(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • छोट्या पडद्याचे प्रदुषण !

    सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषात्त* आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो ‘इडियट बॉक्स’ अर्थात छोटा पडदा!

      May 3, 2009


  • रेल्वे ट्रॅक

    प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती.

      July 16, 2023


  • वजन कमी करण्यासाठी उपास?

    'डायट' हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक ‘अनोखा’ मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे.
    “सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही.” असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. किती मात्रेत जेवावे हे आपण याआधीच पाहून झाले आहे. आज या उपास(मारी)बद्दल पाहू. आयुर्वेद म्हणतो; चार घास कमी जेवावे. मात्र योग्य मात्रेपेक्षा कमी जेवणे हे आरोग्यास अपायकारक आहे असेही आयुर्वेदाचेच मत आहे. भूक मारून उपास केल्यास शरीराला पुष्टी प्राप्त होत नाही. पुष्टी नसल्याने बळ कमी होते. शरीराची जडणघडण (उपचय) ढासळू लागते. हा उपचयच आपली रोगप्रतिकार शक्ती ठरवत असतो. तोच कमी झाल्याने या शक्तीवरही विपरीत परिणाम होऊन शरीर आतून पोखरण्यास सुरुवात होते. याशिवाय अशी उपासमार केल्याने शरीरात वेगवेगळे वाताचे विकार (सांधेदुखी वगैरे) घर करू लागतात.
    वजन कमी करण्याच्या नादात भूक मारून रात्रीचे जेवण बंद केलेत तर सुरुवातीला चांगला फरक अवश्य जाणवतो; काही प्रमाणात वजन कमीदेखील होते. मात्र हे वजन शरीरातील अतिरिक्त पाण्याचे असते. प्रत्यक्षात मेद मात्र मुळीच कमी झालेला नसतो. शिवाय अशा प्रकारे काही किलो वजन घटवलेत तर पुढे केव्हाही नेहमीचा आहार घेण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या जवळपास दीड ते दोन पट वजन वाढते हा कित्येकांचा अनुभव असेल. आरोग्य उत्तम राखून वजन कमी करायचे असल्यास; ‘योग्य आहार- संतुलित व्यायाम- आयुर्वेदीय उपचार’ ही यशस्वी त्रिसूत्री आहे.
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 28, 2016


  • डिसेंबर २८ : हजार धावांचा डाव

    हजार धावांचा भोज्या दोनदा ओलांडणारा विक्टोरिया संघ आणि क्रिकेटच्या तीन प्रमुख प्रकारांमधील एका डावातील सर्वाधिक सांघिक धावा.

      December 28, 2010


  • रहस्यमय जगन्नाथ पुरी

    जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा…

      July 25, 2017


  • महाकपीचा शेवट

    महाकपीचा शेवट

    कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो.

      January 23, 2024


  • वीरचक्र विभूषित योद्धा सुभेदार रतन सिंग

    सुभेदार रतन सिंग १० ऑगस्ट, २०१६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावले. आमच्या प्रसारमाध्यमांनी बारीकशी बातमी दिली. साहजिकच आहे. वाचकांच्या मनात थोडीदेखील राष्ट्रीय भावना निर्माण होता कामा नये, असंच आपल्या माध्यमांचं अलिखित धोरण आहे. विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक खर्याा-खोट्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ उभ्या करायच्या आणि लोकांचं चित्र त्यात गुंतवून ठेवायचं; ‘नॉन-इश्यूज’ ना ‘इश्यूज’ बनवायचं आणि खर्याय ‘इश्यूज’ पासून जनतेचं लक्ष दूर न्यायचं, हे खरं अलिखित धोरण आहे.

      January 12, 2017


  • बीज भाषण : मराठी कथात्म!

    मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा.

      August 22, 2023


  • श्री गणेश – क्युआन शि तिएन संप्रदाय- जपान

    नवव्या शतकापर्यंत श्री गणेशाची जपानला माहिती नव्हती. परंतू भारतीय तत्त्वज्ञानाबाबत त्यांना उत्सुकता होती. चीनी विचारवंतांकडून दिशा घेऊन भारतीय पध्दतीचा त्यांनी अभ्यास केला. कोबा डाइती याने प्रथम श्री गणेशाची स्थापना जपानमध्ये केली.

      July 10, 2012


  • ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

    ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.

      June 16, 2026