वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
‘पूर्णांक’ने आपल्या नाट्यप्रवासात ‘भक्ष्य’, ‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’, ‘राक्षस’, ‘म्हातारबाबा कुठे चाललात?’, ‘यू बी द जज’ या एकांकिका आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके सादर केली.
पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता भारतीय रेल्वेनं हरितक्रांती योजना विविध स्तरावर अमलात आणण्यास सुरुवात केलेली आहे.
भारतातील हरितक्रांतीचं प्रतीक असलेलं पहिलं स्टेशन मानवळ हे जम्मू-उधमपूर मार्गावरील आहे. या स्टेशनला विद्युत प्रवाह वारंवार खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असे. आता स्टेशनवरचे सर्व दिवे, सिग्नल्स, सौर ऊर्जेवर चालतात. असा विद्युत पुरवठा आपत्कालीन वेळेकरता तयार ठेवला जातो.
ऊर्जा व्यवस्थापन कंपनी (एनर्जी मॅनेजमेंट कंपनी) असा वेगळा कक्ष रेल्वेत स्थापन केलेला आहे. त्यांच्यामार्फत व्यापक योजना आखली गेलेली असून, २०० रेल्वे स्टेशनांवरील दिवे, २६ रेल्वे स्टेशनांच्या इमारतींचे दिवे, गच्चीवरचे जाहिरातीचे फलक, २००० लेव्हल क्रॉसिंग्ज सौर ऊर्जेवर चालणार आहेत.
कोळशांवर चालणारी धुराची इंजिनं इतिहासजमा झालेली आहेत. रेल्वे-मार्गांच्या विद्युतीकरणाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. जलऊर्जेबरोबर रेल्वे स्वत:ची सौरऊर्जाकेंद्रं व पवनचक्क्यांवर चालणारी विद्युतकेंद्रं बांधणार आहे.
मोठ्या प्रमाणात नवीन पद्धतीची विद्युत व बायोडिझेल इंजिनं बनविण्यात येत आहेत. यामुळे एरवी हवेचं प्रदूषण कमी होणार असून, इंधन बचत झाल्याने खर्चाचा बोजा कमी होणार आहे. चित्तरंजन कारखान्यातून अशी नवीन इंजिनं WAP7 तयार करून ती नागपूर-इटारसी मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना जोडली जातात. या चढणीच्या मार्गावर पूर्वी गाडीच्या मागील बाजूनं दुसरं इंजिन (बॅकर) लावावं लागत असे, आता नवीन इंजिनामुळे त्याची गरज भासत नाही. यामुळे प्रत्येक गाडीमागे ७०० युनिट्स विद्युत बचत होते. २०१४ सालापासून WAP5, WAP7, WAG9 या पद्धतीची ३०० इंजिनं विविध मार्गांवरील मेल, एक्सप्रेस गाड्यांना लावली जाणार आहेत, ज्यामुळे वर्षाला १०० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार आहे व त्यामुळे हवेत मिसळल्या जाणाऱ्या कार्बनचं प्रमाण १०५ टन इतकं कमी होणार आहे.
मल्टिगेन सेट पद्धतीची नवीन डिझेल इंजिनं वापरण्याने प्रत्येक वर्षी, प्रत्येक इंजिनमागे ३२ लाख रुपयांच्या डिझेलची बचत होणार आहे.
सौरऊर्जेवर संपूर्ण सिग्नल्स यंत्रणा, यु.आर.एस. आणि पी.आर.एस. सेंटर, स्वयंचलित तिकिटांची मशिन्स, स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये गरम पाण्याची सोय अशा विविध गोष्टी चालणार आहेत.
अनेक रेल्वे-कॉलन्यांत कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लाईट्स लावण्यात आलेले असून, काही ठिकाणी त्याचबरोबरीने सौरऊर्जेचा वापर अशा दुहेरी उपाययोजना केलेल्या आहेत.
'रेल्वेकरता सौरऊर्जेवर चालणारे वातानुकूलित डबे बनवण्याचं तंत्रज्ञान आय. आय. टी. मद्रास पुरविणार आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित गाड्यांना पॉवर जनरेटर व्हॅनचा डबा असतो. तिथे डिझेलपासून ऊर्जा बनविली जाते. त्यामुळे संपूर्ण गाडीचं वातानुकूलन होत असतं, पण मेल एक्सप्रेस गाड्यांना २ ते ६ डबे वातानुकूलित असतात. त्यांना डब्याच्या खाली बसवलेल्या बॅटऱ्यांपासून ऊर्जा मिळत असते. जसजसा गाडीचा वेग वाढतो, तसतशा बॅटऱ्या चार्ज होत जातात, आणि डबा थंड होतो; पण या सर्व गोष्टींमुळे गाडीचं वजन वाढतं. त्यामुळे इंजिनाला जास्त ऊर्जा लागते. सौरऊर्जेचा उपयोग झाल्यावर सर्व बाजूंनी ऊर्जेची बचत होणार आहे. चेन्नई-बंगलोर अशी एक प्रवासी गाडी अशा ऊर्जेवर धावत आहे. यात अजून १०० टक्के यश आलेलं नाही. वातानुकूलनाकरता निराळे गॅस वापरले जात आहेत.
कलका-सिमला हेरिटेज गाडी व पठाणकोट-जोगिंदरनगर गाडी यांच्या सर्व डब्यांचे दिवे सौरऊर्जेवर चालतात. जयपूर व आग्रा विभागात हरितक्रांतीचा पट्टा तयार होत आहे.
जंगलसंपत्तीसंवर्धन हा हरितक्रांतीचा महत्त्वाचा पैलू आहे. रेल्वे रुळांच्या मध्यात बसविण्यात येणारे स्लीपर्स पूर्वी लाकडी असत, ज्याकरता हजारो वृक्ष कापावे लागत. आता लाकडी स्लीपर्स पूर्णपणे बाद झालेले असून, त्या ऐवजी एच.डी.पी.ई. पॉलिमरमॅट्रिक्सपासून स्लीपर्स बनविले जातात. जंगलं वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर ७६ लाख नवीन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
तसंच, बायो टॉयलेट्सदेखील बनवली जात आहेत.
पर्यावरण बिघडविण्यात लॉय, बसेस, मोटारी, ऑटोरिक्षा यांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर रेल्वेमुळे सर्वांत कमी प्रमाणात प्रदूषण होत असतं. त्यात भारतीय रेल्वेनं उचललेलं हरितक्रांतीचं पाऊल लाखमोलाचं आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर राजगड मोठ्या दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते.
कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.
प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.
सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत.
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.
आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.
विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.
येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी 'ग्रीन ट्रेन' सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
लिस बेसाक चा जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते. ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला.
मोहरीच्या पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.
कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता?
Copyright © 2025 | Marathisrushti