(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आधी नैवेद्य मग प्रसाद – काय आहे हे गौडबंगाल?

    आधी नैवेद्य मग प्रसाद – काय आहे हे गौडबंगाल?

    लेखक :  शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : मानवाने, आपल्या कमाईचा काही ठराविक एक भाग. ईश्र्वराच्या साक्षीने म्हणजेच परमेश्वराच्या समोर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करून, इदम् न मम . या उक्तप्रमाणे इतरांना वाटून टाकणे. यालाच खाऱ्या अर्थाने प्रसाद म्हणतात.

  • आँधी  चित्रपट

    आँधी चित्रपट

    ” आंधी” चित्रपट भारतभर व मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये गर्दीत सुरु असतानाच देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली, त्यात या चित्रपटांवर बंदी आणली गेली. हा बहुचर्चित चित्रपट काही महिन्यांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला आणि मग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचे यातील काम अप्रतिम. कोशीश आणि आंधी सारखे खास चित्रपट गुलझार यांनी संजीव कुमार यांना करण्यास दिले, आणि दोन्ही चित्रपटा साठी संजीव कुमार यांनी बेस्ट कलाकाराची बक्षीसे मिळवली. आंधी हा चित्रपट म्हणून तर अप्रतिम आहेच पण यात आहेत आर डी बर्मन यांची गाणी. ” आंधी ” चित्रपट म्हणजे राजकारणाच्या पाश्वभूमीवरील संवेदनशील प्रेम कथा. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. जे के (संजीव कुमार) हा हॉटेल मॅनेजर असतो, त्याच्या प्रेमात आरती (सुचित्रा सेन) ही एका राजकीय पुढाऱ्याची मुलगी पडते. लग्नानंतर काही वर्षांनी काही अपरिहार्य कारणांमुळे आरती राजकारणात प्रवेश करते. कालांतरानं आरतीची आरती देवी होते. जे के आणि आरती देवी दोघं एकमेकांपासून वेगळे होतात. अनेक वर्षांनी पुन्हा दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना जाणवतं की एकमेकांवरचं प्रेम अजूनही तेवढंच आहे. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ.
    या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाद देखील थेट हृदयाला भिडणारे आहेत. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस् आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते.

    ह्या चित्रपटातील ३ गाणी मंत्रमुग्ध करून टाकतात.

    https://www.youtube.com/watch?v=9ezj1yuRmIc

    १) तुम आ गये हो नूर आ गया हैं
    २) इस मोड से जाते हैं
    ३) तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं

    https://www.youtube.com/watch?v=wBYMGrThxkI

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • आदरणीय पारनाईक सर….

    आदरणीय पारनाईक सर….

    खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे .

  • आत्महत्या समस्या की उपाय ?

    आत्महत्या समस्या की उपाय ?

    शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.
    आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे.

  • आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे

    आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे

    कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली.

  • आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

    आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

    आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो.

  • आता मदार चौथ्या खांबावरच

    आता मदार चौथ्या खांबावरच

    वारंवार कोसळू पाहाणाऱ्या लोकशाहीच्या सर्कशीच्या तंबूची शेवटची मदार आता न्यायववस्थेच्या चौथ्या खांबावरच आहे. या खाबाचं काही आलवेल नसलं, तरी तो अजून इतर तिन खांबांयेवढा पूर्ण सडलेला नाही, हे दाखवून देण्याची हिच वेळ आहे..!!

  • आता कशाला उद्याची बात?

    आता कशाला उद्याची बात?

    सतत भविष्याच्या काळजीमुळे आपण आपल्या आसपासच्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत,आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वेळ कमी देत आहोत,जीवनाचे अमुल्य क्षण वाया घालवत आहोत आणि या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या गोष्टी हातामधून गेल्यावर होते,हे आपले दुर्भाग्यच.उद्याचा अति विचार करून आपण आपल्या आजच्या सुखांवर विरजण तर नाही टाकत आहोत ना…..??

  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

    आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

    जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

  • आंतरराष्ट्रीय शांतता दिन

    आंतरराष्ट्रीय शांतता दिन

    व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून घोषित केला गेला.