(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कल्याणवृष्टिस्तव – ३

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥

    आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति

    ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
    इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.

    कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
    ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.

    अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
    कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
    अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,

    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,

    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.

    अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 14, 2020


  • भारतातील पहिली मालिका ‘हमलोग’

    १९७५ साली आलेल्या व्हेन कॉन्मिगो (Ven Conmigo) या मेक्सिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या धर्तीवर हमलोग या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेची कल्पना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठे यांना १९८२ मध्ये मेक्सिकन दौऱ्याच्या वेळी मिळाली. भारतात आल्यावर मंत्री वसंत साठे यांनी याच्यावर काम करण्यास सुरुवात केली. व ‘हमलोग’ या मालिकेचे निर्मिती झाली.

      July 7, 2021


  • खांदा कडक होणे (फ्रोझन शोल्डर)

    कडक खांदा होणे हे साधारणतः चाळीशीनंतर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. याची सुरुवात थोडयाशा खांद्याच्या दुखण्याने होते. पुढे पुढे रात्री दुखणे, खांद्याची हालचाल करणे कठीण होणे तसेच दिवसाही दुखण्यास सुरुवात होणे आणि नंतर संपूर्ण हातात दुखणे फैलावणे व सांधा संपूर्णपणे कडक होणे इ.मध्ये शेवट होऊ शकतो.

      June 13, 2023


  • “मृत्युदंड” प्रक्रियेमधील एक दिलासा !

    नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.

      October 17, 2012


  • परमेश्वराचे अस्तित्व

    …. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

      June 22, 2020


  • २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयात सकारात्मक बदल

    २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयात सकारात्मक बदल

    संरक्षण मंत्रालयात गेल्या वर्षभरामध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. ज्यामुळे या मंत्रालयाचे काम पारदर्षक,वेगवान, व जास्त चांगले झालेले आहे. त्यामधील काही महत्त्वाच्या पैलूंवर आपण चर्चा करू.याअगोदर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची स्थिती कशी होती हे पाहाणे गरजेचे आहे. तसेच वर्षात या क्षेत्रात काय बदल झालेले आहे आणि शिल्लक असलेल्या २ १/२ वर्षांत कोणत्या अपेक्षा आहेत हे पण समोर आणणे जरुरी आहे.

      January 11, 2017


  • इमारतीवरील पाण्याच्या टाकीबाबत खबरदारी

    मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी.

      February 2, 2023


  • तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 4

    प्रवेश सर्व जातीना मुक्त होता. कोणी कोणता अभ्यासक्रम घ्यावा यांची प्रत्येक विद्यार्थ्याला मुभा होती.त्यावर कोणतेही बंधन नव्हते.जे काही शिकवले जाई,ते ज्ञानासाठी होते.

      July 13, 2023


  • नागली

    नागली म्हणजेच नाचणी. नागली अथवा नाचणी हे भारतात अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारतात सर्व भाषेत नागली अथवा नाचणी असेच म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रागी अथवा मिलेट असे म्हणतात. नाचणी हे सर्व भारतातच नाही तर सर्व जगभर मिळते. थोडक्यात हे गरिबांचे अन्न म्हणून वापरतात. भारतातील शेतकरी व लोक नाचणीची भाकरी करतात.

      November 28, 2023


  • मन कि बात – नवीन वर्ष..

    उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही.

      January 17, 2017