(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वेदसार शिवस्तोत्रम् – १०

    भगवान श्रीशंकरांच्या वैभवाचे कथन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा

    आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?

    इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.

    आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !

    आयुर्वेद ही कोणतीही 'पॅथी' नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे 'औषधे' हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )

    जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.

    औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.

    काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }

    आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !

    नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    29.04.2017

  • हृदयस्पर्शी आसावरी

    रागदारी संगीतातील काही खास मजेच्या बाबी म्हणजे, जर रागांचे स्वरलेखन तपासले तर, एका रागातील काही स्वर दुसऱ्या रागात तंतोतंतपणे सापडतात पण तरीही, प्रत्येक राग वेगळा असतो. त्यानुसार त्यातील भावना, स्वरांची बढत, ताना, हरकती इत्यादी अलंकार, त्याची आभूषणे आणि तेजाळ लखलखणे वेगळे असते.

  • द ग्रेट मराठा सचिन तेंडुलकर

    विद्याधर ठाणेकर 
    सन्मित्र २४ एप्रिल २००२

    २४ एप्रिल २००२ हा सचिन तेंडुलकरचा २९ वा वाढदिवस. सर्वात प्रथम सचिनला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुक्षेच्छा! आणि योगायोगही असा की, सचिनने स्वतःच्याच २९ व्या वाढदिवसानिमित्त साऱ्या क्रिकेट शौकीनांना २९ व्या कसोठी शतकाची क्षेट दिली. त्यासाठी सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • अक्कल दाढ ????

    (कथा आणि पात्र काल्पनिक आहे)

    काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.

    आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

    मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का?

    डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल.

    माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट.

    डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.

    आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.

    (दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित)

  • महावीर जयंती

    भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत म्हणून ते ओळखले जात.

  • चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

    भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).

  • अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ७

    मे ते सप्टेंबर पर्यंत शेतं, मक्याच्या आणि सोयाबीनच्या पिकांनी हिरवीगार झालेली असायची. मक्याची रोपं तर चांगली १०-१२ फूटांवर पोहोचणारी. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाताना, रस्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली रोपं गाडीच्या उंचीच्या वर पोहोचायची. त्यामुळे उभे आडवे रस्ते मिळणार्‍या कोपर्‍यांवर, आडव्या रस्त्यावरून येणार्‍या गाडया दिसत नसत, त्यामुळे आडवा रस्ता आला की गाडीचा वेग हळू करायचा, डाव्या उजव्या बाजूला मक्याच्या रोपांतून दूरवर नजर टाकायची आणि मगच पुढे जायचं, हे सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेलं.

    गावात व्हाईट नावाचं एक कुटुंब होतं. ते देखील आमच्यासारखं सू सेंटरला नवीनच रहायला आलं होतं. जीम Ph.D. होता आणि जनावरांच्या खाद्य बनवणार्‍या एका कंपनीत सल्लागार म्हणूण काम करायचा. त्याची बायको क्रिस्तीन MBA होती, परंतु तिने नोकरी न करता, घरच्या घरी मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पाच मुलं होती. मोठया दोन मुली १२-१४ वर्षांच्या आणि तीन मुलं ४ ते १० वयातली. त्यामुळे ती मुलं आणि सिद्धार्थ यांची चांगलीच मैत्री झाली. क्रिस्तीन आणि मृणालची गट्टी जमली आणि मला आणि जीमला गप्पा मारायला समान आवडीचे विषय मिळाले. हे कुटुंब नेहमीच्या अमेरिकन कुटुंबापेक्षा खूपच वेगळं होतं. एक तर सगळी मुलं होम स्कूलिंग करणारी - म्हणजे त्यांची आईच त्यांना घरच्या घरी शिकवायची. आई वडील छानछोकीच्या गोष्टींपेक्षा पुस्तकांवर खर्च करणारे. त्यांच्या घरीच त्यांनी एक मोठीशी लायब्ररी जमवली होती. क्रिस्तीन मुलांना गाडीत घालायची आणि दूर दूरच्या ठिकाणी घेऊन जायची. कुठे नॅशनल पार्क्समधे जा, कुठे म्युझीयम बघायला जा, कुठे डायनासोरच्या हाडांचं उत्खनन चाललं असेल तिकडे जा, असा सारा प्रकार. पण त्यामुळे शाळेतलं एकसुरी, बंदिस्त शिक्षण घेण्यापेक्षा, ती मुलं आपल्याला हवं ते भरपूर वाचून, प्रत्यक्ष पाहून, करून, काही वेगळंच आणि चांगलं शिकायची.

    त्या पोरांचे खेळ देखील वेगळेच असायचे. त्या मुलांना घेऊन क्रिस्तीन बरेचदा आमच्या फार्महाऊसवर यायची. मग ती आणि मृणाल एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर गप्पा मारणं, ग्रीटींग् कार्डस बनवणं किंवा आजूबाजूच्या कच्च्या रस्त्यांवरून फिरणं, असं काही तरी करायच्या. डेव्हीड, स्टर्लिंग, इयान आणि सिद्धार्थ गावातल्या पोरांसारखे आमच्या आवारात खेळत बसायचे. घराला लागूनच असलेल्या फार्मच्या पाठच्या बाजूला, सुकलेल्या गवताच्या मोठाल्या गंजी लावून ठेवलेल्या असायच्या. त्यांच्यावर चढून, त्यात लपंडाव खेळणं हा त्यांचा मोठा आवडीचा खेळ होता. उन्हाळ्यात फार गरम व्हायला लागलं, की गायींना उतरवून घेण्याच्या धक्क्यावर जायचं आणि तिथे असलेल्या नळांना पाईप जोडून, ते पाणी एकमेकांच्या अंगावर उडवून, पाण्यात आणि चिखलात मनसोक्त भिजणं, हा असाच एक त्यांचा आवडता खेळ. कधी कधी घराच्या आसपासच्या सशांना पकडण्यासाठी, जमिनीत खड्डे करून ते गवताने झाकायचे आणि आजूबाजूला गाजरं टाकून ससे कधी खड्ड्यात पडतायत हे बघत लपून बसायचं, असे त्यांचे उद्योग चालू असायचे. मुंबईच्या मुलाला अशा गावरान उनाडक्या करताना बघून आम्हाला मोठी मजा वाटायची.

    मैल मैल अंतरावरच्या उभ्या आडव्या कच्च्या रस्त्यांनी चौरस तुकड्यात विभागलेल्या या अफाट माळरानावर, दूर दूर अंतरावर घरं विखुरलेली असायची. घराच्या बाजूलाच बार्न (गायींचा मोठा लाकडी बंदिस्त गोठा), धान्य साठवण्याच्या उंच कणग्या (tower silos), शेतीची अवजारं ठेवायची लाकडी शेड, असा पसारा असायचा. घराच्या पुढे मागे २-३ गाडया, पिकअप ट्रक्स, ट्रॅक्टर्स, इतर मोठाली अवजारं, इतस्तत: जागा शोधून उभी असायची. घराच्या पुढे हिरवळीचा छोटासा तुकडा आणि त्याच्या सभोवती फुलझाडांची सजावट असायची. घरं तशी सुबकशी, पांढर्‍या किंवा करडया रंगाची असायची. दिवसा खिडक्यांचे जाळीदार पडदे हलत असायचे आणि संध्याकाळी घरांतील दिव्यांच्या मंद पिवळ्या उजेडाने खिडक्या उजळून जायच्या. घराच्या पुढयात एक दोन कुत्री डोळे मिटून निपचीत पडलेली असायची आणि एखादी गाडी धूळ उडवत गेली की हळूच डोळे किलकिले करून बघायची. काही घरांच्या आजूबाजूला तुटकी मुटकी फळफुटं आणि तारांच्या सहाय्याने केलेल्या साध्या सुध्या छोटया कुंपणांआड, काही डुकरं किंवा मेंढया दिसायच्या. काही घरगुती कोंबडया इतस्तत: दाणे टिपत फिरत असायच्या. या सार्‍या पसार्‍याभोंवती झाडांची भिंतशी उभारून जणू एखादी गढीच केलेली असायची. बाहेर कुंपण किंवा भिंत वगैरे प्रकार नाही. मोठया झाडांच्या खाली झुडपं आणि तण वाढलेले असायचे. झाडाझुडपांची गर्दी संपली की सरळ शेतंच सुरू व्हायची. अशी ही भर शेतातलीच वस्ती! हिवाळ्यात झाडांची पानं गळून गेली, की ही घरं आणि त्यांच्या आजूबाजूचे बार्नस, धान्यांच्या कणग्या हा सारा पसारा, निष्पर्ण फांद्यांच्या काटेरी कुंपणात बंदिस्त करून ठेवल्यासारखा दिसायचा. थंडीच्या ऐन कडाक्यात, सारा आसमंत बर्फाच्या दुलईत गुरफटून गेला, की क्षितीजापर्यंत पसरलेल्या शेतांत चमकणारा बर्फ एखाद्या अथांग दर्याची आठवण करून द्यायचा. मग निष्पर्ण वृक्षांमधे अर्धवट झाकली गेलेली ही घरं, या अफाट दर्यामधे विखुरलेल्या छोटया छोटया बेटांसारखी वाटायला लागायची.

    आधीच्या मोसमात कापलेल्या मक्याचे खुंट शेतात तसेच राहिलेले असायचे. बर्फाच्या आवरणाखालून त्यांची टोकं तेवढी वरती दिसत असली म्हणजे एखादी चतुरंग सेना आपल्या लखलखत्या रणवेषात तयार होऊन सज्ज असावी, आणि त्यांच्या भाल्यांची टोकं तेवढी शिरस्त्राणांच्या वर दिसत असावीत, तसं दृश्य दिसत असायचं.

    कच्च्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला, आठ दहा फूट रुंद आणि दोन तीन फूट खोल अशा पन्हळी असायच्या. उन्हाळ्यात कधी फार जोरदार पाऊस झाला तर त्यातून मातकट, लालसर पाणी वहायचं. पण त्यांचा खरा उपयोग व्हायचा तो हिवाळ्यात. जेंव्हा मोठं हिमवादळ व्हायचं तेंव्हा रस्ते, शेतं, रस्त्याच्या बाजूच्या या पन्हळी, सारं काही बर्फाने भरून जायचं. भणाणत्या वार्‍याने शेतांतला हा बर्फ रस्त्यावर लोटला जाऊन गाडयांना अडथळा होऊ नये, म्हणून या पन्हळी असायच्या. त्यामुळे वार्‍यामुळे लोटला जाणारा हा बर्फ, ह्या खड्ड्यांसारख्या पन्हळींमधे पडून रस्त्यांच्या कडेला साचत रहायचा. रस्त्यांना ना किनारी ना रोड साईन्स, त्यामुळे रस्ता कुठे संपला आणि पन्हळी कुठे सुरू झाल्या, हे समजायला काहीच मार्ग नसायचा. कुणी बेसावधपणे गाडी चालवत असला किंवा निसरडया बर्फावरून गाडी घसरली की बाजूच्या पन्हाळीमधे जाऊन पडायची.

    रस्त्यांच्या बाजूला विजेच्या तारा वाहून नेण्यासाठी चक्क लाकडी खांब. अमेरिकेत सरळसोट वाढणार्‍या सूचिपर्णी वृक्षांची काही कमतरता नाही. त्यामुळे विजेचे लाकडी खांब म्हणजे चक्क या झाडांचे कापलेले गोल सरळसोट बुंधे! कच्च्या रस्त्यांच्या कडेकडेने या लाकडी उंचच उंच खांबांच्या रांगा, हे एक चहूबाजूंना दिसणारं दृश्य! हिवाळ्यात जेंव्हा रस्ते आणि कडेच्या पन्हळी बर्फाच्छादित होऊन रस्त्याची कड समजणं मुश्किल व्हायचं, तेंव्हा या खांबांच्या रांगांकडे बघूनच रस्त्याच्या कडेचा अंदाज घेत गाडी चालवायची.

  • अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते.

  • साद माहेरची – ओवी

    साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।