वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे.
November 17, 2015
आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
March 20, 2022
जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस.
युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री मा. संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.
सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 23, 2017
आपल्या तोडीचंच किंवा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारं फ्रेंड सर्कल असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे ह्यासारखं दुर्भाग्य नाही.
समोरासमोर नसतानासुद्धा गप्पा मारताना टाईप केलेल्या वाक्यांमधून हवा तो अर्थ पटकन पटकन समजून, त्याचा अजून तिरका अर्थ काढून बोललेलं वाक्य तिसरीकडे नेऊन ठेवणे ह्यातली मजा अवर्णनीय आहे. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की, बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो.
"अरे तुझं वय काय, बोलतोयस काय?" हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅप्पी हार्मोन्स अबाधित ठेवतात,
एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं तेच खरे मित्र!
एकमेकांच्या वरचढ कोटी करून विनोदाची हद्द गाठणे, हेच खरं जीवन! बाकी सब मोहमाया!!
June 8, 2017
शेन वॉर्न देखील कार्ल हूपरला खूप मानत असे कारण त्याचे फूटवर्क जबरदस्त होते . त्यावेळी त्याचे नाव टॉप १०० क्रिकेटपटूंमध्ये घेतले जायचे. शेन वॉर्न पुढे म्हणतो की १९९५ मध्ये त्याला चेंडू टाकताना मला जाणवत होते इतर खेळाडू फलंदाजीला आले की पोझिशन घेण्यासाठी खाली बघतो परंतु कार्ल हूपर मात्र सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूची समोर बघूनच वाट बघत असे.
December 16, 2021
१९६२ साली भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिज चे गोलंदाज त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करायचे आणि त्या दौऱ्यात देखील अपेक्षेप्रमाणे त्यांनी तेज गोलंदाजी केली. परिणामी बरेच भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यात त्यावेळचे भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील समावेश होता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यावेळी परदेशी असलेल्या या भारतीय खेळाडूला रक्ताची गरज होती तेव्हा वेस्ट इंडिज चा खेळाडू फ्रॅंक वोरेल सर्वात आधी रुग्नालयात पोहचवला आणि इतकेच न्हवे तर त्याने रक्तदान देखील केले होते.
March 14, 2022
सामान्यतः महत्वाचे सणाच्या दिवसांमध्ये बहुतांश लोक एवढे बिझी असतात की, त्यांना या सणामध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि तासंतास पार्लरमध्ये बसण्यासाठी वेळच मिळत नाही. तुमच्या समोरही हीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला झटपट चेहरा उजळवणारे काही निवडक नैसर्गिक उपाय सांगत आहोत.
1. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर १५ मिनिट लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर रक्तचंदनाचा लेपही लावा. या उपायाने चेहरा उजळ होण्यास मदत होईल.
2. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. पिकलेली स्ट्रॉबेरी मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. हे चेहऱ्यासाठी टॉनिकप्रमाणे काम करते. या उपायाने रंग गोरा होतो.
3. चेहर्याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहर्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ दिसेल.
4. अनेक प्रातांमध्ये लोक मधाचा वापर करून फेसपॅक तयार करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार बेसन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून तयार केलेला फेसपॅक प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो.
5. फेसपॅक तयार करण्यासाठी ३ चमचे बेसन पीठ, मध, दुधाची साय आणि ऑलिव्ह तेल १-१ चमचाभर मात्रेत घेऊन एकत्र करून घ्या. हे मिश्रण २० मिनिट चेहर्यावर लावून ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धवून घ्या.
6. दक्षिण भारतातील महिला रक्त चंदन नारळाच्या मलईमध्ये मिसळून चेहर्यावर लावतात. दक्षिण भारतीय या मिश्रणाला त्वचेसाठी खूप लाभदायक मानतात.
7. हिमाचल प्रदेशातील महिला चाहेर्यासाठी सफरचंदचा वापर करतात. यांच्या मतानुसार सफरचंद ज्यूस चेहर्यावर लावल्यास चेहर्यावरील काळे डाग दूर होतात. याच्या नियमित वापरणे चेहरा उजळतो.
8. दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे चेहर्यावर लावा. २० मिनिटांनी चेहर्यावरील हे मिश्रण ओल्या कापसाने स्वच्छ करून घ्या. या उपायाने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होईल.
9. कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही ठिंब टाका. हे मिश्रण चेहरावर लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.
10. चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चेह-यावर चमक येईल. किमान तासभर हा लेप चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चमकदार होईल.
तेलकट त्वचेकरीता उपाय
1 चमचा दही, 1 चमचा बेसन, चिमुटभर हळद व 2-4 थेंब लिंबाचा रस टाकून घट्ट लेप तयार करून शरीरावर लावा. या उपायाने त्वचा निरोगी राहील आणि उजळेल.
100 ग्रॅम हळकुंड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. हे उटणे थंडीपासून रक्षण करण्यासाठी आणि कांतीसाठी उपयुक्त आहे.
थोडेसे दही घेऊन त्यामध्ये ८-१० तुळस किंवा लिंबाच्या पानांची पावडर मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. या उपायाने वारंवार चेहऱ्यावर येणारे पुरळ, फोडं यापासून मुक्तता मिळेल.
एक चमचा गव्हाचे पीठ, तांदुळाची पेस्ट, ५-६ पुदिन्याचे पानं आणि ५ गुलाबाच्या पाकळ्या एकत्रितपणे कुटून एकजीव करा. या उपायाने त्वचा कोमल होईल.
रुक्ष त्वचेकरीता उपाय
थोडेसे तीळ दुधामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी यामध्ये चिमुटभर हळद टाकून बारीक कुटून पेस्ट तयार करा. हा लेप त्वचेवर लावल्यास त्वचा तजेलदार होईल.
२ बदाम आणि एक चमचे बेदाणे रात्री दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी पेस्ट करून चेहऱ्यावर लावा.
एक चमचा तांदुळाचे पीठ, 1 छोटा चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या उपायाने त्वचा मुलायम होईल.
एक चमचा उडदाची डाळ न तापवलेल्या दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून यामध्ये थोडेसे गुलाबपाणी टाकून चेहऱ्यावर लावा.
एक चमचा दही आणि 1 चमचा बेसन पिठामध्ये गुलाबपाणी मिसळून त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाईल.
केळ बारीक करून त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मिसळुन हे मिश्रण त्वचेवर लावल्यास टॅनिंगची समस्या दूर होईल.
सौजन्य
डाँ..घोसाळकर
7798617222
`आरोग्यदूत ७' या WhatsApp ग्रुपवरुन साभार
November 22, 2016
मराठी जनमाणसात मराठीचा जास्तीत जास्त वापर संगणकावर व्हावा या हेतूने वरील लेखाचे प्रयोजन केलेले आहे. त्यात इंस्क्रिप्ट कळफलक रचना व युनिकोड अक्षरवळणांचा वापर ही दोन तत्वे वापरण्याचा आग्रह केलेला आहे.
December 28, 2010
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.
May 23, 2022
युरो स्टार
युरो स्टार ही इंग्लिश खाडीच्या खालून जाणारी रेल्वे. युरोपला गेलं, की यातून जरूर प्रवास करायला हवा इतकी ही प्रख्यात आहे. इंग्लंड देशाची संस्कृती या इंग्लिश खाडीमुळे इतर युरोपियन देशांच्या संस्कृतीपेक्षा भिन्न राहिली. दुसऱ्या महायुद्धात याच खाडीमुळे इंग्लंड जर्मनीच्या हल्यातून वाचलं होतं. इंग्लंड व फ्रान्स या खाडीमुळेच आपलं वेगळेपण टिकवून होते. इंग्लिश खाडीखालील रेल्वेबोगद्यानं दोन्ही शहरं हाकेच्या अंतरावर आली. लंडन, पॅरीस व ब्रुसेल्समधील नागरिक इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम अशा देशांत कामाला जातात व रात्री आपापल्या देशात परत येतात. अमेरिकन सोसायटीने १९९४ मध्ये चॅनेल टनेल-ट्रेनला जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केले होते.
लंडन पॅरिस भुयारी रेलमार्ग निर्माण करण्याची पहिली योजना १८०२ मध्ये मांडली गेली होती; पण दोन्ही देशांतील राजकीय वातावरण एकमेकांबाबत सामंजस्याचे नसल्याने अशी योजना कधीच फलद्रूप होणार नाही असं दोन्ही देशांनी गृहीतच धरलं होतं.
दुसऱ्या महायुद्धात हिटलर असा बोगदा गुप्तपणे करतही असेल असं ब्रिटिश नागरिकांना वाटत होतं. किंबहुना, असा बोगदा असता तर हिटलरनं ब्रिटिश भूमीवर आपले भक्कम पाय रोवले असते. प्रत्यक्षात १९८२ सालानंतर 'चॅनेल टनेल'चा गंभीर विचार दोन्ही देशांनी केला आणि चक्रं वेगात फिरू लागली. १९८८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत १९९४ पर्यंत काम पूर्ण झालं. इंग्लंडमधील फोक्स्टोन केंट स्टेशन या शेवटच्या स्टेशनपासून बोगद्याची सुरुवात होते. समुद्राखालून ५० कि.मी. लांबीचा हा बोगदा फ्रान्समधील कॉक्वेल्स पास-दे-केलिस येथे संपतो. बोगद्यात जाण्या-येण्याचे दोन वेगवेगळे भाग असून, बाजूने सर्व्हिस टनेललाईन आपत्कालीन वेळी वापरण्याकरता ठेवलेली आहे.
समुद्रपातळीपासून २५० फूट खोलीवर बोगद्याची बांधणी असून, ३५ कि.मी. अंतरावर भर समुद्रात तो ५०० फूट खोलीवर जातो. समुद्रातील वादळं, भूकंप यांपासून कोणताही धोका पोहचणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. बोगदा बांधणीचं काम १० वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं होतं. बांधणी खर्चाच्या प्राथमिक अंदाजापेक्षा १४० टक्के जास्त खर्च झाला होता. हा खर्च एकूण ४,६५० मिलियन पाउंड्स म्हणजे आजच्या भावाने एकूण ११ बिलियन पाउंड्स होता. १५,००० कामगार व इंजिनीअर्स दोन्ही बाजूंनी काम पुढे नेत होते. शेवटच्या क्षणाला २ इंच व्यासाचं भोक पाडून एका इंग्लिश कामगाराने फ्रेंच कामागारांशी समारंभपूर्वक हस्तांदोलन केलं. हे काम पूर्ण होईपर्यंत १० कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता.
समुद्राखालून जाताना गाडीचा वेग ताशी १६० कि.मी. इतका असतो. सर्व सिग्नल यंत्रणा ड्रायव्हरला संगणकाच्या पडद्यावर दिसत असते. गाडीचा वेग प्रत्येक भागात ठरलेला आहे. त्या वेगात कमी-जास्त फरक झाल्यास गाडी ताबडतोब थांबविण्याची व्यवस्था आहे. या मार्गावर मालगाड्या, तसंच मोटारी आणि ट्रक्स घेऊन जाणाऱ्या जम्बो मालगाड्या धावत असतात. युरोस्टार गाडी लंडन ते पॅरीस हे ५८० कि.मी. अंतर २ तास १५ मिनिटांत, तर लंडन-ब्रुसेल्स ५१५ कि.मी. १ तास ५० मिनिटांत पूर्ण करते.
दुर्घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. तरी दोन वेळा अघटित घटनांशी सामना करावा लागला होता. १९९६ साली नोव्हेंबर महिन्यात मालगाडीतील एका लॉरीने अचानक पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ झाला व बोगद्यातील यंत्रणेचं बरंच नुकसान झालं होतं. डिसेंबर २००९ मध्ये प्रचंड हिमवर्षावामुळे एक युरोस्टार गाडी बोगद्यात अडकून पडली होती. असे अपवाद वगळता आतापर्यंत लक्षावधी प्रवाशांनी युरोस्टारने प्रवास केलेला असून, आता ही रेल्वे युरोपची जीवनरेषा बनलेली आहे.
-– डॉ. अविनाश वैद्य
October 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti