वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.
1) पैशांचे भांडवल
2) वेळेचे भांडवल
3) मनुष्यबळाचे भांडवल
अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.
प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.
मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो.
वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच. अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
पूर्वी घरगुती शिकवण्या घेणे, कपडे शिवून देणे, खाद्यपदार्थ किंवापोळ्या करून देणे, पाळणाघर चालवणे यांसारखे अल्प भांडवलाचे व्यवसाय उपलब्ध होते;पण या प्रकारच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती.
आता असे व्यवसाय उपलब्ध आहेत की ज्याला पैशांच्या भांडवलाची गरज भासत नाही किंवा अत्यल्प भांडवलाची गरज भासते. यांना जास्त करून वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाची गरज भासते. तसेच या व्यवसायांना बर्यापैकी प्रतिष्ठा असते किंवा या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.
1) विमा प्रतिनिधीः-
भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात. आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.
2) म्युच्युअल फंड सल्लागारः-
म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीन साधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
3) विक्री प्रतिनिधीः-
हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्या कंपन्याहा मार्ग अनुसरतात.
4) सामुपदेशक (Councilors):-
मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.
5) प्रशिक्षक (Trainer) :-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल
6) सल्लागार (Consultants):-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.
असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीही स्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी, महिला, गृहिणी, तसेच निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय ते पुर्ण वेळ (Full Time), अर्ध वेळ (Part Time) किंवा स्वतःच्या सवडीप्रमाणे केव्हाही करू शकतात.. तसेच नोकरी करणारे पण हे व्यवसाय करू शकतात.
यासाठी ऑफीस, दुकान, गोडाऊन वगैरेची गरज नसते.भांडवली गुंतवणुक जवळ जवळ नसते. इतर व्यापार्यांना ठेवावे लागतात तसे अनेक प्रकारचे हिषोब ठेवावे लागत नाहीत. बहुतेक आर्थिक व्यवहार हे कंपनी व ग्राहक यांचेमधे परस्पर होत असतात. विक्री प्रतिनिधींना फक्त कमीशन मिळत असते किंवा फी मिळत असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे व्यवसाय फार सोपे असतात.
ज्यांना लोकांना भेटायची आवड आहे, लोकांशी संवाद साधणे आवडते, उत्तम सादरीकरणाचे कौशल्य आहे, लोकांना आपले म्हणणे पटवण्याची कला आहे (Convincing Power) ते लोक या व्यवसायात यशस्वी होतात असे आढळून आले आहे.
तरी मराठी लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करावे हीच इच्छा व अपेक्षा!
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
लोकशाहीतील निवडणूकांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असते. भारतीय लोकशाहीत एकगठ्ठा मतदान किंवा व्होट बॅंकेची संकल्पना भलतीच लोकप्रिय आहे.
अनेक पक्षांनी आपल्या व्होट बॅंक बनवून ठेवलेल्या आहेत. उमेदवारांनीही आपल्या व्होट बॅंक बनवलेल्या आहेत. या व्होट बॅंकांचे पालनपोषण हे उमेदवारांचे अत्यंत प्रिय असे काम. या पालनपोषणातूनच एकगठ्ठा मतदान होतं.
एकगठ्ठा मतदान म्हणजे विशिष्ठ जाती, समुदाय किंवा कोणतातरी समान धागा असलेल्या लोकांना एक आश्वासन देऊन त्यांची सर्वांची मते आपल्यालाच पडतील, अशी व्यवस्था करणे.
एखाद्या कुटुंबाकडून एकगठ्ठा मतदान केल्याचे कधी ऐकलेय? आजकालच्या `हम दो हमारा एक' आणि एकत्र कुटुंबपद्धत मोडून गेलेल्या दिवसात एकाच कुटुंबाकडून फारतर किती मतांची अपेक्षा करणार? पाच-दहा-पंधरा यापेक्षा जास्त नक्कीच नाही. पण बिहारच्या किशनगंज मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणूकीत एक वेगळ्याच प्रकारचं एकगठ्ठा मतदान झालं. हे एकगठ्ठा मतदान होतं ते एकाच कुटुंबाचे.
या कुटुंबात ८५ लोक आहेत आणि ते एकाच घरात, एकाच छताखाली राहतात. या एकाच कुटुंबाला पटवले तर या मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला एकगठ्ठा ४७ मते मिळू शकतात. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या घराचा उंबरठा झिजवला.
हे एक मुस्लिम कुटुंब आहे. त्याचे प्रमुख आहेत मोहमंद नजीर. या कुटुंबात ३० स्त्रिया आणि ५५ पुरुष आहेत. त्यातले ३५ लहान मुले, मुली आहेत. येत्या काही काळात या ३५ मुलामुलींमधले काही जण या मतदार यादीत सामील होतील आणि मग या कुटुंबातील मतदारांची संख्या आणखी वाढेल.
नजीरभाईंचे भाऊ मोहमंद अशफाफ यांची पत्नी अंजिरा खातून या तेव्हा गावच्या सरपंच जोत्या. पण घरातले सर्व निर्णय नजीरभाईच घेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय त्यांनीच विचार करुन घेतला असणार. ते सांगतील त्यालाच या कुटुंबातील सर्व लोकांनी मतदानही केलं असणार हे उघड आहे.
या गावात नजीरभाईंचे कुटुंब तसे प्रतिष्ठीत आहे. गावातील अनेक समस्या, तंटे, वादविवाद सोडवण्यासाठी हे कुटुंब पोलिसांना मदत करते असे पोलिसही मान्य करतात.
हे गाव बिहारची राजधानी पाटण्यापासून ३५० किलोमीटर दूर आहे. हे गाव पुर्णिया जिल्हयात असले तरी ते लोकसभेच्या किशनगंज मतदारसंघात मोडते. मतदारसंघाच्या सीमांची फेरआखणी झाल्यानंतर ते किशनगंज मतदारसंघात गेले आहे. या गावात बहुसंख्य मतदार हे मुस्लिमच आहेत व त्यांचे प्रमाण ६६.७ टक्के आहे. त्यामुळे केवळ नजीरभाईंच्या कुटुंबातूनच नव्हे तर संपूर्ण गावातून एकगठ्ठा मते मिळतील का याची चाचपणीही काही उमेदवारांनी केली. या एकगठ्ठा मतदानामुळे या गावाची, तसेच नजीरभाईंच्या कुटुंबाच्या मागण्या मान्य करुन घेण्याची क्षमता मात्र बरीच वाढली आहे.
ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत.
श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत.
बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे फॉर्मिंग दागिने महिलावर्गात विशेष प्रिय ठरले आहेत.
एक काळ असा होता की, विवाहानंतर सौभाग्य लेणं म्हणून ठसठशीत मोठं मंगळसूत्र, चार सोन्याच्या बांगड्या-पाटल्या, कानातील वजनदार झुमके वगैरे घालणार्या स्त्रिया सर्रासपणे दिसायच्या. किंबहूना असे दागिने घालून मिरवणार्या स्त्रिया “घरंदाज” समजल्या जायच्या. आजही टिव्ही मालिकांमध्ये जुन्या काळातल्या स्त्रिया भरगच्च आणि भारदस्त दागिने गालून मिरवताना दिसतात.
जसा काळ बदलला. महिलांना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध झाली, आणि त्यांनीही विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरुवात केली. महिला नोकरी - व्यवसायात आगेकुच करु लागल्या. त्यांच्या हातात स्वकमाईचा पैसा शिल्लक राहु लागला. परंतू सोन्याच्या दागिन्यांची भारी उपजत हौस असली तरी ही जोखीम अंगावर बाळगणं त्यांना धोक्याचं वाटु लागलं. मग खोट्या दागिन्यांचे... सोन्याचा मुलामा दिलेले दागिन्यांचे दिवस सुरु झाले. मात्र हे खोटे दागिने फार काळ टिकत नसत. ते खोटे आहेत हेसुद्धा जाणकाराच्या पटकन लक्षात येई.
नव्या तंत्रज्ञानाने जसं सगळं जग व्यापुन टाकलं तसं हे दागदागिन्यांचं क्षेत्रही व्यापायला सुरुवात केली. १ ग्रॅम सोन्यातल्या दागिन्यांची सद्दी सुरु झाली. दिसायला ठसठशीत पण वजनाला आणि खिशाला हलके असलेल्या या दागिन्यांवर महिलामंडळ खुष झालं आणि बघताबघता हा उद्योग मोठी भरारी घेऊ लागला.
कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांचे नाजुक कलाकुसर असलेले असंख्य नमुने तयार होऊ लागले. या दागिन्यांच्या जादूने महिलावर्गाला संमोहीत केलं नसतं तरच नवल. लग्न समारंभासारख्या प्रसंगी एकच मोठा दागिना वापरण्यापेक्षा तेवढ्याच सोन्यात शुद्ध सोन्याच्या कसाचे चार-पाच नावीन्यपूर्ण दागिने वापरणं ही कल्पना महिलांना अतिशय आवडली. खिशाला परवडतील अशा थोडक्या पैशात, नवनवीन नाजूक कलाकुसरीचे दागिने मिळु लागल्यामुळे मोलकरणीपासून ते उच्चभ्रु वर्गातील महिलांपर्यंत सर्वांनीच त्यांचं स्वागत केलं. वर्ष-दोन वर्ष पैसे साठवून एखादा दागिना पदरात पडण्यापेक्षा दर दोन - चार महिन्याने एक नवीन दागिना घरी आणणं महिलांना अधिक सोईचं ठरु लागलं.
कमी वजनातील हे दागिने पूर्ण तांब्याचे बनवलेले असतात. त्यावर इलेक्ट्रो फॉर्मिंग मशिनने सोन्याचा एक मायक्रॉनचा म्हणजे अत्यंत सुक्ष्म अशा सुवर्णकणांचा थर दिला जातो. पूर्ण नियंत्रणाकाली दिलेल्या स्प्रेमुळे हा थर एक सारखा व पक्का बसतो.
शुद्ध सोन्यात घडविलेले दागिने कधीही चेपतात किंवा वाकतात. मात्र या फॉर्मिंग दागिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तांब्यावरचे असल्याने जास्त दणकट व टिकाऊ असतात. त्यामुळे त्यांच्या दबले जाण्याची किंवा वाकण्याची अजिबात भिती नसते. रोजच्या वापराने त्यांची थोडीफार झीज होते. या दागिन्यांवरच सुवर्णकणांचा पातळ मुलामा दिला असल्याने फार जोरात व सातत्याने ते दगड, फरशी, लाकूड वगैरेसारख्या कठीण पृष्ठभागावर घासले गेले तरच त्यावर चरे उमटण्याची शक्यता असते. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे या दागिन्यांवरही घाम, अॅसिड, सौंदर्यप्रसाधने वगैरेंचा परिणाम होतो. मात्र गरम पाण्याचा या दागिन्यांवर काहीही परिणाम होत नाही.
लक्षवेधी असे हे कमी वजनातील फॉर्मिंगचे दागिने आता बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडसखाली उपलब्ध झाले आहेत.
अस्सल मराठी म्हणता येईल अशा “सेनोरिटा” ब्रॅंडने अस्सल मराठमोळी रेंज कमी वजनात आणली आहे. अगदी पेशवाई थाटाचे दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत आणि तेसुद्धा अतिशय कमी किंमतीत. फॉर्मिंग दागिन्यांमध्ये मंगळसुत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कर्णफुले, पायल, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या वगैरे सर्वकाही भरपुर डिझाईन्समध्ये आणि ते ही आपल्या बजेटमध्ये म्हणेच रु. ४९९ ते रु. ३९९९ पर्यंत उपलब्ध आहेत.
“स्वर्ग” या आणखी एका नावाजलेल्या ब्रॅंडनेही हे कमी वजनातील फॉर्मिंग दागिने बाजारात आणले आहेत.
यावेळी मात्र आपण मतदान करणारच !!!!
बदल घडवायची ताकद.. तुझ्या मतात आहे…
नभाचे नभाला प्रस्तुत हे खास गाणे… तरुणाईला मतदानाकरिता साद घालण्यासाठी..
शब्दरचना आणि संगीतकारः विशाल आणि समीर
गायकः विशाल राणे
नभाचे नभाला – विशाल, समीर, सई, ऋषिकेष आणि सागर
व्हिडिओ एडिटिंगः पूजा प्रधान
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ द्वारे जनहितार्थ प्रकाशित
भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” देशात आज शेतकर्यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे.
“कसला विचार करतेयस संयोया? ” संयोगिता कागदपत्रे बघत विचार करण्यात गुंग झाली होती ते बघून विक्रमजीत थट्टेत म्हणाला.
“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनमधून मॅचुअरिटी बेनेफिट म्हणून साधारण ७५ लाख ते अगदी १ कोटी मिळतील धरु. टर्म प्लॅनला मॅचुअरिटी बेनेफिट नसतो, पण एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला आणि बाकीची १,४१,३५६ रुपये ही रक्कम इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवली आणि त्यावर फक्त १२ टक्केने रिटर्न मिळाले तरी एन्डावमेंटपेक्षा १ कोटी जास्त मिळतात. प्रत्यक्षात मागील सोळा वर्षात काही म्युचुअल फंडांनी सरासरी २० टक्के वार्षिक या हिशेबाने रिटर्न दिलेले आहे. त्यानुसार तर चक्क ५ कोटी जास्त मिळू शकतात.”
“बापरे, खूपच जास्त तफावत आहे. पण म्युचुअल फंडाचा वैधानिक इशारा असतो, मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. हे समजून गुंतवणूक करत असाल तरच चांगलं, ” विक्रमजीतने सावध पवित्रा घेतला.
“जोखीम असते खरं, म्हणून १,४१,३५६ पैकी काही पीपीएफ या सुरक्षित साधनामध्ये आणि काही इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवावे. प्रमाण किती असावं ते प्रत्येकाने आपल्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीनुसार ठरवावं, तरीही जास्तच लाभ मिळेल. ”
“तू बराच अभ्यास केलेला दिसतोय. आधी इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय याची उजळणी करु आणि सरासरी २० टक्के वार्षिक रिटर्न म्हणजे कम्पाऊंडेड ॲन्युअलाईज्ड ग्रोथ रिटर्न अर्थात सीएजीआर म्हणजे काय याचाही खुलासा करुन घेऊ. ”
“ठीक, इक्विटी म्युचुअल फंड हा गुंतवणूकदारांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, म्हणजे या रकमेतून अनेक कंपन्यांचे अनेक शेअर्स विकत घेतो. या शेअर्सचे भाव जसे कमी-जास्त होतात तसे त्या फंडाच्या गुंतवणूकीचे मूल्यही रोजच्या रोज कमी-जास्त होते. फंडाच्या गुंतवणूकीचे हे मूल्य भागिले त्या फंडाने इश्यू केलेले युनिट म्हणजे त्याचे प्रति युनिट नक्त मालमत्ता मूल्य म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा संक्षेपाने एनएव्ही. म्युचुअल फंडाची नवी योजना लॉंच होते तेव्हा युनिटचे मूल्य १० रुपये असते, नंतर फंडाच्या कामगिरीनुसार या युनिटचे मूल्य म्हणजेच एनएव्ही किती ते ठरते. समजा फंडाच्या लॉंचनंतर त्याच्या एकूण गुंतवणूकीचे मूल्य काही वर्षांनी बरोबर दुप्पट झाले तर त्याचा एनएव्ही १० रुपयावरुन २० रुपये होईल. आपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला त्या फंडाचे युनिट ह्या एनएव्हीप्रमाणे मिळतात. समजा एका फंडाचा एनएव्ही २० रुपये आहे आणि आपण त्यात ४०,००० रुपये गुंतवले तर आपल्याला त्या फंडाचे ४००००/२० बरोबर २००० युनिट मिळतील. हे युनिट आपण त्या म्युचुअल फंडाकडून विकत घेतो आणि विमोचन म्हणजे रिडम्पशन करतानाही युनिट म्युचुअल फंडाला परत करतो आणि त्यावेळेस जो एनएव्ही असेल त्यानुसार पैसे मिळतात. म्युचुअल फंडातून दोन प्रकारे लाभ मिळतात. एक लाभांश किंवा डिव्हिडंड पर्याय, यात वेळोवेळी लाभांश मिळतो, मात्र लाभांश मिळेलच याची हमी नसते. दुसरा पर्याय म्हणजे वृध्दी किंवा ग्रोथ ऑप्शन. यात फंडाच्या एनएव्हीत वाढ होते आणि युनिट्सचे विमोचन करताना या वाढलेल्या भावामुळे फायदा मिळतो. अर्थात शेअरमार्केट कोसळले तर एनएव्ही कमीसुध्दा होतो. एक उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंड ही म्युचुअल फंड योजना बघू. जानेवारी १९९५मध्ये हा फंड लॉंच करण्यात आला. त्यावेळेस १ लाख रुपये याच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये गुंतवले असते तर १० रुपये प्रति युनिट या किमतीने फंडाचे १०,००० युनिट्स मिळाले असते. २ जूलै २०१५ला या फंडाचा एनएव्ही होता ४७० रुपये म्हणजे त्याच १०,००० युनिटचे जर त्या दिवशी विमोचन केले असते तर १०,००० युनिट्स गुणिले ४७० बरोबर ४७ लाख रुपये मिळाले असते. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून ही ४७ लाख इतकी रक्कम मिळाली असती. ”
“बरोबर, १ लाखावर ४६ लाखांचा फायदा दिसतो, पण तो सुमारे २० वर्षात मिळाला आहे लक्षात घेतले तर वार्षिक साधारण २० टक्के सीएजीआर हा दर होतो. म्युचुअल फंडाच्या एनएव्हीमध्ये एखाद्या वर्षी १० टक्के वाढ होते, कधी २० टक्के तर कधी उणे २०, ३० टक्के म्हणजे घटसुध्दा. संपूर्ण कालावधीसाठी सरासरीने वाढीचा एकच दर काय होता ते सीएजीआरने कळते. मूळ भांडवल, विमोचन करताना मिळालेली रक्कम आणि गुंतवणूकीचा कालावधी यांचा हिशेब करुन हा सीएजीआर काढला जातो. ”
“काही महत्वाच्या बाबी. २० टक्के इतका सीएजीआर देणारा एचडिएफसीसी इक्विटी हा एकच फंड नाही तर इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत. बिर्ला सनलाईफ इक्विटी फंड, आयसीआयसीआय टॅक्स प्लॅन, फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडांच्या वृध्दी पर्यायामध्ये दीर्घ कालावधीत उत्तम लाभ मिळालेला आहे. सर्व फंड एकसमान रिटर्न देत नाहीत. त्यांची तुलनात्मक कामगिरी, ते किती जोखीम घेतात इत्यादी काही निकषांनुसार कोणत्या म्युचुअल फंडात गुंतवणूक करायची ते ठरवता येते. तेव्हा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने फंडाची निवड करावी. शेवटी पुन्हा म्युचुअल फंडातील गुंतवणूकतून पुढेही असा लाभ मिळेल याची हमी नाही आणि त्यात जोखीम असते.”
(सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)
मी मराठी Live मध्ये दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख.
उदय कुलकर्णी
झाडीपट्टी म्हणजे आजुबाजूला गर्द झाडी (जंगल) आणि त्याजंगलातून जाणारी एक निमुळती वाट आणि अचानक एक छोटसं गाव येतं आणि त्या गावात नाटक होते. त्यालाच झाडीट्टी असे म्हणतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात मिळून हा महोत्सव सर्व शेतकरी वर्ग दिवाळी ते होळी या चार महिन्यात उत्सवासारखा साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचारांवर आणि जीवनप्रवासावर एका चित्रपटातूनतरी कथा मांडता येण्यासारखी नाही; तरी पण बाळकडूच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार मराठी माणसांसाठीच्या अपेक्षित असलेल्या काही संकल्पना “बाळकडू”च्यानिमित्ताने जोमाने आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडूने आणि लेखकाकडून करण्यात आला आहे.
“गितू, इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय ते बघितलं, उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये जानेवारी १९९५ ला १ लाख रुपये गुंतवले असते आणि २ जूलै २०१५ला त्याचे पूर्ण रिडम्प्शन केले असते तर ४७ लाख रुपये मिळाले असते हे बघितलं. इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत याची दखल घेतली. मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते, हा म्युचुअल फंडाचा वैधानिक इशाराही लक्षात घेतला. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून हा लाभ झाला खरा, पण विम्याचे हप्ते सहसा दिले जातात वार्षिक पध्दतीने. मग तसंच २५ वर्ष जर इक्विटी म्युचुअल फंडात नियमित गुंतवणूक करत राहिलो असतो तर किती लाभ झाला असता?” विक्रमजीतने विचारले.
“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर बाकीचे १,४१,३५६ रुपये वार्षिक इतके इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात. विमा हप्ता मासिक, त्रैमासिक, वार्षिक असा दिला जातो. म्युचुअल फंडातही गुंतवणूक या पध्दतीने करता येते. दर महिन्याला नियमितपणे म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी ही फार लोकप्रिय पध्दत आहे. तेव्हा एसआयपी म्हणजे काय ते आधी बघू, एन्डावमेंटपेक्षा जास्त लाभ किती होऊ शकेल ते नंतर बघू,” संयोगिता म्हणाली.
“शिस्तशीर जाऊ, ” विक्रमजीतची मस्करी.
“एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्या प्रकारे मासिक विमा हप्त्याची रक्कम किंवा बॅंकेतील रिकरींग डिपॉझीटची रक्कम बॅंक खात्यातून परस्पर वळती होते, तसंच एसआयपीद्वारेही बॅंक खात्यातून ठरावीक रक्कम, ठरवलेल्या म्युचुअल फंडात परस्पर गुंतवता येते. याची फ्रिक्वेन्सी दरमहा किंवा त्रैमासिक असते. सहसा दरमहा हा पर्याय निवडला जातो. महिन्यातील १०, १५ इत्यादी एका विशिष्ट तारखेला गुंतवणूकदारांच्या बॅंक अकाऊंटमधून ठरलेली रक्कम डेबीट होते आणि ती ठरवलेल्या म्युचुअल फंडाकडे वळती केली जाते. एसआयपीचा फायदा हा की दरमहा नियमित स्वरुपात म्युचुअल फंडात गुंतवणूक होत राहते. कमीत कमी ५०० रुपयांपासून आपण एसआयपी सुरु करु शकतो. काही फंडात त्याहीपेक्षा कमी रकमेची एसआयपी सुरु करु शकतो. इक्विटी म्युचुअल फंडाबाबत त्याचा एनएव्ही कमी-जास्त होत राहतो. शेअरमार्केट वर गेले तर सहसा एनएव्ही वाढतो, खाली आले तर तो कमी होतो. एनएव्ही कमी झाला असेल तर आपल्याला म्युचुअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि एनएव्ही वर गेला असेल तर कमी युनिट मिळतात, थोडक्यात कधी जास्त भावात खरेदी तर कधी कमी भावात खरेदी यामुळे कॉस्ट ॲव्हरेजिंग होते. ”
“एकरकमी गुंतवणूक ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय आहे. ह्या एसआयपीची मुदत किती वर्ष असते? ”
“ती आपण ठरवू तशी, १ वर्ष, २ वर्ष, १० वर्ष इत्यादी किंवा आपण बंद करा सांगेपर्यत कायमची अशी मुदत राहू शकते. म्युचुअल फंडाला आधी सूचना देऊन कधीही ती बंद करता येते, तसेच मधेच पैसे हवे असतील तर युनिट्सचे रिडम्प्शन करुन पैसे घेऊ शकतो. एसआयपी मात्र पुढे सुरु ठेवू शकतो. ”
“आता एन्डावमेंट प्लॅनच्या तुलनेत किती लाभ मिळेल ते बघू. ”
“एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर वार्षिक १,४१,३५६ रुपये गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात, म्हणजे दरमहा सुमारे ११७५० रुपये. एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये दरमहा ११७५० रुपयांची एसआयपी १० जानेवारी १९९५ला सुरु केली असती आणि जमा झालेल्या सर्व युनिट्सचे ६ जुलै २०१५ला रिडम्प्शन केले असते तर ५ कोटी ८१ लाख रुपये मिळाले असते, म्हणजे एन्डावमेंट प्लॅनपेक्षा सुमारे ५ कोटी जास्ती. एसआयपीद्वारे आपण गुंतवलेल्या एकूण २८ लाख ९० हजार ५०० रुपयांवर हा लाभ झाला असता. फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमधील एसआयपीमधूनही असा चांगला लाभ मिळाला असता. २० वर्ष ६ माहिने इतक्या दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीतून हा लाभ मिळाला आहे. समजा एचडिएफसीसी इक्विटी फंडातील हीच एसआयपी १० जानेवारी १९९५ ऐवजी १० जानेवारी १९९९ला सुरु केली असती तर गुंतवलेली रक्कम झाली असती एकूण २३ लाख २६ हजार ५०० आणि रिडम्प्शन घेऊन मिळाले असते २ कोटी १९ लाख ५४ हजार रुपये. लवकरात लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे किती आवश्यक आहे ते यातून कळतं. बॅंकेतील मुदतठेवीवर चक्रवाढ व्याज मिळतं तेव्हा पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो, तसाच इथे दिसतो. ”
“विमा हा विषय जरा बाजूला ठेऊ. पण एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये १९९५ ला फक्त २००० रुपयांची २० वर्ष मुदतीची एसआयपी सुरु केली असती आणि मार्च २०१५ मध्ये रिडम्प्शन घेतले असते तर ४ लाख ८० हजाराच्या गुंतवणूकीतून १ कोटी रुपये मिळाले असते. २००० रुपयांची एसआयपी सुरु करणं तर कोणालाही सहज शक्य आहे. तसंच इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. ”
वैधानिक इशारा: म्युचुअल फंडाच्या मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. (सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)
टीप: लेख मी मराठी लाईव्ह दैनिकात ११ ऑगस्ट २०१५ ला प्रकाशित झालेला आहे.
उदय कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti