वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते.
कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।१।।
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते।।२।।
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।३।।
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते।।४।।
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते।।५।।
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिको परा।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते।।६।।
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते।।७।।
जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा।।८।।
तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम्।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्।।९।।
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्हणजे कमळ आणि “आलय” म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते.
सोशल मीडियावर रेंगाळत असताना दोन व्हिडीओ पाहण्यात आले . दोन छायाचित्रे पाहण्यात आली . आता यात अतर्क्य काय असं कुणालाही वाटेल . रोज शेकडो व्हिडीओ आणि हजारो छायाचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ असतात . त्यापैकी हे व्हिडीओ , छायाचित्रे असतील असं वाटत असेल तर ते तसं नाही .
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.
सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.
रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.
शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.
जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.
सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं - झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!
जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.
ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti