(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भज गोविन्दम् – भाग २ – चतुर्दशमंजरिका – चर्पटपंजरिका – मराठी अर्थासह

    भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. ‘चर्पट’ चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे.  

      May 17, 2021


  • समलिंगी संबंध – मानसिक विकृती !

    समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी सातत्याने आणि निकोप वाढीसाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत.

      March 18, 2012


  • मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

    मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

    भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी.

      December 11, 2025


  • शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

    सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 'येलो जर्नालिझम'च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

    ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.

    एखादी परिकथा लिहल्यासारखं, परिस्थितीचं वास्तव समजून न घेता शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलं जातंय, यापूर्वी जे लिहिलं... त्याचा उघड विरोध सोशल मीडियावर दिसून आला, मात्र यावर माफी मागण्याचं धाडस दाखवण्यात आलेलं नाही, मग दिलगिरी सारखा गोड-गोड शब्द वापरण्याचंही धाडस आता उरलेलं दिसत नाही.

    या उलट आता आपणच लिहलेलं कसं बरोबर होतं, हे घोडं दामटवण्यासाठी आता शेतकरी कसा 'गाडीवान' आहे, तो रोख पैशांनी मर्सिडीज बेन्झ खरेदी करतोय, असा शब्दांचा खेळ करून लिहलं जातंय, यात कुणालाही वाटेल शेतकरी धनवान आहे, त्याला कर्जाची गरजचं नाहीय. सबघोडे बाराटके असं सूत्र शेतकऱ्यांना लावून चालणार नाही.

    पुणे जिल्ह्यातील तसेच गुडगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एसईझेडमध्ये गेल्या, त्यांना त्याबदल्यात मिळालेल्या पैशातून त्यांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र त्यानंतर त्यातील बहुतेक देशोधडीला लागले, यावर लिहण्याचं धाडस काहींनी तेव्हा का दाखवलं नाही.

    जो माणूस फक्त शेतीवर जगतोय, तो शेतकरी, ज्याची आवक फक्त शेतीतून असेल, आणि त्याने रोख पैशातून मर्सिडीज बेन्झ, पजेरो सारख्या ५०-५० लाखाच्या गाड्या खरेदी केल्या असतील, अशा व्यक्तींचं उदाहरण हे नाव, गावासह छापावं, मी देखिल त्यांच्या भेटीला जाईन आणि त्याची शेतीची यशोगाधा जाणून घेईन, तो करतोय तशीच शेती करण्याचा प्रयत्न करेन, मलाही आवडेल माझ्या बापाला जुनाट सायकलीवरून, सुसज्ज मर्सिडीज गाडीत फिरवायला.

    मात्र ज्यांचा उद्योग-व्यवसाय असेल, आणि शेती नावाला असेल, तरीही तो स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत असेल, आणि तुम्ही त्याच्याकडे शेतकरी या नजरेनं पाहत असाल, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यावरून ते माप सर्वच शेतकऱ्यांना लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

    खरं तर ज्या न्यूज पेपरमध्ये शेतकरी विरोधात सूर आवळले जात आहेत, अशा न्यूज पेपरचा कागद एखाद्या जत्रेत, किंवा बाजारात भजी बांधून खातांना शेतकऱ्याच्या हाती लागेल, आणि तो हे लिहलेलं वाचेल याची शाश्वती नाही, कारण या न्यूज पेपरचा अवाका त्या शेतकऱ्यांपर्यंत नाही.

    मात्र अशा प्रकारच्या लिखाणावरून शेतीविषयी धोरणं ठरवतांना, एखाद्या सरकारचा संभ्रम होऊ शकतो हे नक्की, कारण सर्वच राज्यकर्त्यांनी अशा न्यूज पेपर्सची मतं महत्वाची मानली आहेत, कदाचित यापूर्वी त्या दर्जाचा विचार करणारी, लिहिणारी मंडळी अशा न्यूज पेपर्सना लाभली असावी.

    मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार, कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.

    एक खोटं लपवण्यासाठी हजार वेळेस खोटं बोलावं लागतं, त्याचा प्रत्यय इथे येतोय, आणि एकाने बोललेलं खोटं अनेकांच्या तोंडून नकळत वदवून सत्य ठरवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हिंदीत एक म्हण आहे, 'अधजल घगरी छलकत जाएं', घागरीत पाणी नसेल, तर ते पाणी सारखं उचंबळत असतं, सध्या शेतीविषयी ग्रासरूटला जाऊन शहानिशा न करता, त्यावर वाट्टेल ते लिहण्याचा प्रकार यासारखाच असावा.

    शेतकरी नेते शरद जोशी यांना देखिल ग्रास रूटची खूप मोठी जाण होती, याची आठवण यावरून पुन्हा-पुन्हा होतेय. कारण शरद जोशी यांनी बागायतदार आणि जिरायती असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, त्यांनी नेहमीच अशा घटकांना पुढारी म्हणून संबोधलं आहे. पुढारी हे नेहमीच बोटावर मोजण्यासारखे असतात, पुढारी आणि शेतकरी यांचा उल्लेख वेगवेगळा झाला, तर यापूर्वी झालेला गोंधळ थांबू शकतो, मात्र येलो जर्नालिझम करणारी मंडळी शेतकऱ्यांना उठसूठ डागण्या ठेवतेय.

      December 21, 2014


  • सोनारांचे कान टोचण्याची गरज !

    कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या ...! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत नाही. विवाह कार्यात लेकी, सुना, नातवंडाना सोन्याचे दागिने देण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे आपला ओढा सोन्याकडे अधिक असतो, हे तर सांगणे न लगे. परिस्थितीनुसार काही जन आपली हौस चांदीचे दागिने परिधान करून भागवतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद काय ती समजते. सोने हे सौंदर्यवृद्धीसाठी आहेच शिवाय शरीरस्वास्थाची काळजी घेते व काही रोग बरे करण्यासाठी मदत करतात, अये आयुर्वेद सांगत आहे. परिधान केलेले सोन्याचे दागिने शरीरातील काही नलिका बिंदूवर दबाव टाकून मन व शरीर प्रसन्न ठेवते.

    कान टोचावयास सोनारांची समस्त हिंदुना गरज सोनारांची पडते त्या सोनारांचे कान कोण टोचणार ....? हा प्रश्न नेहमीच आम्हांला पडतो. असे अनेक व्यावसायिक असतील त्यांच्या बाबतीत हेच घडत असेल. सोनार म्हणजे अर्थात ज्वेलर्स, जे सोन्याचांदीची खरेदी विक्री करतात त्यांच्याविषयी माझ्याच नव्हे तर जनमनातले विचार प्रतिपादन करायचे आहेत. गल्लीबोळात असणारे विशेषत: घोडपदेव फेरबंदर विभागात नव्हे तर अन्य विभागात व्यापाऱ्यांनी काय उच्छाद मांडला आहे तो केवळ गरीब आणि गरजवंत यालाच ठाऊक आहे. पण अडचणीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करणारे हे सोनार. त्यांच्याकडून लुबाडणूक होत असूनही त्याच्याच कडे जाणारे खरेदीदार म्हणजे सर्वसामान्य अर्थात आपण मंडळी.

    मी एकदा आपल्या एका ज्वेलर्सकडून बारश्याला लहान मुलाला भेट देण्यासाठी लहान मुलाची २३ कॅरेटची अंगठी रोकड देऊन खरेदी केली. काही अवधीनंतर झवेरी बाजार मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात कामासाठी बसलो होतो. तेथे सरसकट २२ कॅरेटचा व्यवहार चालतो. तेथे बसलेलो असताना मी घेतलेल्या अंगठीशी तंतोतंत दिसणाऱ्या अंगठ्या काउंटर वर आल्या. हजार दोन हजार अंगठ्याचा जुडगा मुंबईतल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वितरीत होणार होता. मी सहज त्याला बोललो ‘अरे यार मी अशी २३ कॅरेटची अंगठी कालच खरेदी केली.’ त्याने सांगितले शक्य नाही, या मालामध्ये २३ कॅरेट नसते. अरे मी तर २३ कॅरेटचे पैसे देऊन खरेदी केले. त्यावर हसत मला त्यांनी सांगितले, ‘तुला त्याने उल्लू बनविले.’ अरेच्या असं कसं होईल या मारवाड्यांना आपण आपले मानले आहे. ते आपल्याला कसे फसवू शकतील. म्हणून त्या प्रकारची अंगठी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक दुकानात फिरलो आणि २३ कॅरेटच्या अंगठीची विचारणा केली पण कोठे ही आढळून आली नाही. मग मात्र माझं डोकं सैरभैर झाले. पन्नास रुपये जादा गेल्याचे दु:ख नव्हते. फसविल्याची कळ सोसवत नव्हती. इकडे आमच्यासारख्यांना लुटायचं आणि सामाजिक, विधायक कार्यांना मदत केल्याचे चित्र निर्माण करण्यात यांचा हातखंडा. देणार तर हजार दोन हजार पण अशा थाटात देणार की, त्याने फार मोठे पुण्याचं काम केले आहे.

    गल्लीबोळात धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी माझे स्पष्ट मत आहे. त्यात काही चांगलेही असतील आणि काही चांगलेही नसतील. काही प्रामाणिक असतील तर काही लुटेरेही असतील. हे आपल्या सर्व सामान्य वर्गाला का लुटतात...? तरीही लुट होत असूनही आपला माणूस त्यांच्या दुकानाची पायरी का चढतो....? या प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर हे व्यापारी काही महिन्यासाठी उधार देतात, तगादा लावत नाहीत. घडणावळ बाहेरच्या व्यापाऱ्यापेक्षा कमी असते. व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळणारे अवास्तव महत्व आणि त्याला हुरळून जाणारा ग्राहक. आणि उद्या गहाण अथवा मोडण्याची वेळ आली तर दूर जायला नको. अशी आपण स्वत:हून ओढवून घेतलेली कारणे. एका विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी आपल्या जीवावर कसे इमले बांधलेत, याचं तर वर्णन करावयास नको.

    सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याची शुद्धतेची हसत हसत शाश्वती देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यात दुट्टपीवृत्ती भरलेली असते. यांच्याकडून घेतलेले सोनं काही दिवसात काजळी चढल्याप्रमाणे का दिसते. २३ कॅरेटच आहे मग त्याप्रमाणे ते देतात का...! किती मिलावट असते,याचा विचार कोणीही करीत नाही. मग तुम्ही मोडावयास गेल्यानंतर कपाळावर हात मारून घेता की नाही. एकूण एका तोळ्याच्या मागे १ ग्राम घट धरली जाते ती काय म्हणून...! काही मारवाडी १ ग्राम घट धरूनही एकूण चालू भावाच्या १०% कमी दर त्या व्यक्तीच्या गळी उतरवितो. वाहन घसारा किंवा इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर घसारा मान्य आहे. या सोन्यातल्या घट विषयी व्यापाऱ्यांची उद्दामगिरी आपण खपवून घ्यायची. आपले लोक काही पैसे वाचविण्यासाठी बिल घेत नाहीत. मग त्यांना आयती संधी चालून येते. ज्या दुकानात सोने घेतले त्यांनी त्या दिवसाचा पूर्ण भाव आहे तो द्यायलाच हवा. ही त्याची जबाबदारी आहे . त्याने जबाबदारी असून दूर पळता कामा नये.

    आपली माणसं देवभोळी आहेत. हल्ली दुकानात सोन्या चांदीच्या देवादिकांच्या नाणी, मुर्त्या आहेत. त्यामध्ये मिलावट असूनही व्यापारी सांगेल त्या भावाला खरेदी करतो. देव्हाऱ्यात ठेवा काही दिवसात काळ्याभोर पडतात. तरीही उजेडात सरळ फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदोउदो आपणच करतो. या व्यापाऱ्यांच्या उद्यमशीलता वाढीसाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सतत असतो पण दिसत नाही. प्रचंड संयम व कौशल्य आणि दुधात साखर म्हणुन त्यांस लागणारा अपार गोडवा जो मुळातच केवळ आतच नाही तर जिभेतुन पाझरत असतो.

    काही ग्राहक क्रेडीट कार्डाचा वापर करून सोने घेतात तेव्हा काही मारवाडी त्यावर काही टक्के अधिक रक्कम उकळतात. सोन्याचांदीची किती मोठमोठी दुकाने आहेत . त्यांच्या दुकानात असं घडत नाही मग हे गल्लीबोळातले महाभाग आपल्या भोळ्याभाबड्या माणसांना का फसवितात...? त्यांच्या अनैतिक व्यवहाराला कसा लगाम घालता येईल, हे ग्राहकच ठरवू शकतो.

    अशोक भेके

      April 11, 2017


  • पक्षीपरिचय ७

      September 25, 2015


  • धोरण शेतकरी केंद्रित असावे !

    आज गुजरात एक प्रगत राज्य म्हणविले जाते; कारण तिथला शेतकरी समृद्ध झाला आहे. गुजरातमध्ये भारनियमन नाही, शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम मिळण्याची काळजी तिथले सरकार घेते, शासन आणि प्रशासन स्तरावर भ्रष्टाचार अगदी नसल्यातच जमा आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाही परिणाम शेतकर्‍यांच्या उन्नतीवर झाला आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?

      October 9, 2011


  • शिवमहिम्न स्तोत्र – भाग ३ मराठी अर्थासह

    शिवमहिम्न स्तोत्र – भाग ३ मराठी अर्थासह

    श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
    चिताभस्मालेपः स्रगपि नृ-करोटीपरिकरः ।
    अमाङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्
    तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि ।।२४।।

    मराठी- हे मदनाचा नाश करणार्‍या शंकरा, स्मशान हे तुझे क्रीडांगण, भूतप्रेते हे तुझे खेळगडी, अंगी चितेतील राखेचा लेप, तसेच गळ्यात मानवी मुंडक्याची माळ असते. तुझे सर्व वर्तन ओंगळ असले तर असू दे, तथापी हे वर देणार्‍या शंकरा, जे लोक तुझी तुला आठवण काढतात, त्यांच्यासाठी तू मंगलच आहेस.

    चिता भस्मा अंगी, मसणवट क्रीडांगण तुला
    भुते प्रेते साथी, मनुज कवटी माळहि गळा ।
    असो भीतीदायी, मन न मम चिंता करितसे
    भले त्याचे होई वरद हृदयी आठवतसे ॥ २४ ॥


    मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः
    प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदशः।
    यदालोक्यालादं हद इव निमज्ज्यामृतमये
    दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत्किल भवान् ।। २५।।

    मराठी- ज्यांनी प्राणायाम करून आपली इन्द्रिये काबूत ठेवली आहेत, यमनियमांचा अवलंब करून मन अंतर्मुख केले आहे, आनंदाने ज्यांच्या अंगावर रोमांच उठले आहेत आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, अमृतमय डोहात डुंबतानाचा प्रसन्न आनंद उपभोगतात अशी त्या योगीजनांची स्थिती ज्याला पाहून होते ते तत्त्व साक्षात् तूच आहेस.

    बरे प्राणायामे श्वसन, वळवी चित विधिने
    नियंता गात्रांचा, पुलकित तनू, नीर नयने ।
    डुबे प्रीती डोही, प्रमुदित स्थिती ज्यास बघता
    यतीची, ते साक्षात परम अससी सत्य जगता ॥ २५ ॥


    त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः
    त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च ।
    परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं
    न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वं न भवसि ।। २६।।

    मराठी- तू सूर्य आहेस, चंद्र आहेस, वारा आहेस, अग्नी आहेस, पाणी आहेस, आकाश आहेस,पृथ्वी आहेस, आत्मा आहेस, असे मर्यादित शब्द प्रगल्भ लोक तुझ्याबद्दल वापरू देत, पण आम्हाला अशी एकही गोष्ट ठाऊक नाही ज्यात तू नाहीस.

    शशी वन्ही वारा दिनकर तसा तूच अससी
    धरित्री तू आत्मा जल नि नभही तूच अससी ।
    अशा व्याख्या मर्यादित सुबुध देती तुजप्रती
    जिथे तू ना होसी अणुहि नच जाणे मम मती ॥ २६ ॥


    त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा
    नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृतिः ।
    तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः
    समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमितिपदम् ।।२७।।

    मराठी- हे (भक्तांना) आश्रय देणार्‍या शंभो, तीन वेद (ऋग्वेद, यजु, साम), तीन अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती), तीन भुवने (भूः, भुवः, स्वः किंवा स्वर्ग, मृत्यु, पाताळ), आणि तीन देव (ब्रह्मा, विष्णु, महेश) यांचा (अ-उ-म् या) तीन वर्णांनी बोध करणारे, सर्व विपर्यासांवर मात करणारे व मंद ध्वनीसह चौथी अवस्था (तुरीय) दाखविणारे तुझे भवन असलेले ॐ हे पद मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील तुझी स्तुती करते.

    तिन्ही वेदां, देवां, भुवन, स्थिति, वा बोध करते
    तिन्हीं वर्णाद्वारे, सुगम बनती, मंद ध्वनि ते
    स्थिती चौथी तुर्या, भवन तव कार पद ते
    नुरे शंका, व्यक्ती समुह स्वरुपा व्यक्त करते २७


    भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महां
    स्तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम् ।
    अमुष्मिन्प्रत्येकं प्रविचरति देव ! श्रुतिरपि
    प्रियायास्मै धाम्ने प्रणिहितनमस्योऽस्मि भवते ।।२८।।

    मराठी- हे ईश्वरा, भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महादेव, भीम तसेच ईशान हे तुझ्या नावांचे जे अष्टक, त्यातील प्रत्येकात वेदांचा सुद्धा संचार आहे. त्यामुळे या माझ्या आवडत्या तेजाला (परमात्मस्वरूप असलेल्या तुला) लीन होऊन साष्टांग नमन करतो.

    महादेवा रुद्रा पशुपति भवा उग्र हि तसे
    तुला शर्वा भीमा म्हणति जन ईशानहि असे ।
    तुझ्या नावांमध्ये सकल श्रुति संचार करिती
    धराशायी अंगें नमन प्रिय तेजा पशुपती ॥ २८ ॥

    टीप- या अष्टकातील प्रत्येक नावासाठी वेगळी मूर्ती कल्पिलेली असून त्या शर्व-क्षितिमूर्ति, भव-जलमूर्ति, रूद्र-अग्निमूर्ति, उग्र-वायुमूर्ति, भीम-आकाशमूर्ति, पशुपति-यजमानमूर्ति, महादेव-चन्द्रमूर्ति, ईशान-सूर्यमूर्ति अशा आहेत. त्यांची मानवी शरीरातील स्थानेही वेगवेगळी आहेत.


    नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो
    नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः ।
    नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमो
    नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः ।।२९।।

    मराठी- ज्याला राने-वने आवडतात, जो अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, त्या (शंकरा) ला नमस्कार. हे मदनाचा नाश करणार्‍या शंभो, अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विस्तीर्ण असणार्‍या (तुला) नमस्कार. हे त्र्यंबका, अत्यंत प्राचीन आणि अत्यंत अर्वाचीन असणार्‍या (तुला) नमस्कार. ही सर्व रूपे ज्याची आहेत अशा तुला नमस्कार. सर्व जगताचा नाश करणार्‍या शंकरास नमस्कार.

    वनांची ज्या गोडी, बहु जवळ, जो, दूर असतो
    अणूपेक्षा छोटा, सकल जग व्यापून उरतो |
    जुना सर्वापेक्षा, नविनतम तो नित्य ठरतो
    अशी सारी रूपे, नमन लय-कर्त्यास करतो ॥ २९ ॥

    टीप- या श्लोकात चवथ्या चरणात ‘सर्वाय च नमः’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘हे सर्व जाणून तुला नमस्कार’ असा अर्थ होईल.


    बहुलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः
    प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः ।
    जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः
    प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः ।।३०।।

    मराठी- विश्वाच्या निर्मितीच्या वेळी ज्याचे ठायी रजो गुणाचे प्राबल्य असते त्या भवाला नमस्कार. विश्वाच्या संहाराचे समयी ज्याचे ठायी तमो गुणाचे प्राबल्य असते त्या हराला नमस्कार. सर्व लोकांच्या सुखासाठी ज्याचे ठायी सत्त्व गुणाचा उद्रेक होतो त्या मृडाला नमस्कार. त्रिगुणांपलिकडे असणार्‍या आणि अत्यंत तेजस्वी पद धारण करणार्‍या शिवाला नमस्कार.

    रज गुण वृद्धी विश्वा निर्मी, भवा नमना करू
    तम गुण वृद्धी विश्वा नाशी, हरा नमना करू ।
    जन सुख वृद्धी सत्त्व गुणे, मृडा नमना करू
    त्रिगुणरहिता तेजःपुंजा शिवा नमना करू ॥ ३० ॥


    कृशपरिणति चेतः क्लेशवश्यं क्व चेदं
    क्व च तव गुणसीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः।
    इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधात्
    वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् ।।३१।।

    मराठी- हे वरदात्या शंभो, अपूर्ण वाढ झालेले आणि क्लेशांना बळी पडलेले माझे मन कोठे, तर गुणांच्या सर्व सीमा ओलांडून जाणारे तुझे चिरंतन वैभव कोठे ? या विचाराने आश्चर्यचकित झालेल्या माझ्या भक्तीने मला ताकद देऊन तुझ्या चरणांवर शब्दरूपी पुष्पमालेची भेट चढवायला भाग पाडले.

    हतबल मन कोठे, त्रस्त नी पिंजलेले
    विभव सकल स्थायी गूण मागे गळाले ।
    बघुनि तव, थरारे चित्त हे, भक्ति भावे
    सबल तव पदी या शब्द हारां वहावे ॥ ३१ ॥


    असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे
    सुरतरु-वर-शाखा लेखनी पत्रमुर्वी ।
    लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
    तदपि तव गुणानामीश पारं न याति ।।३२।।

    मराठी- हे प्रभो, शारदा जरी समुद्राएवढ्या दौतीमध्ये काळ्या डोंगराएवढे काजळ (कालवून), कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी, पृथ्वीचा कागद (करून), सतत लिहीत राहिली, तरीसुद्धा तुझ्या गुणांच्या (वर्णना) पलिकडे जाणार नाही.

    जलधि दउत, शाई काजळी डोंगराची
    कलम सुर-तरूचे, पत्रिका धारिणीची । (कलम- लेखणी, धारिणी – पृथ्वी)
    सतत लिहित ब्राह्मी राहिली, खंड नाही (ब्राह्मी-शारदा)
    तव गुण लिहिताना सोडुनी ते न जाई ॥ ३२ ॥


    असुरसुरमुनीद्रैरर्चितस्येन्दुमौले-
    र्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।
    सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो
    रुचिरमलघुवृतैः स्तोत्रमेतच्चकार ।।33

    मराठी- देव, दानव, श्रेष्ठ मुनी यांनी पूजिलेल्या निर्गुण ईश्वराच्या – चंद्रशेखराच्या – गुणांचे माहात्म्य वर्णन करणार्‍या या रसाळ स्तोत्राची रचना सर्व गणांत प्रमुख असणार्‍या पुष्पदंत नावाच्या (गंधर्वा) ने मोठ्या वृत्तात केली.

    ऋषि-सुर-दनुजांनी पूजिले निर्गुणाला
    महति शशिशिराची वर्णिली ते रसाळा । (शशिशिर- शंकर)
    शिव-गण प्रमुखाने काव्य हे पुष्पदंते
    स्तुतिपर रचलेसे भक्तिचे दीर्घ वृत्ते ॥ ३३ ॥

    टीप- हे शेवटचे काही श्लोक मालिनी व इतर वृत्तात असले तरी येथे उल्लेखिलेले दीर्घ वृत्त पहिल्या २९ श्लोकांचे ‘ शिखरिणी ’ वृत्त आहे.


    अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्
    पठति परमभक्त्या शुद्धचित्तः पुमान्यः ।
    स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र
    प्रचुरतरधनायुः पुत्रवान्कीर्तिमांश्च ।।३४।।

    मराठी- जो मनुष्य शुद्ध मनाने व अत्यंत भक्तिभावाने हे शंकराचे निर्दोष स्तोत्र रोज पठण करील तो शिवलोकात शिवतुल्य होईल आणि इथे (ह्या इहलोकी) त्याला भरपूर धनसंपत्ती, आयुष्य, मुले आणि कीर्ती प्राप्त होईल.

    प्रतिदिन म्हणताहे स्तोत्र हे शंकराचे
    पुनित, मनुज चित्ते भक्तिने पूर्ण साचे
    शिवसम शिवलोकी होतसे, येथ प्राप्ती
    बहुत धन मिळे त्या पुत्र आयुष्य कीर्ती ॥ ३४ ॥

    *************************

    -- धनंजय बोरकर.

    (९८३३०७७०९१)

      August 23, 2022


  • काश्मिर

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांचा काश्मिर प्रश्नावरील हा लेख शेअर करत आहे...


    गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफ़ेक झाली, असे प्रसंग चारपाच वर्षापुर्वीही आपल्याला बघायला ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकापुर्वी इंतेफ़ादा असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे, की काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्त्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकुळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे, की अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्त्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चीम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरूण किरकोळ बॉम्ब वा दगडफ़ेकीने इस्त्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक मोडस ऑपरेन्डी बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातूल फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणानिती संयुक्तपणे राबवित आहेत.

    या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर इंतेफ़ादा शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फ़ुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनिती योजनाबद्ध रितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले, की भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार. किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फ़ारूख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख इंतेफ़ादा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. इंतेफ़ादा ही रणनिती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनिती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त, यांच्याशी इस्त्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर आराफ़त यांनी, आडोश्याने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. आराफ़त त्यात सक्रीय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या हमास संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण आराफ़तच करीत होते. आज फ़ारूख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?

    फ़रक इतकाच आहे, की इस्त्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्त्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफ़ेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्‍यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर आराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफ़ेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेनेनॉन कधी इस्त्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फ़त इस्त्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात तोयबा वा मुजाहिदीन नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्त्रायल इतके खोलवर करते, की त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्त्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्त्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?

    इस्त्रायलची ही रणनिती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा इंतेफ़ादा सुरू झाला, मग इस्त्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एकदोन आठवड्याचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो, की इस्त्रायलच्या सीमेपलिकडचा प्रदेश पुर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमिनदोस्त होऊन जातात. सहाजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या हिजबुल्ला वा अरबी सेनेचा कणा पुर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपुर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उध्वस्त करून टाकली जाते, की इस्त्रायल कितीही गाफ़ील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्त्रायलची कुरापत काढण्याचा विचार इंतेफ़ादा पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. सहाजिकच वर्ष दिडवर्ष इस्त्रायलला शांततापुर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला, की पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या हिजबुल्लाला लढायची खुमखुमी येते. पुन्हा इंतेफ़ादा सुरू होतो. पुन्हा इस्त्रायल आधीच्याच रणनितीचा अवलंब करते. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळुहळू भारतालाही काश्मिर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी इस्त्रायली युद्धनितीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी इंतेफ़ादाच आहे.

    --- भाऊ तोरसेकर

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम.

      June 8, 2017


  • नॅशनल व्होडका दिवस

    व्होडका हे मूळचे रशियन मद्य. व्होडकाला स्वत:ची अशी चव नाही. तो ज्या पेयात मिसळाल त्यात बुडून जातो आणि ती त्याची चव बनून जाते.

      October 4, 2021