तू बर्याच होत्या आणि त्या वेगवेगळ्या दुकानांतून घ्यायच्या होत्या. त्यामुळे कोणी किती वाजतां कोणत्या दुकानाच्या रांगेत उभे रहायचं, तिथलं शॉपिंग संपलं की पुढे कुठच्या दुकानात जायचं वगैरे बारकावे भरपूर होते.
“आपण बाबांना एका दुकानाच्या रांगेत उभं करू आणि आपण पुढच्या दुकानात जाऊ” देशमुखांच्या कन्येनं सुचवून बघितलं. “तुझ्या बाबांना आणि एकटं ? झालं कल्याण! त्यांना ख्रिसमस येईपर्यंत एक देखील वस्तू मिळायची नाही. नुसते गोल गोल फिरत राहतील दुकानभर.” नलिनीबाईंनी तो प्रस्ताव तात्काळ हाणून पाडला. मग मी, माधवराव आणि त्यांचा मुलगा, आम्ही एकत्र एके ठिकाणी जावे आणि सर्व बायकांनी एका ठिकाणी जावे, असा एक विचार पुढे आला. पण तीन चार जणांनी एकाच रांगेत उभं राहण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहणं अधिक शहाणपणाचं आहे असं अनुपमाचं मत पडलं. अर्थात तिच्या मताला अनुभवाचं वजन असल्यामुळे ते लगेच मान्यही झालं. शेवटी मी आणि माधवराव एके ठिकाणी आणि बाकी सर्वजण दुसर्या दोन ठिकाणी विखरून उभं राहण्याचा प्लॅन सर्वांनुमते संमत झाला.
– डॉ. संजीव चौबळ
March 26, 2016
काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.
पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.
आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.
मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.
असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.
-- प्रकाश पोहरे
July 8, 2007
भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.
August 14, 2020

चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे.
March 31, 2022
मुक्ताईनगरच्या प्रवासाची अपूर्वाई माझी भगिनी आणि बंधू यांना जास्त होती कारण १९७५ च्या जडण-घडणीच्या वयापासून ते आता पोक्तपणाच्या (२०२२) वयापर्यंतीच्या वाटचालीत ते या परिसरापासून दूर होते. साहजिकच त्यांची (आणि नेहेमीप्रमाणे उगाचच माझीही) अवस्था- “छोड आए हम वो गलियाँ ” अशी झाली होती. परतल्यावर मला सहज चाळताना चक्क २२/०४/२०१३ ची खालील नोंद आढळली.
June 12, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti