(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • प्रवास ९७ व्या घटना दुरुस्तीचा

    31376महाराष्ट्र राज्याच्या अन् पर्यायाने देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून, सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा विचार गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.

    १९०४ मध्ये सर्वप्रथम भारतात सहकार कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर अनेकवेळा कायद्यात बदल झाले. १९०४ नंतर १९१२ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट अस्तित्वात आला.

    या पार्श्वभूमीवर नुकतेच संसदेने सहकारविषयक १११ वी घटना दुरुस्ती मंजूर केल्याने, त्यानुसार प्रत्येक राज्याला आपल्या कायद्यात योग्य ते बदल करावे लागणार आहेत. संबंधित घटना दुरुस्ती विधेयक हे जरी डिसेंबर २०११ मध्ये मंजूर झालेले असले, तरी त्याची सुरुवात डिसेंबर १९९०-९१ मध्येच झालेली होती. प्रस्तुत पुस्तकात श्री. विद्याधर अनास्कर यांनी हा प्रवास अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडला आहे. सहकार क्षेत्रातील प्रत्येकाने आणि इतरांनीही हा प्रवास जाणून घेणे आवश्यक आहे. एखादे विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण त्या अंतिम विधेयकामधील वाक्यरचनेचाच विचार करतो. परंतु त्यामागील शासनाचा उद्देश आणि त्यासंबंधात झालेल्या चर्चेचा अभ्यास केल्यास कायदा करणार्‍यांच्या मनामध्ये नेमके काय आहे ते समजाऊन घेणे सोपे जाते. तसेच एखादे विधेयक मंजूर होते म्हणजे नेमके काय होते, त्याची प्रक्रिया कशी चालते. त्यामागे कितीजणांचे हातभार लागतात, याची कोणतीच माहिती सामान्यांना नसते.

    संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या घटना दुरुस्ती विधेयकामधील तरतुदींनुसार ज्यावेळी राज्याचा कायदा दुरुस्त करण्याची वेळ येईल, त्यावेळी या सहकार क्षेत्रातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांने त्यामध्ये आपल्या विचारांचे योगदान देणे आवश्यक आहे. परंतु हे कधी शक्य होईल? ज्यावेळी या कार्यकर्त्यांना या घटना दुरुस्ती मागील संपूर्ण पार्श्वभूमी समजेल त्याचवेळी हे शक्य होईल आणि हे महत्त्वाचे काम प्रस्तुत पुस्तकाने केले आहे.

    लेखक श्री. विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मनोगतामध्येच १९०४ पासूनच्या सहकार कायद्यांचा आढावा घेतला आहे. सध्याच्या कायद्याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले आहे. विधेयकाच्या २२ वर्षांच्या प्रवासाचे चित्र रेखाटताना थोडक्यात परंतु अत्यंत प्रभावीपणे हा प्रवासपट आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. स्थायी समितीचे कामकाज, विधेयकातील मुद्यांवर होणारी चर्चा, उच्चस्तरीय समितीसह इतरांचे अहवाल, निष्कर्ष, केंद्रशासनाची भूमिका व शेवटी संसदेच्या सभागृहांचा कौल इत्यादी वर्णने त्यांनी प्रभावीपणे रेखाटली आहेत.

    तसेच या पुस्तकात संदर्भासाठी लेखकाने उच्चस्तरावरील समितीच्या अहवालापासून स्थायी समितीचा अहवाल, सदस्यांमध्ये व शासकीय अधिकार्‍यांमध्ये प्रत्यक्ष झालेली चर्चा सारांश रूपाने दिली आहे. तसेच या घटना दुरुस्तीसंबंधात लेखकाने केलेली अभ्यासपूर्ण चिकित्सा हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा प्रकारे एका विधेयकायचे प्रवास वर्णन रेखाटणारा हा पहिलाच प्रयत्न असावा.

    या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुस्तकावर अभिप्राय दिलेला आहे.

    हे पुस्तक सहकार क्षेत्रातील सर्व अभ्यासकांना, तसेच सहकार विभागातील अधिकार्‍यांना, जागृत सभासदांना आणि विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनाही अत्यंत उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.

    मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील तमाम कार्यकर्त्यांसाठी श्री विद्याधर अनास्कर यांनी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध केले आहे. हे इ-पुस्तक जरुर डाउनलोड करा.

    प्रकाशक
    दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई
    भारतीय क्रिडा मंदिर, चौथा मजला, वडाळा
    मुंबई - ४०००३१.

    आवृत्ती पहिली : जून २०१२
    आवृत्ती दुसरी : जून २०१२

    किंमत : रु. १५०/-

    -- मराठीसृष्टी व्यवस्थापन

  • नाट्य-चित्र कानोसा – अनुमती

    एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती (जीवलग माणूस) जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी त्याचा सोबती किंवा जीवश्च-कंठश्च म्हणून त्याला वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. पण एवढं करुनही ज्यावेळी “ती व्यक्ती” कोणताच प्रतिसाद देत नाही तेव्हा तीचा जीवलग निराश, हाताश होऊन शेवटी हतबल होतो.

  • “नॉएडा” चा धडा!

    २२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणार्‍या ‘ग्रेटर नॉएडा‘ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं!

  • नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय

    प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास‍ मिळणार आहे.. महापालिका , केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून जून्या पंपिंग स्टेशनच्या जागेत संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून नुकतेच नाशिकच्या इतिहास संग्रहालयाचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांची हस्ते संपन्न झाले.

    अश्मयुगातील रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पौराणिक नाशिक, सातवाहन काळापासून मोगल, ब्रिटीशांच्या काळातील नाशिक ते आज प्रगतीकडे झेप घेणारे नाशिक शहर आणि जिल्हयाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न साकार होत असून अशा प्रकारचे एका शहराचा समग्र इतिहास दाखविणारे हे देशातील पहिले संग्रहालय आहे.

    नाशिकच्या अस्तिवात प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत कार्यरत आहे. संग्रहालयाकरिता नाशिकच्या इतिहासाचे उत्खनन करुन अनेक काळातील नाशिकचा शोध घेण्यात आले आहे.दोन लाख वर्षापासूनचा त्रोटक इतिहास असला तरी येथे त्याचा त्रोटक संदर्भ घेवून प्रत्यक्षात ६० हजार वर्षापूर्वीचे पुरावे देखील प्रतिकात्मक स्वरुपात मांडण्यात आले आहे.

    या सा-यांचा इतिहास संग्रहालयात आढळेल. या शिवाय ६० आसनी छोटा रंगमंच असून तेथे नाशिकच्या इतिहासाची माहिती देणारे अर्धातासाचे चार लघुपट दाखविण्याची व्यवस्था आहे. श्री व्यास रिसर्च सेंटरच्या वतीने हे संशोधन, संकलन करुन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती दिनेश वैदय , देवेंद्र कापडणीस, अनिता जोशी यांनी दिली. १ कोटी ६७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात पोस्टर्स, प्रतिकृती, पोथ्या, हस्तिलिखिते, छायाचित्रे, भांडी, शस्त्रे , म्युरल्स या माध्ययमातून हा इतिहास साकारण्यात येत आहे.

    नाशिकचा रंजक इतिहास

    • मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
    • राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
    • इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
    • वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
    • ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
    • तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
    • गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
    • अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .

    संग्रहालयाची वैशिष्ट्ये

    या संग्रहालयात ६० हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडण्यात येत आहे. आदिवासीचे वादय, पोशाख, वासुदेव, नंदी, वीर, पिंगळा यांची मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येत आहे. नाशिक मधील हस्तलिखित भांडार, गणितापासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे विषय, सात कालखंडात नाशिकचे बदलत गेलेली नावे. नाशिकचे रस्ते व त्यासंबंधीची बलुतेदारी, गल्ल्यांची नावे, प्रदर्शित करण्यात येत आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून नाशिकचा इतिहास सादर करण्यात येत आहे.

    या संग्रहालयात १२७ पिच्चर्स फ्रेम ,३५ मूर्ती, १७६ माहिती फ्रेम ,१८० नाणी, तलवार तसेच १४ पेटींग्ज लावण्यात आल्या आहेत.

    ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच ….

    -- अशोक साळी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
    मंगळवार, ५ जुन, २०१२
    ('महान्यूज' मधून साभार)

  • भारतरत्न, दादासाहेब फाळके आणि वाद

    भारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात.

  • स्पर्धा परिक्षेतील डोकेबाज प्रश्नोत्तरे

    स्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्‍या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे

  • शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

    आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?

  • आसाम प्रश्न व पाकिस्तान – सावरकरांच्या नजरेतून

    आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे.

  • नाट्य-चित्र कानोसा – “७२ मैल-एक प्रवास”

    आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.

  • गुंतवणुकदारांना सावधगिरीचा ईशारा

    झटपट श्रीमंत होण्याचा मोह अनेकांना असतो. कमीत कमी वेळात भरपुर पैसा मीळवावा. केलेल्या गुंतवणुकीवर झटपट चांगला लाभ किंवा परतावा/ प्रॉफीट मिळावा असा लोभ अनेकांना असतो. या लोभापायीच अशा गोष्टी घडत असतात. या प्रकारच्या योजनांचा अभ्यास केल्यावर त्यांचा एक विषिष्ट पॅटर्न माझ्या लक्षात आला आहे.