वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं.
समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.
स्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो.
बारामुल्ला जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले होते. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता.

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.
मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं.
भेटवस्तु हा नव्या जगातला जादूई मंत्र आहे. अनेकविध भारतीय सण, राखी, भाऊबीज, जन्मदिवस, प्रमोशन, बाळाचे आगमन, शिक्षकदिन अशा एक का अनेक प्रसंगात भेटवस्तूंची देवघेव होत आहे.
नव्या पिढीचे इंटरनेटशी जुळलेले नाते आणि त्यामुळेच जगभराशी वाढलेला दोस्ताना यातून फ्रेंडशिप डे, फादर - मदर डे, व्हॅलेंटाईन डे यासारख्या पाश्चिमात्य दिवसांनी तरुणांना आपलेसे केले आहे.
आजची तरुणाई ही चंगळवादी आहे असे विधान सर्रास केल जातं पण ती तेवढीच भावूक आहे, दिलदार आहे हे मात्र नेमकं विसरलं जातं प्रेम ही जगातील सर्वश्रेष्ठ भावना आहे आणि त्याचं प्रतिक म्हणून सर्वदूर असलेल्या तरुणांमध्ये भेटीचे आदानप्रदान चालते. 'मला तू आवडतोस/आवडतेस' हे खुलेपणे सांगण्याचा जमाना आहे. त्याचबरोबर प्रेमाच्या इंद्रधनू रंगांची, मैत्रीची, परस्परांच्या आवडीची कदर करणे हे सर्वमान्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ही भेटवस्तू कशाला? असा आडमुठेपणा काहीजण करतात. आमच्यावेळी नव्हती असली थेर हे उद्गार म्हणजे तर तरुणाई आणि जेष्ठमंडळी यांच्यातील मतभेद आणि अंतर वाढविणारे ठरतात.
प्रत्येक पिढीनुसार भावभावनांचे प्रतिबिंब बदलत गेले आहे कारण बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. तर परिवर्तन हा जगण्याचा आरसा आहे. त्यामुळे भेटवस्तूवर तोंडसुख घेत टीकेचा सूर लावणे गैर आहे. आपल्या जिवलग मित्रमैत्रीणी, भावंड, आईवडील, आजीआजोबा एवढच कशाला सर मॅडम संबोधल्या जाणार्या शिक्षकांनाही आजकाल भेटवस्तू दिल्या जातात त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होतात. अडचणींचे, समस्यांचे निवारण होण्यासाठी गुरुशिष्य नात्याबरोबरच एक मार्गदर्शक मित्र या नात्याचा जन्म होतो तो विद्यार्थ्यांना आपलेपणा देतो.
याचा अर्थ शिक्षकांना भेटवस्तू द्या अन् घ्या सवलत असा नव्हे. परस्परांविषयीचा दृष्टीकोन समजायला आणि भीतीचा पगडा दूर व्हायला दोघांतील ओळख वाढायला भेटवस्तू हे एक माध्यम बनते. हीच दृष्टी नात्याच्या परीघातील अनेक बिंदूपर्यंत पोचते मग ते घरगुती असो की मित्रपरिवारातले. त्यामुळे पाल्याला किती परफ्युम्स, घड्याळे मिळावीत याची अवाजवी गणिते करणे सोडा. अकरावीत गेल्यावरच तुला हे सारं मिळतय, या वयातच मिळालं याचे भान ठेवा अशा हेटाळणीयुक्त वाक्यांचा उपयोग न करता त्याच्या भेटवस्तूंचे कौतुक करा कारण मुलामुलींना मिळणार्या भेटवस्तू या त्यांचे मित्रत्वाचे जग विस्तारते आहे हे सांगणारे आहे. नाती ही रक्तापलिकडे जाणारी आणि म्हणूनच महत्वाची आहेत ज्यात तुमचा पाल्य हा एक व्यक्ती म्हणून समृद्ध होतोय.
भेटवस्तू ही कुणीही कुणालाही द्यावी ती देतांना एक पथ्य मात्र जरूर पाळावे की ज्यात किंमतीचा टॅग महत्वाचा नसून आपलेपणाची ओढ असावी. जी वस्तू महाग की स्वस्त, छोटी की मोठी याहून माणसांची श्रीमंती जपणारी असली की भेटवस्तूचा गोडवा अधिकच आनंद देतो. भेटवस्तूची देवघेव ही त्या व्यक्तीची आवड, तिचे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन करायला हवी. अन्यथा भेटीच्या आनंदापेक्षा हे काय भलतंच, याचं काय करू? एवढंही माहीत नाही तर उगाचच ही नाटकं कशाला? अशी भावना होते.
ज्याला वाचनाची आवड आहे त्याला पुस्तक भेट आवडेल. मोठमोठे शोपिस घराला सौंदर्य देण्याऐवजी कुणाला म्युझियम अवतरले वाटू शकतं. कुणी रिस्टवॉच वापरत नाही त्यांना घड्याळ म्हणजे अडचणच.
अर्थात प्रत्येक भेटवस्तू त्या गोष्टी देणार्या व्यक्तीची ओळख सांगते. त्यामुळेच कुणीही कुठल्याही भेटीचा अनादर न करता त्या व्यक्तीच्या आनंदाचा स्वीकार करीत भेटींचा मजा भेटवस्तूंमधून मनमुराद लुटावा.
समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१
या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?
Copyright © 2025 | Marathisrushti