(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • किचन क्लिनीक – अक्रोड

    किचन क्लिनीक – अक्रोड

    अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
    अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
    अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.

    अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
    हृदयाला हितकर असतात.

    अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.

    अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक  – शेंगभाज्या – फरसबी

    किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक  – शेंगदाणा

    किचन क्लिनीक – शेंगदाणा

    शेंगदाण्यांचा वापर आपण पुष्कळ वेळेस करतो टाईमपास म्हणून खारे किंवा भाजून खातो,पोहे,खिचडीतघालतो,चटणी,आमटी,
    लाडू,चिक्की,तेल अशा विविध प्रकारे आपण हे वापरतो.

    शेंगदाणे किंवा भुईमूग हे प्रामुख्याने घाटावर घेतले जाणारे पिक.हे जमीनीखाली शेंगामध्ये तयार होतात.

    शेंगदाणे चवीला गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध वात कफ नाशक व पित्तकर असतात.हे दातांना बळकटी देतात.जखम भरायला मदत करतात.त्वचाविकारात उपयुक्त असून बलकारक,पोषक आहेत.

    आता आपण शेंगदाण्याच्या विविध व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहू:

    १)शेंगदाणा लाडू/चिक्की:
    गोड,उष्ण,पचायलाजड,स्निग्ध,वातनाशक,
    कफपित्तकर,बलकारक,अशक्तपणा कमी करणारी,श्रमहर आहे.

    २)शेंगदाणा चटणी:
    तिखट,गोड,उष्ण,वातनाशक,कफपित्तकर,
    पचायला जड,तोंडास रुची उत्पन्न करणारी,भुक वाढविणारी,शुक्रधातू नाशक आहे.

    ३)खारे शेंगदाणे:
    गोड,खारट,उष्ण,वातनाशक,कफ पित्तकर,अम्लपित्त वाढविणारी,पचायला जड,स्निग्ध,रक्तविकार वाढविते.

    ४)शेंगदाण्याची आमटी:
    चवीला गोड,तिखट,उष्ण,वातकफनाशक,
    पित्तकर,शुक्रनाशक,भुक वाढविणारी,रुचिकर,पचायला जड,बाळंतीण बाईचे अंगावरचे दुध वाढविते,पौष्टिक आहे.

    ५)शेंगदाणा तेल:
    गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातनाशक,
    कफपित्तकर,जखम भरायला मदत करते,त्वचेचा वर्ण सुधारते,संडास व लघ्वी सुटायला मदत करणारी.

    ६)शेंगदाणा पेंड:
    गोड,रूक्ष,वातनाशक,पित्तकफकर,उष्ण,दुध वाढविते,जखम भरणारी,पचायला हल्की.

    शेंगदाणे अतिप्रमाणात खाल्ल्याने अम्लपित्त होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • काश्मीर खोर्‍यातील दगडफेक

    काश्मीर खोर्‍यातील दगडफेक

    काश्मीर खोर्‍यामधील चकमकीच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल.

  • काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

    काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

    बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्‍यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे.

  • काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !

    काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !

    फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच.

  • कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे.

  • कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे.

  • कार्तिक महिन्यातील छठ पूजा

    कार्तिक महिन्यातील छठ पूजा

    हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.

  • कार्टून ‘मिकी माऊस’ चा वाढदिवस

    कार्टून ‘मिकी माऊस’ चा वाढदिवस

    ९३ वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे.