वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१९९९ चा विश्वचषक गाजविणारा आणि पदार्पणाच्या कसोटीत दोनदा सचिनचा बळी मिळविणारा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन.
January 24, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले
तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. "माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा."
हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.
तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.
विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !
हे सारं "तो" कोणासाठी करतोय ?
फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?
त्याच्या स्वतःसाठी !
त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
कोणी पाहो अथवा न पाहो....
तिथे कुणी येवो वा न येवो.....
देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे....
औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे....
गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ....
प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे....
काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे...
उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
की
पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे...
फुल होऊन फुलांकडे पहायचे....
आणि
प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !
या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.06.2017
June 6, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. "मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय."
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.
"मला ब्लडप्रेशर आहे,
मला डायबेटीस आहे,
मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,
माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,
मला थायराॅईड आहे,
किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं,
" तुम्हाला काय होतंय ?"
तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,
"तुम्हाला त्रास काय होतोय?"
तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो,
"मला तर त्रास काहीच होत नाही."
"मग औषध कशासाठी घेताय ?" असं परत विचारलं तर सांगतात, "डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती."
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत.
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.05.2017
May 23, 2017
केवळ मराठीचा विचार करायचा झाला तर आपल्या तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वर – नामदेवांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, भीमसेन जोशी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकणे म्हणजे भक्ती रसात पूर्णपणे बुडून जाणे. पण हे भक्ती संगीत जेव्हा खर्या अर्थाने लोकसंगीत होतं तेव्हा त्याचा जनमानसावरचा प्रभाव समजून येतो. मग ते गावातल्या देवळातले कीर्तन असो, दमल्या भागल्या कष्टकर्यांचा संध्याकाळचा भजनाचा विरंगुळा असो किंवा मिरवणुकांमधलं झांजा, लेझीम आणि ढोलकीच्या तालावरचा नाच असो.
कंट्री म्युझिकचे तिसरे महत्वाचे अंग म्हणजे देशभक्ती. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकनांमधे देशभक्ती नव्याने उसळून आली. त्याचे प्रतिबिंब संगीतात पडणे साहजिकच होतं. गेल्या ८-९ वर्षात बहुतेक सर्व मुख्य कंट्री कलाकारांची देशभक्तीपर गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यात आपल्या आसेतुहिमालय भारताप्रमाणे, अटलांटिक पासून ते पॅसिफिक पर्यंत पसरलेल्या अमेरिकेचे, त्यातल्या रॉकी पर्वतराजीच्या हिमाच्छादित हिमशिखरांपासून नेवाडाच्या वाळवंटापर्यंत असलेल्या नैसर्गिक विविधतेचे, विविधतेतल्या एकतेचे कौतुक केलेलं असतं. आपल्या शहीद आणि सरहद्दीवर देशासाठी प्राण देणार्या जवानांसारखंच, त्यांच्या जवानांबद्दल कृतज्ञता, अभिमान, प्रेम उचंबळून आलेलं असतं. जरी आपल्याकडे सैनिकांबद्दल कितीही आदर, प्रेम अभिमान असला तरी तो सहसा गणवेशातल्या सैनिकांबद्दल दिसतो. एकदा गणवेश उतरवला आणि सैन्यातून निवृत्ती घेतली की सर्वसामान्य नागरिकांच्या रूपात, सैनिकांना फारसं काही महत्व मिळत नाही. पण इथे मात्र सैन्यातल्या माजी सैनिकांना (veterans) भरपूर मान असतो. Veterans Day, Memorial Day अशा दिवशी हे सगळे जुने सैनिक (दुसर्या महायुद्धापासून ते कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध ते अगदी आताच्या इराक युद्धापर्यंत ) आपले ठेवणीतले गणवेश घालून, शौर्यपदके छातीवर लावून, मोठ्या अभिमानाने गावातल्या परेडच्या अग्रभागी संचलन करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. एकंदरीत इथे माजी सैनिकांना समाजात मोठं मानाचं आणि आदराचं स्थान आहे. त्यामुळे कंट्री म्युझिकमधे देशभक्तीपर गाण्यांमधे सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे वारंवार स्मरण केले जावे यात काही नवल नाही.
कंट्री म्युझिकचं शेवटचं महत्वाचं अंग म्हणजे आचरटपणा किंवा खोडसाळपणा. यात सगळंच आलं – दारू पिऊन घातलेला धिंगाणा, तरूण पोरींची घेतलेली फिरकी किंवा एखाद्या फटाकड्या पोरीला पटवण्याची धडपड वगैरे. मग त्यात एखाद्या बाजारात जाणार्या रंगूची छेड काढली जाते किंवा ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?’ अशी सरळ सरळ विचारणा केली जाते. कधी दादा कोंडक्यांच्या सोंगाड्या चित्रपटातल्या ‘माळ्याच्या मळ्यामधी कोन गं उभी?’, किंवा एकटा जीव सदाशिव चित्रपटातल्या ‘काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले’ अशा गाण्यांची आठवण व्हावी, अशी गाणी असतात. तर काही वेळा, सुलोचना चव्हाणांच्या ‘कसं काय पाटील बरं हाय का, काय काय ऐकलं ते खरं हाय का ?’ अशा टाइपची गाणी असतात.
पण या आचरट आणि सवंग गाण्यांच्या कलकलाटात, आणि ‘देव, देस अन धर्मासाठी’ टाइपच्या गाण्यांच्या गर्दीमधे, अनेक नितांत सुंदर गाणी ऐकायला मिळतात. गार्थ ब्रुक्स, ब्रॅड प्रेसली, ऍलन जॅकसन, मार्टिना मॅकब्राइड अशा दिग्गजांची कैक गाणी इतकी हळूवार, हळवी आणि कोमल आहेत की ती ऐकताना भाषा, शब्द, सुरांच्या माध्यमातून आपण भावनांच्या देशात जाऊन पोहोचतो. तिथे कुठली देश विदेशाची बंधनं? शेवटी भावना सगळ्या सारख्याच! त्यातलं गहिरेपण भावलं की देशांच्या सीमा पुसल्या जातात, काळ वेळाची गणितं अदृश्य होतात, जाती वंशाच्या खुणा धुसर होतात आणि धर्माचा जयघोष बंद होऊन नादब्रह्माचा साक्षात्कार व्हायला लागतो.
शेवटी लोकसंगीत म्हणजे काय? सामान्यांच्या दिनक्रमाचा एक अविष्कार! कष्टकर्यांच्या कष्टाचं ओझं हलकं करणारं, पीडितांना दोन घटका आपल्या दु:खाचा विसर पडून रिझवणारं, प्रेमिकांना जगाकडे व्याकूळ, भावुकतेनं बघायला लावणारं, पहाटेच्या सूर्याकडे बघून जीवनाबद्दल आश्वस्त करणारं, संध्याकाळच्या कातरवेळी अस्वस्थ करून सोडणारं, देशभक्तीने अंगावर रोमांच उभं करणारं, परमात्म्याशी संवाद साधू पहाणारं….. ते सारं लोकसंगीत !
भारत काय, अमेरिका काय, साउथ आफ्रिका काय, भाषा वेगळ्या, वाद्यं वेगळी, सूर वेगळे पण उगम मात्र एकच ! तोच तो गर्भातून आलेल्या हुंकारासारखा ! आदिम आणि अनंत !
-- डॉ. संजीव चौबळ
July 20, 2016
कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||
श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 4, 2020
वरवर पाहता प्रमुख रस्त्यांचं जाळं कोंकणात विणल्याचं दिसत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य रस्त्यांमध्ये सलगता आणि थेट जोडलेपणा यांचा अभाव आहे.
December 27, 2022
प्रकाशन दिनांक :- 07/12/2003
वर्तमानपत्रात बातम्यांना स्थान देताना साधारणपणे त्या बातम्यांचे महत्त्व पाहिले, तपासले जाते. सर्वाधिक महत्त्वाच्या बातमीला पहिल्या पृष्ठावर वरच्या भागात प्रसिध्दी मिळते. वृत्तपत्रीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत अशा बातमीला ‘लिड’ म्हणतात.
December 7, 2003
श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का?
September 6, 2019
राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद किंवा विश्ववाद रायचा आकडा. राष्ट्रवादात यांच्यात छत्तीसचा राष्ट्र प्रथम, देशाच्या सीमांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे, उद्योगांचे आणि आस्थापनांचे हित प्रथम त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य; आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट… कारण देश आत्मनिर्भर झाला तरच तो जागतिक महासत्ता होऊ शकेल हा विश्वास.
October 27, 2023

कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
May 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti