(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २४

    यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान्
    अयं श्वास एवेति वाचो भवेयुः |
    तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं
    पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖

    अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत.
    आचार्यश्री म्हणतात,

    यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम समयी माझे जे नातेवाईक माझ्या आजूबाजूला जमलेले असतील, माझ्या कडे पहात असतील,
    असौ वेत्ति नास्मान्- हा आपल्याला ओळखत नाही.
    अयं श्वास एवम्- बस हाच शेवटचा श्वास,
    इति वाचो भवेयुः - असे बोलत असतील.
    अर्थात एखाद्या मरणासन्न व्यक्तीच्या अंतिम समयी जेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ उभे राहतात त्या वेळी तो त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.ही जवळपास अंतिम अवस्था असते. यावेळी बाकीचे लोक फक्त त्याचे श्वास मोजत असतात. शेवटचे काही श्वास राहिले असे म्हणत असतात.
    तदा - त्यावेळी
    भूतिभूषं - भूती म्हणजे विभूती अर्थात भस्माने विभूषित असणारे,
    भुजंगावनद्धं- सर्प वेष्टित अशी
    पुरारे - हे त्रिपुरासुराच्या विनाशका !
    भवंतं - आपले
    स्फुटं - स्फुट या शब्दाचे संस्कृत भाषेत मुक्त, व्यापक, स्वच्छ, अस्तित्व, क्षमतायुक्त असे वेगवेगळे अर्थ आहेत. तसेच दृश्य, संवेद्य असाही अर्थ आहे. लक्षार्थाने स्फुट म्हणजे मूर्ती.
    आपले सगुण-साकार स्वरूप. स्फुट चे वर दिलेले सर्व अर्थ भगवंताच्या मूर्तीला, सगुणरूपाला लागू पडतात.
    भावयेयम् - मी त्या मूर्तीचे ध्यान करो.

    घरदार, नातेवाईक इतकेच काय तर श्वास देखील मागे पडून मला आपल्या चरणी स्थान मिळावे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 3, 2020


  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ८-ब/११

    • आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं ( इति शिरवळकर) –
    • हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं.

    *(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र राज्य विकास संस्थेच्या संचालक असतांनाचें, वक्तव्य वाचावें. या संस्थेनें माहुलकरांचें पुस्तक प्रसिद्ध केलेलें आहे. माहुलकरांनी त्यांचें मराठी पुस्तक प्रकाशनासाठी या राज्यसंस्थेला देऊन संस्थेचा बहुमान केलेला आहे , अशी वैद्यबाईंची कृतज्ञतेची भावना आहे. माझा व माहुलकरांचा व्यक्तिगत परिचय होता, हें माझें भाग्यच! ).

    • दुसरें म्हणजे, आपलें जुने, कालिदास-भास-भारवि-दंडी-भवभूती-पाणिनी-वररुचि-पतंजलि-कौटल्य-व्यास-वाल्मीकि इत्यादींचें साहित्य आपण वाया जाऊं देणार आहोत काय ? धर्माचें जाऊ द्या, पण वेद हे जगातील अति-प्राचीन वाङमयांपैकी एक आहे (कदाचित् सर्वात-प्राचीनही असेल) , आपण त्याला दुर्लक्षून, त्याला ‘लुप्त’ किंवा ‘नष्ट’ होऊं देणार आहोत काय ? तसें केलें तर, आपल्यासारखे ‘हतभागी’ आपणच!
    • हें म्हणजे, ‘आपले माता-पिता अतिशय म्हातारे झाले आहेत, त्यांचा व्यावहारिक उपयोग काय?’, असें म्हणण्यासारखेंच आहे. (माझ्याप्रमाणें साठी-सत्तरीच्या पुढलें वय असलेल्या मंडळींना माझ्या या कथनाची योग्यायोग्यता पटेलच).

    (इथें माझा हेतू अजिबात व्यक्तिगत नाहीं ; तर मुद्दा मांडण्यासाठी दिलेलें हें फक्त उदाहरण आहे ; हें कृपया ध्यानीं घ्यावें, ही माझी शिरवळकरांना विनंती).

    • कर्मकांडाचा भाग सोडून द्या, पण श्राद्ध व पितृपक्ष यांचा मूळ उद्देशच, आपल्या पूर्वजांची आठवण काढणें व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणें, यासाठीच आहे. आपण मोठ्या लोकांची जयंती, पुण्यतिथी, सेंटेनरी वगैरे साजरी करतो, यामागचा हेतू, त्यांची स्मृती कृतज्ञतापूर्वक जागवणें, हाच आहे.

    हें सर्व करायचें , मग पुरातन साहित्याचें जतन कां करायचें नाहीं ?

    • ‘वंदे मातरम्’ या गीतानें स्वातंत्र्यपूर्व काळात लाखो भारतीयांना स्फूर्ती दिली. ‘जन-गण-मन’ हें तर भारताचें राष्ट्रगीत बनलें . ‘ सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा एक पॉप्युलर वाक्प्रचार बनलेला आहे. आणि, हे सगळे आधुनिककालीन आहेत, पुरातन नाहींत. म्हणजे, अगदी २०व्या शतकातही संस्कृतचें जें महत्व होतें, तें ध्यानात येईल.
    • जर्मनी, USA वगैरे पाश्चिमात्य देशांमध्ये आजही संस्कृतचा अभ्यास करणारी अध्यासनें आहेत, विद्वान आहेत ; आणि आपण भारतीयांनी मात्र त्या साहित्याच्या विरोधात बोलायचें, याच्यासारखी खेदकर parody दुसरी नसेल.
    • मला ‘ मॅस्लोची नीड्-हायरार्की ’ या मानसशास्त्रीय सिद्दांताची आठवण येते. त्या सिद्धांताप्रमाणें , ‘उभ्या-त्रिकोणा’च्या आकृतीतील, ( ) , पायाजवळच्या, म्हणजे खालच्या तळाजवळच्या-भागातील , needs (आवश्यकता) आधी पूर्ण व्हाव्या लागतात ; आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच, वरच्या (उच्च) पातळीतील needs पूर्ण करण्याकडे कल असतो. त्यामुळे, लोक आधी, जीवनोपयोगी, career साठी आवश्यक, प्रोफेशनसाठी जरुरी असलेल्या, गोष्टीतच बुडालेले असतात. म्हणून, भाषेची शुद्धाशुद्धता, संस्कृत-भाषेचें महत्व व तिच्यातील ज्ञानामुळे होणारा फायदा, असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, किंवा त्याचें महत्वही त्यांना वाटत नाहीं. तें ठीकच आहे, तें परिस्थितीजन्य आहे ; व त्यामुळे, त्यासाठी त्यांच्या priority साठी त्याना दोष देतां येत नाहीं.

    पण , वर उल्लेखलेल्या ३ टक्क्यांनी जरी याचा विचार केला , तरी काळजी करायचें कारण नाहीं.

    • लिपी व संस्कृतचा तसा अर्थाअर्थी संबंध नाहीं, व प्रादेशिक भाषांच्या लिप्यांमध्ये संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत, याचा उल्लेख आपण आधीच केला आहे.

    त्यातून आतां, सॉफ्टवेअरद्वारें ‘ट्रान्सलिटरेशन ’ ( लिपीबदल) क्षणार्धात शक्य होतें. त्यामुळे, भारतीय भाषांच्या संदर्भात तरी, लिप्यांच्या भिन्नत्वाचा प्रश्न निकालात निघालेला आहे.

    • व्यासंगी विद्वान ( व लोकसत्ताचे भूतपूर्व प्रमुख संपादक) अरुण टिकेकर यांचें संस्कृतसंबंधी, मराठीसंबंधी व in-general भाषेसंबंधी कांही विचार उद्धृत करतो –

    भाषेच्या बाबतीत आपलेंतोडी नाख तबला अने फोडी नाख पेटीअसें झालें आहे. संस्कृत भाषेचा पाय आपण तोडून टाकला. संस्कृत थोडी फार आली की बर्‍याच भारतीय भाषा कळण्याची सोय होते, हें आपण विसरलो आणि संस्कृत ही ‘मृत भाषा’ असा ग्रह करून घेतला. संस्कृत ही ब्राह्मण्याची निशाणी असल्याचें मानलें. .... पाठांतर करणें कमीपणाचें मानलें. ....... ‘द्विभाषा-कोविद’ , त्रिभाषा-कोविद’ मंडळी आज अचानक कुठे गेली ? या प्रश्नाचा शोध घेतला की, देश-स्तरावर मराठी प्रभाव कां उरला नाहीं, मराठी-भाषकांना कोणत्याच क्षेत्रात कोणीच कसें विचारत नाहीं, ..... कन्नड-बंगाली भाषांचा प्रभाव कां ‘वाढत चालला आहे’, याचें उत्तर मिळतें. ..... संस्कृत ही शिष्टांची, तथाकथित उच्चभ्रूंची, उच्चवर्णीयांची भाषा, म्हणून ती आम्ही शिकणार नाहीं. शिवाय तीमृत भाषा’. ती शिकवायचें-शिकायचें कारणच नाहीं, हें आहे आमचें तर्कट. संस्कृत शिकल्यानें मराठी चांगली होईल हें कोणालाचपटतनाहीं. ….. एक भाषा चांगली आली तर दुसरीही लवकर समजते-उमगते हें मानायला आम्ही तयार नाहीं. …. मुंबई-पुण्याकडल्या आणि कोंकण-घाटाकडल्या मराठी भाषकांची हिंदी हा तर देशभरच्या लोकांच्या चेष्टेचा विषय असतो. मग आम्हाला कोणती भाषा नीट, व्यवस्थित येते म्हणायचें ? कोणतीच येत नाहीं हेंच विदारक सत्य आहे” .

    मोठा उतारा आहे, पण महत्वाचा आहे. मोठ्या व्यासंगी, संशोधक, संस्कृती,भाषा यांच्या बद्दल आस्था बाळगणारा, सामाजिक विचार करणारा, सामाजिक कमतरतांबद्दल मन:पूर्वक खंत बाळगणारा, अशा अरुण टिकेकरांचें कथन उद्धृत केल्यावर, त्या विषयाबद्दल आणखी कांहीं बोलायची आवश्यकता नाहीं.

    • भौतिकशास्त्रांच्या सर्व शाखांमधील संशोधन आणि ज्ञानाचा आवाका वेगानें वाढत असतांना तें ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्याचा मर्यादित वेळ द्यावा लागत असतांना तो वेळ क्लिष्ट संस्कृतच्या अध्ययनात कोण वाया घालवूं शकेल ? ’ ( इति शिरवळकर) –
    • कुणालाही जें करावेसें वाटतें, तें करण्याचें त्यांना भारतीय संविधान स्वातंत्र्य देतें.

    *मात्र, एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी की, जर समाजातील सर्वांनीच , फक्त भौतिकशास्त्र, फक्त इंजिनियरिंग , फक्त कंप्यूटर अशा कुठल्याही एका क्षेत्रातच शिक्षण, कार्य व करियर केलें तर, सगळा समाज एकसुरी होऊन जाईल, लोक जणूं ‘क्लोन’सारखे होऊन जातील. आणि, तसें झालें तर, समाजासाठी ती फारच धोकादायक गोष्ट आहे. समाजानें मल्टिडायमेन्शलच असायला हवें, तरच त्याची सर्वांगीण प्रगती होईल.

    *सामाजिक काय, सांस्कृतिक काय, भाषिक काय, या सर्वांच्या बाबतीत हें ध्यानात ठेवायला हवें की, कधीच परमनंट ‘Steady State ’ नसते ; तेव्हां जर प्रगती होत नसेल तर अधोगती निश्चितच ! आणि, हें, ’आज’ म्हणजे सद्य स्थितीत कळत नाहीं, तर कांहीं काळाने मागे-वळून पाहिल्यावरच तें जाणवते, आणि ‘हा Turning Point होता ’ असें त्यावेळेसच कळतें.

    *(एक उदाहरण म्हणजे, आपण औरंगझेबाच्या राज्याकडे बघूं. त्याच्या कृत्यांमुळे मुघल साम्राज्य रसातळाला जाईल, असें कुणी त्याच्या राज्यकाळात वर्तवलें असतें, तर त्याला सगळ्यांनी वेड्यातच काढलें असतें. पण मुघल साम्राज्याचा र्‍हास त्याच्या उत्तर-काळापासूनच सुरूं झाला , हें सत्य, नंतर, मागून पाहिल्यावर प्रतीत होतें.)

    *म्हणून, कुणाला भौतिकशास्त्र शिकायचें असेल, त्याने (अथवा तिनें) तें जरूर करावें, अन्य कुणाला कला-क्षेत्रात जायचें असेल त्यानें तसें करावें, कुणाला भाषाशास्त्रात, किंवा खासकरून संस्कृतशी संबंधित क्षेत्रात कार्य करायचें अशेल, तर त्याला ( / तिला ) ती फ्रीडम आहे. आणि, भाग्याची गोष्ट अशी की, विविध लोकांच्या आवडीनिवडी भिन्नभिन्न असतातच. उदा., नाटक-सिनेमात करियर करणार्‍यांना कुणी सांगून बघावें की, ‘इथें पाय जमवणें कठीण आहे, इथें अस्थैर्य आहे, इथें रात्रंदिवस काम करावें लागतें, हेल्थवर अनिष्ट परिणाम होतो, पहा किती आत्महत्या होतात तें’, वगैरे वगैरे. पण ज्याला / जिला त्या क्षेत्रात जायची तीव्र इच्छा आहे, तो / ती या सगळ्या सांगण्याकडे कानाडोळाच करेल.

    *त्यामुळे, शिरवळकरांनी असें assume करूं नये की, सगळ्याच लोकांना सायन्स व त्यावर आधारित विषयांमध्येच रस असेल ; व कुणालाच संस्कृत शिकायची इच्छा नसेल.

    • समाज कुणावरही अमुक एका प्रोफेशनची सक्ती करूं शकत नाही, (आणि, तसें केल्यास काय होऊं शकेल, याची कल्पना येण्यासाठी आयन रँड या लेखिकेची ‘अँथम’ ही कादंबरी अवश्य वाचावी).
    • संस्कृतचें अध्ययन जर इतकें useless असतें, तर मग जर्मनी, इंग्लंड व USA मधील reputed युनिव्हर्सिटींनी (उदा. हार्वर्ड) , संस्कृत विषयाची ‘चेअर’ ठेवलीच नसती , आणि आजही ( होय, आजही, अगदी २१ व्या शतकातही ) पाश्चिमात्य ज्ञानी व्यासंगी विद्वानांनी त्यांचें आयुष्य संस्कृत व पुरातन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासात घालवलें नसतें. मला पाश्चिमात्यांचें उदाहरण देतांना कांहीं आनंद होतो आहे असें नाहीं , पण सत्य नजरेआड करूनही चालणार नाहीं. हें म्हणजे कस्तुरीमृगासारखें होतें आहे ; त्याला माहीतच नसतें आपल्याकडे काय अमूल्य ठेवा आहे , पण सर्वत्र तो सुगंध दरवळत असतो. आम्हीच आमच्याकडील अशा अनमोल ठेव्याला ठोकरायचें , आणि पाश्चिमात्यांनी त्याचें महत्व जाणून त्याचा अभ्यास करायचा, या paradox ला काय म्हणावें !
    • शिरवळकरांच्या शेवटच्या कमेंटबद्दल :

    असें मोरेही म्हणत नाहींत, किंवा अन्य कुणीही म्हणत नाहीं की, आपली मातृभाषा सोडून द्यावी व फक्त संस्कृतचाच अंगिकार करावा, तिच्याच वापराचा आग्रह धरावा . हा शिरवळकर यांचा केवळ अपसमज आहे. भारतात बहुभाषिकत्व अनेक सहस्त्रकांपासून आहेच. त्यामुळेच तर आपण इतर अनेक भाषा शिकतो. इंग्रजी तर आपण शिकतोच शिकतो, कारण ती काळाची गरज आहे. पूर्वी गोव्याचे लोक पोर्तुगीझ शिकत. शेजारील-प्रदेशाची भाषाही आपण अनेकदा शिकतो (जसें , गुजराती). कांहीं जण तर, फ्रेंच, जर्मन, चिनी मँडेरिन , जपानी, रशियन, स्पॅनिश, अशा परदेशीय भाषाही शिकतात. त्याचप्रमाणें, कुणालाही संस्कृत शिकायाला हरकत नसावी.

    • ‘संस्कृतसाठी राष्ट्रभाषेचा दर्जा हा निष्फळ प्रयत्न’, हें शिरवळकरांचे म्हणणें एका अर्थानें बरोबर आहे.
    • आपण या विषयावर कांहीं चर्चा केलेली आहे. एक तर, ही संधी १९४७-१९५० नंतर गेलेली आहे. दुसरें म्हणजे, आजही भारताची ऑफिशियली कुठलीही राष्ट्रभाषा नाहीं (हिंदीसुद्धा).
    • संविधानानें अनेक भाषांना मान्यता दिलेली आहे, तशी मान्यता संस्कृतलाही द्यायला (अजून दिली नसल्यास) , हरकत नसावी.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      October 9, 2016


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बावीस

    “जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.

      April 6, 2017


  • तुम्ही कॉफी पीता का?

    एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’

      July 15, 2019


  • सरकारी बर्म्युडा ट्रँगल

    प्रकाशन दिनांक :- 04/04/2004

    विज्ञान आणि शास्त्रज्ञांसाठी अद्यापही आव्हान असलेले अनेक भौगोलिक चमत्कार आजही अस्तित्वात आहेत. अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगल हे असेच एक रहस्य आहे. अटलांटिक महासागरात असलेल्या या त्रिकोणी प्रदेशात कोणतीही वस्तू गडप होते.

      April 4, 2004


  • कुठलं खाद्यतेल वापराल?

    फोडणीसाठी देशी गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप वापरावं हे आपण या आधी पाहिलं. तरीही ज्यांना तूप न वापरता तेलच वापरायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत.
    कुठलं तेल वापराल?
    आजकाल आम्हाला ऑलिव्ह ऑइल खूपच ‘हेल्दी’ असतं असा साक्षात्कार झाला आहे. उठसुठ सगळ्या पदार्थांत आम्ही हे महागडं तेल वापरतोय. प्रत्यक्षात ज्या देशांतून हे तेल आपल्याकडे आलं तिथे मात्र हे ऑलिव्ह ऑइल केवळ सॅलड्सच्या ड्रेसिंग पुरतंच प्रामुख्याने वापरलं जातं. फोडणीसारख्या उच्च तापमानाला वापर करण्यास हे अनुपयुक्तच नव्हे तर घातकदेखील आहे हे कायम लक्षात ठेवा.
    या तेलाशिवाय सोयाबीन, सूर्यफूल आणि राईस ब्रान हे तेलांचे प्रकार आपल्या माथी ‘हेल्दी’ म्हणून मारले जातात. पुन्हा सतत एकच तेल न वापरता दोन तेलांचे मिश्रण वापरावे यांसारखे अर्धवट माहितीवर आधारित सल्ले कित्येकजण देत असतात. (प्रत्यक्षात दोन-चार तेलांचे, तेल + तूप अशी मिश्रणे वापरणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार तसे अपेक्षितदेखील नाही.) याशिवाय ‘हृदयासाठी उत्तम’ असं म्हणून जाहिरात करणारे काही ब्रँड आहेतच. लोकहो; यांपैकी कसल्याच आहारी जाऊ नका. आपल्या देशात जी तेलं वापरण्यात येतात तीच वापरा. तसे करणेच फायद्याचे आहे.
    हिंदुस्थानात भौगोलिक स्थितीनुसार तेलांचे प्रकार बदलतात. उत्तर भारतात राईचे तेल चांगले तर दक्षिण भारतात खोबरेल तेल उत्तम. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि मध्य भारतात भुईमूग हाच उत्तम पर्याय आहे. कोणत्याही प्रकारचे तेल असो; घाण्यावरील तेल हे रिफाइंड तेलांहून अधिक चांगले. खोबरेल तेल मात्र कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेले असेल तर उत्तम. ऑलिव्ह ऑइल वाईट असा या लेखाचा अन्वयार्थ कृपया काढू नका. सॅलड ड्रेसिंग म्हणून ते वापरण्यास काहीच हरकत नाही. अन्यत्र मात्र देशी पर्यायच अधिक उजवे आहेत हे नक्की!!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 30, 2016


  • टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान

    स्वामी विवेकानंद म्हणत “स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.” स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले.

      April 21, 2011


  • श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

    आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे.

      September 16, 2023


  • महाराष्ट्रातील पैठणी विणकरांच्या समस्या !

    महाराष्ट्रात अश्या कित्येक राज्यात व गावात वेगवेगळे प्रश्न आहेत, हा एक नमुना !

      February 22, 2011


  • शुभ दिपावली

    २८ ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
    सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!
    २८ ऑक्टोबर २०२४- वसुबारस !
    गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
    प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
    लाभो !

    २९ ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी !
    धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
    निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
    धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

    ३१ ऑक्टोबर २०२४- नरकचतुर्दशी !
    सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
    अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
    आपल्याला लाभो !!
    आपल्याकडून नेहमी सत्कर्म
    घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

    ०१ नोव्हेंबर २०२४- लक्ष्मीपूजन !
    लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
    नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
    होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
    आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

    ०२ नोव्हेंबर २०२४- दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा !
    पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
    गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
    आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

    ०३ नोव्हेंबर २०२४- भाऊबीज !
    जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

    ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
    आंनदाची भरभराटिची जावो.

      October 29, 2024