(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लॉकडाऊनची दोन वर्षं

    कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.

      March 24, 2022


  • आता आम्ही जगावे तरी कसे?

    जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.

    तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.

    पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.

    आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)

    तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?

    असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय

    बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).

    आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?

    अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)

    असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?

    म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)

    आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?

    - आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी

      June 7, 2017


  • असिडिटीचा शत्रू शेवंती

    माझ्या फुलांचे संशोधनात शेवंती असिडिटी, पित्ताचा त्रास ह्यावर उपयोगी आहे असे आले.

    शेवंती कोणतीही चालते, पांढरी किंवा पिवळी. त्या फुलांना शेवंतीची वास आला पाहिजे हे महत्वाचे, कारण आजकाल शेवंतीच्या जवळपास दिसणारी पांढरी व पिवळी फुले मिळतात, परंतु त्यांना शेवंतीचा वास नसतो. शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्यांचे पाणी करावे, त्यामुळे आम्लपित्त,अँसिडिटी जाते. अगदी उत्तम गुण येतो. आज त्रास होतो म्हणून हे पाणी घेतले तर उद्या चमचमीत खाल्ले तरी त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे.

    एकदा तिखट खाल्याने पोटात खूपच जळजळ होत होती. शेवंती असिडिटी वर आहे म्हणून शेवंतीच्या फुलांचे पाकळ्यांचे पाणी प्यायलो, तीन तासात पोटातील जळजळ, आग थांबली. म्हणून पुन्हा एक डोस घेतला. बरे वाटले. ठरवले आता तिखट (स्पायसी )खाणे नाही. त्रास होतो. आणि दुसरे दिवशी नेमकी बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्राबरोबर बेडेकर ची मिसळ खावी लागली. खाताना मनात विचार आला मिसळ त्रास देणार आहे. पण शेवंती चे पाणी घेऊ, आणि मिसळ खाल्ली. घरी आल्यावर कामात शेवंतीचे पाणी घेणे विसरून गेलो. दुसरे दिवशी संध्याकाळी लक्षात आले अरे आपण शेवंतीचे पाणी घेतले नाही, पण त्रास पण झाला नाही.

    प्रयोगातून असे लक्षात आले कि पाण्याचा इफेक्ट ४-५ दिवस राहतो. एकदा पाणी पाकळ्यासकट घेतले तर त्याचा इफेक्ट जवळ जवळ दोन महिने राहिला. आता पाकळ्या सुकवून गोळ्या केल्या व पेशेंटना दिल्या, त्यांना चांगला फायदा झाला.

    माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास खूप व्हायचा, पित्त उलटून पडायचे (हा त्रास ४० वर्षे होता). तिला शेवंतीचे पाणी दिल्यामुळे तो कमी झाला.

    माझा "निर्माल्य औषध" हा लेख छापून आल्यावर बरेच जणांना मी शेवंतीच्या फुलांच्या पासून केलेली साखर दिली व त्यांना फायदा झाला काहींना साखरेने थोडासा गुण आला. त्यांना शेवंतीच्या पाकळ्या सुकवून केलेल्या गोळ्या दिल्यावर खूपच छान गुण आला.

    निसर्ग देवता किती दयाळू व माणसाची काळजी घेणारी आहे. अश्विन व कार्तिकात पित्त वाढते. त्या दिवसात भरपूर शेवंती येते. आमचे पूर्वजांना शेवंतीची हा उपयोग माहिती असावा म्हणून नवरात्र,लक्ष्मीपूजनाला शेवंती आवश्यक अशी प्रथा पाडली.

    जे देवाला ते माणसाला.

    शेवंतीचे माझ्या संशोधनात आलेले काही गुण खालील आजारावर लागू पडते .

    यकृत सूज, कोलायटिस, संडासला खडा, मधुमेह, गॅसेस अडकणे, दमा कोरडा, डोक्यात मुंग्या येणे, रेटिना, अर्धांगवायू, लठ्ठपणा वाढणे, उष्माघात, धनुर्वात, मूत्रपिण्ड काम न करणे, लघवीला आग,किडणी स्टोन.
    ह्या आजारांवर मी अजून वापरलेले नाही.
    ज्याना ते त्रास असतील त्यानी वापरून मला त्याचे अनुभव कळवावेत ही विनंती.

    -- अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

    शेवंतीच्या ह्या गुणधर्माना आयुर्वेदिक ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहिती नाही. माझे काम अनुभव घेणै व सांगणे हे आहे.

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

      April 25, 2017


  • पुस्तकांनी काय शिकवलं

    तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली. पुस्तकांच्या परंपरेचा हा आढावा घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी!

      June 14, 2026


  • कोणत्याही गोष्टीत पॅशन कसं अनुभवाल

    आपल्या संस्कृतीत एक मोठा गैरसमज आहे की पॅशन हे (Spontaneeu) च बसतं तुम्हाला तुमचं काम आवडतं किंवा आवडत नाही. तुम्हाला व्यायाम करायला आवडतो किंवा आवडत नाही. तुम्हाला पुस्तकं वाचणं आवडत किंवा कंटाळवाणं वाटतं. पॅशन ही गोष्ट निर्माण केली जाऊ शकत नाही.

      April 1, 2022


  • तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

    पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांतसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो ,जळजळ होण्याची समस्या कमी होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅढन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅणन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. या पाण्यातील अॅ न्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यायवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्याीवरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते. हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या अॅवन्टीऑक्सिडंट घटकांचा ,कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्याल शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने , संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 2, 2017


  • नारळीकर आणि मराठी विज्ञान परिषद

    डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी.

      November 22, 2021


  • होडी’ – विजनवासातील वल्हवणे !

    गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे.

      February 2, 2023


  • आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७५

    विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.

      December 7, 2016


  • श्री प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर

    प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे.

      July 13, 2025