वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.
चूक सरकारच्या धोरणामध्ये आहे. दुर्दैवाची बाब ही आहे, की हे चुकीचे धोरण बदलून नवे धोरण कसे असावे हे सांगण्याऐवजी अण्णा हजारे सारखे लोक केवळ भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या नावे बोंब ठोकत साप सोडून भुई थोपटत आहेत. नवीन धोरण लागू करण्याची हिंमत कोणतेही सरकार दाखवू शकत नाही. सरकारने ही हिंमत दाखविली, तर आज खुरडत चालणारा हा देश उद्या भरधाव वेगाने पळू लागेल; परंतु असे सरकार या देशाला लाभेल का हाच खरा प्रश्न आहे!
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. २८ एप्रिल २०१९ ला रोजी बाजीराव पेशवे यांची २७९ वी जयंती साजरी करण्यात आली.

आपण मुलांना खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक क्लासेस लावतो. ज्यामुळे मुले रेसमध्ये ढकलली जातात आणि रेसचा घोडा बनतात.
कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?”
सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.
सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.
आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.
-शुभंभवतु
-- प्रा.गजाननशेपाळ
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जगप्रसिद्ध चित्रकार वॅन गॉगला शहरी जीवन मानवलं नाही. शेवटी तो एका शांत, निसर्गसंपन्न जागेत राहायला गेला. तिथे त्याने आयुष्याची शेवटची वर्षे काढली आणि त्यावेळी त्याने जी मोजकी चित्र चितारली ती जगभर गाजली. इतकी किंमत आली की त्या चित्रांचे स्मगलिंगही झाले.
२० ऑगस्ट ! १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली भारत नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालय (The Indian Ministry For New & Renewable Sources) ह्यांनी ह्या दिवसाची स्थापना केली.

रेल्वेवाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि जलद अशी अखंडपणे सुरू राहण्यासाठी रेल्वेमधले कर्मचारी व तंत्रज्ञ हे जसे महत्त्वाचे दुवे असतात, अगदी त्याच तोलामोलाचं महत्त्व रेल्वेमधल्या आधुनिकीकरणालाही आहे. काळ बदलला, रेल्वेप्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला, तसं दर टप्प्यावर रेल्वेनं बदलांना, नव्या तंत्रांना आपलंसं केलं. या प्रवाहात रेल्वेला खऱ्या अर्थानं वेग आणण्यात विद्युतीकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला.
विजेवर चालणारं पहिलं रेल्वेइंजिन ‘एडिंबरो ते ग्लासगो' या दरम्यान सन १८३९ साली धावलं. पुढे १८७९ मध्ये बर्लिन येथील प्रदर्शनात विजेवर चालणाऱ्या रेलगाडीचं प्रात्याक्षिकही दाखविण्यात आलं.
भारतात मात्र विद्युतीकरणासाठी १९२५ साल उजडावं लागलं. १९२५ मध्ये मुंबईच्या 'हार्बर लाईन'वर मुंबई ते कुर्ला ९.५ मैलांचं अंतर पहिल्या विद्युत गाडीनं कापलं आणि पुढे १९२८ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली हे बी.बी.सी.आय.वर, तर १९२९ साली जी.आय.पी.वरील कल्याणपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालं. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग रेल्वेनं काळाचा विचार करता फार लवकर सुरू केला. रेल्वे यार्ड, स्टेशन, सिग्नल्स, रेल्वेचे डबे, या सर्व ठिकाणी अखंडपणे विजेचा पुरवठा मिळाल्यानं रेल्वेची सेवा उत्तम दर्जाची झाली. विजेवर चालणाऱ्या लोकल गाड्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केल्यामुळे मुख्यत: मुंबई व कलकत्ता ही शहरं कल्पनेच्या पलीकडे पसरत गेली.
धुराच्या इंजिनासाठी कोळसा महाग पडत असे, शिवाय गाडीला वेग मिळण्यास वेळ लागायचा. घाटात गाडी चढणं कठीण जात असे. त्यामुळे हळूहळू अनेक मार्गांचं विद्युतीकरण होत गेलं आणि धुराची इंजिनं इतिहासजमा होत गेली.
२१ व्या शतकात यांत आणखीही बदल होणार आहेत. काळापुढे चालणारी रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे डी.सी. (Direct Current)-ए.सी. (Alternating Current) परिवर्तन पूर्ण करेल. त्यानंतर या बदलामुळे दर दिवशी १ कोटी रुपयांची विजेची बचत होणार आहे. नवीन 'बंबार्डियर' गाड्या धावण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या गाड्या यानंतर ए.सी. पद्धतीनं चालणार आहेत.
या सर्व कामासाठी मधून मधून रेल्वेचे मेगा ब्लॉक घडविणं आवश्यक ठरणार आहे. पूर्वी डी.सी.चं ए.सी.मध्ये रूपांतर करण्यात रेल्वेलाईनच्या बाजूनं अनेक ट्रान्सफॉर्मर लागत. त्याकरता जास्त लोक कामावर ठेवावे लागत व हे रूपांतर करण्यात वीज वाया जात असे. आता ए.सी. आल्यानंतर कामावर कमी लोक लागतील. पश्चिम रेल्वेवरचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईची संपूर्ण लोकल व इंजिन वाहतूक ए.सी. मार्गानं होईल. दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथे मुंबई इतक्या लोकल कधीच नव्हत्या. तिथे ए.सी.मधील रूपांतर आधीच झालेलं आहे. भारतीय रेल्वेने ही एक मोठी यशाची पायरी गाठली आहे.
आता जवळजवळ डी.सी. ते ए.सी. काम संपूर्ण भारतभर पूर्ण होत आलं
आहे. प्रथम डी.सी. करंट येत असताना बरीच यंत्रे व मनुष्यबळ रेल्वेलाईनच्या बाजूस ठेवावे लागे, हा सर्व खर्च आता वाचणार आहे; शिवाय, विजेची बचत झाल्याने त्यातही पैसे वाचणार आहेत. हळूहळू भारतभर सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण चालू आहे. याचा खर्च डिझेल इंजिने चालविण्यापेक्षा कमीच आहे व वेगात काहीच फरक पडत नाही आणि हवेत प्रदूषण तर अजिबातच होत नाही. पण याकरता मुबलक वीजपुरवठा असणे आवश्यक आहे; त्याकरता लागणारी वीज जल, कोळसा आणि सौरऊर्जेमार्फत मिळवावी लागेल.
-डॉ. अविनाश वैद्य
Copyright © 2025 | Marathisrushti