वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं.
1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली.
सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते.
सन १८९९ मध्ये जर्मनीत पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात अतिवेगवान ट्रेन सुरू झाली. तेव्हा तिचा वेग ताशी ७२ कि.मी. होता. पुढे १९०३ सालापर्यंत हा वेग ताशी २०६ कि.मी. इतका झाला होता.
१९५७ साली जपानमध्ये ताशी १४५ कि.मी. वेगाची पहिली गाडी सुरू झाली. १९६४ ऑलिंपिकचे औचित्य साधून टोकियो ते ओसाका ही पहिली बुलेट ट्रेन ताशी २१० कि.मी. वेगानं धावू लागली.
फ्रान्समध्ये ताशी ५४० कि.मी. इतका प्रचंड वेग घेणारी जगातील प्रथम क्रमाकांची वेगवान गाडी धावली, पण ती फक्त तंत्रज्ञान तपासण्याकरता वापरली गेली. २००७ पासून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, या देशांना जोडणाऱ्या अतिजलद गाड्या (२५० ते २७० कि.मी. ताशी) २०० गावांपर्यंत पोहोचल्या आहेत.
स्पेनमध्ये ताशी ३१० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांचं जाळं ३१०० कि.मी. इतकं आहे. जपानमध्ये २३८८ कि.मी., तर तैवान मध्ये ३४५ कि.मी. लांबीचं जाळं आहे.
जगात आज पहिला क्रमांक चीनचा असून १०,००० कि.मी. लांबीच्या रेल्वे जाळ्यावर ताशी २५० ते ४३० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्या धावत असतात.
-डॉ. अविनाश वैद्य
बिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली.
२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात.
हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे.
पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांग्ला देश) भागात पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा लादण्याच्या अविचाराविरूद्ध आंदोलन सुरू झाले ! हे आंदोलन खूप भडकले तेव्हा आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी ढाक्का विद्यापीठात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कराने २१ फेब्रुवारी १९५२ या दिवशी गोळीबार केला. पूर्व पाकिस्तानात उर्दू लादू नये आणि सर्व शासकीय कारभार बंगालीतच असावा या जनतेच्या मागणीला उन्मत्त सत्तेने गोळीबाराने उत्तर दिले !
२१ फेब्रुवारी हा दिवस बांग्ला भाषेसाठीच्या तीव्र आंदोलनाचा प्रेरणा दिवस ठरला. १९५३ पासून दरवर्षी बांग्ला भाषेच्या आग्रहासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस पूर्व पाकिस्तानात भाषाग्रह दिवस म्हणून साजरा होऊ लागला. पाकिस्तानचे केंद्र सरकार उर्दूचा हट्ट सोडत नाही आणि बांग्ला भाषेची जास्तच गळचेपी होतेय हे लक्षात आल्यावर या भाषाग्रहाचे रूपांतर पुढे " पाकिस्तानच नको, स्वतंत्र देशच हवा " या मागणीत झाले !
बांग्ला भाषाग्रहामुळे देश स्वतंत्र झाला याच भावनेतून बांग्ला भाषकांनी आपल्या नव्या देशाचे नाव बांग्ला देश ठेवले. जगात बहुतेक देशांच्या नावावरून त्या देशातील सर्वाधिक प्रचलित भाषेचे नाव ठरले आहे पण बांग्ला देशाचे एकमेव उदाहरण असे आहे की येथील प्रमुख भाषेचे नावच त्या देशाला दिले गेले आहे !
काही वर्षांनी बांग्ला देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनात बांग्ला देशाच्या प्रतिनिधीचे पहिले भाषण झाले. त्यात या प्रतिनिधीने बांग्ला देशाच्या वतीने मागणी केली की, मातृभाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी दिलेल्या लढ्यातून निर्माण झालेला बांग्ला देश हा जगातील पहिला देश आहे. बांग्ला देशातील या यशस्वी भाषाग्रही लढ्याचा प्रेरणा दिवस २१ फेब्रुवारी आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाने बांग्ला देशाचा हा प्रेरणा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करावा.
ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस ' जागतिक मातृभाषा दिवस ' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
-- निनाद अरविंद प्रधान
‘पूर्णांक’ने आपल्या नाट्यप्रवासात ‘भक्ष्य’, ‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’, ‘राक्षस’, ‘म्हातारबाबा कुठे चाललात?’, ‘यू बी द जज’ या एकांकिका आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके सादर केली.
पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता भारतीय रेल्वेनं हरितक्रांती योजना विविध स्तरावर अमलात आणण्यास सुरुवात केलेली आहे.
भारतातील हरितक्रांतीचं प्रतीक असलेलं पहिलं स्टेशन मानवळ हे जम्मू-उधमपूर मार्गावरील आहे. या स्टेशनला विद्युत प्रवाह वारंवार खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असे. आता स्टेशनवरचे सर्व दिवे, सिग्नल्स, सौर ऊर्जेवर चालतात. असा विद्युत पुरवठा आपत्कालीन वेळेकरता तयार ठेवला जातो.
ऊर्जा व्यवस्थापन कंपनी (एनर्जी मॅनेजमेंट कंपनी) असा वेगळा कक्ष रेल्वेत स्थापन केलेला आहे. त्यांच्यामार्फत व्यापक योजना आखली गेलेली असून, २०० रेल्वे स्टेशनांवरील दिवे, २६ रेल्वे स्टेशनांच्या इमारतींचे दिवे, गच्चीवरचे जाहिरातीचे फलक, २००० लेव्हल क्रॉसिंग्ज सौर ऊर्जेवर चालणार आहेत.
कोळशांवर चालणारी धुराची इंजिनं इतिहासजमा झालेली आहेत. रेल्वे-मार्गांच्या विद्युतीकरणाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. जलऊर्जेबरोबर रेल्वे स्वत:ची सौरऊर्जाकेंद्रं व पवनचक्क्यांवर चालणारी विद्युतकेंद्रं बांधणार आहे.
मोठ्या प्रमाणात नवीन पद्धतीची विद्युत व बायोडिझेल इंजिनं बनविण्यात येत आहेत. यामुळे एरवी हवेचं प्रदूषण कमी होणार असून, इंधन बचत झाल्याने खर्चाचा बोजा कमी होणार आहे. चित्तरंजन कारखान्यातून अशी नवीन इंजिनं WAP7 तयार करून ती नागपूर-इटारसी मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना जोडली जातात. या चढणीच्या मार्गावर पूर्वी गाडीच्या मागील बाजूनं दुसरं इंजिन (बॅकर) लावावं लागत असे, आता नवीन इंजिनामुळे त्याची गरज भासत नाही. यामुळे प्रत्येक गाडीमागे ७०० युनिट्स विद्युत बचत होते. २०१४ सालापासून WAP5, WAP7, WAG9 या पद्धतीची ३०० इंजिनं विविध मार्गांवरील मेल, एक्सप्रेस गाड्यांना लावली जाणार आहेत, ज्यामुळे वर्षाला १०० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार आहे व त्यामुळे हवेत मिसळल्या जाणाऱ्या कार्बनचं प्रमाण १०५ टन इतकं कमी होणार आहे.
मल्टिगेन सेट पद्धतीची नवीन डिझेल इंजिनं वापरण्याने प्रत्येक वर्षी, प्रत्येक इंजिनमागे ३२ लाख रुपयांच्या डिझेलची बचत होणार आहे.
सौरऊर्जेवर संपूर्ण सिग्नल्स यंत्रणा, यु.आर.एस. आणि पी.आर.एस. सेंटर, स्वयंचलित तिकिटांची मशिन्स, स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये गरम पाण्याची सोय अशा विविध गोष्टी चालणार आहेत.
अनेक रेल्वे-कॉलन्यांत कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लाईट्स लावण्यात आलेले असून, काही ठिकाणी त्याचबरोबरीने सौरऊर्जेचा वापर अशा दुहेरी उपाययोजना केलेल्या आहेत.
'रेल्वेकरता सौरऊर्जेवर चालणारे वातानुकूलित डबे बनवण्याचं तंत्रज्ञान आय. आय. टी. मद्रास पुरविणार आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित गाड्यांना पॉवर जनरेटर व्हॅनचा डबा असतो. तिथे डिझेलपासून ऊर्जा बनविली जाते. त्यामुळे संपूर्ण गाडीचं वातानुकूलन होत असतं, पण मेल एक्सप्रेस गाड्यांना २ ते ६ डबे वातानुकूलित असतात. त्यांना डब्याच्या खाली बसवलेल्या बॅटऱ्यांपासून ऊर्जा मिळत असते. जसजसा गाडीचा वेग वाढतो, तसतशा बॅटऱ्या चार्ज होत जातात, आणि डबा थंड होतो; पण या सर्व गोष्टींमुळे गाडीचं वजन वाढतं. त्यामुळे इंजिनाला जास्त ऊर्जा लागते. सौरऊर्जेचा उपयोग झाल्यावर सर्व बाजूंनी ऊर्जेची बचत होणार आहे. चेन्नई-बंगलोर अशी एक प्रवासी गाडी अशा ऊर्जेवर धावत आहे. यात अजून १०० टक्के यश आलेलं नाही. वातानुकूलनाकरता निराळे गॅस वापरले जात आहेत.
कलका-सिमला हेरिटेज गाडी व पठाणकोट-जोगिंदरनगर गाडी यांच्या सर्व डब्यांचे दिवे सौरऊर्जेवर चालतात. जयपूर व आग्रा विभागात हरितक्रांतीचा पट्टा तयार होत आहे.
जंगलसंपत्तीसंवर्धन हा हरितक्रांतीचा महत्त्वाचा पैलू आहे. रेल्वे रुळांच्या मध्यात बसविण्यात येणारे स्लीपर्स पूर्वी लाकडी असत, ज्याकरता हजारो वृक्ष कापावे लागत. आता लाकडी स्लीपर्स पूर्णपणे बाद झालेले असून, त्या ऐवजी एच.डी.पी.ई. पॉलिमरमॅट्रिक्सपासून स्लीपर्स बनविले जातात. जंगलं वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर ७६ लाख नवीन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
तसंच, बायो टॉयलेट्सदेखील बनवली जात आहेत.
पर्यावरण बिघडविण्यात लॉय, बसेस, मोटारी, ऑटोरिक्षा यांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर रेल्वेमुळे सर्वांत कमी प्रमाणात प्रदूषण होत असतं. त्यात भारतीय रेल्वेनं उचललेलं हरितक्रांतीचं पाऊल लाखमोलाचं आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर राजगड मोठ्या दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते.
कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.
Copyright © 2025 | Marathisrushti