वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो.
विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.
च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.
सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.
या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.
या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?
पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.
या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.
यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.
आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.
स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.
दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?
माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.
तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.
-- विजय लिमये
(9326040204)
भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल
सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते.
चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरीचन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ ९॥
चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि अनल म्हणजे अग्नी. सामान्य जगातील या तीन तेजस्वी गोष्टी. त्यामुळे स्वाभाविकच कोणत्याही तेजस्वी गोष्टीला उपमा द्यायची तर यांचीच द्यावी लागते.
पण त्यातही मर्यादा आहे. चंद्राला कलंक आणि क्षय आहे तर सूर्य आणि अग्नीला दाहकता.
त्यासाठी आचार्य तिन्हीचा एकत्र विचार करतात. सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता एकत्र. पण तरी ते कमी पडते. त्यामुळे कोटी कोटी अर्थात या तिघांच्या एकत्रित तेजाचा अगणित पट आई तेजस्वी आहे. हे तिघेही कोटी-कोटी रूपात एकत्र आले तर जे तेज प्रकट होईल त्याप्रमाणे असणारी.
चन्द्रांशुबिम्बाधरी- चंद्राप्रमाणे जिचे मुख अत्यंत सुंदर आहे अशी. दुसरा अर्थ म्हणजे जिने चंद्राची कोर आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशी.
चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी- चंद्र सूर्य आणि अग्नीच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारी कुंडले कानात धारण करणारी.
चन्द्रार्कवर्णेश्वरी - जिचा वर्ण अर्थात त्वचेचा रंग चंद्र सूर्याप्रमाणे उज्ज्वल आहे अशी.
मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी- जिने आपल्या चार हातात माला, पुस्तक, पाश म्हणजे दोरी आणि अंकुश धारण केले आहेत अशी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरी ची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
….. वसुंधरेला मात्र चंद्र एकच असतो !
भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.
कंट्री म्युझिक म्हणजे अनेक लोकप्रिय संगीत प्रकारांची खिचडी आहे. त्याचा उगम अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत आणि अॅपलाचियन पर्वतराजीच्या
आसपासच्या भागात आढळतो. त्याचं मूळ शोधूं गेलं तर, पूर्वापार चालत आलेलं लोकसंगीत, खास आयरीश ढंगाचं सेल्टिक संगीत, चर्चेसमधून पिढ्यान
पिढ्या चालत आलेलं भावपूर्ण भक्ती संगीत, अशा विविध ठिकाणी सापडतं. साधारणपणे १९२० च्या सुमारास कंट्री म्युझिकचा उगम व्हायला लागला.
सुरवातीला त्याला Hilly billy music म्हणजे गांवढळ लोकांचं संगीत अशी उपाधी होती. परंतु जस जशी या संगीताची लोकप्रियता वाढूं लागली,
तसतसे हे हेटाळणीवाचक नाव मागे पडून, कंट्री म्युझिक अशा सन्मानजन्य नावानं ते ओळखलं जाऊ लागलं.
आणखी मागे जाऊन बघितलं तर असं दिसतं की, गेल्या ३०० वर्षांत अमेरिकेत येणार्या निर्वासित लोकांनी, आपल्याबरोबर येताना आपापल्या देशांच्या
रूढी, परंपरा, संस्कृती, भाषांबरोबर आपल्या लोककला, वाद्यं आणि संगीत देखील आणलं. आयरीश फीडल, जर्मन डलसीमर, इटॅलियन मेंडोलिन, स्पॅनिश
गिटार ही मुख्यत: युरोपची देणगी. त्यात आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांबरोबर आलेलं त्यांचे संगीत आणि बॅंजो हे मुख्य वाद्य. अॅपलॅचियन
पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागात, हे वेगवेगळ्या देशातून आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक जसजसे आपलं बस्तान बसवू लागले तसतशी त्यांच्यात
संगीताची देवाणघेवाण सुरू झाली. १९ व्या शतकात बरेचसे युरोपियन्स दक्षिणेकडे जाऊन टेक्सासमधे स्थिरस्थावर होऊ लागले. तिकडे आधीपासून
असलेल्या स्पॅनिश, मेक्सिकन तसेच तिथल्या स्थानिक रेड इंडियन जमातींशी त्यांचा संबंध यायला लागला; आणि संगीत हा पुनश्च वेगवेगळ्या
ठिकाणांहून आलेल्या नाना देशीच्या लोकांना जोडणारा धागा ठरला. त्यामुळे टेक्सासमधे देखील अनोखं असं मिश्र संगीत उदयाला येऊ लागलं. तिथे
जाऊन वसलेल्या जर्मन आणि झेक लोकांनी आपल्या मायदेशांतल्या परंपरेला जागून मोठमोठी नृत्यगृहं बांधली. त्या ठिकाणी शेतकरी आणि
आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र येऊन नाच गाण्याचा, संगीताचा आनंद उपभोगू लागले.
१९२२ सालापासून कंट्री म्युझिकच्या रेकॉर्डस् बाजारात येऊ लागल्या. त्यात जुनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली घरगुती गाणी, चर्चेस मधील कवनं
आणि लोकसंगीताचा बाज असलेली गाणी होती. त्याचबरोबर विविध देशांतून येऊन अॅपलॅचियन पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागाला आता आपलं घर
समजणार्या या लोकांनी रचलेली, आपल्या या नवीन घराची ओळख करून देणारी आणि इथल्या नवीन चालीरीती रिवाजांचं वर्णन करणारी देखील
गाणी होती.
१९३० च्या सुमारास आलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या लाटेमुळे गाण्यांच्या रेकॉर्डसच्या खपावर परिणाम झाला. गाण्यांच्या रेकॉर्डस् विकण्याऐवजी,
रेडीओवरून गाणी प्रसारित करणं स्वस्त आणि सोईस्कर होतं. देशभरची रेडीओ स्टेशन्स, कंट्री म्युझिक वाजवून वाजवून अधिक लोकप्रिय करू लागली.
याच सुमारास हॉलिवूडमधे वेस्टर्न चित्रपटांचा जमाना सुरू झाला होता. वैराण, ओसाड माळरानावरून किंवा भयचकित करणार्या डोंगरदर्यांमधून तुफान
घोडदौड करणारे, सुसाट वेगाने घोड्यावर बसून गावात शिरून गोळीबार करणारे, अन्यायाशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून, आपल्या रुबाबदार
आणि मर्दानी व्यक्तिमत्वाची छाप पाडणारे काऊबॉइज, सिनेमाचा पडदा ओलांडून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले होते. त्यांच्या रगेल आणि रंगेल
व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणून काऊबॉय संगीत देखील लोकप्रिय होत होतं. या पडद्यावरच्या काऊबॉईजनी कंट्री म्युझिकला एक वेगळीच गहिरी छटा
आणली.
टेक्सासमधल्या गोर्या कष्टकरी लोकांमधे दुसर्या महायुद्धानंतर हॉंकी टॉंक (Honky Tonk) म्हणून एक संगीत प्रकार उदयाला आला. हा संगीत
प्रकार म्हणजे देखील इकडूनच्या तिकडूनच्या संगीताची मिळून झालेली कडबोळीच होती. त्याला काही शास्त्रीय बैठक वगैरे नव्हती. परंतु सामान्य
कष्टकर्याला फारसा विचार न करता, अर्थ किंवा आशय शोधायच्या भानगडीत न पडता, सहज साधं समजेल आणि माना डोलावयाला लागेल, असं मात्र
ते होतं.
-- डॉ. संजीव चौबळ
बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे.
लुप्त झालें, हें खरें आहे. पण, संस्कृत शिकण्यास बंधनें होती, म्हणून तिच्यातील ज्ञान लुप्त झाले, असें शिरवळकर म्हणतात, तें योग्य नाहीं.
सकृतदर्शनीं ह मुद्द योग्य वाटतो. म्हणून त्याची चर्चा व्हायला हवी. ही भाषिक बाब आहे ; म्हणून आपण तिकडे त्या दृष्टिकोनातून पहायला हवें.
मग, परभाषियांना मराठीतील लिंगें कठीण वाटली नाहींत तरच नवल.
*इंग्रजी शब्दांचेबद्दलही असेंच आहे. ‘यूज’ ऐवजी ‘युज’ , ‘कूल’ ऐवजी ‘कुल’ कशाला ?
*इंग्रजी ही उच्चारानुसारी भाषा नाहीं अशी टीका आपण करत असतो, पण मग मराठी कितपत उच्चारानुसारी रहाणार आहे ?
*मराठी मातृभाषा असणार्यांना हिंदी उच्चार योग्य प्रकारें जमत नाहींत. उदा. ‘करते है ’
(हैं ) , ‘जाते है ’ (हैं ) वगैरे.
*नुक्ता नसलेल्या हिंदी शब्दांचा अयोग्य उच्चार, हा आणखी एक दोष .
* बरें, हिंदी व इंग्रजी शब्दांच्या उच्चारांचें ज़रा बाजूला ठेवू. मराठी-भाषिकांनी मराठी बोलण्याचें काय ? तें शुद्ध नको कां ? ‘मला मदत कर’ याच्या ऐवजी ‘माझी मदत कर’ हें योग्य वाक्य आहे कां ? ‘हिंसाचार’ याचा योग्य मराठी उच्चार आहे, ‘हिम्.साचार’ ; त्याचा उच्चार ‘हिन्.साचार’ असा केला तर तें बरोबर आहे कां ? अशी अनेक उदाहरणें देतां येतील.
*[ आणि, कुणी अशुद्ध उच्चारांचा-लेखनाचा मुद्दा मांडला तर, ‘so what’, आहेच ! ] .
*अशा वातावरणात, नियमबद्ध संस्कृत कोणाला रुचणार आहे ?
*पण, संस्कृत नियमबद्ध आहे म्हणूनच शतकानुशतकें न-बदलतां टिकूं शकली. ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू अशी की, आज आपण, ‘आपली मराठी भाषा, कठीण नको, सरल हवी, सोपी हवी’, असें म्हटल्यावर, तिचें विशुद्ध रूप कितपत टिकवूं शकणार आहोत ?
मुद्धा होता आजच्या वापरातील भाषेची शुद्धता, टी.व्ही. वरील कार्यक्रमांची क्वालिटी , वगैरे वगैरे. तेव्हां त्या म्हणाल्या, ‘तुम्हां ३ टक्क्यांना विचारतो कोण ?’ ( त्या स्वत:ही त्या ३% मध्ये सामील आहेत, याची नोंद घ्यावी). मुद्दा सद्य परिस्थितीत बरोबरच आहे. आज शिक्षण समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचलें आहे. सर्वांनाच भाषिक शुद्धतेची काळजी करायला, खास करून आजच्या busy काळात, कितीसा वेळ आहे ? त्यांना भाषिक सरलीकरण आवश्यक वाटतें. ( प्रस्तुत लेखात नंतर वर्णन केलेली , ‘मॅस्लोची नीड् हायरार्की’ , हीसुद्धा या संदर्भात एक महत्वाची बाब आहे).
*त्यामुळे, भाषा ‘शुद्ध’ ठेवण्याचे, सत्वशीला सावंत, अरुण टिकेकर, अविनाश बिनीवाले वगैरेंचे लिखाण व प्रयत्न, हें अरण्यारुदनच ठरतें.
वयानें मोठ्यांचें असें होत नाहीं, म्हणूनच अडचणी निर्माण होतात. पण जर सर्वांनीच ---- बोलणार्या-लिहिणार्यांनी तसेंच इतरांनीही ---- समजूतदार दृष्टिकोन ठेवला तर ही अडचण दूर होऊं शकते. तसें जर संस्कृतच्या बाबतीत झालें तर, ‘भाषा कठीण आहे’, वगैरे प्रश्नच उठणार नाहींत.
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti