वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण.....
एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी आरामदायी क्रीडा कार) देण्याचे ठरविले. २३ जुलै २००२ रोजी ब्रिटिश ग्रां प्रीच्या (कार ‘पळविण्याची’ स्पर्धा) उद्घाटनावेळी मायकल शूमाकरच्या हस्ते प्रतीकात्मक चावी सचिनला देण्यात आली.
४ सप्टेम्बर २००२ रोजी भारतीय संघराज्याच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सचिनला पत्र लिहून त्याच्या विक्रमाच्या गौरवार्थ सरकार त्या गाडीवरील सीमाशुल्क माफ करेल अशी माहिती दिली. (हे शुल्क सुमारे १ कोटी १५ लाख म्हणजे गाडीच्या किमतीच्या १२५% एवढे होत होते.) प्रचलित नियमांनुसार परदेशातून बक्षीस म्हणून मिळालेल्या गाडीला सीमाशुल्क माफ होते, ‘भेट’ म्हणून मिळालेल्या गाडीला नाही.
जुलै २००३ मध्ये सीमाशुल्कमाफीची बातमी प्रसिद्ध झाली आणि मग वादप्रवादांना ऊत आला. अर्थ मंत्रालयाने नियमात बदल घडवून आणला (असे म्हटले जाते) आणि ऑगस्ट २००३ मध्ये ही ‘मोडेना’ मुंबईत दाखल झाली.
मुंबईतील एका प्रसिद्ध पक्षनेत्याने आपले मत ‘सचिनने पाच पिढ्यांना संपणार नाही एवढे कमवून ठेवले आहे, त्याला अशी मुभा देण्याची गरज नाही’ अशा शब्दांत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कृत्याचे समर्थन केले – केंद्रातील सरकार विरोधी पक्षाचे असूनही. (भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टानुसार सीमाशुल्क हा केंद्रसूचीतील विषय असल्याने तो केंद्रशासनाच्या अखत्यारीत येतो.)
दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली आणि ‘सचिन तेंडुलकर हा भारतीय नागरिक कायद्याहून मोठा नाही. त्याला अशी मुभा का देण्यात आली’ या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. सचिनने करमाफीसाठी अर्ज केला होता अशी माहितीही पुढे आली.
मग मात्र फियाट ग्रुपला जाग आली आणि ‘ज्या उदात्त उद्देशाने ही भेट देण्यात आली होती त्याला जागण्यासाठी’ फियाट ग्रुपने सीमाशुल्क भरण्याची तयारी दर्शविली. वस्तुतः हा शहाणपणा फियाटने ही ‘भेट’ भारतीय सार्वभौम शासनाचे नियम पाळून, ती कार भारतात आणून, मग ती सचिनला देऊन करावयास हवा होता.
सचिन असामान्य आहे, त्याच्यासंबंधीच्या चर्चा (आणि वादही) तसेच असामान्य असणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
July 8, 2016
व्हाट्सॲप, ट्विटर, फेसबूक यामुळे दुरदूरची माणसं जोडली गेली हे खरं असलं तरी जवळच्या माणसांमधला संवाद तुटला. शेजारी असलेल्या माणसांशी सरळ बोलून संवाद साधण्यापेक्षा दूरवर असलेल्या कुठल्यातरी (बऱ्याचदा अनोळखी) माणसाशी टायपील संवाद साधण्याच्या प्रयत्नात आपण सारेच असतो. हल्ली यात तरुण, प्रौढ किंना वय झालेले असा भेद नसतो. घरोघरी हेच दृष्य दिसतं. कुटूंबातील सर्व वयाचे सदस्य आपापल्या मोबाईलमधे डोकं घालून आणि कानात इअरफोनचे बोळे खुपसून तिसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीशी संवाद साधत बसलेले दिसणं आता आम बात है..
March 24, 2018
अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे.
August 17, 2011
माझ्या व्यवस्थापकीय जीवनातील अजून एक अनुभव. एके दिवशी माझ्या विभागातील एक अधिकारी, निलयशी गप्पा मारत असताना त्याने मला एक फार इंटरेस्टिंग आणि मस्त प्रश्न विचारला. असा प्रश्न बहुतेक व्यवस्थापकांना कधीनाकधी पडतोच. तो प्रश्न असा “कनिष्ट अधिकाऱ्यांना बहुतेक वेळा एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून द्यायला फार त्रास का होतो? त्यांच्या मते तर त्यांचा विचार सरळ सोपा आणि बहुतेक वेळा कंपनीच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना एकतर हवे तसे यश येत नाही किंवा ते प्रयत्न पूर्णपणे दुर्लक्षित केले जातात. हा अनुभव खूप वेळा खरोखरच हताश करणारा असतो.”
July 10, 2026

आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत.
July 12, 2023
बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
October 6, 2010
एम एस १० हजार एक ही उसाची जास्त साखर उतारा देणारी व लवकर पक्व होणारी जात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस केंद्रात विकसित करण्यात आली असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जातीच्या उसाचे जास्त उत्पादन घेतल्यास ते शेतकरी व साखर कारखानदारांच्या फायद्याचे ठरणार आहे. सन २०१० मध्ये प्रथम ही जात तयार करण्यात आली व ती फुले-२६५ आणि एम एस ६०२ यांच्या संकरातून तयार करण्यात आल्याने त्याला एम एस १० हजार एक असे नाव देण्यात आले आहे.
एम एस १० हजार एक या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे दहा ते बारा महिन्यांत उसाला पक्वता येते. साखरेचा उतारा, उसाचे उत्पादन इतर लवकर पक्व होणाऱ्या जातींपेक्षा जास्त आहे. क्षारपड जमिनीत चांगले तग धरून राहते. चांगले उत्पादन येते. तसेच ही जात कानी, लालकुद व इतर रोगांना प्रतिकारक आहे. कमी पाण्यात इतर जातींपेक्षा चांगली वाढते. ही जात तयार करण्यात संशोधन केंद्रातील डॉ. रामदास गारकर, दत्तात्रय थोरवे, कृषी सहायक मरतड भुसे, अंकुश भोसले, मृद्शास्त्रज्ञ डॉ. धमेंद्र फाळके, रोगशास्त्रज्ञ सूरज नलावडे, मंगेश बडगुजर यांची मदत झाली असून ऊसतज्ज्ञ डॉ. एस. एम. पवार संशोधन कार्यात प्रमुख होते.
उसाच्या पारंपरिक जाती या मध्यम पक्वता असलेल्या आहेत. या जातीचे उस १४ ते १६ महिन्यात पक्व होतात. मात्र, एम एस १० हजार ही जात १० ते १२ महिन्यात पक्व होते. या जातीचा साखर उतारा चांगला आहे, लवकर पक्व होते. तसेच पूर्वीच्या जातीपेक्षा अर्धा टक्का साखर जास्त उत्पादन होते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण येथे हा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतर गोवा येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची (डीएसटीए) जी साखर परिषद झाली, त्या वेळी याबाबतचा संशोधन प्रबंध सादर करण्यात आला होता. त्याबाबत डीएसटीएच्या यंदाच्या वर्षी झालेल्या साखर परिषदेत डॉ. पवार यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
गेल्या वर्षी ज्या कारखाने व शेतकऱ्ऱ्यांना एम एस १० हजार एकची बियाणे देण्यात आले होते. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर यंदा हे बियाणे प्रसारीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रसारण म्हणजे चारही कृषी विद्यापीठाची बैठक होते. त्यानंतर सरकारकडे त्यात पिकाचे उत्पादन करण्याची शिफारस केली जाते. सरकारकडून अधिकृत शिक्का मिळाल्यानंतर ते उत्पादन प्रसारित करता येते.
दरवर्षी पाडगावला एम एस १० हजार एकची बियाणे तयार करून साखर कारखान्यांना, शेतकऱ्यांना पुरविली जातात. जेणेकरून जास्तीत जास्त क्षेत्रात त्याचा प्रसार व्हावा. या उसाच्या जातीचा प्रसार झाला तर शेतकरी व साखर कारखानदार या दोघांनाही त्याचा फायदा होईल.
-- डॉ. एस. एम. पवार यांनी लिहिलेला लेख
November 3, 2016
केवळ मराठीचा विचार करायचा झाला तर आपल्या तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वर – नामदेवांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, भीमसेन जोशी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकणे म्हणजे भक्ती रसात पूर्णपणे बुडून जाणे. पण हे भक्ती संगीत जेव्हा खर्या अर्थाने लोकसंगीत होतं तेव्हा त्याचा जनमानसावरचा प्रभाव समजून येतो. मग ते गावातल्या देवळातले कीर्तन असो, दमल्या भागल्या कष्टकर्यांचा संध्याकाळचा भजनाचा विरंगुळा असो किंवा मिरवणुकांमधलं झांजा, लेझीम आणि ढोलकीच्या तालावरचा नाच असो.
कंट्री म्युझिकचे तिसरे महत्वाचे अंग म्हणजे देशभक्ती. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकनांमधे देशभक्ती नव्याने उसळून आली. त्याचे प्रतिबिंब संगीतात पडणे साहजिकच होतं. गेल्या ८-९ वर्षात बहुतेक सर्व मुख्य कंट्री कलाकारांची देशभक्तीपर गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यात आपल्या आसेतुहिमालय भारताप्रमाणे, अटलांटिक पासून ते पॅसिफिक पर्यंत पसरलेल्या अमेरिकेचे, त्यातल्या रॉकी पर्वतराजीच्या हिमाच्छादित हिमशिखरांपासून नेवाडाच्या वाळवंटापर्यंत असलेल्या नैसर्गिक विविधतेचे, विविधतेतल्या एकतेचे कौतुक केलेलं असतं. आपल्या शहीद आणि सरहद्दीवर देशासाठी प्राण देणार्या जवानांसारखंच, त्यांच्या जवानांबद्दल कृतज्ञता, अभिमान, प्रेम उचंबळून आलेलं असतं. जरी आपल्याकडे सैनिकांबद्दल कितीही आदर, प्रेम अभिमान असला तरी तो सहसा गणवेशातल्या सैनिकांबद्दल दिसतो. एकदा गणवेश उतरवला आणि सैन्यातून निवृत्ती घेतली की सर्वसामान्य नागरिकांच्या रूपात, सैनिकांना फारसं काही महत्व मिळत नाही. पण इथे मात्र सैन्यातल्या माजी सैनिकांना (veterans) भरपूर मान असतो. Veterans Day, Memorial Day अशा दिवशी हे सगळे जुने सैनिक (दुसर्या महायुद्धापासून ते कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध ते अगदी आताच्या इराक युद्धापर्यंत ) आपले ठेवणीतले गणवेश घालून, शौर्यपदके छातीवर लावून, मोठ्या अभिमानाने गावातल्या परेडच्या अग्रभागी संचलन करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. एकंदरीत इथे माजी सैनिकांना समाजात मोठं मानाचं आणि आदराचं स्थान आहे. त्यामुळे कंट्री म्युझिकमधे देशभक्तीपर गाण्यांमधे सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे वारंवार स्मरण केले जावे यात काही नवल नाही.
कंट्री म्युझिकचं शेवटचं महत्वाचं अंग म्हणजे आचरटपणा किंवा खोडसाळपणा. यात सगळंच आलं – दारू पिऊन घातलेला धिंगाणा, तरूण पोरींची घेतलेली फिरकी किंवा एखाद्या फटाकड्या पोरीला पटवण्याची धडपड वगैरे. मग त्यात एखाद्या बाजारात जाणार्या रंगूची छेड काढली जाते किंवा ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?’ अशी सरळ सरळ विचारणा केली जाते. कधी दादा कोंडक्यांच्या सोंगाड्या चित्रपटातल्या ‘माळ्याच्या मळ्यामधी कोन गं उभी?’, किंवा एकटा जीव सदाशिव चित्रपटातल्या ‘काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले’ अशा गाण्यांची आठवण व्हावी, अशी गाणी असतात. तर काही वेळा, सुलोचना चव्हाणांच्या ‘कसं काय पाटील बरं हाय का, काय काय ऐकलं ते खरं हाय का ?’ अशा टाइपची गाणी असतात.
पण या आचरट आणि सवंग गाण्यांच्या कलकलाटात, आणि ‘देव, देस अन धर्मासाठी’ टाइपच्या गाण्यांच्या गर्दीमधे, अनेक नितांत सुंदर गाणी ऐकायला मिळतात. गार्थ ब्रुक्स, ब्रॅड प्रेसली, ऍलन जॅकसन, मार्टिना मॅकब्राइड अशा दिग्गजांची कैक गाणी इतकी हळूवार, हळवी आणि कोमल आहेत की ती ऐकताना भाषा, शब्द, सुरांच्या माध्यमातून आपण भावनांच्या देशात जाऊन पोहोचतो. तिथे कुठली देश विदेशाची बंधनं? शेवटी भावना सगळ्या सारख्याच! त्यातलं गहिरेपण भावलं की देशांच्या सीमा पुसल्या जातात, काळ वेळाची गणितं अदृश्य होतात, जाती वंशाच्या खुणा धुसर होतात आणि धर्माचा जयघोष बंद होऊन नादब्रह्माचा साक्षात्कार व्हायला लागतो.
शेवटी लोकसंगीत म्हणजे काय? सामान्यांच्या दिनक्रमाचा एक अविष्कार! कष्टकर्यांच्या कष्टाचं ओझं हलकं करणारं, पीडितांना दोन घटका आपल्या दु:खाचा विसर पडून रिझवणारं, प्रेमिकांना जगाकडे व्याकूळ, भावुकतेनं बघायला लावणारं, पहाटेच्या सूर्याकडे बघून जीवनाबद्दल आश्वस्त करणारं, संध्याकाळच्या कातरवेळी अस्वस्थ करून सोडणारं, देशभक्तीने अंगावर रोमांच उभं करणारं, परमात्म्याशी संवाद साधू पहाणारं….. ते सारं लोकसंगीत !
भारत काय, अमेरिका काय, साउथ आफ्रिका काय, भाषा वेगळ्या, वाद्यं वेगळी, सूर वेगळे पण उगम मात्र एकच ! तोच तो गर्भातून आलेल्या हुंकारासारखा ! आदिम आणि अनंत !
-- डॉ. संजीव चौबळ
July 20, 2016
गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव .
पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात.
किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते.
एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळणीचे असल्याने आणि मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने तेलातून काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो.
मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. त्यामधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही बळावतो. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतू ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. वर्तमानपत्राच्या कागदामधील, शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करण्यास तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरातात. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर निथळत ठेवणे किंवा पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून ( पुडी) करून नंतरआहारात वापरणे आरोग्यास खूप धोकादायक आहे.
वर्तमानपत्राच्या शाईमध्ये पेट्रोलियम बेस्ड मिनरल ऑईलचा वापर करून ती अधिक पातळ केली जाते. तर ती सुकवण्यासाठी कोबाल्ट बेस्ड घटकाचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याला त्रासदायक असतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.
टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा. पण वर्तमानपत्र वापरणे कटाक्षाने टाळा.
आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरील लेख
October 21, 2016
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
August 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti