(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जानेवारी ३० : कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे एका धावेत सात बळी !

    अ‍ॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अ‍ॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अ‍ॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!

      January 30, 2016


  • घालीन लोटांगण

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

    घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?

    या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.

    रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

    -- रवी उवाच

    विकास,

    'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

    (१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

    (२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.

    (३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

    (४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

    (५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

    तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

    -- रवी अभ्यंकर

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

      September 12, 2016


  • अध्यात्म की बाजार…

    गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्‍यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्‍या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्‍यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्‍या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?

    आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्‍यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्‍या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्‍या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्‍यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्‍याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे...हे कोठे तरी थांबायला नको का ?

    लेखक – निलेश बामणे
    गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
    मो. 9029338268

      December 20, 2014


  • प्रमुख आहार सूत्र – भाग ३

    मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे.

    आस्यासुखं स्वप्नसुखम्
    दधिनी ग्राम्यौदकः पयांसि
    नवान्नपानं गुडवैकृतंच
    प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम !

    हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे.

    काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी 'काय करू नये' ते पहिल्यांदा सांगताना दिसतात.

    मनाचे श्लोक सांगताना समर्थ देखील असेच सांगतात,
    "नको रे मना........"
    हे करू नको, ते करू नको. बाकी सगळं करं, पण हे हे एवढं अजिबात करू नकोस, पुढे धोका आहे."

    नकारार्थी गोष्टी आपल्या मनाला पटकन कळतात. हे वेडं मन सारखं तिथेच धाव घेतं. म्हणून अशा बेसावध क्षणांची आठवण सतत व्हायला हवी. कारण आयुष्यात एक क्षण भाळण्याचा आणि उरलेले सर्व सांभाळण्याचे! सावध तो सुखी म्हणून काय नको, ते प्रथम सांगितले जाते.

    एकदा का मधुमेहाचे लेबल चिकटले की, आयुष्यभर गोड क्षण नुसते आठवणीतच ठेवायचे, अशी आजची धारणा. आपल्याला ही धारणा बदलवायची आहे. मनाची ताकद प्रचंड आहे. जर मनापासून ठरवले तर मधुमेह हद्दपार होऊ शकतो. अत्यंत कडू असणारा हा गोड विषय जरा वादग्रस्त आहे. पण उर्वरीत आयुष्य जर निरोगी आणि गोड जायला हवे असेल तर थोडे कडू निर्णय घेणे हितकर असते. हे निर्णय घ्यावेत.

    मधुमेह होऊ नये याकरीता काय करू नये, या अवतरणातील इथली दुसरी ओळ प्रथम पाहू. कारण विषय दुधाचा सुरू आहे.
    पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी देखील. इथे शब्द वापरलाय "पयांसी"
    हा 'पाणी' या अर्थी नक्कीच नाही. कारण त्याआधीच्याच शब्दामधे "उदक" असा वेगळा शब्द ग्रंथकारांनी वापरला आहे. म्हणजे मधुमेहामधे पाणी आणि दूध या दोन्ही गोष्टीपासून सावध रहायला हवे, असे शास्त्रकारांना अपेक्षित आहे.
    एखाद्या गोष्टीचा अभिमान जरूर असावा. पण गर्व असू नये.

    आमची देशी गाय सर्वगुणसंपन्न जरूर आहे. हा अभिमान जरूर बाळगावा, पण तिचे दूध सर्व रोगात चालते, हा वृथा अहंकार मात्र नको. राजयक्ष्म्यासारख्या रोगात गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध, शेळीचा सहवास श्रेष्ठ सांगितला आहे.

    आमच्या देशी गाईबद्दल मला पूर्ण आदर आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या गाईचे दूधच औषधी ठरेल असे नाही.
    काही ठिकाणी गोदुग्ध, काही वेळा गोदधी म्हणजे दही, काही ठिकाणी गोतक्र म्हणजे ताक, काही ठिकाणी गो नवनीत म्हणजे लोणी, काही ठिकाणी गोघृत म्हणजे तूप, तर काही ठिकाणी गोमूत्र, तर काही ठिकाणी गोमय म्हणजे शेण देखील औषध म्हणून काम करते.

    मधुमेह होऊ नये, म्हणून दुध घे -ऊ- च नये असा टोकाचा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. दूध आता लगेच बंदच करायला हवे असेही नक्कीच नाही.

    "पिण्याचेही" काही नियम असतात ना.
    गैरसमज नको, दुधाबद्दलच बोलतोय मी .......

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021
    19.01.2017

      January 19, 2017


  • हरवलेलं शेपूट’

    वानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं.

      January 16, 2022


  • फेब्रुवारी २१ : दोन मैदानांची कसोटिपदार्पणे

    बोर्डा मैदानाचे आणी त्यानंतर ६७ वर्षांच्या अंतराने जयपुरच्या सवाई मानसिंग मैदानाचे कसोटिपदार्पण

      February 21, 2011


  • महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग १ – चिंच

    आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.

      November 14, 2023


  • खोटदुखी (टाचा दुखणे)

    बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते.

      May 5, 2023


  • तुळजापूरची भवानी

    भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला.

      May 30, 2025


  • आंतरराष्ट्रीय सेल्फी डे

    जगातली पहिली सेल्फी घेतला गेला होता तो १८३९ साली. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. स्मार्टफोनचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. उपलब्ध माहिती नुसार जगातील पहिली सेल्फी १८३९ घेतली गेला. फिलाडेल्फिया येथे एका दिव्यांच्या दुकानाबाहेर रॉबर्ट कॉर्नेलिअस यांनी ही सेल्फी घेतली होती.

      June 22, 2021