(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने

    जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते.

    महाराष्ट्रातील किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यानच्या भागात तसेच खाड्यांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवाखारफुटी वनस्पती आहेत. खाजण वनातील झाडांना सुंद्री असे सामान्य नाव आहे. हा वृक्ष तिवरांच्या गटात मोडतो.

    सुंदरी (लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव: Heritiera littoralis) हा वृक्ष प्रामुख्याने बंगाल मधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे याचे इंग्लिश नाव पडले आहे.
    सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे.

    सुंदरी वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुले एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुले घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि ४-८ सेंमी लांब असते.

    जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.

    हा वृक्ष महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी असलेला एकमेव सुंदरी वृक्ष एका देवराईत आहे. डुंगोबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. या वृक्षास येथे मोठ्या आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ असे नाव आहे. मुंबईत राणीच्या बागेत एक सुंदरी वृक्ष होता, पण त्याची एक फांदी मोडल्यामुळे तो पूर्ण वृक्षच तोडला गेला. सुंदरी वृक्षाकडे बघताच त्याच्या देखण्या दर्शनाने ' सुंदरी ' नावाची सत्यता पटते. हा वृक्ष ४० - ४५ फुट वाढतो. गर्द हिरवी वडाच्या पानांच्या आकाराची पाने खालच्या बाजूने चंदेरी छटा मिटवितात आणि थोडी खरखरीत असतात. पाने अभिमानाने मिरवण्यासाठी भरपूर फांद्या चारही बाजूंनी डौलदारपणे झुलत असतात याची फुले मात्र साधी - सुधी छोट्याशा झुपक्यात येतात.

    नर आणि मादी फुले वेगळी असतात पण एकाच झुपक्यात येतात. सर्व फुलांवर नाजूक लव असते.
    महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या समुद्र किनाऱ्यावर व मुंबई मध्ये ठाण्याच्या खाडीत हे वृक्ष आढळतात. त्यात प्राधान्याने रीझोफोरा, अविसिनीया, सोनेरेशिया इत्यादी वृक्ष आहेत.

    रीझोफोरा हा ट्रॉपिकल मॅन्ग्रोव्ह वनातील वृक्ष आहे. Rhizophora mangle ही जात ज्यास्ती प्रमाणात दिसून येते. परंतु त्याच्या काही हायब्रीड जातीपण आहेत.

    रीझोफोरा किंवा सर्वच खारण भागात वाढणाऱ्या वृक्षांनी आपल्या रचनेत बरेच बदल केलेले आहेत. कारण त्यांना समुद्राच्या खारट पाण्यात जिवंत राहायचे असते. त्यापैकी एक म्हणजे numatophores. हे त्या झाडांच्या मुळांचे विस्तार असतात. ह्यांच्यावर छोटी छिद्रे असतात ज्याच्यामुळे ही हवेतील ऑक्सिजन शोषून तो खारट पाण्या मद्धे असणाऱ्या मुळांना पुरवतात. आणि त्यांच्या मुळामद्धे एकप्रकारचा खारट पणा काढण्यासाठी नैसर्गिक पंप असतो.

    हे वृक्ष समुद्राच्या मध्य भागात (Intertidal झोन) मध्ये असतात जिथे समुद्र साधारणपणे स्थिर असतो. मॅन्ग्रोव्ह प्रकारच्या वनस्पतीमध्ये त्यांचे बीज अंकुरणं वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यास विविपेरस अंकुरण म्हणतात. यामद्धे बीज फांद्यांवर उलटे असते व त्याचा शेपटीकडे भाग लांब , टोकदार व कठीण असतो. बीज वाळल्यावर ते तसेच उलटे समुद्राच्या चिखलात खोलवर रुतून बसते आणि नंतर त्याचे नवीन झाड तयार होते.

    तिवरांची जंगले हा दुर्लक्षित विषय आहे. शिवाय त्याच्या वरची शास्त्रीय माहितीही फारशी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागात डॉ. जी. व्ही जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संशोधक विध्यार्थानी १९७५ पासून संशोधन केले. ते जवळ जवळ २५ वर्षे चालले. त्यातून या खारफुटी वृक्षांची खूप शास्त्रीय माहिती मिळाली व तिला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली.
    खारफुटी जंगलांचे महत्व

    खारफुटीची जंगलं असलीच पाहिजेत का?

    अर्थातच. मुंबईत आपल्याकडे २००५ मध्ये २६ जुलै रोजी मिठी नदीने आपले पात्र ओलांडून केलेल्या पुराने हाहाकार माजवला. तो खारफुटीच्या नाशामुळेच होता. खारफुटींची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात. ती गाळाला किंवा जमिनीला धरून ठेवतात. तशी ती वरही येतात. हवेतील प्राणवायू घेतात. पूर, वादळ, त्सुनामी आल्यास पाण्याचा लोंढा या वनस्पतीच्या मुळाशी, झाडात, तसंच पानात अडतो. जेणेकरून वाढलेली पातळी शहराकडे तितक्या वेगाने पोहोचत नाही. खारफुटी ही या सगळ्याला प्रतिबंधक आहे आणि तीच तोडली गेली. त्यामुळे सरळ पाणी आत आलं. त्यामुळे भविष्यात असे धोके टाळण्यासाठी खारफुटींचं जतन अत्यावश्यक आहे.

    ठाणे येथील खारफुटीची जंगले नष्ट होण्यास प्रामुख्याने बिल्डर जबाबदार आहेत. कारण खार फुटीच्या झाडापासून त्यांना काहीच फायदा होत नाही पण तेथील झाडे नष्ट करून त्या जागेवर भर टाकून जमीन तयार करून तेथे गगनचुंबी इमारती बांधून अमाप पैसा मिळवता येतो हेच त्या मागील कारण आहे.

    खारफुटी जंगलांना राखीव संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

    खारफुटीचे नष्ट होणारे अधिवास व कमी होत चाललेले त्यांचे महत्त्व यामुळे पर्यावरण मंत्रालयाने त्यांना ‘अतिमहत्त्वाच्या वनस्पती’चा दर्जा दिला व पुढे सागरी नियंत्रण कायदा, वन कायदा यामध्ये त्यांना समाविष्ट करून त्यांच्या संरक्षणाची कायदेशीर तरतूद केली. न्यायालयांनीसुद्धा वेळोवेळी कठोर धोरण अवलंबून खारफुटींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. तरीही गेल्या दोन दशकांत भारतात खारफुटींचा नाश झालेला आढळतो. या अनास्थेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खारफुटीबद्दलचे अज्ञान. एक दृष्टिकोन असा आहे, की या मानवास कुठलाही उपयोग नसलेल्या व रोगराई पसरविणाऱ्या टाकाऊ वनस्पती आहेत. तर याच्या विरोधात काही पर्यावरणवाद्यांनी त्यांचे असे गुणगान केले, की यासम याच.

    खारफुटीचे आणखी काही उपयोग

    समुद्रात होणारं तेल, कचरा, रसायनाचे प्रदूषण खारफुटी शोषून घेते. या वनस्पतीमध्ये प्रदूषण शोषण्याची ताकद खूप जास्त आहे. तिच्या मुळाशी खूप मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय गोष्टी साठतात. मासे, खेकडे, कीटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. वनस्पतीच्या मुळाशी कित्येक प्रकारचे मासे, खेकडे अंडीसुद्धा घालतात. तर, काही जलचर, कीटक ती खाण्यासाठी येतात. पूर्वी ठाण्यात खूप मच्छिमार असण्याचे कारण हेच होते. खारफुटीमुळे मासे येत होते. पूर्वी लोक जळाऊ लाकूड म्हणूनही वाळलेल्या वनस्पतीचा वापर करत होते. मोठ्या वृक्षांचा फर्निचरसाठी वापर होतो. ते टिंबर वुड म्हणून ओळखले जाते. मेस्वाक वनस्पती म्हणजे खारफुटी सदृश झाड आहे, दंतमंजनात तिचा उपयोग होतो. मधुमेहासाठी खारफुटीपासून औषधे करतात. संधीवात, गॅसेसवर हा उपचार आहे. तिच्यात औषधी गुण मोठ्या प्रमाणावर आहे. जगात यावर खूप संशोधन केलं जातंय.

    आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै रोजी पाळला जातो.

    या बरोबरच हि लेखमाला येथे संपवत आहे. यामद्धे आपण महाराट्रातील प्रत्येक प्रकारच्या जंगलातील महत्वाच्या वृक्षांची ओळख करून घेतली आहे.अजूनही

    वनस्पती शास्त्रात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी आहेत. त्याबद्दल आपण नंतर बोलू (लिहू).

    -- डॉ. दिलीप कुलकर्णी.

    संदर्भ:

    BY CITY BELL ON FEBRUARY 23, 2022

    खारफुटीची जंगले - Loksatta 04-Jun-2017

    मराठी विकिपेडिया

    गूगल वरील बरेच लेख.

    सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने

      September 29, 2022


  • जयदेव- एक दुर्दैवी संगीतकार

    एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक झाल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी मुंबईत येण्यासाठी घरून पळ काढला.बरकत राय,कृष्णराव जावकर,व जनार्दन जावकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले.अली अकबर खान सारख्या मातब्बराकडे शागीर्दकी केली.म्हणजे किती शास्त्रीय संगीताचे ज्ञान त्यांच्याकडे होते. नवकेतनच्या “TAXI DRIVER“ पासून एस डी बर्मन यांच्या कडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. कालापानी मधील “हम बेखुदिमे तुमको पुकारे” गाण्याची कम्पोजीशन जयदेव यांची होती.पण स्वाभाविकपणे संगीतकार म्हणून नाव लागले सचिनदाचे.

    सुजाताचे संगीत दिले जात होते.”जलते है जिसके लिये” ची चाल तयार झाली. सचिनदानी सांगितले उद्या रफीला रिहर्सलसाठी बोलवा. जयदेवनी हळूच दादांना बाजूला घेतले व म्हणाले “ “दादा,ट्यून जरा ध्यान से सुनो, ये ट्यून रफिसाब कि नही, ये SOFT ट्यून तलत कि है “ दादानाही ते पटले. देव आनंदने निर्णय केला कि एक चित्रपट जयदेवना देऊ या. म्हणून “ हम दोनो “ चित्रपट जयदेवना दिला. त्यावेळी लतादीदी सचिनदाकडे गात नसत. जयदेव सचिनदाचे सहायक होते त्यामुळे लतादीदी आपल्याकडे गातील याची त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी दीदींना विनंती केली “ कृपया माझ्या कडे गा नाहीतर हा चित्रपट माझ्या हातून जाईल” लतादीदी तयार झाल्या.” झायलोफोन वर वाजवलेली लायटरची ट्यून, चित्रपटाची सिग्नेचर ट्यून झाली.पण नंतर कधीही देव आनंदने जयदेवना स्वतंत्र चित्रपट दिला नाही. याच चित्रपटातील “कभी खुद्पे,कभी हालातपे रोना आया, बात निकली तो हार एक बात पे रोना आया “गाण्यासारखे जयदेव जगले. ऋषिकेश मुखर्जींचा “आलाप” व अमोल पालेकर यांचा “अनकही” हे चित्रपट तर पूर्णपणे रागदारीवर आधारित होते. गमन चित्रपटात त्यांनी गायक हरिहरन यांना ब्रेक दिला.

    आयुष्यभर ते अविवाहित राहिले आणि चर्चगेट येथील रिट्झ हॉटेलसमोरच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यात एका खोलीत राहिले. कधी कधी ते दरवाज्याला कुलूप न घालताच बाहेर जात. तेव्हा त्यांना विचारले जाई कि “तुम्ही कुलूप न घालताच बाहेर कसे जाता तेव्हा ते म्हणत “माझ्या कडे चोरून नेण्यासारखे आहेच काय? एक माझं संगीत जे माझ्या हृदयात आहे आणि दुसरे माझं दुर्दैव जे माझं कधीही साथ सोडत नाही.” त्यांना मध्य प्रदेशचे एक लाख रुपयाचे लता मंगेशकर पारितोषिक मिळाले ते घेतल्यावर त्यांना विचारले “ तुम्हाला पारितोषिक मिळाल्यावर कसे वाटते?” ते म्हणाले “आयुष्यात मी कधी एकत्र एक लाख रुपये पाहिले नाहीत “ चेक घेऊन ते कामासाठी दिल्लीला गेले.मुंबईला आल्यावर त्यांनी तो चेक बँकेत भरला.तो क्लीअर होण्या आधीच ६ जानेवारी १९८७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी संगीत दिलेल्या ४२ चित्रपटापैकी कितीतरी चित्रपटाची गाणी गाजली होती.त्यांची गैरचित्रपट गाणी गाजली होती.हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालामधील कवीताना चाली देऊन मन्नाडे कडून गाऊन घेतली होती त्यांना तीन वेळा उत्कृष्ठ संगीतकार रेश्मा और शेरा,गमन,अनकही चित्रपटांना मिळाले.आणि सूर सिंगार ४ चित्रपटाना मिळाले. त्यांची गाणी गाजलेले चित्रपट.

    १) जोरूका भाई २) हम दोनो ३) किनारे किनारे ४) मुझे जिने दो ५) रेश्मा और शेरा ६) प्रेम पर्बत ७) परिणय ८) आलाप ९) तुम्हारे लिये १०) घरौंदा ११) गमन १२) अनकही

    -- रवींद्र शरद वाळिंबे.

      August 23, 2022


  • पक्षीपरिचय – १

      August 18, 2015


  • गगनचुंबी इमारतींना आधार कशाचा?

    आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.

      January 13, 2023


  • आमची माती आमचं शिक्षण

    परिक्षा शुल्क भरायलाही पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून गावाकडे परतणारी शेतकऱ्याची पोरं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभे असलेले विद्यार्थी असे विरोधाभासी चित्र सध्या दिसत आहे. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणारे डोळे मातीत राबवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमाकडे कसे काय वळू लागले? प्रवेश फेरीसाठी ९४ टक्के गुणांचा कट ऑफ पर्यंत कशी पोहचली? आमची माती आमचे विद्यार्थी हे चित्र कसे काय दिसायला लागले ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.

    राज्यातील १७३ कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी रांगा लागल्या. ६२ हजार अर्ज आले. पहिल्या फेरीचे कट ऑफ गुण होते ९४ टक्के. दुसरीकडे अभियांत्रीकीच्या राज्यात किमान ६० हजार जागा रिक्त राहील्या आहेत. बीएड, डीएड महाविद्यालये बंद पडत आहेत. तर फार्मसीसारख्या विषयाकडे विद्यार्थी वळण्यास तयार नाहीत. व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ वळवत असताना कृषी अभ्यासक्रमाला सोन्याचे दिवस आलेले दिसतात.

    कृषी क्षेत्रात करियरच्या संधी मागील काही वर्षात झपाट्याने वाढत आहेत असे दिसून येते. पूर्वी बिएस्सी अ‍ॅग्री, डिप्लोमा साठी प्रवेश घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातलाच असायचा. घरी शेतीवाडी असल्याने सातबारा दाखवून कमी गुणातही प्रवेश मिळायचा. शहरी पोरे शेतकरी महाविद्यालयाकडे पहायची सुध्दा नाहीत.अगदी चार पाच वर्षापर्यंत शेतकी महाविद्यालयेही विद्यार्थ्यांची वाट पहात असत. कारण शेतकर्‍याचा मुलगाही मास्तर होण्याला जास्त प्राधान्य देऊ लागलेला. लाखा लाखाने डोनेशन भरुन बीएड, डीएड करायचे. त्यानंतरही शिक्षक म्हणून एखाद्या शाळेवर चिकटण्यासाठी जमीनीचा तुकडा विकावा लागायचा. हेही करण्यास ही मुले तयार होती. काळाच्या ओघात शिक्षक भरतीच बंद झाल्याने हाही मार्ग खुंटला. कृषी महाविद्यालयांचा चांगला पर्याय समोर आल्यानंतर सहाजिकच ग्रामीणच नाही तर शहरीमुलेही या अभ्यासक्रमाकडे वळू लागली. विशेष म्हणजे पहिल्या वर्षापासूनच स्पर्धा परिक्षेची तयारी करायची. शेतातल्या या पायवाटेने सरकारी नोकरीत शिरायचे असा उद्देशही साध्य होत होता. या परिस्थितीचा फायदा घेणार नाहीत ते शिक्षण सम्राट कसले. बीएडची दुकाने बंद करुन त्यांनी शेतकरी महाविद्यालयाची उघडली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आघाडीवर होते. कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये आपल्याच महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची कंत्राटी भरती त्यांनी करुन त्यांनी कमाईचा दुहेरी मार्ग यशस्वी केला.

    असे असले तरी कृषी क्षेत्रातील करियरच्या विविध संधीमुळे डॉक्टर, इंजिनियरच व्हायचे ही मानसिकता काही प्रमाणात बदलत आहे हेही काही कमी नाही. कृषी अभ्यासक्रमाच्या विविध शाखा सुरु होत आहेत. प्रक्रिया उद्योग, माती शास्त्र, सिंचन, अर्थशास्त्र, हरितगृह, पूरक उद्योग, बाजार व्यवस्थापन, संधोधन या शिवाय पदव्युत्तरनंतर अभियांत्रिकीच्या अनेक संधी निर्माण झाल्याने शेतकीचे शिक्षण घेणे म्हणजे प्रत्यक्ष नांगर हातात धरुन उत्पन्न वाढवण्यासाठी शेतात विविध प्रयोग करणे एवढ्या पुरतेच हे क्षेत्र मर्यादित राहीलेले नाही. किटकनाशके, खते, बियाणे, अवजारे तयार करण्याNया वंâपन्यांमधून तसेच रुरल फायनान्स, बँका मधूनही कृषी पदवीधाराकांना मागणी असल्याने मातीशी प्रत्यक्ष नाते नसलेल्यांनाही कृषी अभ्यासक्रम खुणावू लागले आहेत.

    तथापी दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भिक्ष, शेतमालाला कवडीमोल भाव, प्रक्रियेत उतरण्याची मानसिकता नसलेला शेतकरी अशी अनेक आव्हाने शेतीत उभी असताना कृषी अभ्यासक्रमांकडे विद्याथ्र्यांचा ओढा हे चित्र आशादायी आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच नाही असेच द्यावे लागेल. शेतीचे प्रगत तंत्रज्ञान शिकून घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या शेतात करणारे विद्यार्थी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. प्रत्येकाला या क्षेत्रातल्या नोकर्‍या खुणावत आहेत. नोकरीचा उपयोग शेतीच्या विकासासाठी करतील तर तसेही नाही.. बीएस्सी अ‍ॅग्री करुन सरकारी नोकरी मिळवणाऱ्यानाही कार्यालयातील खुर्ची सोडवत नाही. कृषी विस्तार कार्यक्रमात धडाडीने काम करण्यापेक्षा विस्ताराच्या योजना कागदावर राबवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. याला काही अपवाद असले तरी कृषी महाविद्यालयांमधील विद्याथ्र्यांची संख्या पाहता अशा कर्मचाऱ्याचे प्रमाण व्यस्तच दिसते. जोपर्यंत पुस्तकात शिकलेले शेतीचे धडे मातीत हात घालून प्रत्यक्षात येणार नाहीत तोपर्यंत मातीत उतरलेल्या या गुणवंतांना काही किंमत मिळणार नाही.

    pradnyadeshpande2014@gmail.com

      August 27, 2015


  • संतत्त्व आणि तुकाराम

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये डॉ. प्रकाश सपकाळे यांनी लिहिलेला हा लेख


    संतत्त्वाची परिभाषा मराठी वाङ्मयात सर्वात आधी मुक्ताबाईने केली आहे. संतत्व गुणवत्ता आहे. गुणवत्तेचा अर्क आहे. संस्कृतात 'संत' शब्द आहे, तो साधुसंत, सज्जन, सदाचारी अशा अर्थाने. हिंदीत 'संत' शब्द ढिसाळपणाने वापरला जातो. सज्जन माणूस या अर्थाने, मराठीत वारकरी संतांच्या संदर्भात हा शब्द योजला जातो. महानुभाव संप्रदायात 'महंत' आहेत. 'आचार्य' आहेत. 'संत' नाहीत. दत्त संप्रदायात 'गुरू' आहेत. 'संत' नाहीत. समर्थ संप्रदायात महंत, समर्थ, रामदासी आहेत. खिश्चनांमध्ये saint आहेत, 'संत' नाहीत. खिश्चन धर्मात 'सेंट'- saint ठरवण्यासाठी ठराविक पद्धतीने-चाकोरीने, कागदोपत्री पुरावे जमा करून, चमत्कार नोंदवून तांत्रिक पद्धतीने दिली जाते ती उपाधी म्हणजे saint. ती संबंधिताच्या मृत्यूनंतर दिली जाते. गुणवत्तेशी तिचा संबंध नाही. तांत्रिकतेशी आहे. चर्च ठरवते कोणाला saint म्हणायचे ते! अशी ती औपचारिक व तांत्रिक उपाधी आहे. आपल्याकडे संतत्व ठरते ते त्या व्यक्तीच्या हयातीतच आणि परंपरेने ते ठरते. त्या व्यक्तीच्या चारित्र्याने, गुणवत्तेने, आचार-विचारांनी, कार्यकर्तृत्वाने समाजच ते ठरवत असतो. संतत्वाचे निकष संतांच्या चरित्र-चारित्र्यातूनच ठरत असतात. अंगभूत गुणांचा आदर्श आपल्या आचरणातून संतांनी आविष्कृत केला आहे.

    संत जेणे व्हावे । जन बोलणे सोसावे ।...
    विश्व जाहलेया वन्ही । संतमुखे व्हावे पावी ।
    तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
    असा संतत्त्वाचा उद्गार प्रथम मुक्ताबाईने केला.

    ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या समकालीन संतांनी-विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा, सोयराबाई इत्यादिकांनी संतत्वाची प्रमाणे आपल्या आचार-विचारातून आविष्कृत केली. एकनाथांनी तेच केले. सर्व बाबतीत कळस ठरलेले तुकाराम यांनी संतांचाच आदर्श समोर ठेवून जीवनक्रम आरंभिला.

    झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग ।
    करू संती केले ते ।
    आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।

    अशी त्यांची भूमिका आहे. आपण एका क्रांतिकारक कुळाचे जबाबदार वारस आहोत याचे त्यांना भान होते. आपल्या कुवतीचे, आपल्या कर्तव्याचे त्यांना भान होते. संतांच्याच मार्गाने चालायचे आहे. अवतार, ऋषी, संत यांचे कार्य एकच. साधूंचे रक्षण, दुष्टांच्या दुष्कृत्यांचा विनाश, धर्मसंस्थापना, ऋषींनी सांगितलेले साच भावे वर्तावया, आडरानाने भरलेले जग आचरणाने स्वच्छ करायला आपण आलो आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. शब्दज्ञानाने अर्थाचा नाश केला आहे. भक्तीचा डांगोरा पिटून जगात आनंदी आनंद निर्माण करू. धर्माचे रक्षण करू. तथाकथित धर्माधिकारी अध्यात्माचा खरा मार्ग न दाखवता स्वार्थ बुद्धीने शब्दज्ञान सांगून देवाला, धर्माला, धर्मग्रंथांना साधन मानून लोकांना फसवतात. त्यांना स्वतःला अनुभूती नसतेच. ईशस्पर्श नसतो. संत मात्र ईशस्पर्शाने परीसस्पर्शाने सोने व्हावे, गंगेस मिळाल्याने सरितांचे, ओघळांचे स्वरूप पालटावे, तसे संतपदाने संतमय झालेले असतात. आपपरभाव त्यांच्या ठायी नसतो. रंजल्या गांजलेल्यांना संत आपले म्हणतात. अंतर्बाह्य नवनीतासारखे त्यांचे चित्त असते. निरपराधांना ते आधार असतात. सर्वांवर मुलाप्रमाणे ते प्रेम करतात. संत साक्षात भगवंताच्या मूर्तीच असतात.

    दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।
    तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवतांची मूर्ती ।।

    शिक्षक ज्याप्रमाणे लहानग्यांना शिकवतात, तसे संत क्रिया करून जगाला दाखवतात. आचरणाने शिकवतात. 'आधी केले मग सांगितले' असे त्यांचे आचरणातून शिकवणे असते. आई ज्याप्रमाणे बालकाची गती पाहून पाऊल टाकते, तसे संत वागतात. संत लोकांसाठी पाण्यातल्या नावेसारखे असतात. स्वतः तरतात, इतरांना तारतात.

    अर्भकाचे सारी । पंते हाती धरली पाटी ।।
    तैसे संत जगी । क्रिया करूनी दाविती अंगी ।।
    तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ।।

    सूर्य, दीप, हिरा हे दृश्य वास्तवतेचे दर्शन घडवतात. संत अदृश्याचे परमेश्वराचे, विठ्ठलाचे दर्शन घडवतात.

    रवि, दीप, हिरा दाविती देखणे ।
    अदृश्य दर्शनें संतांचे ती ।।१।।
    तापली चंदन निववितो कुडी ।
    त्रिगुण तो काठी संतसंग ||२

    चंदन ताप दूर करते तर संत त्रिविध तापाची बाधा दूर करतात. आईबाप शरीराचे पोषण करतात, संत जन्म मरण यातून सुटका करतात.

    संतांच्या अंगभूत गुणांचे गुणवत्तेचे निकषच तुकोबांनी दिलेले आहेत. संत कल्पतरू आहेत. इच्छा पुरवतात. संत कामधेनू आहेत. हितोपदेश करणारे शिक्षक आहेत. माता पिता आहेत. तृषार्तासी उदक, भुकेल्यास मिष्ठान्न आहेत. सज्जन सांगाती सोयरे आहेत. तीर्थांचे आश्रयस्थान, यमदूताचे काळ आहेत.

    संत पाऊले साजरी । गंगा आली आम्हावरी ।
    स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।।१।।

    संत अग्नी, परीस, गंगा, चंदनासारखे आहेत. आपणासारखे तात्काळ करणारे आहेत. सहनशील, व्यापक, विशाल मनोवृत्तीचे आहेत.

    तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात।
    तुका म्हणे संतपण याचि नावे ।
    जरी होय जीव सकळांचा ।।

    संत अजातशत्रू असतात. त्यांची देवावर माया असते.

    वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ।।

    संत भेदभाव करीत नाहीत. पाप-पुण्य, सुख- दुःख, हानी-लाभ असा भेद त्याच्या ठिकाणी संपलेला असतो. अधिकार, जात, वर्ण, धर्म, सत्य-असत्य, जन-वन यात अभिन्नता मानतात. आपपरभाव त्यांचा संपलेला असतो.

    नाही दुजेपण ठावे त्यासी ।

    प्रारब्ध-क्रियामाण- संचित असा काही भेद त्यांना नसतो. सत्त्व-रज-तम यांची बाधा नसते. देवभक्तपण हेही भिन्नत्व नसतो. संत उदार असतात.

    संत उदार उदार । भरले अनंत भांडार ।
    त्यांचे अंगी नम्रता असते. भाषा प्रेमळ असते.

    प्रेमे अमृते रसना ओलावली ।
    सकळ इंद्रिये जाली ब्रह्मरूप ।।

    संत समदृष्टी असतात.

    अवघे सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे।
    संत अंतर्बाह्य सद्गुणी असतात.

    चंदनाचे हात पायही चंदन ।
    परिसा नाही हीन कोणी अंग ।

    दीपा नाही पाठी पाठीं अंधकार ।
    सर्वांगे साकर अवघी गोड ।
    तुका म्हणे तैसा सज्जनापासून
    पाहता अवगुण मिळेचि ना ।।

    संत प्रेमळ असतात, परोपकारी असतात.
    संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ ।
    संतांचिये गावी वरो भांडवल ।
    अवघा विठ्ठल धन वित्त ।
    प्रेमसुख सारी घेती देती ।।

    संत दुसऱ्याला आपल्या (जिवा) सारखे मानतात.
    जीव ऐसे देखे आणिका जीवांसी ।
    निखळ चि रासि गुणांचीच ।।
    तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
    संत परिपूर्ण असतात.
    तुका म्हणे तैसे जाणा संतजन ।
    सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ।।
    संत प्रेमळ असले तरी लढाऊ वृत्तीचे असतात.
    अभंग हे बाण त्यांचे हाती असतात.
    हाती बाण हरिनामाचे ।
    वीर गर्जती विठ्ठलाचे ।
    जुंजार ते विष्णुदास ।।
    क्षमा, दया, शांती ।
    बाण अभंग हे हाती ।।

    संत धैर्यवंत असतात. 'अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।
    संत षडरिपु जिंकलेले असतात.
    संसाराचे नवी साधिले निधान ।
    मारिले दुर्जन षड्वर्ग ।।
    संत मोक्षालाही तुच्छ मानतात. भूतीं भगवंत अनुभवतात.

    तये गावी नाही दुःखाची वसती ।
    अवघाचि भूतीं नारायण ||
    संत विदेही असतात. देही उदास, आशापाश

    निवारण केलेले असतात. त्यांचा विषय नारायण हाच झालेला असतो.

    तुका म्हणे देही । संत झाले विदेही ।।
    संतांचे लक्षण ओळखाया खूण |
    दिसती उदासीन देहभावा ।।

    विदेही असल्याने, आशापाश निवारलेले असल्याने शुभाशुभ, हर्षामर्ष अंगी नसतो. द्रव्य दारा चित्ती नसतात. जगच जनार्दन असल्याने जगाच्या सुखासाठी जगत असतात.

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
    देह कष्टविती उपकारे ।।
    भूतांची दया हे भांडवल संतां ।
    आपुली ममता नाही देही ।।
    तुका म्हणे सुख पराविया सुखे ।
    अमृत हे मुखे स्रवतसे ।।

    त्यामुळे 'संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ' असतो. अशा संतांचे उपकार काय सांगावे? संत निरंतर जागवतात. गाईने वासराला सांभाळावे तसे ते आपल्याला सांभाळतात.

    तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।

    तृषार्ताला उदक, भुकेल्याला मिष्ठान्न लाभावे, बालकाला आई भेटावी, तसा जीवलग संतांचा संग लाभतो. अवघी पुण्ये सानुकूल व्हावी, तेव्हा संतसंग लाभतो. कृतकृत्य व्हावे, असे सोयरे, हरिजन प्राणसखे संत. संत म्हणजे जीवाचे जीवन. संतसंग तोच स्वर्गवास.

    संतांचा संग तोचि स्वर्गवास ।।
    संत घरा आले तोच खरा दिवाळी दसरा ।
    दसरा दिवाळी तोचि आम्हा सण
    सखे संतजन भेटतील !
    धन्य दिवस आजि जाला सोनियाचा ।।
    संतदर्शन घडणे म्हणजे साक्षात् भगवंताचे दर्शन घडणे.

    संतदर्शन हा लाभ । पद्मनाभ जोडला ।
    संतांच्या चरणस्पर्शाने वासनेचे बीज जळून जात.
    सुख वाढते. विश्रांती प्राप्त होते. संतकृपेने काया डवरते.

    अलिगणे संतांचिया । दिव्य झाली माझी काया ।
    मस्तक ह पायावरी । त्यांच्या ठेविता ।।
    संत पाउले साजिरी । गंगा आली आम्हांवरी ।
    स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।
    तुका म्हणे धन्य झालो । संतसागरी मिळालो ।।
    संतांच्या संगतीने आपणही संतांसारखे होऊन
    जातो.

    अग्निमाजी गेले । अग्नि होऊन ठेले ।।
    चंदनाच्या वासे । तरू चंदन झाले स्पर्शे ।।

    अग्नीत गेले ते अग्नीरूप झाले. चंदनाच्या वासाने इतर झाडेही सुगंधित होतात. संतांचे आलिंगन मोक्ष, सायुज्जना घडवणारे असते.

    अलिंगने घडे । मोक्ष सायुज्जना जोडे ।।
    ऐसा संतांचा महिमा |

    संतांचा महिमा सांगताना संतत्वाचे अनेक निकष तुकोबा सांगून जातात. संत सज्जन, सोयरे, शिक्षक, मायबाप, प्रेमळ, परोपकारी, सहनशील, विशाल मनोवृत्तीचे, क्षमाशील, आपपरभावरहित, अंतर्बाह्य सदगुणी, प्राणसखे, जीवाचे जीवन, मोक्षालाही तुच्छ मानणारे, मधुर भाषी पण प्रसंगी पाखंड खंडण करताना लढाऊ, झुंजार वृत्तीचे

    मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
    कठीण वज्रास भेदू ऐसे ।।

    असे विदेही, षड्रिपु जिंकलेले असे असतात.
    मुलाम्याचे नाणे - संतांची सोंगे

    संतांविषयी समाजात अतिशय आदर वाटत असतो. लोकांच्या मनात देवासारखी भावना संतांविषयी असते.

    संधिसाधू, ढोंगी, दांभिक लोकांच्या हे लक्षात येते की देवाच्या, धर्माच्या आश्रयाने पुष्कळ प्रकारचे भौतिक लाभ होऊ शकतात, तेव्हा असे लोक संतांची बाह्य लक्षणे दाखवून समाजात मिरवू लागतात. भौहे भाबडे लोक त्यांना भुलतात. त्यांनाही संत समजू लागतात.

    प्रत्येक काळात असे लोक आढळून येतात. तुकोबा त्यांच्याविषयी स्पष्टपणाने बोलून लोकांना सावध करतात. तुकोबा भावात्मक जितके बोलतात, तितकेच अभावात्मक स्पष्टपणे सांगतात. संत कसे असतात तसेच संत कसे नसतात तेही सांगतात.

    'नव्हतो सावचित्त । तेणे अंतरले हित ।। असे होऊ नये म्हणून संतांनाही, संत म्हणून मिरवणाऱ्यानाही कस लावून तपासून पाहावे, असे स्पष्टपणे सांगतात.

    शुद्ध कसूनि पाहावे । वरील रंगा न भुलावे ।।
    तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले ।
    जरी हिंडविते देशोदेशी ।।
    हिरीयासारिखा दिसे शिरगोळा ।
    पारखी तो डोळा न पाहती ।।
    देऊनिया भिंग कानाविले मोती ।
    पारखिया हाती न पाहाती ।।

    सोन्याचा मुलामा दिलेले नाणे सोन्याच्या मोलाने चालत नाही. शिरगोळ्याला हिऱ्याचे मोल मिळत नाही. रत्नपारखी पारख करतो, तसे संतांना पारखावे.

    संतांची सोंगे संतांसारखीच वाटतात. पण दोन्ही दिती सारखी। वर्म जाणे तो पारखी ।। मनाने तटस्थ असणारा आणि आळशी, ध्यानस्थ बसलेला आणि झोप घेणारा, सर्वस्वाचा त्याग केलेला आणि पोटासाठी जोग घेणारा, देवासाठी आर्त असणारा आणि पोटासाठी भक्ती करण्याचे सोंग करणारा असे दोन्ही सारखेच दिसतात. म्हणून वर्म जाणावे.

    संतांची सोंगे स्वतःविषयी बढाया मारतात.

    डबक्यातल्या बेडकाने सागराचा धिक्कार करावा, कावळ्याने मी राजहंस आहे, असे म्हणावे, गाढवाने मी गजाहून थोर आहे, असं म्हणावे तसे ढोंगी संत मिरवतात.

    फुगते काउळे म्हणे मी राजहंस आगळे
    मुलाम्माचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ।।

    कोल्ह्याच्या गर्जना कुठपर्यंत? सिंह पाहिला नाही तोपर्यंतच. गारा तोपर्यंतच शोभतात, जोपर्यंत हिरा प्रकाशला नाही. ढोंगी संत स्वतःच्या संतपणाच्या गोष्टी कुठपर्यंत करतात? जोपर्यंत तुकारामांसारखा संत भेटला नाही.

    तोवरी तोवरी संतांचिया गोष्टी ।
    जव नादी भेटी तुक्यासवे ।।

    संतांच्या सोंगांची ही संतपणाची लक्षणे दाखवणे म्हणजे वांझेने गरवार लक्षण दाखवणे आहे.

    वांझेने दाविले गऱ्हावार लक्षण ।
    चिरगुटे घालून वायथाला ।।
    गन्हवारे हा विधी । पोट वाढविले चिंधी ।
    लावू जाणे विन्हे । तुका साच आणिक कल्हे ।।

    अशा ढोंगी संतांच्या नादी लागलो तर परमार्थ साधना दूर, देव भेटणे दूरच. सर्व प्रकारचे शोषण मात्र हमखास होते. चोराच्या संगतीने चोरीची इच्छा व्हावी, व्यभिचाऱ्याच्या संगतीने व्यभिचाराची इच्छा व्हावी, तसे हो. सर्व वाया जाते. समाजात अपकीर्ती होते. अशा ढोंगी संतांकडून, संतांच्या सोंगांकडून उद्धार होऊ शकत नाही.

    दगडाची नाव आधीच ते जड
    काय ते दगड तारू जाणे ।।
    तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी
    सोंग संपादणी करती परि ।।

    गाढवाने कितीही शृंगार केला तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही.

    गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ।।
    संतपणाची कितीही बाह्य लक्षणे दाखविली तरी अशा संधिसाधूंचा मूळ धर्म सुटत नाही.

    अशी संतांची सोंगे कशी ओळखावीत? याविषयीही निःसंदिग्धपणे तुकोबा मार्गदर्शन करतात.

    तरी ते संपादिले सांग कारणावाचुनी व्यंग ।।
    भोंदावया मीस घेऊनी संतांचे ।
    करी कुटुंबाचे दास्य सदा ।।

    पोपटासारखे बोलणारे, लोकरंजन करणारे, द्रव्यासाठी शिकवले तसे बोलणारे, पाठांतर करून ज्ञानी म्हणून मिरवणारे, संतचिन्हे मिरवणारे खरे संत नसतातच.

    संताचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरवती जगी ।।
    कामक्रोधलोभ चित्ती । वरिवरि दाविती विरक्ती ।।

    असे अनेकजण संत म्हणून मिरवताना दिसतात. पण संत म्हणून मिरवणाऱ्यांना कस लावावा. परीक्षा घ्यावी. हिरा म्हणून मिरवणाऱ्या गारांना घणाने ठोकून पाहावे
    हिऱ्या ऐशा गारा दिसती दुशेन ।
    तुका म्हणे पण न भेटे तो ।।

    संत आणि संतांची सोंगे सारखीच दिसतात.
    दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे तो पारखी ।
    म्हणून संत कोण नाही, याविषयी तुकोबा सांगतात.
    अध्यात्मपर कविता करतात, संत आडनाव आहे,
    कीर्तन करतात, पुराणे सांगतात, वेद पठण करतात, कर्मकांड करतात, तीर्थाटन करतात, वनात राहतात, अंगाला भस्म लावतात, माळा नुती परिधान करतात, असे सर्व संत नाहीत. ही सगळी बाह्य लक्षणे होत. हे सर्व संसारी लोक आहेत. देह निरसला नाही, ते सर्व संसारी होत. संत नव्हेत. बाह्य लक्षणांना महत्त्व नाही. भगवेपणा लक्षण मानले तर कुत्रा भगवाच असतो, जटा वाढवणे संतांचे लक्षण असते तर अस्वलही संत ठरेल. भूमीत गुहा खोदून राहणारा संत असता तर उंदीरही संतच ठरला असता की! कशासाठी अशी खटपट करावी?

    लोकांनी भुलावे म्हणून ही सारी सोंगसंपादणी! कीर्तन करणे, भक्तिगीते गाणे, जडीबुटी देऊन चमत्कार करणे, शिष्यशाखा वाढवणे, आपण अयाचक असल्याची प्रसिद्धी करवणे, मठपती होणे, देवार्चन करणे, देवाचे दुकान मांडणे, वेताळ वगैरे प्रसन्न आहे, असे पसरवणे, पुराण सांगणे, अध्यात्मपर घटापटादींवर वाद घालत चर्चा करणे, पढीक पंडित असणे, आगम जाणणे, स्तंभन विद्या जाणणे, पुरस्कार मिळवून मोठेपणा बिंबवणे असे उपद्व्याप करणारे संत नव्हेत. हे कपटी लोक असतात.

    केस वाढवणे, अंगात भुते आणणे, नरनारी जमवून शकून सांगणे ही संतांची लक्षणे नव्हेत. तरी ते नव्हती संत जन । तेथे नाही आत्मखुण ।। अध्यात्मिक, धार्मिक लक्षणे दाखवणारे संत नव्हेत. तंबाखू, भांग सेवन करणारे, गांजा ओढणारे संत नव्हेत. ही सारी संतांची सोंगे आहेत.

    ऐसे संत झाले कवी । तोंडी तमाखूची नळी ।।
    ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू।।
    दावुनी वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ।।
    तुका म्हणे सांगे, किती । जळो तयांची संगती ।।

    भोंदू संतांची लक्षणे म्हणजे कर्मकांड करणे, वैराग्याची लक्षणे दाखवत भोग घेत राहणे, अशा भोंदूची संगत धरू नये. असे पिंड पोषण करणारे संत नव्हेत. त्यांच्या लेखी जीव हाच देव. भोजन हीच भक्ती. मुक्ती म्हणजे मरण. असे भोंदू पापपुण्याचा विचार न करता आचरण करतात. स्वतः उंच जागी बसून मोठेपणा मिरवतात. टिळा-टोपी अशी सजावट करतात, ध्यान धारणा करण्याचे नाटक करतात.

    बक ध्यान करी । सोंग करूनि मासे मारी ।।
    असे ढोंगी संत नसतात. हरिकथा सांगणारे संत नव्हेत. अशी अनेक लक्षणे दाखवणारे दुकान मांडे असतात. संत नसतात.

    असे मांडिले दुकान ।
    कथेमध्ये हलवी ढोंग । संत नव्हे ते बेसंग ।
    पाहुनी स्त्रियांचा मेळा । काढी सुस्वर तो गळा ।
    तुका म्हणे नव्हे योग । पोटासाठी केले ढोंग ।।

    भविष्य सांगणारेही संत नव्हेत.
    जगरूढीसाठी घातले दुकान ।
    जातो नारायण अंतरुनि ।।

    ऋद्धीसिद्धचे साधक, वाचासिद्ध हे संत नव्हेत.
    तीर्थस्नान करणारे, उपास करणारे संत नव्हेत.

    अंतरीची बुद्धी खोटी । भरले पोटी वाईट ।।
    मंदिरातील पुजारी, शब्दज्ञानी, पंडित, जातीचे ब्राह्मण, याज्ञिक, होम हवन करणारे, पूजा सांगणारे हे सारे संत नव्हेत. देवाच्या, धर्माच्या आधारे जगणारे ते पोटभरू होत. शोषक होत. पिंडपोषक होत. वित्त, धन, सभा, कीर्ती, जमीन अशा अनेक गोष्टी प्राप्त करणारे शोषक होत. पाखंडी होत.

    पाखंडांचा, पाखंड्यांचा मेरुमणी म्हणजे स्वतःला परमपूज्य म्हणवणारे स्वयंघोषित देव. देव, धर्म यांमुळे सामान्य माणसालाही मान मिळतो. पाखंडी, संतांची सोंगे देवाच्या आश्रयाने समाजात वावरतात. देवाला मिळणारे, देवाच्या नावाने मिळणारे सर्व काही अशा संधिसाधूंना मिळू लागते. दसऱ्यामुळे आपटा, सवंदर अशा रानचाऱ्यालाही महत्त्व प्राप्त होते. पाण्यामुळे मातीच्या घागरीलाही डोक्यावर घेतले जाते. दाण्यामुळे मापाचीही देव घेव होते. तसं 'देवामुळे मान । नाहीतरी पुसे कोण? ।।' देवामुळे आणि संतपदाच्या महात्म्यामुळे मुलाम्याच्या नाण्यांनाही स्थान मिळते. पण हे ढोंगी गुरू, स्वामी, स्वयंघोषित परमपूज्य तर देवाचेच मारेकरी ठरतात. देवाला बाजूला सरकवून स्वतःलाच ते देव, देवाचे अवतार, अवताराचे अवतार इतकेच नाही काही तर अवतार घेणारी सुप्रीम पॉवर आपणच आहोत, असे घोषित करू लागतात. प्रक्षेपित करू लागतात. तुकोबांच्या काळीही असे लोक होतेच. ज्ञानेश्वरांच्याही काळात असे पंथ संस्थापक दिसतात. आपणच परमेश्वराचा शेवटचा अवतार! माझ्यानंतर अवतार नाहीच, असे म्हणणारे. तुकोबा 'देही', 'देव', 'जली' जनार्दन, 'भूती' भगवंत, 'जगी' जगदीश्वर, ‘विश्वी विश्वंभर' असे परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूप स्वानुभवाने सांगतात. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे।' अशी गर्जना करतात. पण हे ढोंगी परमपूज्य केवळ आणि केवळ स्वतःलाच परमपूज्य, परमेश्वर मानतात. तुकोबा म्हणतात,

    एक म्हणती आम्ही देवचि पै झालो ।
    ऐसे नका बोलो । पडाल पतनी ।।
    एक म्हणती आम्ही देवाचि पै रूपे ।
    तुमचे नि बापे न चुके जन्म ||
    स्वतःला देव घोषित करणे पाखंडीचा अतिरेक आहे.
    अहं म्हणे ब्रह्म । नेणे भक्तीचे ते मर्म ।
    तुका म्हणे क्षण । नको तयाचे दर्शन ।।
    स्वतःला देव समजणाऱ्यांची भक्ती करणे म्हणे आपल्या आयुष्याचे मातेरे करणे होय.
    सानुनिया नरा । कोण आयुष्याचा मातेरा ।।
    अशांच्या नादी लागणे म्हणे
    गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले
    तोंड काळ झाले जगामाजी ।।

    अशी संतांची सोंगे विदेही नसतात. देहाचे चोचले पुरवणारे इंद्रियभोगी असतात. कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. परमेश्वर षड्गुण संपन्न असतो.

    षडगुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंती जाण ।।

    यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असे परमेश्वराचे सहा गुण. त्याचप्रमाणे परमेश्वराचे दुसरे सहा गुण म्हणजे सर्वज्ञता, तृप्ती, अनादिज्ञान, स्वातंत्र्य, शक्तिप्रकाशन आणि अनंतशक्तित्व असे गुण ज्या माणसात असतात, त्याच्या मनुष्यपणाचा चिरा पडतो. त्याचे मनुष्यपण संपते. पण हे ढोंगी, दांभिक, इंद्रियभोगी स्वघोषित परमपूज्य तर धन, द्रव्य, दारा, जमिनी, कीर्ती पुरस्कार, मान्यता, मान यांचे आयुष्यभर भुकेले असतात. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या आश्रयाने सर्व सुखोपभोग प्राप्त करतात. मठ, ट्रस्ट यांच्या आड सर्वकाही पचवतात. स्वतः अयाचित असल्याचे पसरवून शिष्यांद्वारा कलेक्शन करतात.

    आमचेहि गोसावीयाची अयाचित वृत्ती
    देती शिष्याहाती उपदेश ।।

    भावपुष्प, भावसमर्पण, अशा गोंडस नावांनी भक्तांकडून नियमितपणे 'देवाचा वाटा' म्हणून धन उपटले जाते. त्यासाठी अध्यात्माची परिभाषा साधन म्हणून वापरली जाते. 'देवाचा वारा देव नाही तो चोर आहे, असे गीतेत सांगितले आहे, असा पण देवाचा वाटा स्वतःच हडप करणारा कोण? महाचोर. असे महाचोर उदंड जाहले आहेत. देवकृषी, देवराई अशा गोंडस नावांनी खाजगी आणि शासकीयही जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यांच्या स्त्रीईषणा, धनईषणा, लोकेषणा, कीर्ती ईषणा, अपत्य ईषणा प्रचंड असतात. अध्यात्माच्या परिभाषेत त्या छान घोळलेल्या असतात. आपल्या स्थैर्याला, प्रतिभेला धक्का लावणाऱ्याच्या मागे ते सर्व प्रकारची झेंगटे लावतात. त्याची बदनामी करतात. पुरता काटा काढतात. आपले पितळ उघडे पाडणाऱ्याला, त्याचे स्वरूप उघडे करणाऱ्याला जगातून नाहीसेही करायला कमी करत नाहीत.

    तुकोबा अशा स्वयंघोषित परमपूज्यांपासून, स्वयंघोषित देवांपासून सावध रहायला सांगतात.

    देवा धर्माच्या आधारे चालणारे अन्यथा ज्ञान भावनिक शोषण करते. इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. पिंडपोषक पाखंडी, संतांची सोंगे म्हणजे मुलाम्याचे नाणे आर्थिक शोषण करतात. विपरीत ज्ञान पसरवून स्वतःचे महत्त्व वाढवतात, मार्गदर्शन करीत आहोत असे दाखवत आडमार्गाला घेऊन जातात. हे देवाच्या मार्गावरील वाटमारे होत. देवाकडे जाणारे वित्त-जमिनी इत्यादीच नव्हे तर श्रद्धा-भक्ती यांचीही हे वाटमारी करतात. खऱ्या ज्ञानापासून, खऱ्या देवापासून दूर नेतात.

    संतांची भावात्मक लक्षणे सांगून तुकोबाअभावात्मक लक्षणेही सांगतात व संतांच्या सोंगांचं पितळ निर्भीडपणे उघडे पाडतात. रोखठोकपणे, स्पष्टपणे सांगतात,

    तुका म्हणे सत्य सांगो । येवोत रागे येतील ते ।
    सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ।।

    अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचे समकालीन सालोमालो, मंबाजी, रामेश्वरभट्ट समाजाचे असे अनेक प्रकारचे शोषण करताना त्यांनी पाहिले असतील. आज तुकोबा असते तर अध्यात्माची दुकाने मांडून बसलेले बाबा, दादा, नाना, ताई आणि बापू अशा अनेक खिसेकापूंवर तुटून पडले असते. तुकोबांचे संतत्त्वाविषयीचे निकष सार्वकालीक असल्याचे प्रत्ययास येते संतांची सोंगे ओळखण्यासाठीही तुकोबांनी दृष्टी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या दृष्टीने पाहू या आणि सावध होऊ या.

    -- डॉ. प्रकाश सपकाळे,
    जळगाव

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

      October 6, 2022


  • नाट्य-चित्र कानोसा – झपाटलेला २ – 3D

    वीस वर्षांपूर्वी जेव्हा एका प्रसंगामध्ये लक्ष्या आणि तात्या विंचू यांच्या बाचाबाचीत इंस्पेक्टर महेश जाधव कडून बाहुलारुपी तात्या विंचूच्या कपाळात मध्यभागी गोळी लागून त्याचा मृत्यू होतो. इपाटलेला २ मध्ये याच तात्या विंचूचा आत्मा बाबा चमत्कार कडून पुन:रुजिवीत करण्यात येतो. याच तात्या विंचूचा २० वर्षांनंतर वावर या पृथ्वीवर कसा आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे,

      June 10, 2013


  • पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने आखलेले विविध प्रकल्प

    रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.

    आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.

    विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.

    येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी 'ग्रीन ट्रेन' सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 25, 2022


  • विपश्यनेचा योगायोग

    पुण्यात राहात असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या विपश्‍यना केंद्राची पाटी अनेक वेळा पाहिली होती. पण मनात असूनही कधी चौकशी केली नव्हती.

    पुढे बघू...आत्ता काय घाई आहे, या नावाखाली मनातली उत्सुकता पूर्णपणे दडून गेली. पण अमेरीकेत सहा महिन्यांसाठी मुलाकडे आल्यावर मात्र असा योग आला की...

    अमेरिकेत आल्यावर लांबच्या, जवळ्च्या, स्थळांना मुलाच्या-सुनेच्या सवडीप्रमाणे भेटी देत होतो. संपूर्ण हिरवागार परिसर... उंच उंच झाडी, त्यात लपलेले मोठे - लांब लांब जाणारे रस्ते, त्यावरुन प्रचंड वेगाने जाणाऱ्या मोटारी color=#0000ff size=5>, व कधीही न थांबणारी वाहतूक...आपल्याकडे दिवाळीत असते त्याप्रमाणे प्रसन्न हवामान... ह्यामुळे दिवस मजेत जात होते. एक दिवस सचिनचा - भाच्याचा फोन आला, तो टेक्सास राज्यात डलासला राहतो. त्याने विपशनाचा कोर्स बद्द्ल

    सांगितले व अमेरिकेत विपशनाची अनेक केंद्रे आहेत, व सदर कोर्स इथेच केल्याचे सांगितले, झाले... पुनः मनात दडवून ठेवलेली उत्सुकता जागी झाली. शेवटी वेबवर जाऊन माहिती काढली. अमेरिकेत- आमच्या राज्यात

    म्हणजे मॅसेच्युसेटस् मधेच सेलबर्न मध्ये विपशना केंद्र असल्याचे समजले. ऑनलाईन अर्ज केला. पण ऑगस्ट महिन्यात माझा नंबर लागला नाही म्हणून यांनाही त्यांचा लागलेला नंबर रद्द करावा लागला. सप्टेंबरच्या कोर्ससाठी

    अर्ज दिला, व एकदाचा दोघांचा नंबर लागला. ३ सप्टे.ते १४सप्टे.२००८ असा दहा दिवसाच्या कोर्ससाठी आम्हा दोघांना तेथे सोडून मुलगा व सून परत गेले, म्हणजे लॅनकॅस्टरला रवाना झाले.

    पहिल्या दिवशी संध्याकाळी सर्व साधकांना विपश्यनेची माहिती व दिवसाच्या कार्यक्रमासंबधी सूचना देण्यात आल्या. व दिवसातून १६ तासाच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक मिळाले. सकाळी ४ वाजता उठल्यापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत ठासून भरलेला कार्यक्रम होता. पण कोर्सला आल्यावर मधेच कोर्स सोडता येणार नाही. असे अर्जात भरुन घेतले होते. शिवाय १० दिवस मौनव्रत, अजिबात बोलता येणार नाही, मोबाईलपण

    बाळगता येणार नाही, टिव्ही नाही, पुस्तकही नाही, कुणाशीही बोलायचे नाही, खाणाखुणासुध्दा करायच्या नाही, एकमेकांना स्पर्श करायचा नाही, हजर झालेल्या दिवशी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत विपशनाबद्दल श्री. गोयंका यांची टे ऎकवण्यात आली.

    पहिल्या दिवशी सकाळी ४ वाजता मंदिरात वाजते त्याप्रमाणे घंटेचा नाद झाला, त्याबरोबरच खरोखरच एव्हढ्या सकाळी जाग आली, प्रातःविधी व स्नान आटोपून ४.३० ला मेडिटेशनहॉलमधे दाखल झाले, मंद दिव्याच्या प्रकाशात अत्यंत शांतता असलेल्या हॉलमधे नेमून दिलेल्या जागेवर योग्य वाटतील अशा उशा, आसने घेउन बसले. आणि आमची विपश्यनेची पहिली पहाट सुरु झाली, घनगंभीर आवाजात पाली भाषेत प्रार्थनेचे स्वर ऐकू आले. शांतपणे डोळे मिटून, मनातील विचार बाजूला सारुन, निर्विकारपणानं मनात कुठलाही विचार न करता स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. त्यात सुरवातीला केवळ श्वासावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत अशा अवस्थेत बसल्यानंतर ना श्त्याची घंटा वाजली. पुःन्हा ८ वाजता हॉलमधे वरील साधनेची

    उजळणी करुन घेण्यास सुरवात झाली. कुणीही एक शब्दही बोलत नव्ह्ते. अत्यंत शांत अशा वातावरणात मनाचा असा अभ्यास सुरु झाला. सकाळी दोन तासात किती व मनकिती एकाग्र झाले ते कुणीही सांगू शकणार नव्ह्ते. बैठक-मांडी

    घालून बसल्यानेव सवय नसल्याने पाय दुखत होते, सकाळ्चा नाश्ता जरा बऱ्यापौकी झाल्याने - डुलकी येणे साहजिकच होते.- तशी हॉलमधे शांतता होती. कधी मधूनच मांडी बदलण्याची बैठ्क बदललेल्याची हालचाल व आवाज येत होते . कुणीतरी मधूनच खोकत ह्या शांततेचा भंग करत होते. पुःन्हा पाली भाषेत गंभीर पण शांत स्वरात शब्द कानावर पडत होते.- ते आम्हांला समजत होते. व त्यामुळे होणारा पायांना त्रास कमी झाल्याचा भास होत होता.

    दुपारचे अकरा केंव्हा वाजले कळलेच नाही. जेवणाची घंटा झाली. नाश्त्याप्रमाणे जेवणाची सोयही बायकांची पुरुषांची वेगवेगळ्या ठिकाणी केली होती. जेवणांत सर्व पदार्थ शाकाहारी होते. अनेक पदार्थ असल्याने सर्वाच्यां आवडीनिवडी

    राखण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. त्यानंतर एका तासाची विश्रांती होती. त्यानंतर पुनः साधना - ५ वाजता चहाची सुट्टी झाली. यावेळी दूध-चहा- काॅफी/फळे ठेवलेली होती. संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत साधना त्यानंतर भाषावार प्रवचने-इंग्लिश-रशियन- हिंदी- स्पॉनिश माध्यामांच्या साधकांची वेगवेगळी सोय करण्यात आलेली होती. ह्या एक ते दीड तासात व्हिडीओवरुन गोयंका यांचे १ल्यादिवसाचे प्रवचन दाखवण्यात व ऎकविण्यात आले.

    २५०० वर्षापुर्वी भारतात वैभवावर असलेली ही विपश्यनेची विद्या जवळजवळ नाहीशी झाली.व तीचे पुर्नःजीवन करण्यासाठी तसेच मानवाला राग-लोभ-द्वेष या विकारापासून मुक्त करण्यासाठी व शांतता- प्रेम-बंधुभाव-यांची जोपासना होण्यासाठी विपशना कशी उपयोगी आहे.हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अनेक उदाहरणे देउन स्पष्ठ केले. या बरोबरच-मन-एकाग्र करण्यासाठी शांतता-मौनव्रत- शाकाहार व्रतस्थ-वृती यांची आवश्यकता कशी आहे. हे स्पष्ठ केले. त्यानंतर पुःन ८.३०ते ९ पर्यंत साधना करण्यास मेडिटेशन हॉलमधे जाउन बसले. ९ वाजता रुममधे जाउन पलंगावर अंग टाकले. कधी डोळा लागल कळलेच नाही.

    दुसऱ्या दिवशी आपोआप ४ वाजता जाग आली. सदर साधनेत १०-१५ इंडियन -अमेरिकन-स्पॅनिश-चिनी- आफ्रिकन असे सर्वजण स्री- पुरुष मिळून साधारण १५० साधक सहभागी होते. २०-२५ वर्षाच्या वयाचे तरुणापासून ६५

    वर्षाच्या व्रुध्दापर्यंत सर्व सहभागी होते. सर्व एकमेकांना पहात होते. पण मौन-व्रत अत्यंत काटेकोरपणे पाळत होते. विश्रांतीच्या वेळेत पुरुष त्यांना दिलेल्या जागेतच फिरत होते. स्रिया त्यांच्या जागेतच फिरत होत्या. ३-४ जोड्पी सदर साधना शिबीरात होते. पण एकमेकांचे तोंडही त्यांना १० दिवस दिसत नव्ह्ते. किंवा तसा कोणी प्रयत्न करत नव्ह्ते. स्रियांनी दंड-गुढगे झाकले जातील असेच कपडे घालायला पाहिजेत अशी एक अट होती. मेडीटेशन हॉलमधे (साधना-मंदिरच) शब्द योग्य आहे. स्वच्छ -शांत

    मंद प्रकाशाचे दिवे होते. समोरच्या स्टेजवर टिच्रर- गुरु व स्रियांसाठी गुरुमां असे शांत चेहेयाचे दोघे अमेरिकन गुरु बसले होते. मनात विचार चमकून गेला की २५०० वर्षापासूनची पुराणी-विद्द्या, भारतीय विद्या भारतीयांना अमेरिकेत येवून गो- याकडुन एसी हॉलमध्ये लोड-तक्या घेउन शिकावी लागते. हा कसा योगायोग आहे. पण दुस-या क्षणी त्या गुरुंच्या जागी ॠषीतुल्य- शुभ्रदा्ढी वाढवलेले डोक्यावर जटा-बांधलेले पांढरे शुभ्र वस्र परिधान केलेल्या भारतीय ॠषिमुनींची मूर्ती उभी राहिली आणि ह्या अमेरिकन गुरु व गुरुमांच्या बद्द्ल मनांत प्रचंड आदर निर्माण झाला. गुर्रुदेवोभवो. गुरु सर्वत्वे पुज्जंते !

    अशा भारावलेल्या वातावरणांत अशी साधना पुढे चालू होती. दिवसेंदिवस मनाविषयी ज्या पध्द्तीने आपण कधीच विचार केला नाही त्याचा अभ्यास सुरु झाला. माणसाचे मन फार फार महत्वाचे आहे. त्याने मनावर घेतले तर म्हणजे मनाने मनावर घेतले तर, मनुष्य विकार-रहित होऊ शकतो. मनावर आघात करणारे विकार राग-लोभ-द्वेष-आनंद- दुःख-सुख हे सर्व विकार आहेत त्यांना ताब्यात ठेवता यावे म्हणून मन ताब्यात पाहीजे. आपण आपल्या मनाच्या बाबत कधी विचारच केला नाही. एकाग्र होऊन बसलोच नाही--- हळूह्ळू आपण मनाला विचार- रहित करु शकू असे वाटू लागले. ३ रा-४ था दिवस असेल वाटत होते. आपले मन स्थिर होत आहे. पण छेः,एका क्षणांत ते हुलकावणी देऊन दुर गेलेले असायचे पुःन्हा कसेतरी करुन, धरुन आणले तर क्षणांत दूर पळून जायचे. एखाद्या मदा-याचे खेळ करणारे माकड त्याच्याकडुन सुटून य़ा झाडावरुन त्या झाडावर पळून जाते, त्याच्या हातात येतच नाही तशी गत झालेली असायची. मला तर नक्की वाटते या जगांत नव्हे या विश्वांत कुणाचा वेग जास्त असेल तर तो मनाचा...सर्वापेक्षा जलद , घडीत येथे तर दुस-याक्षणी माझ्या सिंहगड-रोड-च्या पुण्याच्या घरी तर कधी भुतकाळात घड्लेल्या घटनाकडे बरे साधे नाही त्या त्या प्रसंगाचे स्थळाचे- काळचे चित्ररुप मनःचक्षुं समोर साकारुन क्षणात जुन्या मैत्रिणीच्या वहीतील क्षराकडे तर क्षणात नातीच्या बोबड्या बोलाकडे किती प्रचंड -वेग! कधी जुना प्रसंग आठ्वून क्रोधित होणारे, कधी आनंदाचा प्रसंग आठ्वून आनंदीत होणारे मन - आपलेच,पण आपल्याला न कळलेलं... वर्तमानात काय आहे- या क्षणी काय आहे यावर नियंत्रण न ठेवणारे असे मन कसा आवर घालणार अन कसे निर्विकार करणार?

    गोयंका यांनी रोजच्या प्रवचनातून हळूह्ळू मन कसे एकाग्र करता येईल या बाबत खूपच छान व सोपे करुन सांगितले. प्रथम-प्रथम केवळ मनाचे लक्ष श्वास कसा येतो व जातो याकडे यावर स्थिर करावयाचे २/३ दिवस याचीच साधना करावयाची व नंतर मन पुरेसे सूक्ष्म झाल्यावर आपण त्याच्यामाध्यमाने आपल्या शरीरावर विकारांचे होणारे दृश्य व सुप्त परिणाम स्थितप्रज्ञ होऊन जोखावयाचे व विश्वांत ज्याप्रमाणे उत्पत्ति -हास -पुनः उत्पत्ति -हास- असे चक्र चालू आहे त्याची जाणीव मनाला करुन द्यावयाची जेणे करुन दु:ख सुख हे त्या त्या विकांराची उत्पत्ती करतात.पण ते सर्व अनिश्चल आहे. निश्चल नाही- हे समजावयाचे,तसे वाचून हे सोपे वाटते,पण यावर अमंल करणे कठीण आहे-----पण अशक्य नाही.

    या मनाच्या शिक्षणाचे धडे रोज घेत होते.मौनाचे धडे चालू होते . काही प्रश्नांची उत्तरे मन स्वतःहूनच देत होते. -तर काही प्रश्न तेच निर्माण करुन गोंधळ करत होते. गोयंकाच्यां रोजच्या ध्वनी-दृष्य -प्रवचनांमुळे १-१-३० तास रोज मनाला -पर्यायाने स्वताःला नव्या ज्ञानाची मेजवानी मिळत होती. अडीअडचणीच्यावेळी गुरुजी धावुन येत होते. बाहेरचे

    वातावरण ३-४ दिवस अतिशय उत्तम होते.नंतर भरपूर पाऊस सुरु झाला. सूर्यदर्शन होईना.----मनावर वेगळे दड्पण येत होते. बाहेरचे वातावरणही मनावर संस्कार करत होते तर! शेवटचे २ दिवस उरले --- मन एकाग्र करण्यात थोड्यावेळ का होईना यश येत आहे असे वाटू लागले .--साधनेत ८व्या दिवशी नवीन भर पडली. आपल्या मनाने आपल्यातच अंर्तबाह्य स्पर्श करुन एकाग्र करण्याची व विकारावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरु झाला.विपशनाच्या

    साधनेत १ तासभर न हालचाल करता स्तब्ध बसता येऊ लागले. साधना मंदिरात साधकांची समाधी लागू लागली. आवाज, खोकणे, पायांचे दुखणे, कंटाळा, झोप सारे कुठे पळून गेले? ते कळलेच नाही. आयुष्यभर जमिनीवर न बसलेले अमेरिकन स्त्री-पुरुष ह्या साधनामंदीरात आनंदाने -- कुठ्ल्यातरी ओढीने -तासनतास शांतपणे बसू लागले होते.

    ध्यानमंदीर खरोखरच शांत- शांत झालेले दिसून येवू लागले. जेवण सुध्दां आपोआप कमी झाले. ठरल्यावेळी आपोआप जाग येऊ लागली. दिवसाचे १६ तास कसे संपत होते. कळत नव्ह्ते. ९ व्या दिवसाच्या प्रवचनांत, उद्या मौन संपेल व पाच मिनिटांची वेगळी प्रार्थना (अर्थात मुकपणे) होईल असे सांगितले.-तसेच एक मह्त्वाची गोष्ट सांगितली की -

    जरी जग हे नश्वर असले, जन्म /मरण हा फेरा असला, काहीही निश्चिंत नसले, तरी सुध्दा जग हे फार सुंदर आहे! प्रत्येकाच्या जन्मांचे काहीतरी कारण आहे. त्यामुळे ह्या जन्मा चा आपण उपभोग घेतला पाहीजे .प्रपंचात राहुन सुध्दा आपण आपला राग-लोभ-मद-मत्सर यांचा त्याग करुन शांती- प्रेम-आनंद- समाधान बंधुभाव -निर्माण करुन प्रसन्नपने जगले पाहीजे.

    १० व्या दिवशी सकाळ्च्या साधने नंतर मौन संपले----एवढ्या दिवस एकमेकांकडे नुसते निर्विकारपणे बघणारे हे माणुस नावाचे प्राणी -त्यांचा प्रत्येकाचा पुर्नजन्म झाल्यासारखे वाटत होते. सर्व आसमंतात आनंद- भरुन राहीला होता.एकामेकांविषयी सर्वाच्या मनांत केवळ प्रेमाची भावना चेह-यावर स्पष्ट दिसून येत होती. घरचे एखादे मोठे आनंदाचे कार्य संपल्यावर घरच्या प्रमुखाचे मन जसे काही होते.तसे भाव सर्वांच्या चेहे-यावर होते-- नव्हे मनांतही होते. एकामेकांविषयी एवढा आदर तर मी आयुष्यात प्रथमच बघत होते--इतके मन स्वच्छ झाले होते. काय बोलावे अन किती काही कळत नव्ह्ते त्यानंतरच्या साधनेत ही विपश्यना केलेली, शांती-प्रेम-आदर-समाधान-आनंद मिळाले त्यात सर्वांना पृथ्वीवरील, आकाशांतील, पाण्यातील, प्राणीमात्रांना सामावून घेत आहे. त्यांना सहभागी करीत आहे-.अशी प्रार्थना होती-आपल्या आनंदात सर्वांना-सहभागी करुन घेतल्याची भावना किती सुखावणारी-होती. गोयंका गुरुजीनीही त्यांची-गुरु- दक्षिणा-हीच मागितली होती.ह्या सर्व प्राणीमात्रांत मी सुध्दा आलो.त्यामुळे ही मिळ्णारी माझी गुरुदक्षिणाच आहे. असे त्यांनी प्रव नात सांगितले होते. शिबीराच्या ११ व्या दिवशी सकाळी घराकडे परत फिरावयाचे होते सर्वांना त्यांच्या रुम साफ करायच्या होत्या त्या सर्वानी अगोदरच केल्या होत्या. आवार,व्हरांडा,स्वंयपाकघर,रुमच्या समोरचा पॅसेज साधकांनी स्वच्छ केले.---पण खरे तर सूचना न देता सुध्दा साधकांना मनाने केले असते -कारण पुढे येणा-या साधकांसाठी तयारी करावयाची होती. मागच्या साधकांनी आमच्यासाठी रुम-एकदम स्वच्छ करुन दिल्या होत्या.तसेच आमच्या राहण्याचा/ खाण्याचा /बाकीच्या गोष्टी साठी- लाईट- पाणी-इत्यादी -चा खर्च हा मागच्या-शिबीराच्या साधकांनी देणगी देवून केला होता. तेथे सर् व गोष्टी आम्हांला मोफत होत्या.-त्
    ातही एक तत्व होते -माझा खाण्याचा (भिक्षेचा)

    खर्च दुस-याने केला होता.त्यात माझा'मी' गळुन गेला. जोपर्यंत हा 'मी' (आय) स्वतः मनात भरुन आहे.तो पर्यंत राग-लोभ ह्या षङरिपुनां मनात मुक्त प्रवेश आहे. एकदा का हा 'मी' माझ्यातुन गेला की उपासना सोपीच की ...तर

    पुढ्च्या साधकांना काहीतरी मिळावे यासाठी देणगी स्वखुशीने देण्याचे होते.त्याला कुणाचाही विरोध नव्हताच! सर्व साधक एकमेकांचा निरोप घेत होते.गुरु गृहातून स्वग्रृही जाणा- या पुर्वीच्या शिष्यांची आठ्वण झाली. त्यांच्या आमच्या भावनात फरक नसावाच ज्यांची स्वतःची गाडी नव्ह्ती त्यांना दुसरे लिफ्ट देत होते .रस्ता वाकडा करुन सुध्दा- थोडा चक्कर पडणार होता तरीही -- सर्वांच्या डोळ्यांत कृतकृत्याची भावना दिसत होती.

    ; योगु-लिनु आम्हांला घेण्यासाठी गाडी घेऊन आले. आणि या शिबीरातून...आश्रमातून ---बाहेर पडलो. पुर्नजन्म झाल्यासारखे... १० दिवसाच्या सोन्याच्या जन्मभराच्या आठवणी मनांत घेऊन.

    हल्लीच्या ह्या धकाधकीच्या ,जिवघेण्या ,स्पर्धेच्या ,आर्थिक चढउताराच्या काळांत माणूस किती अगतिक झाला आहे.एका प्रचंड मानसिक दडपण खाली जगतो आहे, आयटीच्या युगात - सर्वच अस्थिर -अनिश्चिंत आहे, त्याचीच भिती

    माणसाला वाटत असते.असा ताण सहन करण्याची ताकद संपली की जीवनच संपविण्याची इच्छा प्रबळ होत जाते! शांतता लाभावी -मन स्थिर रहावे यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे पडतात.कित्तेक शिक्षित चांगल्या उत्तम पगाराच्या,

    चांगली कौंटुबिक पार्श्वभुमी असलेल्या तरुणांच्या मनांत असुरक्षिततेचे विचार झटकन येतात -त्यांना हाकलून लावण्याची ताकद त्यांच्यात-त्यांच्यामनांत नसते. हाव-हव्यास मानगुटी सोडत नाही, यापुढे या पुढे--यापेक्षा मोठे --- यापेक्षा मोठे--सुख आणखी सुख आणखी पैसा पर्यायाने पैसा पैसा ---आणखी पैसा हा विचार सारखा घोळत असल्याने असलेला सुखाचा 'हा' क्षण वर्तमान काळातला क्षण -वाया घालवुन छातीफूटे पर्यंत धावत असतो. ह्या नावाखाली नैराश्याचा झटकाआला कि सारे संपले ."जग फार सुंदर आहे". याचाही विसर पडतो.आणि आत्महत्येत पर्यावसन होउन मागे उरलेल या स्वकियांना वा-यावरसोडुन स्वतः निघुन जातो. अशा काळात - 'विपश्यना' हा मार्गदर्शक --अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार--वाटाड्या नक्की ठरु शकणार आहे.

    ह्या'अनिंश्चल काळात- मार्ग नक्कीच निश्चल ठरु शकतो.मोठ-मोठ्या कंपनीत कारखान्यात , ताणतणावाचे काम करणा-या व्यक्तींसाठी आणि सर्वा-साठीच ही साधना अम्रुत ठरु शकते. याबाबत भारतातील उद्योगपती -आयटीतील वरिष्ट आघिकारी यांनी आपल्या कक्षेतील कर्मच्या-यांना, आघि-का-यांना ' ह्या' विपसनेच्या कोर्सला नक्की पाठवावे. त्याबाबतचा खर्च /रजा त्या त्या संबधात उद्योगाने करावा. त्यात त्यांचाही दीर्धकालीन फायद आहे.

    तेरा मंगल तेरा मंगल----तेरा--- मंगल ---हो---य---रे !!!.

    -- रजनी पवार

      December 5, 2010


  • औषधी वाळा – गरीबांचा A.C.

    वाळ्याला गरीबांचा A.C. म्हणतात. या बहुगुणी वाळ्याचा विशेषत: उन्हाळ्यात खूप उपयोग होतो.

    Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. वाळ्याला बेना, बाला, मुदीवाळा, कुरुवेल, सुगंधी-मूलक, उशीर, खर, बेकनम्‌, कसक्युकस ग्रास, व्हेटिव्हेरिया झिझॅनॉईडिस अशी अनेक नावं आहेत. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात "खस गवत" ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत. वाळा या गवता या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत. गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात. उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला मस्त सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्याड दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावं. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वाळ्याचे पडदे लावण्याची पारंपरिक प्रथा आपल्याकडे आहे. वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो. मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयोग करतावा. वाळा अत्तर म्हणजेच खसचं अत्तर. वाळ्याचा वास मनाला उल्हसित करतो, आपल्या संवेदनकेंद्रांना चेतना देतो. त्यामुळे आपल्याला सुगंधाचं ज्ञान होतं. वाळ्याचं चूर्ण अंगाला चोळलं तर त्वचेचा दाह कमी होतो. घामाचं नियंत्रण होतं आणि घामाची दुर्गंधीही कमी होते. चूर्ण पाण्याबरोबर पोटात घेतलं तर "तृषा' शमते आणि पोटातली कडकी कमी होते. वाळ्याचे तेल बाजारात ८ ते १०००० रुपये किलो दराने विकले जाते. वाळ्याचे तेल उध्र्वपातन पद्धतीने काढताना खूपच काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक सुगंधी तेल हे अनेक रासायनिक पदार्थाचे मिश्रण असते. यातल्या प्रत्येक पदार्थाचा उत्कलन बिंदू विशिष्ट असतो व इतरांपेक्षा भिन्न असतो. तसेच त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी (सापेक्ष घनता)मध्येही फरक असतो. ऑईल सेपरेटरद्वारे तेल व पाणी वेगळे करताना जर पाण्यापेक्षा सुगंधी तेल जड असले तर ते तेल भांडय़ाच्या तळाशी राहते व हलके असले तर पाण्यावर तरंगते. वाळ्याच्या तेलाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी .९९० ते १.०३२ असते. उध्र्वपातन प्रक्रियेने वाळ्याचे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर सुरुवातीला येणारे वाळ्याच्या तेलातील काही घटक हे पाण्यावर तरंगतात तर नंतर येणारे काही घटक हे पाण्यापेक्षा जड असल्याने भांडय़ाच्या तळाशी राहतात. बाजारात वाळा मिळतो. छोट्या शहरांमध्ये तर मिळतोच पण पुण्या मुंबईलाही मिळतो. काष्ठौषधी असलेल्या दुकानात नक्की मिळतो.

    वाळ्याचे औषधी उपयोग
    वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मुत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मुत्रल आहे.
    वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, हृदयरोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, व्रण आणि ज्वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात.
    वाळ्याचे तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. वाळ्यात रंगद्रव्ये, आयर्न ऑक्साेईड, आम्ल चुन्याचे प्रमाण असते. वाळ्याचे सरबत तर हिरव्या रंगामुळे व थंड गुणामुळे उपयोगी आहे.

    चंदन वाळा सरबत.
    साहित्य. चंदन पूड पाच ग्रॅम, वाळा पावडर पाच ग्रॅम, पाणी 50 मि.लि., साखर 100 ग्रॅम.
    कृती. पाणी उकळलेल्या पाण्यात चंदन व वाळा पावडर टाकून दोन तास झाकून ठेवावी. नंतर चमच्याने ढवळून गाळून किती होते ते मोजावे. एक वाटी मिश्रणास दोन वाटी साखर व एक वाटी पाणी याप्रमाणे घ्यावे. पाणी व साखर एकत्र उकळून फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागले, की गॅस बंद करून त्यात चंदन-वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण घालून चांगलं चमचाने ढवळून गाळणीने गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

      April 11, 2017