वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर राजगड मोठ्या दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते.
कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.
प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.
सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत.
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.
आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.
विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.
येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी 'ग्रीन ट्रेन' सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
लिस बेसाक चा जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते. ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला.
मोहरीच्या पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.
कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता?
विविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा.
भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी 'अनमॅन्ड एरिअल व्हीइकल' (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले आहेत. या उपकरणाच्या मदतीने हत्तींच्या कळपांची हालचाल 'सेंट्रल रेल ट्रॅक कंट्रोल सिस्टिम'ला कळवली जाईल. तिथून इंजिन ड्रायव्हरला ती माहिती वॉकी-टॉकीवर कळवली जाईल. खबर मिळताच ते गाडीचा वेग कमी करतील व हत्तींच्या बळी पडण्याची शक्यता कमी होईल. ज्या विशिष्ट जंगलातील भागांतून हत्तींची हालचाल जास्त असते, त्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून रस्ते काढण्यात आले आहेत. ज्यावरून हत्ती पलीकडील बाजूला जाऊ शकतील.
सौराष्ट्रातील गीर जंगलाच्या बाजूनं जाणाऱ्या रेल्वेमार्गाजवळून गाडी जात असताना सिंहांची कुटुंबं दिसू शकतात. हा रेल्वेमार्ग पिपाव्ह बंदराकडे जातो. एकदा एका मालगाडीच्या धक्क्याने दोन सिंहिणी तत्काळ मरण पावल्या व त्या मालगाडीबरोबर खेचल्या जाऊन पुढे मार्गाजवळ पडलेल्या आढळल्या. त्यांच्याबरोबर असलेले सिंहाचे ३ बछडे मात्र वाचले होते.
गीर जंगल सिंहांकरता जगप्रसिद्ध आहे. त्या जंगलाच्या बाजूनं एक रेल्वेमार्ग जातो. काही वेळा रात्रीच्या अंधारात सिंह आणि त्यांचे बछडे थेट रेल्वेमार्गावर येतात व त्यावेळी येणाऱ्या गाडीच्या धक्क्याने मरण पावतात. अशा घटना ३ ते ४ वेळा घडल्या आहेत. अशा घटनेत सिंहांचा बळी जाणे योग्य नाही हे लक्षात घेऊन या मार्गावर रात्री ७ ते सकाळी ७ या काळात गस्त घालण्याकरता जवळच्याच खेड्यातील दोन सिंहप्रेमी तरुण काठ्या, टॉर्च व वॉकीटॉकी घेऊन रेल्वेमार्गावर गस्त घालतात. तिथेच आडवे होण्याकरता एक छोटे मचाण बांधण्यात आले आहे. रात्रभरात ५ ते ६ मालगाड्या जात असतात. या वेळात जर सिंहाची डरकाळी ऐकू आली किंवा त्यांची हालचाल दिसली तर जवळच्या स्टेशनमास्तरला ताबडतोब कळविलं जातं, जरूर पडल्यास टॉर्चच्या उजेडाने इंजिन थांबविलं जातं व योग्य तो सल्ला इंजिनड्रायव्हरला दिला जातो. या तरुणांना अंदाजे प्रत्येकी ६०००रु. महिना असा भत्ता दिला जातो. सिंहांवरील प्रेमापोटी रात्रभर जागत राहण्याचं हे काम ते तरुण मनापासून आवडीने करत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
Copyright © 2025 | Marathisrushti