(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३६

    महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
    शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
    शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖

    भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
    आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,

    महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
    शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
    गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
    त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
    शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
    शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.

    हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
    आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • आत्मा हरवलेली पत्रकारिता !

    आत्मा हरवलेली पत्रकारिता !

    सोपान बोंगाणे 
    दै. पुण्यनगरी, पत्रकार

    मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.

  • शिक्षणाचं वाटोळं, online झालंय

    शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
    गेटचाच उडालाय रंग आणि -
    गंजून कराकरा वाजायला लागलय ,
    सताड उघडून पडणच संपलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    वॉचमनकाकांच्या दंडुक्याला, न उरलय काम,
    पोरं नाही मस्ती नाही, न नोकरीत राम.
    दटावणं रागावणं संपूनच गेलंय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    जिन्याला-मैदानाला पोरांची आस,
    अंगाखांद्यावर खेळवणं हाच त्यांचा ध्यास.
    एकटेपणाचं दुःख नेमकं, आता उमगलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    प्रयोग-वाचन नाही, बुकं कडीकुलपात बसलीयत,
    काचेच्या कपाटातून , दाटीवाटीने घुसलीयत.
    त्या सांगाड्यालाही जिणं, असह्य होऊन गेलंय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    शाळा भरणं, तास संपणं आता नाही काही,
    मधली सुट्टी, शाळा सुटली घणघणतच नाही.
    शिपाईदादाशी घंटेचं नातंच हरवून गेलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    पन्नास बाकं आम्ही, पडलोय आपले धूळ खात,
    सकाळ होताच आशेने, दाराकडे असतो पहात.
    दफ्तरं नाही, मुलं नाहीत जगायचं कसं?झालंय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    गृहपाठ-खोड्या, मस्ती आणि शिकवणी ,
    तिमाही-सहामाही, परीक्षा अन तपासणी .
    समोरासमोर शिकवण्याचं समाधानच सरलय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    आमचा विचार सांगतो, कुणीच करेना झालंय,
    शाळा नाही, मित्र नाही कंटाळवाणं खूप होतंय
    घरात बसून मन मात्र, अगदी कोंडून गेलंय ,
    कारण आमच्या शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    wfh सांभाळत यांचं online पहायचं ,
    कधी?कधी? हे सुरळीत, सांगा सगळं व्हायचं ?
    मुलांच्या आयुष्याचं तुम्ही, काय करायचं ठरवलंय?
    'परिक्षेशिवाय पास' हे त्यांनाही आवडू लागलंय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    कारण शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
    प्रासादिक म्हणे
    -- प्रसाद कुळकर्णी.
  • सुर्य नमस्कार का घालायचे ?

    आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.--

    आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस

    फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

    सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

    1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले

    ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

    नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

    फक्त केले पाहिजे रे !!?

    अरविंद जोशी B.Sc.
    ९४२१९४८८९४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग नऊ

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्त म्हणजे जाणकार.
    ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे.
    प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, तेल लावल्यावर बाहेरचा वारा लागू न देण्यासाठी त्यांना मऊ कपड्यात गुंडाळून ठेवणे, डोक्यावरची ताळु भरण्यासाठी ब्रह्ररंध्राच्या दिशेत चारही बाजूने तेल लावणे, वर कापसाचे वा विड्याचे पान ठेवून त्यावर टोपरे बांधणे इ. सर्व गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. पण आज या सर्व गोष्टी कालबाह्य, अंधश्रद्धा म्हणून उपेक्षित झाल्या आहेत.

    त्यातल्या त्यात एक बरे आहे," हे असले नको ते उद्योग अजिबात करू नका" म्हणून सांगणाऱ्या भारतातील पाश्चात्य शिक्षणाने प्रभावीत झालेल्या तज्ञ डाॅक्टर मंडळींना त्यांच्या लहानपणी हे सर्व ( नको उद्योग ) केले होते, त्या आप्त आया आणि बाया अजूनही पुरावा म्हणून हयात आहेत.

    लहान मुलांच्या अंगाला तेल लावणे ही एक कला आहे. हे शिक्षण जगातले सोडूनच द्या, भारतात देखील अजूनही कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात दिले जात नाही. हे ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे या ज्ञानाने समृद्ध असलेल्या आप्तांची संख्या सुदैवाने चांगली आहे.

    जसे, आता उत्तम गुणांच्या, मूळ भारतीय बियांणाचे वाण संपत आलेले आहे, तसे या भारतीय परंपराचे ज्ञान जपून शिल्लक ठेवण्यासाठी या आप्त मंडळींची आवश्यकता आहे. ही मंडळी कदाचित निरक्षर अंगठेबहाद्दर असतील, कदाचित सही सुद्धा करता येत नसेल, त्यांना कदाचित आपण करत असलेल्या कृतीमागील शास्त्र काय आहे, हे शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत सांगता येणार नाही. पण त्यांच्या राकट हातातील ही हळुवार कला जपणे आणि जोपासणे, त्याला संरक्षित करणे, संवर्धीत करणे हे भावी सुदृढ बलवान भारताला आवश्यक आहे.

    आरोग्याशी संबंधित असलेल्या या अशा प्रत्येक गोष्टीमागे दडलेले शास्त्र, वैज्ञानिक दृष्टीने समाजासमोर आणणे आणि पुनर्स्थापित करणे ही काळाची गरज आहे.

    ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.....
    ......संपूर्ण भारत निरोगी होण्यासाठी, आप्त बनत चाललेल्या वैद्य म्हणवून घेणाऱ्या, अंगी सुप्त गुण असलेल्या गुणवान वैद्यांची देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०४.०८.२०१७

  • अर्थ’ संकल्प 

    १ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे. अर्थाचे काय ? भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो. दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो. काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे एकापेक्षा जास्त अर्थ लावता येतात ….

  • रंगीत कपडे सावलीत वाळत घालायला का सांगतात?

    रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात.

  • प्लास्टिकचा इतिहास भाग-२

    १९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये ॲलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअॅसिटलचा आणि १९५७ साली पॉलिकार्बोनेटचा उदय झाला.

  • पुष्करमुल

    ह्याचे ०.३३-२ मीटर उंचीचे क्षुप असते.पाने ३-६ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंदीचे मुलीय पत्र असते.पत्रवृन्त पाना इतकेच लांब असते.काण्डीयपत्र आयताकार असून काण्डास वाढणारे असते.फुल पिवळे ०.५-१ सेंमी व्यासाचे गुच्छ असते.फळ ०.४ सेंमी लांब व चमकदार व स्निग्ध असते.फळाला चिकटलेले बहिर्दल ०.७५सेंमी लांब व तांबुस रंगाचे असते.

    ह्याचे उपयुक्तांग मुळ असून पुष्करमुल चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के,स्निग्ध व तीक्ष्ण आहे.पुष्करमुळ वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याची औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)पुष्करमुला मध्ये असणारे तीक्ष्ण व विशिष्ट सुगंधी तेल जंतुघ्न कार्य करत असल्याने त्याचा वापर जखमांमध्ये करतात.

    २)पुष्करमल शोथनाशक व वेदनास्थापक आहे म्हणून सुज येणाऱ्या व वेदनायुक्त अवयवांवर ह्याचा लेप करतात.

    ३)पुष्करमुलाचे मुख्य कार्य प्राणवहस्त्रोतसावर होते ते कफाचे विल्यन करते तसेच जंतुघ्न व कफदुर्गंधीनाशक कार्य करते.म्हणून खोकला,दमा व उचकीमध्ये उपयुक्त आहे.

    ४)पुष्कर मुळ तापामध्ये स्वेदजनन व आमाचे पाचन करून ताप बरा करते.

    ५)पुष्करमुल शरीरातील क्लेदाचे घामावाटे उत्सर्जन करते व त्यामुळे त्वचारोगामध्ये स्त्राव व खाज कमी करते.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • अमेरिकेतील छोटी गावे – भाग ६

    छोट्या गावांमधे, पशुसंवर्धन हा बर्‍याच कुटुंबांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मुलं जन्मापासूनच गायींच्या, वासरांच्या, डुकरांच्या, शेळ्यामेंढ्यांच्या आसपास वावरत असतात. दोन तीन वर्षांची मुलं, आई-वडिलांबरोबर घरच्या फार्मवर जाऊन छोट्या छोट्या साधनांनी लुडबुड करत काम करायचा प्रयत्न करतात. दुसरी तिसरीपासूनच ही मुलं “4 H” सारख्या कार्यक्रमांमधे सहभागी होतात. पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली ती लहान वासरं, डुकरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या हाताळायला शिकतात. ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एखादं वासरू किंवा डुकराचं पिल्लू वाढवणं, त्याला साफसूफ करून त्याची निगराणी ठेवणं, त्याचे केस विशिष्ट प्रकारे कापणं, त्यांना ठरावीक पद्धतीने उभं रहायला किंवा चालायला शिकवणं, हे सारं करायला शिकतात. उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळ्या काउंटीजच्या जत्रांचे वेध लागायला लागतात. अशा जत्रांमधे 4 H कार्यक्रमाअंतर्गत ही मुलं आपली जनावरं दाखवण्याच्या स्पर्धांमधे मोठ्या उत्साहाने भाग घेतात. या जत्रा आणि स्पर्धा या कुटुंबांसाठी मोठ्या महत्वाच्या असतात. सारं कुटुंब जणू झपाटल्यासारखं होऊन जातं. अशा स्पर्धांमधे बक्षीस मिळवणं म्हणजे मोठंच मानाचं असतं. त्यातून काउंटी किंवा विभागीय स्पर्धांतून पुढे जाऊन राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधे जायला मिळणं म्हणजे जणू स्वर्गालाच हात टेकणं.

    एप्रिल, मे महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली की खेळांची मैदानं ओसंडून वाहायला लागतात. थंडीच्या सहा महिन्यांत घरा दारात बंदिस्त होऊन पडलेली मुलं, माणसं बाहेर मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशाचं उबदार सुख अनुभवायला आसुसलेली असतात. छोट्या गावांमधे करमणुकीला फारसा वाव नसल्यामुळे सायकली चालवणे हा एक लहान मुलांचा आवडीचा विरंगुळा असतो. तरूणांमधे त्याचंच रूपांतर मोटार सायकली चालवण्यात होतं. गावातल्या एकुलत्या एक मध्यवर्ती रस्त्यावर, मोठ्ठ्याने आवाज करत मोटार सायकली चालवत, हे तरूण समवयस्कांमधे रमून जाण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी त्याच त्या मध्यवर्ती रस्त्यावर मोटारींची परेड काढून शेवटी एखाद्या कट्ट्यावर बसून गप्पांचा अड्डा जमवला जातो. याच सुमारास (जून जुलैपासून) गावातल्या रस्त्याच्या कडेला आसपासचे शेतकरी आपल्या बागेतली फुलं किंवा शेतातले टोमॅटो, कणसं, किंवा इतर ताजा भाजीपाला घेऊन आपल्या पिक-अप ट्रक्स लावून विकायला बसतात.

    मिडवेस्ट आणि त्याच्याही पश्चिमेकडच्या काही राज्यांतली काही छोटी गावं तर एवढ्या दूर दूर अंतरावर आहेत की कल्पना करणं अवघड व्हावं. कामानिमित्ताने नेब्रास्का, साऊथ डकोटा, नॉर्थ डकोटाच्या काही भागांमधे फिरलो तेंव्हा याची प्रचिती आली. या राज्यातल्या काही भागांमधे, जिथे रॅंचेस (प्रचंड मोठाली चराऊ कुरणे) आहेत तिथे मानवी वस्तीच्या खाणाखुणा धुसर होत जातात. अशा ठिकाणच्या काही रस्त्यांवर ३०-४० मैल अंतरांपर्यंत मधे वस्ती लागत नाही. या प्रदेशामधे फिरताना गाडीचा पेट्रोल टॅंक अर्धा जरी भरलेला असला तरी जेंव्हा गॅस स्टेशन दिसेल तेंव्हा पेट्रोल भरून टाकणे हेच शहाणपणाचं ठरतं. अशा ठिकाणी गाडीतलं पेट्रोल संपणं म्हणजे काय दिव्य असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अशा ठिकाणी रस्त्यावरच्या रोड साइन्स वगैरे काही नसतात. फक्त लाकडी फळकुटं खांबांवर ठोकून त्यावर अमुक रॅंच तमक्या दिशेला आहे एवढंच लिहिलेलं असतं. काही रॅंचेसवर मी गेलोय ते चक्क १५-२०,००० एकरांचे होते. अशा रॅंचवर गेलं की जिकडे बघावं तिकडे नुसतं अफाट माळरान. मधे झाडी, पाणवठे वगैरे सारं काही. रस्त्याचं नाव नाही. रॅंचेसवरच्या माहितगार माणसाबरोबर त्यांच्या गाडीनं गेलं तर ठीक नाहीतर २०,००० एकर जमिनीवर ३००० गायींचा ठावठिकाणा लागायलाच मुळी मुश्किल ! या अशा रॅंचेसवर गायींना पाणी पिण्यासाठी चक्क मोठ मोठाले तलाव केलेले असतात. या प्रचंड मोठ्या रॅंचेसवर या गायी रानोमाळ भटकत, चरत असतात आणि वन्य श्वापदांसारख्या, तहानेच्या वेळेला या पाणवठ्यांवर येत असतात. अशा मोठ्या रॅंचेसवर गायींच्या बरोबरीने इतर वन्य प्राणी देखील आश्रय घेऊन असतात. बर्‍याचदा हरणांचे कळप दृष्टीस पडतात तर काही पाणवठ्यांच्या आश्रयाने बदकं आणि गीजचे थवे गुजराण करताना आढळतात.

    रॅंचवरच्या फार्महाऊसवर बहुदा पुरुष मंडळीच वास्तव्य करून असतात. त्यामुळे ह्या फार्महाउसेसमधे, त्यांच्या गॅरेजेसमधे, अस्सल पुरुषी अस्ताव्यस्तपणा ठायी ठायी विखुरलेला असतो. बीयरचे कॅन्स आणि बंदुका इतस्तत: पडलेल्या असतात. चिखलाचे बूट, मळलेले कपडे इतस्तत: भिरकाऊन दिल्या ठिकाणी पडलेले असतात.बर्‍याच रॅंचेसपासून शाळा खूप दूर असल्यामुळे अनेक रॅंचर्स जवळपासच्या बर्‍यापैकी मोठ्या गावात देखील एखादं घर बाळगून असतात. बहुदा बायका आणि मुलं अशा गावातल्या घरी रहातात. मुलं आठवडाभर शाळेत जाऊन शनिवार-रविवारी रॅंचवर ये जा करतात. अशा निर्जन ठिकाणी वैद्यकीय सोयी मिळणं देखील दुरापास्त. वेळ पडलीच तर आसपासच्या (६० ते १०० मैलांवरच्या) ठिकाणाहून एखादं हेलीकॉप्टर मागवावं लागतं. इथे तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णाला हेलीकॉप्टरमधून जवळच्या हॉस्पिटलमधे नेणं ही सामान्य बाब आहे.

    आमच्या कंपनीचे पशुवैद्यकीय आणि इतर कर्मचारी गायींमधे भृण प्रत्यारोपण (embryo transfer) करण्याच्या निमित्ताने अशा दुर्गम भागातील रॅंचेसवर बरेचदा जातात. अनेकदा अशा ठिकाणी मोटारीने जाणं म्हणजे फारच जिकीरीचं काम असतं. अशा वेळी छोट्या विमानातून (पायलट आणि दोन किंवा तीन जण दाटीवाटीनं बसतील अशा) जाणं येणं फारच सोईस्कर ठरतं. इथे बहुतेक छोट्या गावांमधे अगदी छोटेसे विमानतळ असतात. अर्थात त्यावर केवळ पिकांवर औषधांची फवारणी करणारी विमानंच उतरू शकतात. अशा विमानांतून या शेता-माळरानांच्या अफाट हिरव्या समुद्रावरून एक ठिपका होऊन उडणं हा मोठा रोमांचक अनुभव असतो.

    -- डॉ. संजीव चौबळ