वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अशा त्या मंत्राच्या द्वारे योगी लोक त्या भगवान गणेशांच्या वैभवाचे गायन करतात. अर्थात अत्यंत आनंदाने त्या मोरयाला आळवत राहतात.
उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .
हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..
हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच धान्यापासुन मद्य बनविण्याच्या कारखान्यांना परवानगी दिली, यातील बरेचसे कारखाने विदर्भात असुन त्यांची यंत्रसामुग्रीही तयार आहे , फक्त शासनाच्या परवानगीचाच काय तो उशिर होता , असेही समजले. आता यावर बर्याच लोकाना आक्षेप होता . शेतकर्यांच्या आत्महत्या जास्त असणार्या विदर्भात हे कारखाने कशाला ? असे काहींचे म्हणणे होते , तर गरिबी जास्त असताना धान्याचा उपयोग लोकाना खाण्यासाठी करण्याऐवजी मद्यासाठी कशाला ? असाही एक मतप्रवाह होता . काही लोकांनी शासनाला पत्रे लिहिली , काहींनी उपोषणाचा मार्ग अवलंबला , पण शासन आपल्या निर्णयापासुन तसुभरही ढळले नाही , विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही याबाबतीत सरकारला साथच दिली , आणि कारखाने चालु होण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता हा निर्णय शासनाने काही तडकाफडकी घेतला नव्हता . बर्याच विचारविनिमयानंतर आधी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला . समितिने या विषयावर काम करुन गोपनीय अहवाल शासनाला सादर करावा , असे आदेश देण्यात आले . या समितीने सहा महिने अथक प्रयत्नांनी अहवाल तयार केला , आणि शासनाला सादर केला. या गोपनीय अहवालाच्या शिफारशीनुसारच हा निर्णय घेण्यात आला. हा गोपनीय अहवाल नुकताच फुटला आणि आमच्या हाती लागला . ( सर्व गोपनीय अहवालच का फुटतात , या विषयावर अहवाल तयार करण्याचे काम शासनाची एक समिती करीत आहे . तो अहवाल मात्र अद्यापपर्यंत फुटलेला नाही. ) आम्ही तो वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत .
अहवाल
धान्यापासुन मद्यनिर्मिती महाराष्ट्रात शक्य आहे काय ? या विषयावर विविध विषयातील तज्ञ मंडळींनी सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी हा अहवाल तयार केला असुन त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत .
कुठल्याही प्रकारच्या कारखान्यासाठी प्रमुख चार गोष्टींची आवश्यकता असते. कारखान्यासाठी जागा , कच्या मालाची उपलब्धता , मनुष्यबळ , आणि विक्रीसाठी बाजारपेठ . यातील प्रत्येक गोष्टीचा ही समिती सांगोपांग विचार करुन अहवाल सादर करीत आहे.
१ . महाराष्ट्रात भरपुर प्रमाणात जमीन आहे . सिंचनाचा अभाव असल्याने बरीचशी जमीन कोरडवाहु आहे . पावसाच्या अनियमिततेमुळे पिके अनिश्चित आहेत. त्यात बराचसा शेतकरी हा कर्जाच्या विळख्यात बुडालेला आहे , आणि त्याच्या बर्याच जमिनी या गहाण पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतजमीन ताब्यात घेणे सहज शक्य असुन कारखान्याला जागा सहज मिळेल , असे म्हणता येइल .
२. क्रुषिमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार आपल्याकडे अन्नधान्याचा अतिरिक्त साठा ( सरप्लस ) शिल्लक आहे . हा अतिरिक्त साठा उपलब्ध असला तरी अन्नधान्याच्या किंमती सामान्य लोकांच्या अवाक्याबाहेर गेलेल्या आहेत . त्यामुळे हे धान्य त्यांना विकत घेणे शक्य नाही . हा साठा पडुन रहाण्यापेक्षा मद्यनिर्मितीसाठी वापरता येणे शक्य आहे.
३. शेतीची अवस्था बिकट झाल्यामुळे बरेचसे शेतकरी मजुरी करतात . त्यात परराज्यातुन येणार्या लोंढ्यांमुळे राज्याच्या लोकसंख्येत वाढच होत आहे . हे सर्व मनुष्यबळ अशिक्षित असल्याने स्वस्त आहे , आणि मद्यनिर्मितीच्या कारखान्यात वापरता येण्याजोगे आहे . अनायासे बेरोजगारीवरही तोडगा निघेल .
४. शेवटची आणि महत्वाची आवश्यकता म्हणजे , उपलब्ध बाजारपेठ . आता यासाठी थोडा विचार करावा लागेल. आपल्याकडे कित्येक कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्याकडे धान्य पिकवण्यासाठी शेतजमीन नाही,. धान्य महाग झाल्यामुळे ते विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत , १०० रु किलो दाळ घेण्यापेक्षा ५ रुपयांचा देशी दारुचा कट्टा त्यांना परवडतो, त्यामुळे त्यांना मद्य विकणे सोपे आहे. अशी जनता आपल्याकडे कोटींमधे असल्याने ही बाजारपेठ खुप मोठी आहे .
महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात खुप पुढे होते. हळुहळु बरीच राज्ये आपल्या पुढे निघुन गेली. आपण मात्र जिथल्या तिथे राहिलो. मात्र हळुहळु दरवर्षी अशा शेकडो कारखान्यांना परवानगी दिली तर कारखान्यांची संख्या आपल्याकडे खुप वाढेल , आणि औद्योगिकरणात आपसुकच आपले पाउल पुढे पडेल . त्यामुळे धान्यापासुन मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना शासनाने परवानगी द्यावी , आणि असे कारखाने महाराष्ट्रात अधिकाधिक कसे वाढतील हे बघावे , अशा शिफारशी ही समिती शासनाला करीत आहे.
आम्ही पक्के म(द्य)हाराष्ट्रवादी असल्याने ” मेड इन महाराष्ट्र ” अशा मद्याची चव कधी चाखायला मिळते याची अत्यंत मनापासुन वाट बघत आहोत .
-- निखिल नारायण मुदगलकर
आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.
ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.
ह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.
ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.
साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.
ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.
काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते .
१ ) Duffy Antigen Negativity
२ ) Sickle Cell Trait
१ ) Duffy Antigen :
मनुष्याच्या रक्तातील तांबड्या रक्तपेशींमध्ये ABO रक्तगट प्रणाली असते . तसेच Duffy Antigen ही दुसरी एक प्रणाली सुद्धा असते . नेहमी करण्यात येणाऱ्या रक्तगटाच्या तपासणीत या दुसऱ्या प्रणालीला विचारात घेतले जात नाही . कारण त्याचा दर्जा हा दुय्यम स्वरूपाचा असतो . परंतु Duffy Antigen Receptor for Chemokines ( DARC ) ही तांबड्या रक्तपेशींवरील प्रथिने रक्तपेशींच्या आत शिरण्याकरिता परोपजीवींसाठी दिशा दाखविणारी असतात . त्या प्रथिनाच्या मार्गदर्शनामुळे मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींमध्ये सहजपणे आत शिरतात .
साधारणपणे जगातील बहुसंख्य लोकांच्या तांबड्या रक्तपेशीत हे प्रथिन असते . त्या लोकांना Duffy Positive असे म्हणतात , आणि ह्या कारणामुळेच मलेरियाचे परोपजीवी जास्तीत जास्त लोकांमध्ये सहजतेने प्रवेश करतात .
परंतु मानवी जनुकात जर जन्मत : काही बदल झाले तर अशा व्यक्तींमध्ये Duffy Antigen ( प्रतिजन ) तयार होत नाही . अशा अल्पसंख्य व्यक्तींना Duffy Negative असे संबोधिले जाते अनुभवावरून असे लक्षात आले आहे की याठिकाणी मार्गदर्शक प्रथिनाचा अभाव असल्यामुळे जी व्यक्ती Duffy Negative असते तिच्या रक्तपेशीत Plasmodium Vivax हे मलेरियाचे परोपजीवी शिरूच शकत नाहीत . त्यामुळे अशा लोकांना P. Vivax Resistant म्हणतात.
काही अफ्रिकेतील जमातींमध्ये Duffy Negative लोकांचे प्रमाण जास्त आहे . त्यांच्यात P. Vivax होत नाही . या शोधामुळे P. Vivax कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींत पसरला जातो यावर प्रकाश पडला आहे . P. Vivax वरील प्रथिने व Duffy Antigen प्रथिन यांचे संगनमत कोणत्या पद्धतीने होते याच्या अभ्यासातून लस बनविण्याची दिशा मिळू शकेल .
२ ) Sickle Cell Haemoglobin Trait : ( Hb As )
काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मत : जनुकांच्या एका जोडीमध्ये जर दोष असेल तर Sickle Cell Anaemia हा तांबड्या रक्तपेशींमधील रचनात्मक दोष निर्माण होतो . यामध्ये तांबड्या रक्तपेशी विळ्याच्या आकारासारख्या दिसतात . त्यामध्ये Haemoglobin चे प्रमाण कमी असते परंतु जर जनुकाच्या त्या जोडीमधील फक्त एकामध्येच जन्मत : दोष असेल तर तांबड्या रक्तपेशीत रचनात्मक दोष अंशत : च येतो . अशा व्यक्तींना Sickle Cell Trait Carrier म्हणतात . जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये पुरुष व स्त्री दोघेही Carrier असतील तर तेथे मात्र त्यांच्या मुलांमध्ये Sickle Cell Anaemia हा दोष आढळतो . असे पाहण्यात आले आहे की Sickle Cell Trait ( carrier ) असलेल्या व्यक्तींमध्ये Plasmodium Falciparum चे परोपजीवी तग धरु शकत नाहीत . त्यामुळे त्या लोकांना Falciparum पासून मलेरिया होत नाही .
परंतु ज्या लोकांमध्ये Sickle Cell Anaemia असतो त्यांना Falciparum पासून कोणतेही संरक्षण मिळत नाही . Sickle Cell Anaemia व Sickle Cell trait या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती अफ्रिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतात . महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली भागातील आदिवासींमध्ये Sickle Cell Anaemia व Trait चे लोक आढळून आले आहेत .
एकदा मलेरिया झाल्यानंतर त्याच्याविरूद्ध शरीरात तयार होणारी प्रतिबंधकारक शक्ती कायम स्वरूपाची राहत नाही . ( Permanent Immunity ) त्यामुळे एकदा मलेरिया होऊन पूर्णपणे रुग्ण बरा झाला म्हणजे त्याला आता पुन्हा परत कधी मलेरिया होणारच नाही अशी खात्री नसते याउलट बऱ्याच संसर्गजन्य रोगांबाबत असे आढळते की एकदा होऊन गेलेला आजार परत उद्भवतच नाही . अर्थात याला क्वचित अपवादही असू शकतात .
मलेरियाच्या परोपजीवांच्या अनेक अवस्था ( Stages ) असल्याने व त्या प्रत्येक स्थितीमधील प्रतिजने ( Antigen ) वेगवेगळी असल्याने अनेक प्रकारची प्रतिजने रक्तात फिरत असतात . तसेच P. Vivax आणि P. Falciparum या दोनही प्रकारच्या परोपजीवांमधील प्रतिजन क्षमता वेगवेगळी असते . याखेरीज निरनिराळ्या भौगोलिक विभागात असणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांतील प्रतिजनांत असणारा फरक अशा दुहेरी कारणांमुळे त्यांच्या विरुद्ध तयार होणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) रोगप्रतिबंधाला कार्यक्षम ठरत नाहीत . वारंवार वापरल्या गेलेल्या मलेरिया विरुद्धच्या औषधामुळे परोपजीवांच्या जनुकात आता बदल होत आहेत . ( Genetic Mutation ) त्यामुळे प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यावर मर्यादा पडत आहे व त्याचबरोबर हे परोपजीवी नेहमी वापरात असलेल्या औषधांना दाद देत नाहीत . ( Drug Resistant Strains ) या परोपजीवांच्या वाढीचे प्रमाण जबरदस्त असल्याने एका रुग्णातून दुसऱ्या निरोगी व्यक्तीत ते सहजरित्या पसरतात .
कही वेळा मात्र एखाद्या रुग्णास वारंवर एकाच तऱ्हेच्या परोपजीवांमुळे मलेरिया झाला तर काही महिन्यांनंतर त्यांच्यात प्रतिबंधकारक शक्तीची पातळी चांगली वाढते . परिणामी त्यांच्या रक्तात पुन्हा परोपजीवी आढळले तरी त्यांच्यात तापाचे प्रमाण फारच कमी असते . व या तापाबरोबर येणारी दुसरी काहीही लक्षणे दिसत नाहीत . थोडक्यात त्यांच्या शरीरात त्याच पध्दतीच्या ( Type ) परोपजीवांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते . उदाहरणार्थ - वारंवार P.Vivax होण्याने त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते परंतु तरीही P. Falciparum विरुद्ध ही क्षमता उपयोगास येत नाही . थोडक्यात अभयत्व एकाच गटाविरुद्ध मिळते .
माणसात होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांना फक्त मानवाचाच घरोबा आवडतो . ते दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात तग धरूच शकत नाहीत . त्यामुळे माणसातून माणसाकडे असा त्या परोपजीवांचा प्रवास विनासायास अखंडपणे चालू राहतो व त्यातही लहान मुलांच्या शरीरात मोठ्यांपेक्षा हे परोपजीवी अधिक काळ ठाण मांडून बसत असल्याने मुलांमध्ये मलेरियाचा रोग जास्त रेंगाळतो .
जगप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट याचे भारतात जवळजवळ ६० वर्षे वास्तव्य होते . उत्तर भारतातील बऱ्याच जंगलात पायी फिरत त्याने जंगलांचा सखोल अभ्यास व अनेक प्राणी पक्षांच्या शिकारीही केल्या होत्या . या काळात निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे त्याच्या हाताची स्थिरता कमी झाली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीटपणे सावजावर रोखण्यात त्याला अडचण येत असे . परंतु हळूहळू त्यावर जिम कार्बेटने मात केली होती . डासांचा प्रताप अशा या जगन्मान्य मोठ्या नावाजलेल्या शिकाऱ्यासही भोगावा लागला होता . तो लिहितो , " बऱ्याच जंगलातल्या निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे माझ्या हाताची स्थिरता गेली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीट रोखण्यात काही वेळा अडचण येत असे पण हळूहळू मी त्यावर मात केली होती " . - जिम कार्बेट - जंगल लोअर काळ १९४०
केस नंबर ५
श्री . श्रीपाद कुळकर्णी वय वर्षे ८२ , उत्तम तब्येत , मोठा असा कोणताही आजार गेल्या चाळीस वर्षांत त्यांना झालेला नव्हता . गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ १५ दिवस अजिबात भूक लागत नव्हती . थकवा बराच आला होता , परंतु अंगात ताप नव्हता . थोडीसुद्धा कणकण जाणवत नव्हती . सहज म्हणून केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासणीत हिमोग्लोबिन फक्त 4.5gm % व P.Vivax चे परोपजीवी सापडले . कोणतीही मलेरियाची लक्षणे नव्हती . असे असूनही मलेरिया विरुद्धच्या औषधांचा पूर्ण कोर्स व त्यासोबत ताकद येण्यासाठी दिली जाणारी इन्जेक्शने दिल्यावर १५ दिवसात तब्येत पूर्ववत झाली . श्रीपादरावांच्या शरीराचे अभयत्व चांगले असावे ज्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसली नाहीत , परंतु त्यांच्या बाबतीत अॅनेमिया मुळे रोगाचे निदान झाले.
--डॉ. अविनाश वैद्य
सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात....
आपण मुख्यमंत्री झालात हाच आपला पहीला गुन्हा. आपण साखरसम्राट नसताना असं धाडस केलंच कसं? साखरसम्राट होऊन नको त्या कारणानी टनामागे शेतकर्याचं शोषण केलं नाही हा आपला दुसरा गुन्हा
गबर बागाईतदार शेतकरी वर्षानुवर्षे जिराईतदार शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे भान्डवल करून त्यांच्या टाळुवरचं लोणी खात आहेत.हे आपण ओळखले हाही गुन्हाच!शेतकर्यांना कर्ज माफ करण्याच्या नावाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सहकारी बँका आपलं उखळ पांढरे करुन घेतात हे आपल्या चाणक्ष नजरेतुन सुटले नाही हा काय लहानसा गुन्हा आहे?
शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा या साठी तात्कालिक उपाययोजने ऐवजी दिर्घकालिन उपाययोजना अवलंबल्या हा काय गुन्हा नाही?सर्व सवलती आँनलाईन करून भुरट्या गबर शेतकऱ्यांना पायबंद घातला हाही गुन्हाच.
साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार्या मार्केट कमीटी आणि दलालाची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न करता हा गुन्हा कसा खपुन घ्यायचा?
तुमच्या कार्यकाळात बाजार भाव कमी मिळाले ही बाब टाळता आली असती तर बरे झाले असते ,हे खरे असले तरीही कांदा घाटात फेकला आणि टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला तेव्हा ज्यांचे राज्य होते अन धरणात लघुशंका करणारे गादीवर विराजमान होते .त्यांचे काय ? हा प्रश्न विचारायचा नसतो.त्यांना सोडाहो त्यांना सगळं माफ आहे.
तुम्ही मात्र विक्रमी तुर खरेदीचाही गुन्हा करता वर घोटाळा करणार्या व्यापार्यांवर कारवाई करता! हे काही बरे नाही.
तुमचा अपघात झाला ,आम्हाला बरे वाटले .तुमच्या मरणावर टपलोच होतो. दुसरा असता तर अपघाताने हबकुन गेला असता .तुम्ही मात्र लगेच कामाला लागलात. याला काय अर्थ आहे?अजूनही एकही घोटाळा केला नाही ,हा गुन्हाच.
तुम्ही ५ वर्षे राहीलात तर गरीब शेतकर्याचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवाल ही भिती वाटते .या गुन्ह्याला शिक्षा हवीच साहेब, असे अनेक गुन्हे करीत रहा हीच विनंती
-- संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम . लेखकाचे नाव मला माहित नाही.
अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी – पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. आज आपण असाच आपल्यआजीच्या बटव्यातल पूर्वापार चालत आलेली बाळगुटी का देतात त्यात कोणत्या औषधींचा समावेश असतो त्याचे प्रमाण आणि द्यायची पद्धत ह्याबाबत माहिती मिळवणार आहोत.
Copyright © 2025 | Marathisrushti