वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक.
व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे!
जुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे.
या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली.
मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते.
सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला.
तगडा हँडसम टॉम क्रुज तसा आधीच टॉप गन पासून ॲक्शन हिरो म्हणून लोकांना खूप आधीपासूनच आवडला होता. पण MI ने जगभर इतकी जबरदस्त कमाई केली की स्वतः टॉमने MI Franchise चे हक्क घेत 1996 ते 2018 या 22 वर्षात MI-2, MI-3, MI-Ghost Protocol, MI-Rogue Nation, MI-Fallout असे तब्बल सहा सिनेमे या फ्रँचाइज अंतर्गत काढलेत.

'मैत्री पेक्षा थोडं जास्त'...असं जुनं, हळवं नातं ... पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं...असं हे 'मैत्रीपेक्षा थोडं जास्त' असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट 'सहेला रे' ....
प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय...
मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध भावे म्हटल्यावर जी सहजता अभिप्रेत आहे ती अर्थातच चित्रपटात दिसते. त्यामुळे अभिनय हा माझ्या परीक्षणासाठीचा विषय नाही. मुळात परीक्षण म्हणून मला लिहायचं नाही.
'विवाहित स्त्री चा मित्र, किंवा विवाहित पुरुषाची मैत्रीण' हे एक हळवं नातं आहे, त्याला कुठेही विवाहबाह्य संबंधाची दुर्गंधी नाही हे लक्षात घेऊन चित्रपट मांडलेला आहे..
विवाहित आयुष्य , हे घरामधे व कुटुंबामधे गुंतून राहिल्याने कालांतराने बंदिस्त, सीमित, थोडक्यात, फारसं happening राहत नाही. मग ते स्त्रीचं असो अथवा पुरुषाचं. मतभेद किंवा काही गंभीर समस्या असतीलच असं नाही पण बऱ्याच अंशी पती पत्नी एकमेकांना गृहीत धरू लागलेले असतात.
तेव्हाच यातून बाहेर काढण्याकरता , ध्यानी मनी नसताना एखादा मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात अनपेक्षितपणे येतात आणि हे मळभ आपोआप दूर होतं ते त्याच्याशी मनमोकळेपणे बोलल्याने आणि त्याच्या सहवासाने.
शमा वर भरभरून प्रेम करणारा निरंजन असाच तिला शोधत अमेरिकेवरून येतो आणि राहून गेलेला मनातलं सगळं तिला सांगतो. शमा सुद्धा तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करते. एकमेकांवरचं एकेकाळी व्यक्त न होऊ शकलेलं प्रेम व्यक्त करतात. शमा मध्ये असेल्या ताकदीची निरंजन तिला जाणीव करून देतो, तू मला माझ्या आयुष्यात कायम हवा आहेस 'मित्रापेक्षा थोडा जास्त' म्हणून , हे शमा सुद्धा निरंजन ला सांगते. आणि विणलं जातं ते एक सुंदर नातं..एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र मैत्रिणीचं .
अवघ्या तीन-चार दिवसांच्या काळात घडणारी ही कथा, योग्य व्यक्ती आणि त्याने आपल्या आयुष्यात योग्य क्षणी येणं याची गंमत सांगते. शमा मध्ये झालेल्या आत्मविश्वासपूर्ण बदलाचं स्वागत जेव्हा विक्रम, तिचा नवरा करतो तेव्हा शमाची ताकद, एक स्त्री व एक पत्नी म्हणून अजून वाढते. इथे चित्रपट टिपिकल केलेला नाही याचा आनंद होतो. निरंजन हा माझा जुना मित्र हे सुद्धा ती मोकळेपणाने विक्रम ला सांगते.
स्त्री ने स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं असताना सुद्धा तिचा नवरा आज तिचा मित्र हे तिची ताकद बनू शकतात हा मोठा विचार चित्रपटातून अगदी सहज पोहोचवला जातो.
या सगळ्या कथानकाला उत्तम साथ देतात ती चित्रपटाची निसर्गरम्य दृश्य, उत्तम संवाद आणि डॉ .सलील कुलकर्णी यांचं संगीत.
मृणाल कुलकर्णी यांचं गड किल्ल्यांवरचं प्रेम जाणवतं ते त्यांच्या गरुडमाची वचारच्या सहज वावरामुळे. चित्रपटात त्यांनी त्याची अगदी उत्तम सांगड घातली आहे.
निरंजन आणि शमाच्या एकमेकांविषयीच्या प्रेमाचा उलगडा होतो तो गरुडमाची च्या एका उंच टोकावर. आजूबाजूला हिरवळ, पावसाळी वातावरण, ढग ..असं असताना दिली गेलेली प्रेमाची कबुली..हे दृश्य फारच परिणामकारक ठरलं आहे.
निरंजन आणि शमाची ट्रेक ची आवड, त्यातून बाहेर येणाऱ्या जुन्या आठवणी, आणि आठवणींबरोबर पुन्हा पुन्हा हळवे होणारे हे मित्र मैत्रीण आपल्याला आपल्याही एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीची आठवण करून देतात.
स्त्री च्या आयुष्यात असा एक मित्र का हवा आणि पुरुषाला सुद्धा अशी एक मैत्रीण का असावी , याचं उत्तर शोधणारा हा सुंदर चित्रपट आहे.
मर्यादांची पूर्ण जाणीव ठेवून, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं एकमेकांना बिनधास्त सांगू शकणारे मित्र मैत्रीण..त्यांची उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे... सहेला रे..
-- गौरी सचिन पावगी
Image source : google

डिस्क्लेमर- मी आधीच सांगतो की किशोरदांचा जबरदस्त फॅन आहे.
पण...
रफी आपलं दैवत आहे.
कळायलं लागलं तेंव्हापासून या आवाजाने जादू केली आहे. आमच्या लहानपणी एफ एम नव्हते. पण आमची सांगली आकाशवाणी होती..आजही आहे. त्यावर सकाळी भजन सदृश्य गाणी लागायची. त्यात बऱ्याचवेळा 'शोधीशी मानवा' किंवा 'प्रभु तू दयाळू' नेहमी लागायचे. त्यांच्या त्या भारदस्त आवाजात त्या कोवळ्या मनातही ती मनावर कोरली जायची. एक दोन गाणी शुक्रवारी किंवा रविवारी वाजायची ती येशू ख्रिस्तांवर असायचं. गाणं नेमकं आठवत नाही पण रफी साब ते इतकं मनापासून गायचे की ते़ंव्हाच जाणवलं.. नावाने मोहम्मद असला तरी हा माणूस जाती धर्माच्या खूप खूप पलिकडे आहे.. बस्स तेंव्हापासून रफीसाब आपले झाले.
Cut to..2009-10
मी व आमची पूर्ण टीम तेंव्हा आमच्या बँकेच्या कँप शाखेतून ऑपरेट करायचो. इस्ट स्ट्रीटला रफीसाहेबांच्या जन्मादिनी आमच्या ब्रँच समोर जो चौक आहे तिथेच एक मंडप लागतो.
समोर चाळीस पन्नास खुर्च्या ठेवल्या जातात. पुण्यातले बरेच ऑर्केस्ट्रा मधे गाणारे किंवा गाण्याची जाण असणारे गायक लोक तिथे येतात. रफींची अनेक अजरामर गाणी तिथे सादर करतात. ती गाणी ऐकतानाचा त्या गायकांचा भाव हा मला एखाद्या मंदिरात किंवा गुरूव्दारात सेवा दिल्यासारखा पवित्र वाटायचा. रफी-प्रेमाने भारलेले हे लोक आपल्या दैवताच्या प्रेमासाठी स्वेच्छेने, वेळ काढून व कोणतीही बिदागी न घेता तिथे दरवर्षी येउन आपली गानसेवा देतात. मी कँपात बसायचो तोपर्यंत जसा वेळ मिळेल तसा तिथे जाउन थांबायचो. आपल्या या दैवताची गाणी ऐकून तृप्त व्हायचो. दोन दोन तास उभे राहूनही पाय दुखायचे नाहीत..अगदी खरं सांगतो.
आमच्या याच ब्रँचपासून थोडे पुढे जाउन जरा उजवीकडे वळून एम.जी रोडवर एक चौक पुढे गेला की चौकात एक पाटी दिसते 'मुहम्मद रफी चौक'. पुण्यात कधी न राहिलेल्या रफीसाहेबांचे पुण्यातल्या एका चौकाला नाव देणारे पुणेकर खरे रसिकच म्हंटले पाहिजेत. कधीही त्या चौकातून कारमधून वा स्कुटर वरुन जाताना त्या पाटीकडे हमखास लक्ष जायचे माझे.
आता पुणे सोडून चार वर्षे होत आली.
पण अजूनही एक इच्छा आहे.
24 डिसेंबरला एकदा मुद्दाम पुण्यात जाउन पुन्हा एकदा सकाळी आमच्या ब्रँचसमोरच्या त्या चौकात उभे राहुन ते सांगितीक 'लंगर' अनुभवायचे आहे..
तो 'रफी' नामक दैवी प्रसाद घ्यायचा आहे.
बस्स...
-- सुनील गोबुरे.
विविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा.
Copyright © 2025 | Marathisrushti