(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३

    स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
    मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
    जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
    पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖

    भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
    आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
    मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् - उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
    जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
    जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
    पराशक्तिमित्रं - पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
    नमः पंचवक्त्रम् - अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 12, 2020


  • कंबर, पाय, दात दुखण्यांवर उपाय

    बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.
    पाय दुखणे मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

    कंबर दुखी विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.

    उसण भरणे कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.

    बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक) बर्याचचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्याेच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.

    दात दुखणे आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.

    पोटदुखी ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.

    जुलाब जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.

    उलटी उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.

    अपचन अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.

    शौचास खडा होणे ही सवय बर्याअच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 12, 2017


  • ग्रोव्ह्युअर पद्धतीने छपाई

    ग्रोव्ह्युअर छपाई पद्धतीत प्रतिमा कोऱ्या जागेपेक्षा खोलगट भागात असते. या खोलगट भागावरून छपाई करण्याच्या पद्धतीला इंटाग्लिओ पद्धत म्हणतात. प्रथम संगणकात प्रतिमा तयार करून एक पॉझिटिव्ह तयार केली जाते. एका तांब्याच्या सिलेंडरभोवती ही पॉझिटिव्ह गुंडाळून उघडयावर ठेवली जाते.

      May 28, 2023


  • चेहर्‍याचा रंग कसा उजळेल?

    चेहेर्‍याचा रंग उजळण्यासाठी  काही सोप्या युक्त्या. हे करुन बघाच. बाहेरच्या कोणत्याही क्रिमची गरज नाही. 

      September 4, 2017


  • अपरिचित इतिहास

    अपरिचित इतिहास

    शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.

    महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार

    पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.

    ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.

    शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.

    दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.

    संदर्भग्रंथ

    • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
    • शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४

    © *शिवकालीन सत्य इतिहास ग्रुप*

    jiRaje.co.in/

      November 6, 2016


  • आश्चर्यकारक मिश्रधातू

    अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची शक्यता आहे.

      February 14, 2023


  • देवपूजेतील साधन – निरांजन

    देवपूजेतील साधन – निरांजन

    निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात.

    निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे.

    निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो.

    सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.

      January 30, 2016


  • प्रा. एम. एम. शर्मा

    १९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले.

      October 10, 2023


  • पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

    आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का?
    याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, पचन सुधारते असे काही संशोधनांचे निष्कर्ष आहेत. ज्या देशांत सकाळी नाश्त्यापासूनच मांसाहार करण्यास सुरुवात होते तेथे आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण मुळातच जास्त असणार ही बाब आपण लक्षातच घेत नाही. आपल्याकडे ‘पट्टीचे खाणारे’ लोकही नाश्त्यापासून मांसाहारावर ताव मारायला सुरुवात करत नाहीत हे महत्वाचे. ‘पचन सुधारणे’ म्हणजे केवळ शौचाला साफ होणे इतकाच अर्थ अशा संशोधनांत आढळून येतो. प्रत्यक्षात इतका संकुचित अर्थ वैद्यकीयदृष्ट्या मुळीच योग्य नाही. दिवसभर ब्रेड, चीज आणि मांस यांसारखे पचायला अतिशय जड पदार्थ सातत्याने खाल्ल्यावर स्वाभाविकपणे निर्माण होणारा बद्धकोष्ठाचा त्रास टाळावा म्हणून हे लोक Fibre आणि roughage इतक्याच मर्यादित दृष्टिकोनातून या पालेभाज्यांकडे पाहून त्यांचा उदोउदो करत असतात. आपल्याकडे तसा करण्याची निश्चितपणे आवश्यता नाही.
    परदेशात खाल्ल्या जाणाऱ्या कोर्नड, सॅलरी, रॉकेट लिव्स यांसारख्या Green leafy vegetables या आपल्याकडच्या मेथी, चाकवत, माठ इत्यादी पालेभाज्यांच्या तुलनेत अगदी भिन्न आहेत. त्यामुळे त्यांना लावलेला हा न्याय आपल्याकडे मुळातच लावता येणार नाही. मुंबईसारख्या शहरांत तर रेल्वेलाईनच्या लगत असलेल्या वाफ्यांत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आणि आजूबाजूच्या सांडपाण्यावर पोसल्या जाणाऱ्या पालेभाज्यांत निकेलसारखे कर्करोगास कारणीभूत असणारे घटक वाजवीपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात आढळले आहेत. (यात पालक ही पालेभाजी आघाडीवर आहे)
    सरटेशेवट; जो आहारीय पदार्थ जसा दिसतो/असतो तसेच परिणाम तो शरीरावर करतो. पालेभाज्या लवकर वाढतात, लगेच कुजतात आणि त्यात सर्वाधिक किडे असण्याची शक्यता असते. आयुर्वेदाने तर पालेभाज्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ‘अशाकभुक्’ या शब्दात दिलेला आहे. थोड्क्यात सांगायचे झाल्यास; पालेभाज्यांचा आहारात अगदी जेमतेम समावेश असावा. Green leafy vegetables चा आंधळेपणाने केलेला गवगवा तर अजिबातच नको!!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 27, 2016


  • श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ४

    श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
    श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
    वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥

    श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.

    भयहरां - भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.

    ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.

    निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.

    श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् - भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.

    वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
    यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.

    नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,

    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 13, 2020