वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
१२ मिनिटात २८८ योगासने.
सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.
सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.
एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.
३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट
३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:
वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.
वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.
इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.
सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?
सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ
सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता
‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.
जागतिक आर्थिक महासत्तेची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वेळप्रसंगी एकाधिकारशाहीच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध झिडकारण्यातही ते मागे-पुढे पाहणार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत बँकेच्या मूळ भांडवलापासून ते आकस्मिक निधीपर्यंत जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी आता पाहायला मिळणार आहे.
भारताचा माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या मैदानास ध्यानचंद स्टेडियम असे नाव देण्यात आले. ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हॉकी प्रमाणेच क्रिकेट सामन्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र गीतांच्या मालिकेतील हे आणखी एक गीत.
उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे.
उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना तृष्णा भागवण्यासाठी मोहर्ली येथील आठ पाणवठ्यांवर सौर पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे कृत्रिम झरे आता उन्हाळ्यात नैसर्गिक झऱ्यात पाणी साठवण्याचे काम करीत आहेत. यामुळे प्राण्यांना पाणी पिण्याची जागाही बदलण्याची गरज नाही, असे दृश्य आता दिसून येत आहे. यासर्व प्रयोगामुळे 50 चौरस किलोमीटर भागातील प्राण्यांची तृष्णा भागवण्यात व या प्राण्यांना उन्हापासून होणारा त्रास वाचविण्यास मदत होत आहे.
2010 पासून धनंजय बापट यांच्या पुढाकाराने मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला. पहिल्या तीन वर्षात टँकरच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर वन विभागासोबत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. चौथ्या वर्षी सहकारी मित्र डॉ. विवेक भोरे जे स्वत: मेकॅनिकल इंजीनियर व सौर ऊर्जा या विषयात डॉक्टरेट आहेत. त्यांनी अत्यंत कमी क्षमतेचा परंतु सूर्योदय ते सूर्यास्त असा पूर्ण वेळ चालणारा बॅटरी विरहीत पंप तयार करून याच क्षेत्रातील हातपंप असलेल्या कूपनलिका सोबतच हा पंप टाकून एक अभिनव प्रयोगाची सुरूवात केली. त्यामुळे मागील वर्षीपासून हाच उपक्रम अनेक सुधारणांसह सुरू करण्यात आला आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पानवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत. डॉ. भोरे यांनी तयार केलेले पंप ‘वॉटर ईज लाईफ’ या गटातर्फे स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहेत व त्याची दररोज देखभाल सुद्धा या गटातर्फे करण्यात येत आहे. यावर्षी या आठ सौर पाणपोई मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 188, आगरझरी कुटी कक्ष क्र. 169, फेटराबोडी कक्ष क्र. 167 चा तलाव, कालापाणी कक्ष क्र. 175 चा देवाडा तलाव 170, जुनोना कुटी कक्ष क्र. 154 अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.
या सर्व कामासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर, श्रीधर बालपाणे, संजय घोडवे, विठ्ठल लेडांगे, वन विभागाचे वनरक्षक हिंगणकर आदीचे मार्गदर्शन व मदत सतत लाभत असून वनरक्षक या सर्व उपक्रमांची देखरेख करीत आहेत. तलाव क्षेत्रात 100 फूट खोल कूपनलिका तयार करून अत्यंत कमी दरात म्हणजेच फक्त 40 हजार रूपयात ताजे, स्वच्छ पाणीपुरवठा करणारा पंप बसवून प्राण्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात वनविभागात स्वीकृत करून राबवण्यात आला तर स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शासनाची कोट्यवधींची बचत होईल. कारण यासर्व उपक्रमाला जवळपास 4 लाख इतका खर्च येतो. मात्र येथे फक्त 40 हजार रूपयांच्या खर्चात हे काम असून याला मनुष्यबळाची गरज नाही. सोबतच या पाणपोईमुळे प्राण्यांची पिण्याची जागाही बदलणार नाही, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. ही पाणपोई प्राण्यासांठी उन्हाळ्यात वरदान ठरली आहे असेच म्हणावे लागणार.
आज मी तुम्हाला अशा एका कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की ज्याच्या नावापासूनंच नशिबाने त्याची थट्टा मांडली , पण जो पुढे जाऊन एक असा अद्वितीय कलाकार बनला की ज्याच्या नावाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उभा रहाण्याची कल्पनाच करवत नाहि! चला तर मग या हकीकतीकडे…..
“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.
लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti