वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.
ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.
२)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.
३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.
४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.
५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.
अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो.
बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटाटा हा विषवत असतो म्हणून तो कधीच खाऊ नये.तसेच डायबेटिस असणा-यांनी,वजन कमी करायचे असल्यास हा खाऊ नये.बटाट्याच्या सालीत जीवनसत्व क असते त्यामुळे बटाटा हा सालीसकटच उकडावा.
बटाटा हा चवीला गोड,थंड व कफवात वाढविणारा व पित्तनाशक असतो.चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)बध्दकोष्ठाचा त्रास असल्यास शेगडीवर अथवा चुलीत बटाटा भाजावा व त्यावर सैंधव,काळेमीठ,जीरे,मिरी घालून खावा.
२)बटाटा भाजून जिरे,मिरी,सैंधव लावून खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी कमी होते.
३)लघ्वी कमी होणे,जळजळ होणे,पिवळी लघ्वी होणे ह्या बटाटा उकडून धणे,जीरे व सैंधव लावून खावा.
४)नवा बटाटा उकडून बाळंतीण बाईला दिल्यास अंगावरचे दुध वाढते.
बटाट अतिखाल्ल्यास वात विकार वाढतात व वजन वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात.
गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर,
लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस प्यायला दिला जातो.
जसे हे स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.गाजराचे रोप हे हातभर उंचीचे होते व गाजर हे जमीनी खाली वाढणारे कंद आहे.
गाजर हे चवीला गोड कडवट असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते पण पित्त मात्र वाढविते.
चला आता गाजराचे उपयोग पाहूयात:
१)इसब,गळवे,फोड ह्यात गाजर थोडे मीठ घालून पाणी न घालता वाफवून घ्यावा व त्याचा पोटीस बांधावा.
२)गाजराचे बी हे मासिक पाळी येण्या करिता ५ दिवस पाण्यात वाटून घ्यावे.
३)वारंवार भरपूर गढूळ लघ्वी होत असल्यास १ कप गाजराचा रस +१/२ चमचा जीरे +१चमचा धणे हे मिश्रण सकाळ संध्याकाळी उपाशी पोटी घ्यावे.
४)मधुमेहामुळे झालेली जखम नसेल व ती चिघळली असेल तर गाजराच्या रसाच्या घड्या
दिवसातून ४ वेळा जखमेवर ठेवाव्या.
५)कच्चे गाजर चावून खाल्ल्यास तोंडास रूची येते,जीभ साफ होते व हिरड्या देखील मजबूत होतात.
गाजर खायचा अतिरेक केल्यास पित्त वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता .
ह्याचा व्रुक्ष असतो.ह्याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो.चवीला कडू,तिखट,तुरट अशी मिश्र चव आणी थंड असा हा कढिपत्ता शरीरातील वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतो.
ह्याचा उपयोग देखील आपण घरगुती उपचारांमध्ये करू शकतो बरे का!अगदी डोळयांपासुन ह्रूदयाचा पर्यंत ब-याच अवयवांना हा हितकर आहे.चला मग पाहूयात ह्याचे औषधी उपयोग.
१)एॅसीडीटी मध्ये २ चमचे कढिपत्ता रस+१ चमचा लिंबु रस+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण चाटावे.
२)गजकर्ण,खरूज,इसब अशा त्वचा रोगात कढिपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी.
३)ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारण पणे १५-२० दिवस १ चमचा कढिपत्ता चटणी गुळात मिसळून पाण्यासोबत गिळावी.
४)मार लागणे,ठेचलागणे,मुरगळणे ह्यामुळे आलेल्या सुजेवर कढिपत्ता + हळद ह्याच्या पोटीसाने शेकावे.
५)बरेचदा गांधीलमाशी,मधमाशी,कोळी असे किटक अंगावर चिरडून मरतात आणी त्या जागी विखार होतो आणी मग आग होणे,खाज सुटणे,पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कढिपत्ता चुरून त्या भागावर लावावा.
कढिपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते,संडासला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.
जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.
कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.
आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.
२)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.
३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात
४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.
५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.
६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.
कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार.
ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे असतात.ओवा चवीला तिखट कडवट असतो आणी उष्ण असतो.हा शरीरातील वात आणी कफ दोष कमी करतो पण पित्त वाढवितो.म्हणूनच पित्ताचा त्रास तसेच एॅसीडीटी मुळव्याधीचा त्रास असणा-यांनी ह्याचा वापर करू नये त्याचप्रमाणे उन्हाळयात ह्याचा वापर करू नये.
१)अजीर्ण आणी पोटदूखीचा त्रास होत असल्यास १ टीस्पून ओवा खाऊन त्यावर एक घोट गरम पाणी प्यावे.
२)जंतांचा त्रास वारंवार होत असल्यास विड्याच्या पाना सोबत ओवा खावा ही तक्रार लगेच कमी होते.
३)खोकला येत असल्यास ओवा आणी खडीसाखर हे मिश्रण विड्याच्या पानासोबत खावे.
४)पावसाळयात मधुमेह असणा-या व्यक्तींना वारंवार लघवी होते अशा वेळी १ चमचा ओवा + ४ चमचे बेलाच्या पानांचा रस हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)४ चमचे ओवा + २ चमचे एरंडेल तेल तव्यावर परतून घ्या व त्याच्या पुरचुंडीने सांधेदुखी,मुरगळणे,मुकामार लागला असल्यास त्या भागावर शेकावे.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आवळा ह्याला आयुर्वेदा मध्ये आमलकी किंवा धात्री असे म्हणतात.धात्री अर्थात आई किंवा माता जी आपल्या अपत्यांचे भरण पोषण करते.आणी आयुर्वेदामध्ये आवळ्याला देखील असेच महत्त्व आहे कारण हा आवळा आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी व आपले पोषण वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास करतो ह्यात वाद नाही.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायन औषधी असे देखील म्हटले जाते.कारण रसायन औषधी ह्या आपल्या शरीरातील सात ही धातुंचे योग्यप्रकारे निर्माण व पोषण करणारे औषध म्हणजे रसायन.ह्या औषधाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच रसायन औषध नित्य सेवन केल्याने शरीर लवकर वृध्द होत नाही अर्थात आपण ती च्यवनप्राशची ॲड पाहिली असेल ना ६० साल के बुढे या ६० साल के जवान त्यात तो वृद्ध च्यवनप्राश खाऊन कसा पटापट जीने चढतो तर एक तरूण व्यक्ती अगदी जीने चढताना अगदी दमून जातो.हेच दाखवते कि च्यवनप्राश हे रसायन औषध सेवन केल्याने म्हातारपण लांब रहाते आपल्या पासून.कारण च्यवनप्राश मध्ये देखील प्रमुख घटक हा आवळाच असतो.
आवळ्यामध्ये विटामीन सी अर्थात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.तसेच हा आवळा आपण नियमीत पणे आपल्या दैनंदिन जीवनात सेवन केल्यास तो आपल्या आरोग्याचे रक्षण हमखास व अगदी उत्तमरित्या करतो.
आपण नेहमी आवळ्याचे लोणचे करतोच.तसेच आवळ्याच्या कॅंण्डी देखील आता मिळतात अर्थात हा साखरेच्या पाकात शिजवलेले आवळे होय.तसेच आवळ्याचा च्यवनप्राश,आवळ्याचा रस,आवळ्याचे सरबत,आवळा चुर्ण,आवळ्याचा मुरंबा,आवळ्याचा पाक,आवळा सुपारी अशा नानाविध रूपांमध्ये तो बाजारात उपलब्ध आहे.त्यातील आपल्याला सोयीस्कर रूपांमध्ये त्याचे सेवन आपण करावे.
आवळा हा त्वचेची काळजी घेतो,रक्ताची शुद्धी करतो,श्वसन संस्थेचे आरोग्य राखतो,पचनसंस्थेचे आरोग्य नीट ठेवतो,प्रजनन संस्था देखील सांभाळतो,हाडांची काळजी घेतो असा वेगवेगळ्या पातळींवर एकटा खिंड लढविणारा हा आवळा काही खास औषधींपैकी एक आहे. ह्याच्या बद्दल लिहावे तेवढे थोडे आहे.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.
ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.
हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.
२)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.
३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.
४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.
५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.
अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते.
अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट हिरवी असतात.
अंजीर चवीला गोड,थंड व वात पित्तनाशक आहे व थोड्या प्रमाणात कफ वाढवितो.
आता आपण त्याचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)तोंडातील जीभ,दात,हिरड्या ह्यांचे आरोग्य टिकवायला अंजीर चावून खावे.
२)लघ्वीची जळजळ,उग्रवास,खरपडणे ह्यात अंजीर खावा फायदा होतो.
३)लहान मुलांचे पोट फुगून संडासला खडा होतो कारण पोटात मळ सुकतो अशा वेळेस सुका अंजीर पाण्यात कोळून ते पाणी त्याला पाजावे.
४)अशक्तपणा,वजन कमी होणे,सुका खोकला,संध्याकाळी बारीक ताप येणे,ह्यात २ अंजीर +१ चमचा ज्येष्ठमध चुर्ण हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी त्या व्यक्तीला द्यावे व नंतर २ तास काही खायला व प्यायला देऊ नये.असे ३ आठवडे करावे.
५)बऱ्याच लहान मुलांना जेवणामध्ये काही तरी गोड लागते अशा वेळी त्यांना जेवणात अंजीराचा पाक करून द्यावा ह्याने त्यांचे पोषण देखील होते.
अंजीर खायचा अतिरेक केल्यास भुकमंदावणे,जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti