(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुखकर हवाई प्रवास

    जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो.

  • मी येतोय… ५ सप्टेंबरला !!

    विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.

    च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.

    सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.

    या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.

    या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?

    पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.

    या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.

    यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.

    आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.

    स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.

    दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?

    माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.

    तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.

    -- विजय लिमये
    (9326040204)

  • आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी

    भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल

  • लसूण खाण्याचे फायदे

    सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते.

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ९

    चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरीचन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
    मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ ९॥

    चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि अनल म्हणजे अग्नी. सामान्य जगातील या तीन तेजस्वी गोष्टी. त्यामुळे स्वाभाविकच कोणत्याही तेजस्वी गोष्टीला उपमा द्यायची तर यांचीच द्यावी लागते.

    पण त्यातही मर्यादा आहे. चंद्राला कलंक आणि क्षय आहे तर सूर्य आणि अग्नीला दाहकता.

    त्यासाठी आचार्य तिन्हीचा एकत्र विचार करतात. सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता एकत्र. पण तरी ते कमी पडते. त्यामुळे कोटी कोटी अर्थात या तिघांच्या एकत्रित तेजाचा अगणित पट आई तेजस्वी आहे. हे तिघेही कोटी-कोटी रूपात एकत्र आले तर जे तेज प्रकट होईल त्याप्रमाणे असणारी.

    चन्द्रांशुबिम्बाधरी- चंद्राप्रमाणे जिचे मुख अत्यंत सुंदर आहे अशी. दुसरा अर्थ म्हणजे जिने चंद्राची कोर आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशी.

    चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी- चंद्र सूर्य आणि अग्नीच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारी कुंडले कानात धारण करणारी.

    चन्द्रार्कवर्णेश्वरी - जिचा वर्ण अर्थात त्वचेचा रंग चंद्र सूर्याप्रमाणे उज्ज्वल आहे अशी.

    मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी- जिने आपल्या चार हातात माला, पुस्तक, पाश म्हणजे दोरी आणि अंकुश धारण केले आहेत अशी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरी ची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • चंद्र !

    ….. वसुंधरेला मात्र चंद्र एकच असतो !

  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४४

    भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.

  • अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग २

    कंट्री म्युझिक म्हणजे अनेक लोकप्रिय संगीत प्रकारांची खिचडी आहे. त्याचा उगम अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत आणि अ‍ॅपलाचियन पर्वतराजीच्या

    आसपासच्या भागात आढळतो. त्याचं मूळ शोधूं गेलं तर, पूर्वापार चालत आलेलं लोकसंगीत, खास आयरीश ढंगाचं सेल्टिक संगीत, चर्चेसमधून पिढ्यान

    पिढ्या चालत आलेलं भावपूर्ण भक्ती संगीत, अशा विविध ठिकाणी सापडतं. साधारणपणे १९२० च्या सुमारास कंट्री म्युझिकचा उगम व्हायला लागला.

    सुरवातीला त्याला Hilly billy music म्हणजे गांवढळ लोकांचं संगीत अशी उपाधी होती. परंतु जस जशी या संगीताची लोकप्रियता वाढूं लागली,

    तसतसे हे हेटाळणीवाचक नाव मागे पडून, कंट्री म्युझिक अशा सन्मानजन्य नावानं ते ओळखलं जाऊ लागलं.

    आणखी मागे जाऊन बघितलं तर असं दिसतं की, गेल्या ३०० वर्षांत अमेरिकेत येणार्‍या निर्वासित लोकांनी, आपल्याबरोबर येताना आपापल्या देशांच्या

    रूढी, परंपरा, संस्कृती, भाषांबरोबर आपल्या लोककला, वाद्यं आणि संगीत देखील आणलं. आयरीश फीडल, जर्मन डलसीमर, इटॅलियन मेंडोलिन, स्पॅनिश

    गिटार ही मुख्यत: युरोपची देणगी. त्यात आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांबरोबर आलेलं त्यांचे संगीत आणि बॅंजो हे मुख्य वाद्य. अ‍ॅपलॅचियन

    पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागात, हे वेगवेगळ्या देशातून आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक जसजसे आपलं बस्तान बसवू लागले तसतशी त्यांच्यात

    संगीताची देवाणघेवाण सुरू झाली. १९ व्या शतकात बरेचसे युरोपियन्स दक्षिणेकडे जाऊन टेक्सासमधे स्थिरस्थावर होऊ लागले. तिकडे आधीपासून

    असलेल्या स्पॅनिश, मेक्सिकन तसेच तिथल्या स्थानिक रेड इंडियन जमातींशी त्यांचा संबंध यायला लागला; आणि संगीत हा पुनश्च वेगवेगळ्या

    ठिकाणांहून आलेल्या नाना देशीच्या लोकांना जोडणारा धागा ठरला. त्यामुळे टेक्सासमधे देखील अनोखं असं मिश्र संगीत उदयाला येऊ लागलं. तिथे

    जाऊन वसलेल्या जर्मन आणि झेक लोकांनी आपल्या मायदेशांतल्या परंपरेला जागून मोठमोठी नृत्यगृहं बांधली. त्या ठिकाणी शेतकरी आणि

    आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र येऊन नाच गाण्याचा, संगीताचा आनंद उपभोगू लागले.

    १९२२ सालापासून कंट्री म्युझिकच्या रेकॉर्डस्‌ बाजारात येऊ लागल्या. त्यात जुनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली घरगुती गाणी, चर्चेस मधील कवनं

    आणि लोकसंगीताचा बाज असलेली गाणी होती. त्याचबरोबर विविध देशांतून येऊन अ‍ॅपलॅचियन पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागाला आता आपलं घर

    समजणार्‍या या लोकांनी रचलेली, आपल्या या नवीन घराची ओळख करून देणारी आणि इथल्या नवीन चालीरीती रिवाजांचं वर्णन करणारी देखील

    गाणी होती.
    १९३० च्या सुमारास आलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या लाटेमुळे गाण्यांच्या रेकॉर्डसच्या खपावर परिणाम झाला. गाण्यांच्या रेकॉर्डस्‌ विकण्याऐवजी,

    रेडीओवरून गाणी प्रसारित करणं स्वस्त आणि सोईस्कर होतं. देशभरची रेडीओ स्टेशन्स, कंट्री म्युझिक वाजवून वाजवून अधिक लोकप्रिय करू लागली.

    याच सुमारास हॉलिवूडमधे वेस्टर्न चित्रपटांचा जमाना सुरू झाला होता. वैराण, ओसाड माळरानावरून किंवा भयचकित करणार्‍या डोंगरदर्‍यांमधून तुफान

    घोडदौड करणारे, सुसाट वेगाने घोड्यावर बसून गावात शिरून गोळीबार करणारे, अन्यायाशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून, आपल्या रुबाबदार

    आणि मर्दानी व्यक्तिमत्वाची छाप पाडणारे काऊबॉइज, सिनेमाचा पडदा ओलांडून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले होते. त्यांच्या रगेल आणि रंगेल

    व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणून काऊबॉय संगीत देखील लोकप्रिय होत होतं. या पडद्यावरच्या काऊबॉईजनी कंट्री म्युझिकला एक वेगळीच गहिरी छटा

    आणली.

    टेक्सासमधल्या गोर्‍या कष्टकरी लोकांमधे दुसर्‍या महायुद्धानंतर हॉंकी टॉंक (Honky Tonk) म्हणून एक संगीत प्रकार उदयाला आला. हा संगीत

    प्रकार म्हणजे देखील इकडूनच्या तिकडूनच्या संगीताची मिळून झालेली कडबोळीच होती. त्याला काही शास्त्रीय बैठक वगैरे नव्हती. परंतु सामान्य

    कष्टकर्‍याला फारसा विचार न करता, अर्थ किंवा आशय शोधायच्या भानगडीत न पडता, सहज साधं समजेल आणि माना डोलावयाला लागेल, असं मात्र

    ते होतं.

    -- डॉ. संजीव चौबळ

  • काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

    काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

    बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्‍यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे.

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ८-अ/११

    • विवेक शिरवळकर यांच्या प्रतिसादाबद्दल :
    • शिरवळकर यांनी राजोपाध्ये यांच्या कांहीं मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आपण त्यांची चर्चा आधी केलेलीच आहे. पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं.
    • संस्कृतमधील बरेंच ज्ञान काळाच्या उदरात लुप्त झालें’ (इति शिरवळकर) –

    लुप्त झालें, हें खरें आहे. पण, संस्कृत शिकण्यास बंधनें होती, म्हणून तिच्यातील ज्ञान लुप्त झाले, असें शिरवळकर म्हणतात, तें योग्य नाहीं.

    • एक तर, पुरातन काळीं ताडपत्र, भूर्जीपत्र, अशा साधनांवर लिहीत, जी खूप काळ टिकूं शकत नसत. ‘रफ’ हँडमेड कागदाचें निर्माण व्हायला लागल्यानंतरही, हा कागद सहजपणें सर्वांना उपलब्ध होत नसे. त्यातून, तोही किती टिकणार ? अशा कारणांमुळे, कांहीं साहित्य नष्ट झालें.
    • नालंदा व तक्षशीला येथील पुरातन लायबर्‍या आक्रमकांनी नष्ट केल्या. आधीच, हातानें लिहिलेल्या अशा, विविध ग्रंथांच्या प्रती कितीशा असणार ? ग्रंथालयातील प्रत नष्ट झाल्यावर शिल्लक रहाणार किती व कुठे ? कौटल्याचें (कौटिल्य) अर्थशास्त्र असेंच लुप्त झालें होतें, त्याची प्रत दक्षिण भारतात आधुनिक काळात सापडली.
    • असें भारतातच नाहीं तर इतरत्रही झालेलें आहे. इजिप्तमधील अलेक्झँड्रियाच्या लायब्ररीचेंही तेंच झालें ; तिच्यातील पुरातन ग्रंथ एकदा नव्हे तर दोनदा नष्ट केले गेले ; एकदा रोमन सम्राटानें ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर, व दुसर्‍यांदा मुस्लिम आक्रमणानंतर. तिथें पॅपायरसवर लिहीत.
    • इ.स. च्या beginning च्या थोडें आधी-नंतरच्या यहुदी (ज्यू) लोकांच्या कांही पंथांचे (जसें की Essenee यांचे) लिखाण , तसेंच, ख्रिश्चन धर्म नवीन असतांनाच्या काळातील ग्रंथांचेंही, असेंच झालेलें आहे. ‘डेड सी स्क्रोल्स’ व ‘नाग हमादी’ येथें असेच, त्या काळातील पपायरसवरील लिखाण गेल्या कांहीं दशकांमध्येंच सापडलें आहे.
    • सिंधु-सरस्वती ( हडप्पीय ) संस्कृतीची लिपी अजून उलगडली नाहीं ; त्यामुळे तिची भाषा कोणती, हेंही अजून सांगतां येत नाहीं. मात्र, ती संस्कृती नष्ट झाली (किंवा विखुरली) , व तिची लिपी लुप्त झाली, याची कारणें natural disasters शी संल्लग्न आहेत ; ती शिकण्याचा अधिकार कोणाला होता-नव्हता, यामुळे नाहीं. प्राकृत भाषासमूहातील पैशाची अशीच लुप्त आलेली आहे, तिच्यातील एकमेव known ग्रंथ कथासरित्सागर लुप्त आहे, पण त्याचें संस्कृत भाषांतर उपलब्ध आहे.
    • या सर्व उदाहरणांमुळे शिरवळकर यांचा हा मुद्दा निकालात निघतो.
    • संस्कृतच्या व्याकरणाची क्लिष्टता व दुर्बोधता , हा तिचा दोष ( इति शिरवळकर) –

    सकृतदर्शनीं ह मुद्द योग्य वाटतो. म्हणून त्याची चर्चा व्हायला हवी. ही भाषिक बाब आहे ; म्हणून आपण तिकडे त्या दृष्टिकोनातून पहायला हवें.

    • शिरवळकर शब्दरूपांबद्दल बोलतात. इथें एक गोष्ट ध्यानात घेणें आवश्यक आहे, ती ही की, वैदिक संस्कृतमध्ये असलेली रूपें नंतरच्या काळात वापरली जात नसत, पण व्याकरणात ती ठेवणें आवश्यक होतें , कारण वेदोध्ययन तर होणारच होतें. उदा. ‘अहम्’ ( म्हणजे ‘मी’ ) याची द्वितियेची रूपें घ्या. ती अशी आहेत : ‘ मह्यम् – मे ; अवाभ्याम्- नौ ; अस्मभ्यम् – न:’ , यापैकी ‘मे-नौ-न:’ ही आर्ष-संस्कृतमधील रूपें आहेत ; ती जर व्याकणातून काढून टाकली, तर मग, ( उदाहरणार्थ ) , ‘सहनाववतु, सहनौभुनक्तु’ या सुप्रसिद्ध ऋचेचा ( श्लोकाचा) अर्थ कळणारच नाहीं. असेंच इतर कांहीं ऋचांचेंही होईल. (ज्याला हें शिकायचें नाहीं, त्यानें त्या रूपांकडे लक्ष देऊं नये ; पण त्यासाठी व्याकरणच बदलण्याची काय गरज ? जें, कांहीं कारणानें आवश्यक ठरतें, तें तर ठेवायलाच हवें. )
    • आपण ‘ळ’ बद्दल आधीच लिहिलें आहे. आर्ष-संस्कृत-अध्ययनासाठी व संथेसाठी ‘ळ’ आवश्यक आहे.
    • लॅटिनचें व्याकरण मी थोडेंफार वाचलेलें आहे. तेंहीं कांहीं सोपें नाहीं. त्यात व संस्कृतमध्ये साम्य आहे. (त्यामुळेच तर, १९व्या शतकात ‘इंडो-युरोपियन भाषासमूहा’बद्दलचा सिद्धांत मांडला गेला).तरीही, लॅटिन ही १९व्या शतकापर्यंत युरोपची ज्ञानभाषा होती.
    • लॅटिनचें जाऊं द्या. जर्मन तर चांगली जिवंत भाषा आहे ना ? मी थोडीफार जर्मन शिकलेलो आहे. तिच्यातही basically याच प्रकारची रचना आहे. पण ती जर्मनीबाहेरच्यांना ‘क्लिष्ट’ वाटली तरी, ती भाषा जर्मनीची राष्ट्रभाषा आहेच ना ?
    • मी वाचलेलें आहे की, स्कँडिनेव्हियन (नॉर्वे व स्वीडन यांच्या) व ‘फिनिश’ (फिनलंडची) भाषा फारच क्लिष्ट आहेत, त्या युरोपियनांनाही शिकायला कठीण जातात. म्हणून काय त्या-त्या देशवासीयांनी त्या भाषांना सोडून दिलें ?
    • एका डच-भाषीय युरोपियनाला मी एकदा म्हणालो ,‘तुमची भाषा शिकायला कठीण आहे असें म्हणतात. तो (ज़रा विनोदानें) म्हणाला, ‘अजिबात नाहीं, आमच्या इथें लहान मुलेंही सहज ही भाषा बोलतात’. वर-वर हा विनोद असला तरी, आपल्यासाठी यात एक महत्वाचा message आहे !
    • बाकीच्या भाषांचें जाऊं द्या. तुम्ही कधी हिंदी-भाषकांना मराठीबद्दल विचारलें आहे काय ? ते म्हणतात, तुमची मराठी फारच कठीण बुवा ! ‘च’ कधी म्हणायचें , ‘च़’ कधी, तें कळतच नाहीं ; आपल्या ‘च़’ , ‘ळ’ या उच्चारांना ते फार घाबरतात. हिंदीत दोनच लिंगें (genders) आहेत, मराठीत तीन. त्यातूनही, कुठल्या शब्दाचें कोणतें लिंग , याला मराठीत विशिष्ट नियम नाहींत. त्यामुळे ते लोक हमखास मराठीत चुका करतात.
    • कन्नडमध्ये सर्व निर्जीव वस्तूंना नपुंसकलिंग वापरलें जातें. ( जसें की, बहुतांशी, इंग्रजी व फारसीमध्येही ). खरें तर ही जास्त चांगली पद्धत आहे, पण मराठीत तसें नाहीं. आपली ‘खुर्ची’ स्त्रीलिंगी आहे, तर ‘टेबल’ नपुंसकलिंगी , आणि ‘पंखा’ पुल्लिंगी. त्यामुळे मराठी बोलतांना कन्नडभाषियांची पंचाईत होते. ‘तें खुर्ची ठेवलं’ , ‘ तें पंखा लावलं’ असेंच ते बोलतात.
    • मराठी भाषेतील लिंगांविषयी इतिहासाचार्य (व भाषाशास्त्रज्ञ असलेले) वि.का.राजवाडे यांनी काय लिहिलें आहे तें पहा - ‘ प्रत्येक शब्दाची प्रथम जात ठरवून, व त्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी बनवून , नंतर त्याच्याशी विभक्तीचा व्यवहार करावयाचा, असा मराठीचा कायदा आहे ’.

    मग, परभाषियांना मराठीतील लिंगें कठीण वाटली नाहींत तरच नवल.

    • तमिळ भाषा आपल्यालाही कठीणच वाटतें. तिच्यात ‘ळ’ चे तीन उच्चार आहेत. त्यांच्या लिपीमध्ये, प्रत्येक वर्गात ( उदा, ‘क’ वर्ग, ‘प’ वर्ग) मधली अक्षरें नाहींत (जसें ख,ग). ही भाषा किती पुरातन आहे, हें सांगतात, व त्यात कांहीं तथ्यही आहे. (याबद्दल मी तमिळभाषियांशी थोडीफार चर्चाही केलेली आहे). पण काठिण्याचें काय ?
    • चिनी व जपानी लिपी घ्या. ही चित्रलिपी आहे, ती वाचणें आपल्यासारख्याला महाकर्मकठीण ! त्यांचे उच्चारही कळत नाहींत. अहो, त्यांचे इंग्रजी उच्चारही कळायला कठीण जातात. पण त्या भाषा आपल्याला कठीण वाटल्या तरी, चांगल्या जिवंत आहेत, व ती राष्ट्रेंही आजच्या घडीला जगातील महत्वाची राष्ट्रें आहेत.
    • क्रियापदांचें म्हणाल तर, अधिक क्रियापदें असणें, हें भाषेला अधिक flexible बनवतें. इंग्रजीत अनेक क्रियापदें आहेत, नामापासून क्रियापद बनवता येतें, व क्रियापदापासून नाम. उलट, त्यामुळे इंग्रजी भाषा अधिक समृद्ध झालेली आहे. मराठीत त्या मानानें कमी क्रियापदें आहेत. बर्‍याच ठिकाणी, लावणें, घेणें, करणें, असा शब्दांचा वापर करून आपण जोड-क्रियापद बनवतो, उदा. दिवा लावणे, दार लावणें, घर लावणें, घड्याळ लावणें. इथें प्रत्येक ‘लावणें’ चा अर्थ वेगवेगळा आहे. (जिज्ञासूंनी अविनाश बिनीवाले यांचे ‘भाषा आपली सर्वांचीच’ हें उपयुक्त व interesting पुस्तक वाचावें).
    • मराठीत आपण, ‘म्हणणें’ व ‘सांगणें’ अशी क्रियापदें वापरतो. बिनीवाले यांनी त्यासाठी इंग्रजीतील, tell, describe, narrate, ask, advise, recommend, repeat, report, explain, remind, comment, अशा क्रियापदांची जंत्रीच दिली आहे. त्याशिवाय, communicate, emphasize, simpathise, emphathise, verbalise, mime, say, वगैरे संबंधित क्रियापदें मला सुचतात. इतके शब्द असल्यामुळेच इंग्रजीमधील एक्सप्रेशन अधिक clear, explicit होतें.
    • हिंदीतही पानी पीना, सिगरेट पीना असा वापर होतो.
    • बंगालीत ‘भात खाबो’ आणि, जल ( पाणी ) सुद्धा ‘खाबो’च.
    • स्वतंत्र्यवीर सावरकरांनी जोड-क्रियापदांऐवजी, नामांमधून नवी क्रियापदें (नामधातु) बनवली होती. जसें की, ‘उभा करणें’ च्या ऐवजी ‘उभवणे’, त्याचप्रमाणें मिठाळणें, साखराळणें, चुनवणें इत्यादी. (त्यांच्या बुद्धीला सलाम करावा तेवढा थोडाच ! ). हा भाषा-सुधार, खरें तर उपयुक्त होता. ती पद्धत अंगिकारली असती, तर मराठीत क्रियापदें वाढली असती, व जोड-क्रियापदांची जरूरही कमी झाली असती.
    • ‘रोमन_लिपी-आधारित’ सर्वच भाषांमध्ये एक मोठा दोष आहे, आणि तो म्हणजे, त्या उच्चारानुसारी नाहींत. त्यामुळें, त्यांचें स्पेलिंग पाठ करावें लागतें, आणि तरीही स्पेलिंगच्या चुका होतातच. (संस्कृतमध्ये पाठांतर करावें लागतें, असें म्हणणार्‍यांनी, याची नोंद घ्यावी). अमेरिकनांनी स्पेलिंग्ज सोपी केलेली आहेत खरी, पण तरीही भाषा तर इंग्रजीच आहे ना ! म्हणजे, कांहीं स्पेलिंग्ज सोपी झाली, याव्यतिरिक्त अमेरिकन-इंग्रजीत, मूळ इंग्रजीचे अन्य drawbacks आहेतच !
    • आणि तरीही, आज भारतात ज्ञानभाषा व संपर्क-भाषा इंग्रजीच आहे, एवढेंच नव्हे तर, कंप्यूटर व सॉफ्टवेअर यांच्यामुळे, आणि कॉमर्स म्हणजे व्यापारामध्येही ती वापरात असल्यामुळे, इंग्रजी सर्व जगात संपर्क-भाषा झालेली आहे.
    • त्यामुळे, संस्कृत भाषा कठीण आहे, तिच्यात क्रियापदें जास्त आहेत, हें argument उपयोगाचें नाहीं.
    • कुठलीही भाषा व शिकण्यासाठी, न वापरण्यासाठी , अनेक कारणें दाखवली जाऊं शकतात, तरीही, कठीण समजल्या भाषा तेथील लोक वापरतातच. इस्त्राइलनें तर हिब्रू ही ‘मृत’ भाषा ‘जिवंत’ केली.
    • खरें तर, मूळ मुद्दा वेगळाच आहे, शिक्षणाचा प्रचार-प्रसार आतां समाजात अॅक्रॉस-दि-बोर्ड झालेला आहे. त्यामुळे, सर्वांच्या सोयीसाठी मराठीचें सरलीकरण चाललेलें आहे. म्हणजे, हा मुद्दा राजकीय-सामाजिक आहे, भाषिक नाहीं.
    • *बरेच अनुस्वार तर मराठी लेखनातून गेलेच ; पण आतां र्‍हस्व-दीर्धांची काय जरूर, असा विचार पुढे आलेला आहे. (गुजरातीतही, अशीच, ‘र्‍हस्व-दीर्घ’ चर्चा चालूं आहे) . ‘प्रीतिबंध’च्या ऐवजी ‘प्रितिबंध’ योग्य कसें ? ‘वीरशैव’ च्या जागीं ‘विरशैव’ कां ?

    *इंग्रजी शब्दांचेबद्दलही असेंच आहे. ‘यूज’ ऐवजी ‘युज’ , ‘कूल’ ऐवजी ‘कुल’ कशाला ?

    • कोणी असेंही सुचवलें आहे की मराठीत ‘ऐ’ च्या जागीं ‘अइ’ असें लिहावें , व ‘औ’ च्या जागीं ‘अउ’ लिहावें. ही तर सरलीकरणाची हद्द झाली ! (उलट, असें विचारतां येईल की, एकऐवजी दोन अक्षरें कशाला लिहायची ? )
    • एक गोष्ट नमूद करायला हवी. सरलीकरणामुळे मराठीतून अनुस्वार हद्दपार केल्याचा एक परिणाम असा झालेला आहे की, लिखित शब्दांच्या उच्चारात चूक होऊं शकते. उदा. ‘गेलें’ --- याचें रूप झालें आहे, ‘गेलं’ --- त्याचं आतां लेखन झालं, ‘गेल’ असं ( अनुस्वारविरहित). याचा खरें तर उच्चार आहे, ‘गेलऽ’. पण नुसतें ‘गेल’ लिहिल्यानें तो ‘गेऽल’ (जोराचा वारा, किंवा एका क्रिकेटरचें नांव) असाही होऊं शकतो.

    *इंग्रजी ही उच्चारानुसारी भाषा नाहीं अशी टीका आपण करत असतो, पण मग मराठी कितपत उच्चारानुसारी रहाणार आहे ?

    *मराठी मातृभाषा असणार्‍यांना हिंदी उच्चार योग्य प्रकारें जमत नाहींत. उदा. ‘करते है

    (हैं ) , ‘जाते है ’ (हैं ) वगैरे.

    *नुक्ता नसलेल्या हिंदी शब्दांचा अयोग्य उच्चार, हा आणखी एक दोष .

    * बरें, हिंदी व इंग्रजी शब्दांच्या उच्चारांचें ज़रा बाजूला ठेवू. मराठी-भाषिकांनी मराठी बोलण्याचें काय ? तें शुद्ध नको कां ? ‘मला मदत कर’ याच्या ऐवजी ‘माझी मदत कर’ हें योग्य वाक्य आहे कां ? ‘हिंसाचार’ याचा योग्य मराठी उच्चार आहे, ‘हिम्.साचार’ ; त्याचा उच्चार ‘हिन्.साचार’ असा केला तर तें बरोबर आहे कां ? अशी अनेक उदाहरणें देतां येतील.

    *[ आणि, कुणी अशुद्ध उच्चारांचा-लेखनाचा मुद्दा मांडला तर, ‘so what’, आहेच ! ] .

    *अशा वातावरणात, नियमबद्ध संस्कृत कोणाला रुचणार आहे ?

    *पण, संस्कृत नियमबद्ध आहे म्हणूनच शतकानुशतकें न-बदलतां टिकूं शकली. ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू अशी की, आज आपण, ‘आपली मराठी भाषा, कठीण नको, सरल हवी, सोपी हवी’, असें म्हटल्यावर, तिचें विशुद्ध रूप कितपत टिकवूं शकणार आहोत ?

    • एकदा एका intelligent and mature अशा प्रसिद्ध लेखिका-दिग्दर्शिकेशी माझी कांहीं चर्चा झाली.

    मुद्धा होता आजच्या वापरातील भाषेची शुद्धता, टी.व्ही. वरील कार्यक्रमांची क्वालिटी , वगैरे वगैरे. तेव्हां त्या म्हणाल्या, ‘तुम्हां ३ टक्क्यांना विचारतो कोण ?’ ( त्या स्वत:ही त्या ३% मध्ये सामील आहेत, याची नोंद घ्यावी). मुद्दा सद्य परिस्थितीत बरोबरच आहे. आज शिक्षण समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचलें आहे. सर्वांनाच भाषिक शुद्धतेची काळजी करायला, खास करून आजच्या busy काळात, कितीसा वेळ आहे ? त्यांना भाषिक सरलीकरण आवश्यक वाटतें. ( प्रस्तुत लेखात नंतर वर्णन केलेली , ‘मॅस्लोची नीड् हायरार्की’ , हीसुद्धा या संदर्भात एक महत्वाची बाब आहे).

    *त्यामुळे, भाषा ‘शुद्ध’ ठेवण्याचे, सत्वशीला सावंत, अरुण टिकेकर, अविनाश बिनीवाले वगैरेंचे लिखाण व प्रयत्न, हें अरण्यारुदनच ठरतें.

    • भाषा तळापर्यंत, across-the-board जायची म्हणजे शुद्ध-अशुद्ध व्हायचेंच. तें चालवून घेणेंही ठीक आहे. त्याबद्दल तक्रार असूं नये. अडचण ती नाहीं. अडचण आहे तर, ती आहे, ‘प्रमाण-भाषा’ सोपी-सोपी करत जाण्याची. तें होऊं नये. ‘प्रमाण भाषा’ शुद्धच हवी. मग ती भाषा बोलणार्‍या लोकांनी बोलतां-लिहितांना चुका केल्या तरी ते एक वेठ स्वीकार्य असूं शकेल .
    • हें ज्याप्रमाणें आधुनिक प्रादेशिक भाषांना लागू आहे, तसेंच संस्कृतलाही लागू आहे. संस्कृत ही नियमबद्ध असल्यामुळे, ‘प्रमाण भाषा’च आहे. पण, आजच्या संदर्भात, जर कुणी अशुद्ध बोललें- लिहिलें, तर तें चालवून घेतां येईल. त्यासाठी या भाषेच्या काठिण्याची किंवा सरल-पणाची चर्चा कशाला ?
    • आपण भाषेचा एवढा बाऊ करतो, पण लहान बालकांना त्याचें कांहींच वाटत नाहीं. कारण तीं, चुकत-माकत शिकत जातात. कुणी त्यांच्या चुकांना हसत नाहीं, अन् , ‘कुणी हसेल’ अशी भीतीही त्यांच्या मनांत येत नाहीं. वयानें मोठी असलेली माणसें त्यांना सुधारत जातात, व बालक आपली भाषा सुधारत जातें.

    वयानें मोठ्यांचें असें होत नाहीं, म्हणूनच अडचणी निर्माण होतात. पण जर सर्वांनीच ---- बोलणार्‍या-लिहिणार्‍यांनी तसेंच इतरांनीही ---- समजूतदार दृष्टिकोन ठेवला तर ही अडचण दूर होऊं शकते. तसें जर संस्कृतच्या बाबतीत झालें तर, ‘भाषा कठीण आहे’, वगैरे प्रश्नच उठणार नाहींत.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com