(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

    मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

      August 9, 2022


  • एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

    आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली.

      August 3, 2022


  • युवा दिवस

    भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले.

    या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती.

    ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.

    स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉसलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतंय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉठलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्य ही येते.

    तर खरच आपणच आपण भविष्य घडवायला हवे, कोणावरही अवलंबून राहणे हे योग्य नाही.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 7, 2017


  • मनाचे श्लोक – ३१ ते ४०

    महासंकटी सोडिले देव जेणे | प्रतापे बळे आगळा सर्व गूणे |
    जयांते स्मरे शैलजा शूलपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||31||

    अहिल्या शिळा राघवे मुक्त केली | पदी लागता दिव्य होऊनि गेली |
    जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||32||

    वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा | शशी सूर्य तारांगणे मेघमाळा |
    चिरंजीव केले जनीं दास दोन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||33||

    उपेक्षा कदा रामरूपी असेना | जिवा मानवा निश्चयो तो वसेना |
    शिरी भार वाहेन बोले पुराणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||34||

    असे हो जया अंतरी भाव जैसा | वसे हो तया अंतरी देव तैसा |
    अनन्यासि रक्षीतसे चापपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||35||

    सदा सर्वदा देव सन्नीध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे |
    सुखानंद आनंद कैवल्यदानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||36||

    सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
    हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||37||

    मना प्रार्थना तूजला एक आहे | रघूराजअंकीत होऊनि राहे |
    अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||38||

    जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | जयाचेनि योगे समाधान बाणे |
    तयालागि हे सर्व चांचल्य दीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||39||

    मना पाविजे सर्वही सूख जेथे | अती आदरे ठेविजे लक्ष तेथे |
    विवेके कुडी कल्पना पालटीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||40||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      December 27, 2015


  • डिसेंबर ०२ : ‘बॉडीलाईन’चा जन्म

    ‘बॉडीलाईन’ या शब्दाच्या भाषिक जन्माची कथा आणि बॉडीलाईनच्या पर्यवसानांवर एक नजर

      December 1, 2010


  • इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि तरुणाई

    दूरचित्रवाणीच्या तंत्राचा शोध लागून आता सुमारे १०० वर्षे पूर्ण होतील. काही काळापूर्वी ज्या टीव्हीला इडियट बॉक्स म्हणून हिणवले जायचे तोच टीव्ही आता इंटेलिजंट बॉक्स झाला आहे. जगात आणि भारतात जेव्हा हे तंत्रज्ञान पसरत होते तेव्हा शिक्षण, माहिती आणि मनोरंजन हेच टीव्हीचे उद्दिष्ठ असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले जायचे.

      November 26, 2023


  • जटामांसी

    जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.

    जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:

    हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.

    आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.

    २)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.

    ३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.

    ४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 28, 2017


  • भारताच्या हवाई इतिहासातील महत्वाचे टप्पे

    भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा.

      July 21, 2023


  • लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर हल्ला

    सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.

      October 9, 2012


  • श्री शिव नामावल्यष्टकम् – २

    हे पार्वतीहृदयवल्लभ – हे संबोधन मोठे मजेदार आहे. यातील हृदयवल्लभ शब्द पार्वतीसह वापरला तर पार्वती च्या हृदयाला अत्यंत प्रिय असणारे असा अर्थ होतो आणि पार्वती आणि हृदयवल्लभ हे शब्द वेगळे केले तर ज्यांच्या हृदयाला पार्वती अत्यंत प्रिय आहे असा अर्थ होतो.

      August 6, 2020