वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
November 12, 2016
सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे.
October 14, 2023
विज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे.
April 12, 2023
आपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम, कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते.
April 30, 2019
Mutt म्हणजे दोन वेगळ्या जातीच्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती. मुळात ती मुद्दाम प्रस्थापित न केलेल्या पण सहज प्रस्थापित झालेल्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती असते. हा दिवस मिश्र जातीच्या कुत्र्यांना वर्षातून दोनदा प्रेम करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
July 31, 2020
आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. ढगांशी लपाछपी खेळत, निळ्या गगनातून विहार करणारे हे हवाईजहाज ताशी ९५० कि.मी. या प्रचंड वेगाने प्रवास करते. जमिनीपासून दहा हजार मीटर उंचीवरून तरंगत जाणारे विमान म्हणजे एक वैज्ञानिक चमत्कार होय.
March 7, 2023
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात.
January 4, 2025
गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ! “पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
April 6, 2023
लहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते.
August 5, 2015
खरे तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना हे असे चार रस्ते क्षणोक्षणी एकत्र येतात. छोटे मोठे निर्णय हे सतत घ्यावे लागतात. गुगल मॅप सारखे सतत कुणीतरी सोबत असतेच असं नाही. आणि कुणी असे असलेच सोबत तर कधी कधी त्या सिग्नल नसलेल्या मोबाईल सारखी अवस्था होऊ शकते की! अशावेळी निर्णय हा स्वतःलाच घ्यावा लागतो.
September 3, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti