वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली.
दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.
दादर पश्चिमेस “प्रारंभ” या इमारतीत, १९६७ रोजी सुरेश चाळकर या गृहस्थाने परिसरातील होतकरु तरुणांसह, सामाजिक बांधिलकी आणि एकोपाच्या भावनेनं “बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाची” स्थापना केली;
प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक ॲसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते.
आज आपल्या राज्यामध्ये मध्ये जर राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष सारखेच नाकर्ते असतील तर केवळ “सिस्टीम” ला नावे ठेवून आणि “हे असेच चालणार ” असे सुस्कारे सोडून महाराष्ट्रा ची नक्कीच प्रगती होणार नाही.कुठेतरी आपण कार्यरत झाल्याशिवाय हे राज्य सुधारणार नाही.रस्त्या वर उतरून एक मेकांची डोकी फोडणे आणि मग जेल च्या वारया करणे याने काहीही सध्या होत नाही.घरबसल्या केवळ १० रुपये आणि थोडासा वेळ दिला तर सामान्य माणूस सुद्धा सामाजिक कार्य करू शकतो.तेव्हा मी महाराष्ट्रा तील जनतेला विनंती करीन कि माहितीचा अधिकार कायदा जाणून घ्या,त्याचा भरपूर वापर करा
काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा तो दिवस आहे ज्याची वाट प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने पाहतो .प्रत्येकाची ती जिवणपरिक्षा असते . तशी माझ्याही विचारांची घालमेल मनात सतत सुरू होती बाबाचा फोटो पाहून.... त्या जीवन परीक्षेबाबत ,विचारा विचारात नकळत आठवले ते दिवस .मी बारावी पास झाली मी मेडीकल ला जाणारी पण खूप वादळ येऊन गेले आयुष्यात कारण बाबाचे ठीक दुसर्या दिवशी कॅन्सर ने निधन झाले मी बाबाच्या लाडकी लेक .आयुष्याच नकोस वाटले होते बाबा गेल्यावर मग तिथे जीवनाचा काय प्रश्न .मी फक्त बाबाच्या दुःखात बाबांना ओल्या डोळ्यांनी शोधत फिरणारी .पण अश्यात माझा भाऊ याने तो जिथे शिकला त्याच लॉ कॉलेज मधे प्रवेश केला माझा .माझे वक्तृत्व अतिशय चांगले त्यामुळे माझ्या आपल्याना तो निर्णय फार आवडला .मी कॉलजमध्ये जाण्याचे टाळत होते पण आई कडे पाहून परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती तेव्हा कॉलेज सुरू केले.नवीन अभ्यासक्रम हातात पडणारी भलीमोठी पुस्तक .कॉलेजमधील अभ्यासक्रम शिकून झाला .क्लासमेट नवीन शिक्षक ही नवीन पण न घाबरता आत्मविश्वासाने मी अभ्यास सुरू केला .पातूर ते अकोला बस ने प्रवास करावा लागत असायचा बस स्टँड वर गेले की बाबाची आठवण यायची .. बाबाच्या ओळखीचे लोक दिसायची तिथेच नकळत आसवे डोळ्यातून वाहत असायची.तो रोजचा बस चा प्रवास माझ्या सदैव आठवणींचा राहील .कारण मी सलग तीन वर्षे बस मध्ये माझे आसवे पुसत पुढे गेलेली आहे .बस वेगाने धावायची त्यापेक्षाही वेगाने माझे मन धावायचे बाबांच्या आठवणी मध्ये ....पण दुःखाने व्याकुळ झालेल्या मनाला बाबा गेल्यावर ज्यांनी मला धीर दिला असे माझे आई भावंड आणि माझ्या बाबाचे मित्र मोहन जोशी काका या सर्व लोकांनी मला जो धीर दिला आज त्या धिरामुळे मी स्वतःला सावरत इथपर्यंत आले असे मला वाटत होते.विचारा विचारात सकाळ झाली .मी लवकर तयार होऊन नेहमीच्या बस स्टँड वर आली .आजचा तो दिवस आहे जो कशा आला केव्हा आला मला कळत नव्हतं असे मनात विचार चालू होते .मी फार उत्सुक होते निकाल पाहायला .बस मध्ये बसून केव्हा अकोला आला कळलेच नाही. कॉलेज मध्ये पोहताच सर्व मैत्रिणी भेटल्या माझ्या नवीन प्रकाशित पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देत.आमच्या चांडक मॅडमने ही माझे खूप कौतुक केले.सगळाच आधीपेक्षा वेगळं घळत होत निकाल या वेळी ऑफलाईन लागला होता त्यामुळे निकाल पहायची आतुरता शिगेला पोचली होती.लवकरच आमचा निकाल मॅडमच्या हाती आला आम्ही सर्व कॅबिन मध्ये गेलो सर्वांचा एकामागून एक निकाल कळत होता.आता मॅडमनी माझी मार्कशीट हातात घेतली अन् मी फर्स्ट क्लास पास झाल्याचे कळवले .कॉलेज मध्ये टॉपर येण्याचा आनंद तर होताच पण ह्या क्षणाला माझे नकळत डोळे भरून आले.कारण माझ्या मैत्रिणी त्यांच्या बाबांना कॉल करून निकालाची बातमी देत होत्या .त्यावेळी मला वाटले आज माझे बाबा असते तर मी फर्स्ट क्लास टॉपर आल्याचे त्यांना किती कौतुक असते .अभिमानाने त्यांनी माझी पाठ थोपटून मला कौतुकाने अॅडव्होकेट म्हणून हाक मारली असती क्षणभर मी त्या निकालाच पाहत राहिला .ती माझी गेलेली पाच आठवणींचे आठवत .तेवढ्यात मैत्रिणीने विचारले विशाखा तू घरी कॉल नाही केला मग लगेच भानावर येत माझ्या भावा बहिणींला कॉल करू सांगत मी ती आनंदाची बातमी त्यांना दिली सांगताना डोळे भरून आले अन् लगेच कॉल कट केला .सर्वांसारखे माझेही स्वप्न होते. की बाबाचे नाव मोठं करावे अन् त्यावेळी कौतुकाने त्यांनी मला शाबासकी द्यावी .पण मात्र सदैव मन ते सोबत असल्याची जाणीव करून देते .कारण जेव्हा मी पेपर द्यायला जायची तेव्हा मैत्रिणीचे बाबा याचे तेव्हाही माझ्या भोळ्या मनाला मनात बाबा नसल्याची उणीव करून जायचे ...असे आसवांच्या पुरात गेलेली माझे पाच वर्षे पूर्ण झाली अन् आज तो निकालाचा दिवस माझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गाथा लिहीन गेला हा माझा दुःखाचा प्रवास या वेळी सोबतीला होत्या माझ्या बाबांच्या आठवणी माझ्या सोबत आहेत जे मला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त लढ विशाखा असे म्हणतात.कालचा निकालाचा दिवस हा सदैव माझ्या स्मरणात राहील...... कारण ती माझ्या जीवनातील पहिली यशाची पायरी मी चढले पण खरे बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला त्यांच्या आठवणीला जीवन नौका करीत ...कारण बाबाचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे.
अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जि.अकोला
बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. रामानंद सागर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा पहिला चित्रपट होता. अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले, लता मंगेशकर यांना खरा ब्रेक मिळाला तो पण बरसात मधील गाण्यांमुळेच. बरसातमुळे राजकपूर यांचे नाव सर्वत्र झाले.
अरुंधती भट्टाचार्य या सेल्सफोर्स, इंडियाची अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा देखील आहेत. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा असलेल्या पहिल्या महिला आहेत.
आरती विंझाईला । ताह्मिणीचे आईला।
सप्रम आनंदाने । पंचारती ओवाळीन ।।धृ।।
आरती विंझाईला ।
तुंची एक परब्रह्य । निर्गुण तुचि साचार ।
उत्पती स्थिती नाश । सर्व तुझाच भास ।।1।।
आरती विंझाईला ।।धृ।।
घेतली अनंत रूपे । भत्त* तारावयासी ।
मारिले राक्षसाशी । खेळ आम्हा दाविशी ।।2।।
आरती विंझाईला ।।धृ।।
ऱ्हमलज्जा बिजरूपे । श्री ऱ्हंकार स्वरूपे ।
अक्राळ विक्राळ सुक्ष्मे । सर्व स्थित्यंत रक्षे ।। 3।।
आरती विंझाईला ।।धृ।।
ताह्मिणीचे तापिणीला । श्री विझाई देवीला ।
गणेश सुत प्रिय भत्त* । चरणी तिचे आसत्त* ।।4।।
आरती विंझाईला ।।धृ।।
गायक - श्री.सुधीर गोरे.
घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.
Copyright © 2025 | Marathisrushti