वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज देशात सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळा आहे आणि त्याची झळ प्रत्येक कुटुंबाला बसतेच पण त्यात जास्त त्रास सहन करावा लागतो त्या कुटुंबातील स्त्रीला आणि मग बाजारातील वस्तूंचे भाव कडाडलेले बघितले की साहजिकच तिच्या कपाळाला आठ्या पडतात.
November 21, 2013

पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं.
January 4, 2022
बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत.
July 9, 2015
दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.
November 21, 2025
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.
चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.
नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.
दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.
थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.
अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....
आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.
थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.
हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.
मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .
November 9, 2015
क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
August 15, 2021
इथे हरणं खूप. रस्त्याच्या कडेला, मोटारींच्या धडकेने मरून पडलेली हरणं हे तर कायमच दिसणारं दृश्य. संध्याकाळी, रात्री गाडी चालवताना त्यांचं भान ठेवावं लागतं. बहुतेक सारा रस्ता दाट झाडीतून आणि माळरानांतून जाणारा. त्याला काही ठिकाणी रस्त्याच्या कडेचं कुंपण, पण बराचसा भाग कुंपणाशिवायचा. त्यामुळे हरणांना रस्त्त्यावर यायला काहीच अडचण नसते. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात, एखाद्या टेकडीच्या उतारावर, चार-पाच हरणांचा कळप चरतांना बरेचदा नजरेस पडतो. चरता चरता बरेचदा हरणं रस्ता ओलांडून पलीकडे जातात. कधी कधी गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात, एखादं चुकार हरीण अवचीत् रस्त्यात उभं असलेलं दिसतं. अचानक आलेल्या प्रकाशझोतामुळे आंधळं झालेलं ते हरीण, कावरंबावरं होऊन गोंधळल्यासारखं जागच्या जागी उभं रहातं आणि मग अचानक भानावर येऊन लांब उडी मारून बाजूच्या अंधारात मिसळून जातं. काही वेळा रस्त्याच्या कडेला, गाडीच्या दिव्याच्या झोताच्या किनार्याशी, काजव्यासारखे डोळे चकाकतात आणि अंधारात हरणं स्तब्ध उभी आहेत असं लक्षात येतं. बहुतेक ड्रायव्हर्स सावधपणे गाडी चालवत असतात आणि हरणांना रस्ता ओलांडू देतात; पण कधी कधी गाडी पटकन थांबवता येत नाही किंवा बावचळलेलं हरीण नेमकं गाडीवर येऊन थडकतं. माझ्याच गाडीवर दोनदा अशी हरणं येऊन थडकली होती; सुदैवाने दोन्ही वेळां फारशी दुखापत न होता, ती हरणं उठून पळून जाऊ शकली.
बहुतेक वेळां कळपांमध्ये फक्त माद्या आणि पिल्लंच दिसतात. एकदा मात्र मला एक एकांडा नर दिसला होता. सकाळी १०-१०॥ च्या सुमारास मी लॅबला चाललो होतो. रस्ता मोकळा होता. अचानक माझ्या पुढ्यात सुमारे १०० फुटांवर, बाजूच्या झाडीतून एक चांगला डौलदार, शिंगवाला नर बाहेर आला आणि रस्त्यावर चालूं लागला. त्याची पाठ माझ्याकडे होती. मी गाडी हळू केली. त्याने एकवार मागे वळून माझ्या गाडीकडे पाहिलं मग दोन्ही बाजूला मान वेळावून अंदाज घेतला आणि एक मोठी झेप घेऊन, जसा आला तसाच तो बाजूच्या झाडीत नाहीसा झाला.
**
तब्बल तीन वर्षं या यु.एस.रूट नंबर ६ वर मी आठवड्यातले पाच-सहा दिवस ये जा केली. दिवसा रात्रीच्या बहुतेक सर्व वेळा आणि ऋतुचक्राच्या सार्या चाकोरीतून या यु.एस.रूट नंबर ६ची सारी रूपं बघीतली. रोज बघून बघून, रस्त्यावरचे चढ उतार, वळणं, आजूबाजूचा परिसर, ठरावीक झाडं, शेतं, सारं काही परिचयाचं होऊन गेलं. तरी देखील हा इतका ओळखीचा झालेला रस्ता, रोज नव्या वळणावर एक नवं रूप सादर करून मला विस्मीत करून सोडायचा. त्याच्या नित्य नव्या अविष्कारानं शेवटच्या दिवसापर्यंत मला मोहीत करून सोडलं.
मोठाल्या शहरांतल्या रस्त्यांवर आपण कधीच एकटे नसतो. सहप्रवाशांची गर्दी, वाहनांची झुंबड़, एकंदर कोलाहलाने आपलं आणि रस्त्याचं असं नातं कधी फारसं जुळतच नाही. किंबहुना रस्ता म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याचं निर्जीव साधन असतं. गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो निर्जीव रस्ता शेअर करून आपण नुसते यंत्रासारखे पळत असतो. परंतु यु.एस.रूट नंबर ६ वर माझ्या गाडीतून प्रवास करताना, रोजचा दीड तास मी एकट्याने या रस्त्याच्या सहवासात घालवला. तुरळक वाहतूक, गर्दीचं नामोनिशाण नाही, कर्कश्श कोलाहल नाही आणि आजूबाजूला बघावं तिकडे निसर्गाचं नित्य नवं रूप! त्यामुळे यु.एस.रूट नंबर ६चा, हा ३०मैल लांबीचा छोटासा तुकडा मला माझा वाटावा, यात काही नवल नाही.
३२०५ मैल लांबीच्या, १४ राज्यांतून जाणार्या आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत जाणार्या, ह्या यु.एस.रूट नंबर ६ वर, कधी तरी या टोकापासून त्या टोकापर्यंत गाडीने प्रवास करण्याची माझी जबरदस्त इच्छा आहे. माझ्या माहितीतल्या त्या छोट्याश्या ३० मैलाच्या तुकड्यासारखाच सारा यु.एस.रूट नंबर ६ सुंदर आहे का, हे जाणून घेण्याचं मला मोठंच कुतूहल आहे. पण तो प्रवास करेपर्यंत, माझ्या परिचयाचा हा “माझा यु. एस. रूट नंबर ६”, मला “मर्मबंधातल्या ठेवीसारखा” जपून ठेवायचा आहे.
July 30, 2015
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक
षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.
या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.
आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.
खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.
भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.
आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.06.2017
June 13, 2017
फणसा सारखा बाहेरून कडक आणी आतून अगदी नरम अशी म्हण प्रचलित आहे.असा हा सर्वांचा आवडता फणस ज्याला कोकणचा मेवा देखील म्हणतात.
ह्याचे कापा,बरंका किंवा रसाळ आणी भाजीचा असे तीन प्रकार असतात.साधारण पणे उन्हाळ्यात पिकणारे हे फळ तसे सर्वांच्याच आवडीचे नाही का?
फणसपोळी,फणसाचे चिप्स,गुळ खोबरे तांदूळ व गरे घालून केली जाणारी गोड सांजण,गोव्यात मिळणारा कच्चा फणस ज्याला कुवला म्हणतात त्याचे केले जाणारे चटणी वजा भाजी ज्याला आम्ही सपशेल म्हणतो,किंवा मग नुसतेच गरे काढुन खा ना त्यात हि एक आगळी वेगळी मजा आहे.
ह्याचा ५०-१०० फूट उंच वृक्ष असतो व ह्याच्या खोडालाच हे फणस लागतात जे १-३ फूट लांब व ५-२५ किलो वजन भरणारे देखील असतात.फणस बाहेरून हिरवा बारीक उंचवटे युक्त व आत पिवळ्या रंगाचे मऊ गरे व त्यात आठळया असलेला असतो.
कच्चा फणस हा तुरट गोड,थंड व कफवातवर्धक व पित्तनाशक असतो.तर पिकलेला फणस हा चवीला गोड,थंड व कफकर व वातपित्तनाशक असतो.
चला आता ह्याचे घरगुती उपयोग पाहू:
१)फणसाचे दुध हे गाठी व सूज कमी करते व जखम भरायला मदत करते.
२)अशक्तपणा,वजन कमी होणे अशा तक्रारींवर २ फणसाचे गरे,१/४ चमचा मिरीपूड ,१/४ चमचा सैंधव हे मिश्रण जेवणानंतर खावे.पण भुक लागत नसल्यास हा प्रयोग करू नये.
३)तोंड कडू होणे,कोरडे पडणे,पोटात गरम वाटणे,अशा तक्रारींवर फणसाचे १-२ गरे भरल्या पोटावर खावे.
४)बरंका अर्थात रसाळ फणसाचे गरे वाटून गरम करून हे मिश्रण पिकत येणाऱ्या गळूवर बांधावे म्हणजे गळू पिकून फुटेल.
५)शरीरावर झालेली जखम भरून येण्यासाठी रसाळ फणसाचा गर वाटून जखमेवर बांधावा म्हणजे रक्तस्राव थांबतो व जखम देखील लवकर भरते.
फणस खायचा अतिरेक केल्यास जुलाब,सर्दी,कृमी,खोकला होतो.
फणसाच्या अतिखाल्ल्याने होणाऱ्या अजीर्णावर खोबरे खावे.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 22, 2016
सुमारे दिडशे वर्षांपूर्वीची एक दंतकथा आहे. एका राजाने चार मजली भव्य राजवाडा बांधला. राजवाड्यावरील छतावर त्याने तांबा या धातूचे चांगले पाच सेंटीमीटर जाडीचे पत्रे घातलेले होते. राजवाड्यात सुखाने नांदत असताना एका मोहाच्या क्षणी राजा, एका स्त्रीच्या मोहजालात गुरफटला.
December 20, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti